शहरं
Join us  
Trending Stories
1
समीर वानखेडे यांना झटका! आर्यन खानच्या शोवरील मानहानी खटल्यात सुनावणी, कोर्ट काय म्हणाले..
2
मारुती सुझुकीने रचला इतिहास; फोर्ड, जीएम, फोक्सवॅगनला पछाडत ठरली जगातील ८वी सर्वात मौल्यवान ऑटो कंपनी
3
लक्ष्मी मित्तल यांनी दिल्लीत केली या वर्षीची सर्वात मोठी प्रॉपर्टी डील, कितीला खरेदी केला बंगला?
4
आंधळं प्रेम! प्रियकरला भेटण्यासाठी ११०० किमीचा प्रवास करून मध्य प्रदेशला पोहोचली १८ वर्षांची मुलगी; पण पुढे काहीतरी भलतंच घडलं
5
जीएसटी २२ सप्टेंबरला घटला, अन् टर्म इन्शुरन्सचे हप्ते कंपन्यांनी चार दिवसांनी कमी केले; कारण काय...
6
पर्सनल लोन हवे आहे? 'ही' सरकारी बँक देत आहे सर्वात स्वस्त कर्ज, पहा टॉप बँकांचे दर आणि EMI
7
पाकिस्तानच्या पंतप्रधानांचा पुन्हा आंतरराष्ट्रीय अपमान! ट्रम्प यांनी व्हाईट हाऊसमध्ये बोलावून ताटकळत ठेवले
8
नवरात्री २०२५: नवरात्रीत 'या' शुभ मुहूर्तावर डोळे मिटून करा घर-गाडीची खरेदी; वस्तू लाभणारच!
9
हाय बीपी, थायरॉईड, फॅटी लिव्हर: एका बँक कर्मचाऱ्याची वेदनादायक कहाणी, सांगितलं का सोडावी लागली नोकरी?
10
ट्रम्प यांचा 'टॅरिफ बॉम्ब'! सन फार्मा-ल्यूपिनसह 'या' कंपन्यांचे शेअर्स आपटले; ३ लाख कोटींचे नुकसान
11
CM आदित्यनाथांचे कौतुक, PM मोदींनी गुंतवणुकदारांना सांगितले उत्तर प्रदेशात गुंतवणुकीचे फायदे; UPITS मध्ये काय बोलले?
12
"शंभर टक्के ओला दुष्काळ जाहीर झालाच पाहिजे", शिंदेंच्या आमदाराचीच सरकारकडे मागणी
13
'शबनम कांड' सारखंच प्रकरण! 'सावधान इंडिया' पाहिलं अन् फिल्मी स्टाईलनं मित्राला संपवलं; त्या तिघांमध्ये नेमकं काय झालं? 
14
"हिंदूंच्या मतांवर आमचं महायुती सरकार; आम्हाला कुणी गोल टोपी, दाढीवाल्याने मतदान केले नाही"
15
"बेबी, I Love You, जवळ ये ना..." विद्यार्थिनींना असे मेसेज पाठवणारा चैतन्यानंद मुंबईत लपलाय?
16
'मिशन शक्ती ५.०'चा धडाका! अवघ्या ३ दिवसांत १२ हरवलेल्या लोकांना शोधून काढले; योगी सरकारची पोलिसांना शाबासकी
17
प्रदूषणाने धोक्याची घंटा वाजवली! कार्बन उत्सर्जनात चीन नंबर १, भारत कितव्या क्रमांकावर? आकडेवारी पाहून बसेल धक्का
18
पीएम किसान योजनेत मोठा बदल! आता 'या' शेतकऱ्यांनाही मिळणार लाभ, २१ वा हप्ता कधी?
19
Budh Gochar 2025: दसऱ्याला बाराही राशी सौभाग्याचे सोने लुटणार, बुध गोचर भाग्य पालटणार
20
माझ्याविरुद्ध तिहेरी कट, डोनाल्ड ट्रम्प का संतापले?; ‘सिक्रेट सर्व्हिस’ला चौकशीचे आदेश

अत्याचार रोखण्यासाठी खंबीर पावले उचलणार - सुप्रिया सुळे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2020 23:41 IST

राज्यामध्ये भाजपचे १०५ आमदार निवडून येऊनसुद्धा शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस व इतर मित्रपक्ष मिळून महाविकास आघाडी बनवून राज्यात सत्ता आणण्याचे काम एकमेव शरद पवारच करू शकतात.

माणगाव : राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आहे. हे सरकार धर्मनिरपेक्ष तत्त्वावर चालणारे सरकार आहे. राज्यात महिलांवर अत्याचार होऊ देणार नाही. तशी खंबीर पावले उचलत आहोत. पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी महिलांसाठी निवडणुकीमध्ये ५० टक्के आरक्षण आणून मोठी क्रांती केली आहे. सर्व स्तरांवर महिलांचे सक्षमीकरण झाले आहे. आज पुरुषांच्या बरोबरीने सर्व स्तरांतून महिला आघाडीवर आहेत. बचतगटाच्या माध्यमातून महिला स्वत:च्या पायावर उभ्या राहत असल्याचे प्रतिपादन खा. सुप्रिया सुळे यांनी केले.

माणगाव येथे शनिवारी महिला दिनानिमित्त आयोजित मेळाव्यात त्या बोलत होत्या. दिल्लीमध्ये गेले १० दिवस अधिवेशन सुरू आहे. परंतु गेले १० दिवस संसदेत कोणत्याही प्रकारचे कामकाज झाले नाही. दिल्लीत झालेल्या दंगलीचे उत्तर गृहमंत्री अमित शहांनी द्यावे, अशी मागणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे सातत्याने केली. मात्र अद्याप ते उत्तर देऊ शकले नसल्याची टीका खा. सुप्रिया सुळे यांनी केली.रायगड जिल्ह्यात बहुतेक सर्व पदांवर महिला काम करीत आहेत. पक्षाच्या माध्यमातून सर्वांनी अशाच प्रकारचे काम करणे गरजेचे आहे. आमदार, जिल्हाधिकारी, प्रांत, तहसीलदार, सभापती, नगराध्यक्ष, पोलीस उपनिरीक्षक या सर्व पदांवर महिला म्हणून उत्तमरीत्या काम करीत आहेत. खऱ्या अर्थाने रायगड जिल्ह्यात महिलाराज सुरू असल्याचे त्यांनी नमूद केले.

राज्यामध्ये भाजपचे १०५ आमदार निवडून येऊनसुद्धा शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस व इतर मित्रपक्ष मिळून महाविकास आघाडी बनवून राज्यात सत्ता आणण्याचे काम एकमेव शरद पवारच करू शकतात. त्यांनी आदिती तटकरे यांना ८ खात्यांची जबाबदारी देऊन महिला सक्षम आहेत, हे दाखवून दिले आहे.

राज्यमंत्री आदिती तटकरे म्हणाल्या, हळदीकुंकू कार्यक्रमापुरत्या मर्यादित न राहता संघटनावाढीचे काम महिला करीत आहेत. येथील महिला लोकप्रतिनिधी, महिला कार्यकर्त्या वेगवेगळ्या प्रकारचे चांगले उपक्रम राबवत आहेत. अर्थसंकल्पात एक हजार कोटींची तरतूद बचतगटातील वस्तू खरेदीसाठी केली आहे. या वेळी अर्थसंकल्पात कोकण विभाग पर्यटनास झुकते माप दिल्याचे तटकरे यांनी नमूद केले.कार्यक्रमाला माजी आ. सुरेश लाड, आ. अनिकेत तटकरे, जिल्हा अध्यक्षा गीता पालरेचा, राज्य महिला चिटणीस दिपिका चिपळूणकर, संगीता बक्क्म, सभापती अलका जाधव, नगराध्यक्षा योगीता चव्हाण, तालुका अध्यक्ष सुभाष केकाणे, तळा समाज कल्याण सभापती गीता जाधव, आदी मान्यवर उपस्थित होते.