शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup 2025 IND vs PAK Final : ठरलं! इतिहासात पहिल्यांदाच भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल
2
'संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना NDRF निधीतून भरीव मदत द्या'; CM फडणवीसांची अमित शाहांकडे मागणी
3
इस्रायलची राजधानी तेलअवीव येथे कारमध्ये मोठा स्फोट, अनेक जण जखमी झाल्याची शक्यता
4
संकट अद्याप टळलेले नाही, पुढील २ दिवस पाऊस वाढण्याचा अंदाज; विदर्भ, मराठवाड्यात काय होणार?
5
लडाख हिंसाचारानंतर सोनम वांगचुक यांच्यावर मोठी कारवाई; सरकारने रद्द केला एनजीओचा परवाना
6
Saim Ayub : आफ्रिदीच्या जावयाला टक्कर देण्याच्या नादात फजिती; सर्वाधिक वेळा पदरी पडला भोपळा!
7
कोथरूड मारहाण प्रकरणात निलेश घायवळही आरोपी; दहशत वाढवण्यासाठी दिली होती पिस्तुल
8
Suryakumar Yadav Hearing On PCB Complaint : सूर्याला फक्त वॉर्निंग की... फायनल आधी होणार फैसला!
9
'शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी PM केअर फंड वापरा'; उद्धव ठाकरेंची सरकारकडे मोठी मागणी
10
कपड्यांवरून ट्रोलिंगबाबत अखेर अमृता फडणवीस यांनी सोडलं मौन, म्हणाल्या- "ज्या महिलेकडे..."
11
झुबिन गर्गच्या मृत्यू प्रकरणात नवं वळण; संगीतकार ज्योती गोस्वामीला अटक, अनेकांची चौकशी सुरु
12
Taskin Ahmed 100 Wickets : पाक विरुद्ध बांगलादेशी गोलंदाजाची कमाल! पहिल्याच षटकात साधला 'शतकी' डाव
13
“विद्यार्थ्यांची परीक्षा देण्याची मानसिकता नाही, MPSC पुढे ढकला”; कुणी केली सरकारकडे मागणी? 
14
Maharashtra Flood: “महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांना पूर्ण मदत करावी, मदतकार्याला गती द्यावी”; राहुल गांधींचे आवाहन
15
Asia Cup 2025 Final: सूर्यकुमार यादवच्या विरोधात पाकची तक्रार; टीम इंडियाचा कर्णधार फायनलला मुकणार? जाणून घ्या प्रकरण
16
लालबागचा राजा संकटात धावून आला; शेतकरी बांधव, पूरग्रस्तांना मंडळाकडून ५० लाखांची मदत घोषित
17
17 पैकी 12 जणांची मंत्रिमंडळातून होणार 'सुट्टी'! या राज्यात भाजप करणार मोठी 'सर्जरी'? मंत्रीपदासाठी या नव्या नावांची चर्चा!
18
VIDEO: दिसण्यावर जाऊ नका... काकांनी गायलेलं रोमँटिंक गाणं ऐका, नक्कीच त्यांचे 'फॅन' व्हाल
19
Video - बदल्याची आग! लिव्ह-इन पार्टनर झाला हैवान; Ex गर्लफ्रेंडला एक्टिव्हाने दिली धडक
20
Pranjal Khewalkar: रोहिणी खडसेंचे पती प्रांजल खेवलकर यांना पुणे न्यायालयाकडून जामीन मंजूर

परस्परविरोधी भूमिकेमुळे प्रशासनावरच संशय, रायगडमध्ये कोरोनाचे चार संशयित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2020 00:40 IST

पनवेल तालुक्यामध्ये इराणमधून आलेले चार जण कोरोनाचे संशयित सापडले आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी प्रसारमाध्यमांना दिली.

अलिबाग : जगातील काही देशांमध्ये कोरोना व्हायरसने थैमान घातले असतानाच पनवेल तालुक्यामध्ये इराणमधून आलेले चार जण कोरोनाचे संशयित सापडले आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी प्रसारमाध्यमांना दिली. मात्र दोनच तासांमध्ये जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. प्रमोद गवई यांनी याचा इन्कार केला आहे. प्रशासनातील दोन्ही अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीमध्ये विरोधाभास असल्याचे दिसत आहे. या प्रकरणी नक्की कोण खरे बोलत आहे, याबाबत नागरिकांमध्ये संभ्रम आणि भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.अलिबागमधील काही पत्रकारांनी जिल्हाधिकारी निधी चौधरी यांची काही कामानिमित्त भेट घेतली. त्या वेळी त्यांनी पनवेल तालुक्यामध्ये चार जण हे इराणमधून आले आहेत. त्यांना सर्दी, खोकला आणि ताप आल्याने त्यांची तपासणी करण्यात आली. त्यानंतर त्या संशयितांच्या थुंकी आणि रक्ताचे नमुने पुण्यातील प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवण्यात आल्याचे चौधरी यांनी सांगितले. दरम्यानच्या कालावधीमध्ये रायगडचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. प्रमोद गवई हे अधिक तपासणीसाठी पनवेलला रवाना झाले होते.डॉ. गवई हे पनवेलला पोहोचल्यावर त्यांनी तेथील वैद्यकीय अधिकारी डॉ. पद्ममा बर्फे यांची भेट घेऊन संशयितांची केस हिस्ट्री तपासली. त्यांच्यामध्ये कोरोना व्हायरसची कोणतीच लक्षणे आढळली नाहीत. त्यामुळे त्यांच्या रक्ताचे आणि थुंकीचे नमुने पाठवण्याचा प्रश्नच नाही, असे डॉ. प्रमोद गवई यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. या संशयितांची भेट घेतली. त्यांना सायनसचा त्रास होता, आता त्यांची तब्येत ठीक आहे. संबंधित संशयितांबरोबर हस्तांदोलनही केल्याचे डॉ. गवई यांनी सांगून त्यांना कोरोना व्हायरसची लागण झाली नसल्याबाबत क्लीन चिट दिली.जिल्ह्याचे प्रमुख म्हणून जिल्हाधिकारी माहिती देतात तेव्हा ती विश्वसनीय असते, मात्र काही तासांतच आरोग्य विभागाने ते संशयित रुग्ण नव्हतेच, असे सांगून टाकले आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण झाला. जिल्हाधिकारी निधी चौधरी यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.>पुन्हा तपासणी का?ं११ फेब्रुवारी २०२० रोजी तीन नागरिक हे इराणहून मुंबईमध्ये आले होते, तर एक नागरिक हा २१ फेब्रुवारी २०२० रोजी आला होता, अशी माहिती डॉ. गवई यांनी दिली. त्या वेळी विमानतळावर जागतिक आरोग्य संघटनेच्या निकषानुसार स्कॅनिंग मशिन होते का, असाही प्रश्न आहे. स्कॅनिंग मशीन होते असे मानले तर आलेल्या रुग्णांची पुन्हा तपासणी का करण्यात आली, असाही प्रश्न उपस्थित केला जात आहे.