शहरं
Join us  
Trending Stories
1
"इंग्रजीचा पुरस्कार अन् भारतीय भाषांचा तिरस्कार हे योग्य नाही, आपली भाषा..."; CM फडणवीसांचे राज यांना उत्तर
2
हैदराबादच्या बेगमपेट विमानतळाला बॉम्बने उडवण्याची धमकी; सुरक्षा यंत्रणा अलर्टवर, शोधमोहिम सुरू
3
पंतप्रधान नरेंद्र मोदी ३७ दिवस शांत बसले अन् आता..; मोदी-ट्रम्प चर्चेवर काँग्रेसचा निशाणा
4
डोनाल्ड ट्रम्प यांनी विचारलं, कॅनडातून परतताना अमेरिकेत थांबू शकता? पंतप्रधान मोदींनी दिला नकार, म्हणाले...
5
'मम्मीने दरवाजा उघडला, काशी काका आता आले अन्...'; 9 वर्षाच्या मुलाने सांगितले कशी झाली बापाची हत्या?
6
'आता पुन्हा शरद पवारांकडे जायचे नाही, असं ठरवलंय'; पवारांचा निष्ठावंत दुखावला, बळीराम काका साठेंनी मन केलं मोकळं
7
Swami Samartha: 'भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे' हे स्वामींचे वचन; पण आहे 'ही' एक अट!
8
रोहित शर्माच्या पत्नीचा पाठलाग करत घरापर्यंत पोहोचला, फोटोही काढू लागला, पाहतात रितिकाचा राग अनावर, त्यानंतर...  
9
हिंदी सक्तीवरून राज ठाकरेंचं महाराष्ट्रातील शाळांच्या मुख्याध्यापकांना खुलं पत्र, वाचा जसच्या तसं...
10
Israel Iran War : 'मोसाद'ची नवीन खेळी!, इराण अलर्टवर, नागरिकांना मोबाईलमधून WhatsApp डिलिट करण्याचे आदेश
11
नाशिकचे बडगुजर अखेर भाजपमध्ये; बावनकुळे यांनी केले स्वागत!
12
दूधवाल्याची चूक अन् छत्रपती संभाजीनगरजवळ कारसह दोन बस एकमेकांवर धडकल्या
13
हिंदीची सक्ती महाराष्ट्रात होऊ देणार नाही; मनसे प्रमुख राज ठाकरेंचा सरकारला इशारा
14
कुंडलीत ‘या’ स्थानी राहु-केतु आहेत? अपार धनलाभ, भरघोस भरभराट; कुणी काही वाकडे करू शकणार नाही!
15
AI Farming: शेतकऱ्यांच्या मदतीला एआय गडी; नुकसान टाळेल, नफाही वाढवेल!
16
IND vs ENG: गौतम गंभीर कुठेच दिसेना... टीम इंडियासोबत 'कोच' म्हणून VVS लक्ष्मण इंग्लंडमध्ये, पण का?
17
Sonam Raghuvanshi : चक्की चालवणारे सोनमचे बाबा कसे झाले करोडपती? कमाई एवढी की नातेवाईकांच्या नावावर खाती
18
अहमदाबाद विमान अपघाताबाबत मोठा खुलासा; तीन महिन्यांपूर्वी बदलले होते विमानाचे इंजिन...
19
पती, सासरच्या लोकांवर निराधार लैंगिक आरोप करणे हे मानसिक क्रौर्य: उच्च न्यायालय
20
पाकिस्तानच्या सिंधमध्ये जाफर एक्सप्रेसवर हल्ला, रेल्वे ट्रॅकवर भीषण स्फोट; ट्रेन रुळावरून घसरली

वाळू वाहतुकीवर तहसीलदारांचा लगाम

By admin | Updated: February 13, 2017 05:11 IST

महाड तालुक्यातील सावित्री खाडीमध्ये मोठ्या प्रमाणात वाळूचे उत्खनन केले जाते. परवाना असतानादेखील कमी परवाना घेऊन जास्त

दासगाव : महाड तालुक्यातील सावित्री खाडीमध्ये मोठ्या प्रमाणात वाळूचे उत्खनन केले जाते. परवाना असतानादेखील कमी परवाना घेऊन जास्त प्रमाणात वाळूची वाहतूक करणाऱ्यांना लगाम लावण्यासाठी रायगड जिल्हाधिकाऱ्यांनी एक आदेश काढला. त्याच आदेशाचे पालन करत महाडचे तहसीलदार यांनी तालुक्याच्या टोलनाका या ठिकाणी तीन शिफ्टमध्ये तालुक्यातील सर्व तलाठ्यांना तपासणीसाठी तैनात केले. यामुळे वाळू नेणाऱ्या वाहनांची तपासणी सुरू झाली व विनापरवाना होणाऱ्या वाहतुकीला मोठ्या प्रमाणात लगाम लागले. जिल्हाधिकाऱ्यांच्या या आदेशाने वाळूचोरांचे धाबे दणाणले आहेत.महाड तालुक्यातील सावित्री खाडीही संपूर्ण महाराष्ट्रामध्ये काळ्या सोन्याची खाण म्हणून प्रसिद्ध आहे. या खाडीमध्ये बांधकामासाठी उत्तम दर्जाची काळी वाळू निघत असल्याने मुंबईसह महाराष्ट्राच्या कोनाकोपऱ्यातून या वाळूला मोठ्या प्रमाणात मागणी आहे. दर वर्षी या वाळूउपशासाठी निविदा निघतात. काही वर्षांपूर्वी ट्रेझरद्वारे या खाडीमधून मोठ्या प्रमाणात उत्खनन केले जात असे. यंदा डिसेंबर २०१६ ते सप्टेंबर २०१७ या कालावधीसाठी महाड तालुक्यातील या सावित्री खाडीमधून सहा व्यावसायिकांना हातपाटी वाळूउपशासाठी परवाने देण्यात आले आहेत. परवाना कमी काढून उपसा मोठ्या प्रमाणावर करणे व त्याची वाहतूकदेखील मोठ्या प्रमाणात विनापरवाना करून शासनाच्या कोट्यवधी रुपयांच्या महसुलाला चुना लावण्याचा गोरखधंदा या ठिकाणी सुरू होता. जिल्हाधिकारी शीतल उगले-तेली यांनी संपूर्ण रायगड जिल्ह्यामध्ये आदेश काढून मुख्य ठिकाणी अशा प्रकारे होणाऱ्या वाळू वाहतुकीच्या तपासणीसाठी नाके बसवण्याचे आदेश तहसील कार्यालयांना दिले. त्याप्रमाणे महाड तालुक्यासह जिल्ह्यांच्या १५ ठिकाणी नाके बसवले आहेत. या ठिकाणी तीन शिफ्टमध्ये तालुक्यातील सर्वच तलाठ्यांच्या पाळी लावल्या, हा नाका ७ फे ब्रुवारीपासून सुरू झाला असल्याचे तहसीलदारांनी सांगितले. खाडीतून भरलेली, येणारी वाळूची गाडी या नाक्यावर थांबवून त्याच्या परवान्याची तपासणी करून सोडण्यात येणार असून, जास्त वाळू आणि कमी परवाना असणाऱ्या वाहनांवर गुन्हा दाखल करण्यात येणार आहे.सध्याच्या या तपासणी नाक्यामध्ये महिला तलाठ्यांच्याही ड्युट्या लावण्यात आल्या असून, त्यांना दिवसाच्या पाळीमध्ये समाविष्ट करून घेण्यात आलेला आहे. याअगोदर याच ठिकाणाहून शेकडो गाड्या ट्रक वाळूची वाहतूक करत होत्या. मात्र, नाका बसल्यापासून दिवसात दोन किंवा तीनच ट्रक वाळू या ठिकाणाहून बाहेर पडत आहे. या तपासणी नाक्यासाठी महसूल कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी पोलीस बंदोबस्त पुरविण्यात आलेला आहे.