शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

वाळू वाहतुकीवर तहसीलदारांचा लगाम

By admin | Updated: February 13, 2017 05:11 IST

महाड तालुक्यातील सावित्री खाडीमध्ये मोठ्या प्रमाणात वाळूचे उत्खनन केले जाते. परवाना असतानादेखील कमी परवाना घेऊन जास्त

दासगाव : महाड तालुक्यातील सावित्री खाडीमध्ये मोठ्या प्रमाणात वाळूचे उत्खनन केले जाते. परवाना असतानादेखील कमी परवाना घेऊन जास्त प्रमाणात वाळूची वाहतूक करणाऱ्यांना लगाम लावण्यासाठी रायगड जिल्हाधिकाऱ्यांनी एक आदेश काढला. त्याच आदेशाचे पालन करत महाडचे तहसीलदार यांनी तालुक्याच्या टोलनाका या ठिकाणी तीन शिफ्टमध्ये तालुक्यातील सर्व तलाठ्यांना तपासणीसाठी तैनात केले. यामुळे वाळू नेणाऱ्या वाहनांची तपासणी सुरू झाली व विनापरवाना होणाऱ्या वाहतुकीला मोठ्या प्रमाणात लगाम लागले. जिल्हाधिकाऱ्यांच्या या आदेशाने वाळूचोरांचे धाबे दणाणले आहेत.महाड तालुक्यातील सावित्री खाडीही संपूर्ण महाराष्ट्रामध्ये काळ्या सोन्याची खाण म्हणून प्रसिद्ध आहे. या खाडीमध्ये बांधकामासाठी उत्तम दर्जाची काळी वाळू निघत असल्याने मुंबईसह महाराष्ट्राच्या कोनाकोपऱ्यातून या वाळूला मोठ्या प्रमाणात मागणी आहे. दर वर्षी या वाळूउपशासाठी निविदा निघतात. काही वर्षांपूर्वी ट्रेझरद्वारे या खाडीमधून मोठ्या प्रमाणात उत्खनन केले जात असे. यंदा डिसेंबर २०१६ ते सप्टेंबर २०१७ या कालावधीसाठी महाड तालुक्यातील या सावित्री खाडीमधून सहा व्यावसायिकांना हातपाटी वाळूउपशासाठी परवाने देण्यात आले आहेत. परवाना कमी काढून उपसा मोठ्या प्रमाणावर करणे व त्याची वाहतूकदेखील मोठ्या प्रमाणात विनापरवाना करून शासनाच्या कोट्यवधी रुपयांच्या महसुलाला चुना लावण्याचा गोरखधंदा या ठिकाणी सुरू होता. जिल्हाधिकारी शीतल उगले-तेली यांनी संपूर्ण रायगड जिल्ह्यामध्ये आदेश काढून मुख्य ठिकाणी अशा प्रकारे होणाऱ्या वाळू वाहतुकीच्या तपासणीसाठी नाके बसवण्याचे आदेश तहसील कार्यालयांना दिले. त्याप्रमाणे महाड तालुक्यासह जिल्ह्यांच्या १५ ठिकाणी नाके बसवले आहेत. या ठिकाणी तीन शिफ्टमध्ये तालुक्यातील सर्वच तलाठ्यांच्या पाळी लावल्या, हा नाका ७ फे ब्रुवारीपासून सुरू झाला असल्याचे तहसीलदारांनी सांगितले. खाडीतून भरलेली, येणारी वाळूची गाडी या नाक्यावर थांबवून त्याच्या परवान्याची तपासणी करून सोडण्यात येणार असून, जास्त वाळू आणि कमी परवाना असणाऱ्या वाहनांवर गुन्हा दाखल करण्यात येणार आहे.सध्याच्या या तपासणी नाक्यामध्ये महिला तलाठ्यांच्याही ड्युट्या लावण्यात आल्या असून, त्यांना दिवसाच्या पाळीमध्ये समाविष्ट करून घेण्यात आलेला आहे. याअगोदर याच ठिकाणाहून शेकडो गाड्या ट्रक वाळूची वाहतूक करत होत्या. मात्र, नाका बसल्यापासून दिवसात दोन किंवा तीनच ट्रक वाळू या ठिकाणाहून बाहेर पडत आहे. या तपासणी नाक्यासाठी महसूल कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी पोलीस बंदोबस्त पुरविण्यात आलेला आहे.