शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातमध्ये निनावी पक्षांना ₹४३०० कोटींची देणगी..; राहुल गांधींचा निवडणूक आयोगावर हल्लाबोल
2
"हिंदू राष्ट्र म्हणजे केवळ हिंदू नाही, तर..."; समाजातील दुहीवर मोहन भागवतांचं स्पष्ट भाष्य
3
अचानक राजीनामा दिल्यानंतर, काय करतायत जगदीप धनखड? पत्नी वारंवार का जात आहे राजस्थानला?
4
हृदयद्रावक! "भाऊ, सर्वनाश झाला, आपला मुन्नू गेला..."; ढसाढसा रडत मोठ्या भावाला फोन
5
पंजाबमध्ये पुरामुळे कहर, नवोदय विद्यालयात ४०० मुले आणि शाळेतील कर्मचारी अडकले; पालक प्रशासनावर संतापले
6
"खू्प कर्ज झालंय..."; सचिन-शिवानीने आधी चार वर्षाच्या मुलाला विष दिलं अन् स्वतःला संपवलं; चिठ्ठीत काय?
7
युतीचा श्रीगणेशा! उद्धव ठाकरे सहकुटुंब राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपतीचं घेतले दर्शन
8
भारतावर 50% टॅरिफ लावून ट्रम्प यांनी स्वतःच्याच पायावर कुऱ्हाड मारली, आता लागणार अमेरिकेची 'लंका'! आला असा अहवाल
9
R Ashwin: आर. अश्विन आयपीएलमधून निवृत्त, फक्त विदेशी क्रिकेट लीगमध्ये खेळणार!
10
ऑनलाईन App वरुन ऑर्डर केलं जेवण अन् डिलिव्हरी बॉयच्याच पडली प्रेमात, आता केलं लग्न
11
अष्टविनायक चित्रपटातील साधीभोळी गणेशभक्त वीणा आता दिसते अशी, अनेक वर्षे होती चित्रपटांपासून दूर
12
"सूनेने गोळी मारून हत्या केली, माझा मुलगा रक्ताच्या थारोळ्यात पडलेला होता"; तीन महिन्यातच पतीची हत्या
13
अर्चनानंतर आता श्रद्धा तिवारी गायब...; कुटुंबानं मुलीचा उलटा फोटो दरवाजाच्या चौकटीला लावला
14
खळबळजनक! कॉन्स्टेबलने कुटुंबीयांच्या मदतीने पत्नीला जिवंत जाळलं, प्रकृती गंभीर
15
ChatGPT ने मुलाला आयुष्य संपवण्याचे ट्यूशन दिले, पालकांनी न्यायालयात सगळीच माहिती सांगितली
16
मुंबईच्या दिशेने मराठा मोर्चा: "शांततेचं आंदोलन कुणीच रोखू शकत नाही," मनोज जरांगेंचा निर्धार
17
"लोक ओरडत होते, मी दगड पडताना पाहिले, मला..."; वैष्णोदेवी मार्गावर नेमकं काय घडलं?
18
३६ दिवस डिजिटल अरेस्ट; सायबर ठगांनी निवृत्त एअरफोर्स अधिकाऱ्याकडून ३.२२ कोटी लुटले...
19
बाप्पाला आणताना, नेताना, पूजा करताना मूर्तीचा भाग 'दुभंगला' तर अशुभ? धर्मशास्त्र सांगते... 
20
गणेशोत्सवानिमित्त सांस्कृतिक कार्य विभागाच्या वतीने रील स्पर्धेचे आयोजन, प्रथम क्रमांकाला एक लाखांचे बक्षीस

शाळांचा दर्जा उंचावण्याची जबाबदारी शिक्षकांची

By admin | Updated: September 5, 2015 22:59 IST

राज्य शासनाने या वर्षात एक लाख शिक्षकांची भरती करण्याची केलेली घोषणा खोटी आहे. येत्या वर्षभरात अतिरिक्त ठरणाऱ्या दीड लाख शिक्षकांच्या पाठीशी आम्ही ठाम उभे राहू मात्र

रोहा : राज्य शासनाने या वर्षात एक लाख शिक्षकांची भरती करण्याची केलेली घोषणा खोटी आहे. येत्या वर्षभरात अतिरिक्त ठरणाऱ्या दीड लाख शिक्षकांच्या पाठीशी आम्ही ठाम उभे राहू मात्र त्यासाठी शिक्षकांनी आपल्या जबाबदारीचे भान ठेवत प्राथमिक व माध्यमिक शाळांतील शिक्षणचा दर्जा उंचावण्याची गरज आमदार सुनील तटकरे यांनी व्यक्त केली. इंग्रजी माध्यमांच्या शाळांच्या प्रभावापुढे निभाव लागण्याकरता शिक्षकांनाच पुढाकार घ्यावा लागेल असेही तटकरे यांनी रोहा येथे सांगितले.रायगड जिल्हा परिषदेचा आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण सोहळा रोह्याच्या डॉ. चिंतामणराव देशमुख शहर सभागृहात आमदार सुनील तटकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत व जिल्हा परिशद अध्यक्ष सुरेश टोकरे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला. कार्यक्रमाला आमदार जयंत पाटील, आमदार अनिल तटकरे, आमदार सुभाष पाटील, माजी आमदार विवेक पाटील, जिल्हा परिषद उपाध्यक्ष अरविंद म्हात्रे, शिक्षण सभापती भाई पाशिलकर, अर्थ सभापती चित्रा पाटील, समाज कल्याण सभापती गीता जाधव, महिला बालकल्याण सभापती प्रिया मुकादम, जिल्हा राष्ट्रवादी अध्यक्ष वसंत ओसवाल, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अविनाश गोटे आदी उपस्थित होते.सुनील तटकरे यांनी म्हणाले, गावाचा मान पूर्वी हा त्या ठिकाणच्या केंद्र शाळेमुळे होता. आता या शाळांमधील पट कमी होत चालल्याने या शाळांचे महत्व कमी होत चालल्याची खंत व्यक्त केली. आमदार जयंत पाटील यांनी, सन्मानित झालेल्या शिक्षकांनी डॉ. चिंतामणराव देशमुखांच्या भूमीत सन्मान झाल्याचा अभिमान बाळगला पाहिजे, असे सांगुन जिल्ह्यासह राज्यातील दीड लाख शिक्षक पुढील वर्षी अतिरिक्त ठरणार आहेत. त्यामुळे प्राथमिक व माध्यमिक शाळांतील शिक्षणाचा दर्जा उंचावला तरच अस्तित्व टिकवता येईल याचे भान ठेवण्याचे आवाहन केले.शिक्षणाधिकारी शेषराव बडे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. यावेळी जिल्ह्यातील प्राथमिक व माध्यमिक आदर्श शिक्षकांसह जिल्ह्यात शालांत परिक्षांमध्ये प्रथम तीन क्रमांकानी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. तसेच आय.एस.ओ. मानांकम प्राप्त केलेल्या शाळांनाही सन्मानित करण्यात आले. यावेळी शिक्षक व अधिकारी उपस्थित होते.$$्निजनता विद्यालयात कार्यक्रमरसायनी : जनता विद्यालयात विद्यार्थ्यांनी शालेय कामकाज प्रत्यक्ष करुन अध्यापनाची अनुभूती घेतली. अध्यापन, सभा, भाषणे, सूत्रसंचालन सर्व काही विद्यार्थ्यांनी केले. सभेमध्ये प्रथम डॉ. राधाकृष्णन यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन श्रीफळ विद्यार्थ्यांनीच वाढविले.