शहरं
Join us  
Trending Stories
1
Shaktipeeth Expressway: ...हा तर आर्थिक संकटाचा महामार्ग;  वित्त विभागाचा कर्जवाढीचा इशारा
2
विशेष लेख: एकनाथ शिंदे आणि अजित पवारांचे जमत का नाही?
3
वीज आणखी स्वस्त होणार; खरेदी खर्चातील ६६ हजार कोटींच्या बचतीमुळे दरांत कपात
4
जगभर: चीनमध्ये ५ मिनिटांच्या मिठीसाठी ६०० रुपये, ‘मॅन मम्स’ प्रकरण काय?
5
अग्रलेख: आता शक्तिपीठाचा मनोरा... राज्याला ते परवडणार आहे का?
6
हिंदीचा मुद्दा पेटला! सक्तीविरोधात राज ठाकरे, उद्धव ठाकरेंचे दोन वेगवेगळे मोर्चे
7
Maharashtra Rain: आधी हूल, आता पुरेपूर; सर्वदूर पावसाचे धुमशान, विदर्भ, मराठवाडा अन्  खान्देशात मुसळधार
8
मुंबईतले सर्वधर्मीय १५०० भोंगे उतरवले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मोहिमेला यश
9
कुरघोडी कसली? आक्षेप घेणे ही ‘वित्त’ची जबाबदारीच; मुख्यमंत्री फडणवीस यांनी मांडली भूमिका
10
लेख: सैरभैर जगाला हवा आहे ‘मुत्सद्दी मध्यस्थ’
11
एमएमआरसह महाराष्ट्रात आता टाटा पॉवरची वीज, नियामक आयोगाकडे अर्ज दाखल
12
...तर शेतकरी जातील काळ्या यादीत अन् पाच वर्षे मिळणार नाही कोणत्याच योजनेचा लाभ
13
राज्यात उद्धव ठाकरेंनीच स्वीकारले हिंदी सक्तीचे धोरण; उदय सामंत यांचा गंभीर आरोप
14
15 दिवसांत गाझा युद्ध संपणार! आता हमासच्या जागेवर कोण राज्य करणार? नेतान्याहू-ट्रम्प यांनी घेतला मोठा निर्णय
15
चीन-पाकिस्तानसोबतच्या 'तिकडी'ला बांगलादेशचा नकार! युनूस सरकारची भारताला मोठी ऑफर
16
आणीबाणीच्या काळात संविधानाच्या प्रस्तावनेत 'धर्मनिरपेक्ष', 'समाजवादी' शब्द जोडले गेले, समीक्षा  व्हावी; संघाची मागणी
17
"जय हिंद, जय भारत..."; आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातून शुभांशू शुक्ला यांचं पहिलं भाषण, काय म्हणाले...?
18
“इंदिरा गांधींनी आणीबाणी उठवली, पण मतचोरी करुन निवडणुका घेतल्या नाहीत”; काँग्रेसची टीका
19
अमेरिका, रशिया,यूएई, सौदी...; 'या' यादीत लवकरच भारतही येईल, सर्व काही 'सेट'
20
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान

प्राध्यापकांना एक वर्षापासून पगार नाही

By admin | Updated: September 8, 2015 00:01 IST

बी. एल. पाटील तंत्रनिकेतनच्या कर्मचाऱ्यांना गेल्या एक वर्षापासून पगारच मिळालेला नाही. एक वर्ष विनावेतन काम करावे लागल्यामुळे कर्मचाऱ्यांचे हाल होत आहेत. या कर्मचाऱ्यांनी १० सप्टेंबरपासून

खोपोली : बी. एल. पाटील तंत्रनिकेतनच्या कर्मचाऱ्यांना गेल्या एक वर्षापासून पगारच मिळालेला नाही. एक वर्ष विनावेतन काम करावे लागल्यामुळे कर्मचाऱ्यांचे हाल होत आहेत. या कर्मचाऱ्यांनी १० सप्टेंबरपासून उपोषण करणार असल्याचा इशारा दिला आहे.जुलै २०१४ ला व्यवस्थापनाने जुलै २०१५ ची प्रवेशप्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर पगार देण्याचे आश्वासन तंत्रनिकेतनच्या प्राध्यापकांना दिले होते. मात्र यावर्षीही प्रवेश कमी झाल्याचे कारण देवून, व्यवस्थापन पगार देण्याबाबत टाळाटाळ करीत आहे. प्रवेश कमी झाले त्यात आमचा काय दोष? असा प्रश्न कर्मचाऱ्यांना पडला आहे. तंत्रनिकेतनच्या प्राचार्यांनी प्राध्यापकांचे विनंती पत्रही घेतले नाही, त्यांना ते पोस्टाने पाठवावे लागले. व्यवस्थापनाने हटवादीपणाची भूमिका सोडून सर्वमान्य तोडगा काढावा, अन्यथा १० सप्टेंबरपासून उपोषणास बसण्याचा इशारा सुजात घोरपडे, एन. एन. जाधव, वैभव कांबळे, सिमंतिनी आपटे, संदीप गायकवाड, शीतल पाटील, शरयू पाटील, आप्पासाहेब रूपनर, वैशाली निकम यांनी एका पत्राव्दारे दिला आहे.खोपोली तंत्रनिकेतनमध्ये यंदा प्रवेश खूप कमी झाले आहेत. संस्थेवर पाच कोटींचे कर्ज झाले आहे. अशा परिस्थितीमध्ये तंत्रनिकेतन चालवणे कठीण झाले आहे. - दत्तात्रय मसुरकर, अध्यक्ष खालापूर ता. शिक्षण प्रसारक मंडळ