शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
3
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
4
'फक्त एकाला मारणार, जो लाखांच्या...!'; लॉरेंस बिश्नोई गँगची पाकला धमकी, कुणावर निशाणा?
5
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
6
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
7
'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून द्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा आणि शेअर करा आकर्षक शुभेच्छा पत्रं!
8
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
9
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
10
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
11
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
12
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)
13
मैत्रिणीचे लग्न आटोपून घरी येताना अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, ९ जणांना अटक
14
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
15
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
16
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
17
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
18
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
19
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे

परस्परविरोधी भूमिकेमुळे प्रशासनावरच संशय, रायगडमध्ये कोरोनाचे चार संशयित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2020 00:40 IST

पनवेल तालुक्यामध्ये इराणमधून आलेले चार जण कोरोनाचे संशयित सापडले आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी प्रसारमाध्यमांना दिली.

अलिबाग : जगातील काही देशांमध्ये कोरोना व्हायरसने थैमान घातले असतानाच पनवेल तालुक्यामध्ये इराणमधून आलेले चार जण कोरोनाचे संशयित सापडले आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी प्रसारमाध्यमांना दिली. मात्र दोनच तासांमध्ये जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. प्रमोद गवई यांनी याचा इन्कार केला आहे. प्रशासनातील दोन्ही अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीमध्ये विरोधाभास असल्याचे दिसत आहे. या प्रकरणी नक्की कोण खरे बोलत आहे, याबाबत नागरिकांमध्ये संभ्रम आणि भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.अलिबागमधील काही पत्रकारांनी जिल्हाधिकारी निधी चौधरी यांची काही कामानिमित्त भेट घेतली. त्या वेळी त्यांनी पनवेल तालुक्यामध्ये चार जण हे इराणमधून आले आहेत. त्यांना सर्दी, खोकला आणि ताप आल्याने त्यांची तपासणी करण्यात आली. त्यानंतर त्या संशयितांच्या थुंकी आणि रक्ताचे नमुने पुण्यातील प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवण्यात आल्याचे चौधरी यांनी सांगितले. दरम्यानच्या कालावधीमध्ये रायगडचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. प्रमोद गवई हे अधिक तपासणीसाठी पनवेलला रवाना झाले होते.डॉ. गवई हे पनवेलला पोहोचल्यावर त्यांनी तेथील वैद्यकीय अधिकारी डॉ. पद्ममा बर्फे यांची भेट घेऊन संशयितांची केस हिस्ट्री तपासली. त्यांच्यामध्ये कोरोना व्हायरसची कोणतीच लक्षणे आढळली नाहीत. त्यामुळे त्यांच्या रक्ताचे आणि थुंकीचे नमुने पाठवण्याचा प्रश्नच नाही, असे डॉ. प्रमोद गवई यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. या संशयितांची भेट घेतली. त्यांना सायनसचा त्रास होता, आता त्यांची तब्येत ठीक आहे. संबंधित संशयितांबरोबर हस्तांदोलनही केल्याचे डॉ. गवई यांनी सांगून त्यांना कोरोना व्हायरसची लागण झाली नसल्याबाबत क्लीन चिट दिली.जिल्ह्याचे प्रमुख म्हणून जिल्हाधिकारी माहिती देतात तेव्हा ती विश्वसनीय असते, मात्र काही तासांतच आरोग्य विभागाने ते संशयित रुग्ण नव्हतेच, असे सांगून टाकले आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण झाला. जिल्हाधिकारी निधी चौधरी यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.>पुन्हा तपासणी का?ं११ फेब्रुवारी २०२० रोजी तीन नागरिक हे इराणहून मुंबईमध्ये आले होते, तर एक नागरिक हा २१ फेब्रुवारी २०२० रोजी आला होता, अशी माहिती डॉ. गवई यांनी दिली. त्या वेळी विमानतळावर जागतिक आरोग्य संघटनेच्या निकषानुसार स्कॅनिंग मशिन होते का, असाही प्रश्न आहे. स्कॅनिंग मशीन होते असे मानले तर आलेल्या रुग्णांची पुन्हा तपासणी का करण्यात आली, असाही प्रश्न उपस्थित केला जात आहे.