शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती; आमदारकीही जाणार नाही, आज काय घडलं?
2
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
3
आता मनमानी चालणार नाही! रुग्णालयांना आधीच सांगावा लागणार आयसीयू-व्हेंटिलेटरचा खर्च; 'यांची' मंजुरीही आवश्यक
4
थरारक घटना! टेकऑफनंतर काही मिनिटांतच Air India विमानाचा यू टर्न; हवेत अडकला प्रवाशांचा श्वास
5
सैराटची पुनरावृत्ती! आंतरजातीय विवाहामुळे बदल्याची आग; बापानेच केली गर्भवती लेकीची हत्या
6
रस्त्यांवर झाडू मारतोय भारतीय 'सॉफ्टवेअर डेव्हलपर'! महिना सव्वा लाखाची कमाई; कंपनी का देते इतके पैसे?
7
विधवा वहिनीचं दीरासोबतच सुरू झालं अफेअर अन् अचानक घरातून झाली गायब! एक महिन्यानंतर जे समोर आलं... 
8
तुम्ही वापरत असलेला चार्जर FAKE तर नाहीये ना? कसा ओळखायचा ओरिजनल चार्जर, टाळू शकता मोबाइलचं होणारं नुकसान
9
Mumbai Crime: मुंबईतील धक्कादायक प्रकार! चालत्या लोकलमधून मुलीला खाली फेकलं; Video व्हायरल, आरोपीला पकडलं
10
भीषण अपघात! इंडोनेशियात डिव्हायडरला धडकून बस महामार्गावर उलटली, १६ जणांचा मृत्यू
11
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
12
बॉलिवूडचे चर्चेतले चेहरे अक्षय खन्ना-सनी देओल २९ वर्षांनंतर एकत्र दिसणार? 'या' सिनेमाची चर्चा
13
Budh Gochar 2025: २०२५ ला निरोप देताना 'या' ७ राशींचे नशीब चमकणार, आयुष्यात येणार सुवर्णकाळ
14
लग्नाच्या आदल्या रात्री वडील ओरडले; नवरदेवाच्या लागलं मनाला, वरातीऐवजी घरातून निघाली अंत्ययात्रा!
15
कोट्यधीश होण्याचे स्वप्न आता होणार पूर्ण! २१X१०X१२ हा फॉर्म्युला वापरा; ५१ व्या वर्षी व्हाल मालामाल
16
KVP Scheme: पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम; विना जोखीम 'इतक्या' महिन्यांत तुमचे पैसे होतील दुप्पट
17
केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू अजमेर दर्ग्यावर चादर चढवणार; म्हणाले, "दुआ करने जा रहा हूं..."
18
भाडं वाढणार; १००, २००, ५०० कोटी नाही तर, 'इतक्या' कोटींचा होणार रेल्वेला बंपर फायदा, जाणून घ्या
19
एस एस राजामौलींच्या 'वाराणसी'चं बजेट १३०० कोटी? प्रियंका चोप्रा म्हणाली, "अर्धे पैसे माझ्या..."
20
शरीफ उस्मान हादीचा मारेकरी देश सोडून पळाला? बांगलादेश पोलिसांनी सत्य परिस्थिती केली स्पष्ट
Daily Top 2Weekly Top 5

वाळू वाहतुकीवर तहसीलदारांचा लगाम

By admin | Updated: February 13, 2017 05:11 IST

महाड तालुक्यातील सावित्री खाडीमध्ये मोठ्या प्रमाणात वाळूचे उत्खनन केले जाते. परवाना असतानादेखील कमी परवाना घेऊन जास्त

दासगाव : महाड तालुक्यातील सावित्री खाडीमध्ये मोठ्या प्रमाणात वाळूचे उत्खनन केले जाते. परवाना असतानादेखील कमी परवाना घेऊन जास्त प्रमाणात वाळूची वाहतूक करणाऱ्यांना लगाम लावण्यासाठी रायगड जिल्हाधिकाऱ्यांनी एक आदेश काढला. त्याच आदेशाचे पालन करत महाडचे तहसीलदार यांनी तालुक्याच्या टोलनाका या ठिकाणी तीन शिफ्टमध्ये तालुक्यातील सर्व तलाठ्यांना तपासणीसाठी तैनात केले. यामुळे वाळू नेणाऱ्या वाहनांची तपासणी सुरू झाली व विनापरवाना होणाऱ्या वाहतुकीला मोठ्या प्रमाणात लगाम लागले. जिल्हाधिकाऱ्यांच्या या आदेशाने वाळूचोरांचे धाबे दणाणले आहेत.महाड तालुक्यातील सावित्री खाडीही संपूर्ण महाराष्ट्रामध्ये काळ्या सोन्याची खाण म्हणून प्रसिद्ध आहे. या खाडीमध्ये बांधकामासाठी उत्तम दर्जाची काळी वाळू निघत असल्याने मुंबईसह महाराष्ट्राच्या कोनाकोपऱ्यातून या वाळूला मोठ्या प्रमाणात मागणी आहे. दर वर्षी या वाळूउपशासाठी निविदा निघतात. काही वर्षांपूर्वी ट्रेझरद्वारे या खाडीमधून मोठ्या प्रमाणात उत्खनन केले जात असे. यंदा डिसेंबर २०१६ ते सप्टेंबर २०१७ या कालावधीसाठी महाड तालुक्यातील या सावित्री खाडीमधून सहा व्यावसायिकांना हातपाटी वाळूउपशासाठी परवाने देण्यात आले आहेत. परवाना कमी काढून उपसा मोठ्या प्रमाणावर करणे व त्याची वाहतूकदेखील मोठ्या प्रमाणात विनापरवाना करून शासनाच्या कोट्यवधी रुपयांच्या महसुलाला चुना लावण्याचा गोरखधंदा या ठिकाणी सुरू होता. जिल्हाधिकारी शीतल उगले-तेली यांनी संपूर्ण रायगड जिल्ह्यामध्ये आदेश काढून मुख्य ठिकाणी अशा प्रकारे होणाऱ्या वाळू वाहतुकीच्या तपासणीसाठी नाके बसवण्याचे आदेश तहसील कार्यालयांना दिले. त्याप्रमाणे महाड तालुक्यासह जिल्ह्यांच्या १५ ठिकाणी नाके बसवले आहेत. या ठिकाणी तीन शिफ्टमध्ये तालुक्यातील सर्वच तलाठ्यांच्या पाळी लावल्या, हा नाका ७ फे ब्रुवारीपासून सुरू झाला असल्याचे तहसीलदारांनी सांगितले. खाडीतून भरलेली, येणारी वाळूची गाडी या नाक्यावर थांबवून त्याच्या परवान्याची तपासणी करून सोडण्यात येणार असून, जास्त वाळू आणि कमी परवाना असणाऱ्या वाहनांवर गुन्हा दाखल करण्यात येणार आहे.सध्याच्या या तपासणी नाक्यामध्ये महिला तलाठ्यांच्याही ड्युट्या लावण्यात आल्या असून, त्यांना दिवसाच्या पाळीमध्ये समाविष्ट करून घेण्यात आलेला आहे. याअगोदर याच ठिकाणाहून शेकडो गाड्या ट्रक वाळूची वाहतूक करत होत्या. मात्र, नाका बसल्यापासून दिवसात दोन किंवा तीनच ट्रक वाळू या ठिकाणाहून बाहेर पडत आहे. या तपासणी नाक्यासाठी महसूल कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी पोलीस बंदोबस्त पुरविण्यात आलेला आहे.