शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

संगणक परिचालकांच्या समस्या सोडवणार, सुनील तटकरे यांचे आश्वासन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2018 02:33 IST

ग्रामीण भागातील नागरिकांना गावातच सर्व सोयी-सुविधा व विविध प्रकारचे दाखले आॅनलाइन मिळावेत यासाठी प्रत्येक ग्रामपंचायतीत आपले सरकार सेवा केंद्र सुरू करण्यात आलेले आहे. हे केंद्र चालविण्यासाठी ग्रामपंचायत क्लस्टरनुसार केंद्रचालकांची तर प्रकल्पात काम करण्यासाठी संगणक परिचालकांची नियुक्ती करण्यात आली आहे.

म्हसळा : ग्रामीण भागातील नागरिकांना गावातच सर्व सोयी-सुविधा व विविध प्रकारचे दाखले आॅनलाइन मिळावेत यासाठी प्रत्येक ग्रामपंचायतीत आपले सरकार सेवा केंद्र सुरू करण्यात आलेले आहे. हे केंद्र चालविण्यासाठी ग्रामपंचायत क्लस्टरनुसार केंद्रचालकांची तर प्रकल्पात काम करण्यासाठी संगणक परिचालकांची नियुक्ती करण्यात आली आहे.राज्यातील संगणक परिचालक हे अल्प मानधनावर काम करीत आहेत; मात्र फेब्रुवारी २०१७पासून काही परिचालकांचे मानधन मिळालेले नसून ते राज्य शासनाचे सीएससी - एसपीव्ही या कंपनीकडे थकीत आहे. हे थकीत मानधन मिळविण्यासाठी अनेक वेळा संगणक परिचालकांनी नागपूर, मुंबई मंत्रालय, जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद, पंचायत समिती अशा सर्वच ठिकाणी वेळोवेळी आंदोलने, मोर्चे काढले आहेत; परंतु त्यांच्या काही प्रलंबित मागण्या पूर्ण झाल्या नाहीत व थकीत मानधन मिळालेले नाही. त्यामुळे त्यांनी शासन व कंपनीच्या जाचाला कंटाळून सोमवार, ९ एप्रिलपासून कामबंद आंदोलन सुरू केले आहे.सामूहिक राजीनामे देण्याबाबतचे लेखी निवेदन १४ एप्रिल रोजी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आमदार सुनील तटकरे यांना रायगड जिल्हा संगणक परिचालक संघटनेचे महाराष्ट्र राज्य सचिव तथा रायगड जिल्हा अध्यक्ष मयूर कांबळे यांनी दिले.संगणक परिचालकांच्या विविध समस्या व थकीत मानधन आणि कंपनीचे व्यवस्थापन याबाबत जिल्हा परिषदेमध्ये १७ एप्रिल रोजी कंपनीचे व्यवस्थापक, संबंधित जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिकारी यांची बैठक आयोजित करण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. संगणक परिचालकांना केलेल्या कामाचा मोबदला हा त्यांना वेळच्या वेळी मिळालाच पाहिजे.- आदिती तटकरे, अध्यक्षा, रायगड जिल्हा परिषदआपले सरकार सेवा केंद्र या प्रकल्पाचा बोजवारा उडाला आहे आणि याला फक्त आणि फक्त कंपनीचे गलिच्छ व्यवस्थापन जबाबदार आहे. त्यामुळे संगणक परिचालकांना कोणतीही कंपनी मध्यस्थी न ठेवता शासनामार्फत नियुक्ती देऊन सध्याच्या महागाईचा विचार करता किमान १५000/- रु . वेतन द्यावे.- मयूर कांबळे, महाराष्ट्र राज्य सचिव तथारायगड जिल्हा अध्यक्ष

टॅग्स :Raigadरायगड