शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या महायुद्धानंतर प्रथमच युरोपावर युद्धाचे ढग; पोलंडने सीमेवर तैनात केले ४० हजार सैनिक
2
नेपाळची संसद भंग, निवडणुकीच्या तारखांची घोषणा; शुक्रवारी रात्री शेजारील देशात काय काय घडलं?
3
देशभरातील घरे होणार स्वस्त; ग्राहकांना थेट लाभ देण्याची क्रेडाईची मोठी घोषणा
4
UN परिषदेत १४२ देशांसह भारतानं उचललं मोठं पाऊल; अमेरिका अन् इस्रायलला बसला झटका, काय घडलं?
5
फवाद-वाणी कपूरचा 'अबीर गुलाल' भारतातही रिलीज होणार, पहलगाम हल्ल्यानंतर झाला होता बॅन
6
पोस्टाची जबरदस्त स्कीम; महिन्याला करा 'इतकी' गुंतवणूक देईल ₹४० लाखांचा रिटर्न, जाणून घ्या संपूर्ण गणित
7
आजचे राशीभविष्य- १३ सप्टेंबर २०२५: आर्थिक लाभाचा दिवस, पण वाणीवर संयम ठेवा
8
मराठा समाजाला अगोदर मिळालेले आरक्षण नकोय का? रद्द करायचे का?; ओबीसी नेते छगन भुजबळांचा सवाल
9
महाराष्ट्राविना देशाचा गाडा न चाले! देशात सर्वाधिक रोजगार, कंपन्या अन् पेन्शनधारक राज्यात
10
स्पाईसजेट विमानाचे चाक टेकऑफ घेताना निखळले; एकाच चाकावर मुंबईत लँडिंग, मोठी दुर्घटना टळली 
11
'महादेवी'चा निर्णय उच्चस्तरीय समितीने घ्यावा, सर्वोच्च न्यायालय; हत्तीण मठाकडे पाठविण्यास ‘पेटा’चा विरोध
12
विशेष लेख: ‘जेन झी’च्या डोक्यात ही खदखद कुणी भरली आहे? 
13
पतीचे भाकीत ठरले खरे ; डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्यावरून ठेवले नाव
14
जेन झीने महिलेच्या हाती सोपविली नेपाळची धुरा, एकमताने सुशीला कार्की नव्या पंतप्रधान
15
अग्रलेख: मान्सून तिबेटात, धस्स भारतात! मानवी उपद्व्यापच कारणीभूत
16
कुर्डूतील मुरुम उत्खनन बेकायदेशीरच आहे; पालकमंत्री जयकुमार गोरेंचा खुलासा
17
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मणिपुरला भेट देणार; पाच राज्यांचा दौरा 
18
चॅटजीपीटीनं त्याला पाठवलं मृत्यूच्या दारात; घशातील त्रास, AI ने काय दिला सल्ला?
19
‘भारत मोठा झाल्याची भीती वाटते म्हणून टॅरिफ लावला’; सरसंघचालक मोहन भागवतांचे मोठे विधान
20
केवळ शब्दांनी नव्हे, तर आपल्या मुलांना महात्मा गांधीजींप्रमाणे वर्तनातून शिकवा -मोरारीबापू

भराव करणाऱ्यांवर कारवाई करा- सावंत

By admin | Updated: March 20, 2017 02:14 IST

तालुक्यातील सरकारी जमिनींवर अनधिकृत भराव करून तेथील कांदळवनांची कत्तल करण्याच्या सर्रास घटना घडत आहेत.

अलिबाग : तालुक्यातील सरकारी जमिनींवर अनधिकृत भराव करून तेथील कांदळवनांची कत्तल करण्याच्या सर्रास घटना घडत आहेत. त्यांना अभय न देता त्यांच्यावर तातडीने पोलिसांत तक्र ार दाखल करावी, अशी मागणी येथील सामाजिक कार्यकर्ते संजय सावंत यांनी अलिबागच्या तहसीलदारांकडे केली आहे. त्यामुळे अनधिकृत भराव करणाऱ्यांचे चांगलेच धाबे दणाणले आहेत.अलिबाग तालुक्यातील अनधिकृत भरावांबाबत येथील सामाजिक कार्यकर्ते संजय सावंत यांनी प्रशासनाकडे वारंवार तक्र ार केली होती. शहाबाज येथे पीएनपी कंपनीने, बेलकडे येथे अलिबाग तालुका मीठ उत्पादक संस्थेने, रेवदंडा मोठा कोळीवाडा येथे संजय हवालदार यांनी सीआरझेडमध्ये येणाऱ्या सरकारी जागेत अनधिकृत मातीचा भराव करून अतिक्रमण केले आहे. हे तहसीलदारांच्या कागदपत्रांवरून सिध्द होत आहे. मग या व्यक्तींविरोधात तहसीलदार पोलिसांत तक्र ार दाखल करण्याचे आदेश का देत नाहीत असा प्रश्न सावंत यांनी १८ मार्चच्या तक्र ार अर्जात केला आहे. तहसीलदारांनी या अज्ञात व्यक्तींविरोधात पोलिसांत गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी सावंत यांनी केली आहे. तहसीलदारांनी विहित मुदतीत सरकारच्या १० आॅक्टोबर २०१३ च्या परिपत्रकामध्ये नमूद केल्याप्रमाणे त्यांच्यावर जबाबदारी निश्चित करण्यासाठी जिल्हाधिकारी रायगड यांच्याकडे अपिल करण्यात येईल, असे सावंत यांनी सांगितले. सरकारचे १० आॅक्टोबर २०१३ च्या परिपत्रकानुसार तहसीलदार अलिबाग यांनी अलिबाग कोळीवाडा येथील अनधिकृत भरावाबाबत अज्ञात व्यक्तींविरोधात अलिबाग पोलीस ठाण्यामध्ये ३ डिसेंबर २०१६ ला तक्र ार दाखल केली आहे. अशीच तक्र ार शहापूर-शहाबाज येथील अनधिकृत भरावाबाबत दाखल करण्यासाठी ग्रामविकास अधिकारी शहापूर यांना तहसीलसदारांनी आदेशीत केले आहे. विशेष म्हणजे या प्रकरणात प्रशासनाने कंपनीला १६ लाख ३३ हजार ७६ रु पयांचा दंड डिसेंबर २०१६ मध्ये ठोठावला होता. ही दंडात्मक रक्कम तत्काळ सरकारकडे जमा केली नाही तर पीएनपी कंपनीविरुध्द महाराष्ट्र जमीन महसूल संहिता १९६६ अन्वये पुढील कारवाई करण्याची नोटीसही पीएनपीला बजाविली होती. याचा अर्थ त्यांना आरोपी माहिती आहेत. मग त्यांना अभय का दिले जाते, असा प्रश्न सावंत यांनी केला आहे. (प्रतिनिधी)