शहरं
Join us  
Trending Stories
1
शेतकरी मदतीचा मुद्दा गाजला; कृषिमंत्री आधी म्हणाले, ‘नाही’ नंतर म्हणाले, ‘हो, प्रस्ताव आला’
2
आजचे राशीभविष्य, ४ डिसेंबर २०२५: अचानक धनप्राप्ती अन् विविध फायदे होतील, ज्याने आनंदित व्हाल
3
Orange Gate Tunnel: सोळा मजली उंच इमारतीइतक्या खोल, ७०० इमारतींखालून जाणार ऑरेंज गेट बोगदा
4
लंकादहन: भाजप-शिंदेसेनेतील वाद गाजला, सत्तापक्षांतील वादांचे निवडणुकीत झाले प्रदर्शन
5
Indigo Flights Issue: ...म्हणून इंडिगोची सेवा ढेपाळली; १०० पेक्षा जास्त विमाने झाली रद्द
6
राज्यात सरासरी ६७.६३% मतदान; तळेगाव दाभाडे तळात, तर कोल्हापुरातील मुरगूड अव्वल 
7
नवी मुंबईतील शिंदेंच्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांचा ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश
8
मुंबईसह देशभर विमानतळांवर गोंधळ, २०० विमाने झाली रद्द; बोर्डिंग पास हाताने लिहिण्याची आली वेळ 
9
महामुंबईतील १९ आरएमसी प्लांट बंद, तीन उद्योगांची प्रत्येकी पाच लाखांची बँकहमी जप्त
10
महाडमध्ये दोन गटांतील राड्याप्रकरणी विकास गोगावलेंसह २० जणांवर गुन्हा, परस्परविरोधी तक्रारी दाखल
11
इंडिगोची दोन्ही विमाने रद्द; १२ तास ताटकळले संभाजीनगरकर
12
IND vs SA : मार्करमच्या सेंच्युरीच्या जोरावर द.आफ्रिकेचा मोठा पराक्रम; ऐतिहासिक विजयासह साधला बरोबरीचा डाव
13
“माझ्या भावाला BJPशी मैत्री हवी, पण मुनीर भारताशी युद्ध…”; इम्रान खानची बहीण नेमके काय म्हणाली?
14
IND vs SA Turning Point Of The Match : ती एक चूक नडली! यशस्वीमुळे टीम इंडिया ठरली अपयशी
15
दिल्ली पोटनिवडणुकीत भाजपाला धक्का, काँग्रेसने खाते उघडले; आम आदमी पक्षाचे काय झाले?
16
२० वर्षांनी राज ठाकरे घरी गेले, सक्रीय होताच संजय राऊतांना भेटले; अर्धा तास चर्चा, काय घडले?
17
IND vs SA : पंचांनी चेंडू बदलून दिला, पण... KL राहुलनं कोणावर फोडलं पराभवाचं खापर?   
18
नगर पंचायत-परिषदा निवडणुकीचा मुद्दा संसदेत; सुप्रिया सुळेंचे सरकारवर टीकास्त्र, म्हणाल्या...
19
शतकातील सर्वात दीर्घ सूर्यग्रहण, ६ मिनिटे २३ सेकंदांपर्यंत पसरेल अंधकार, कोणकोणत्या देशांत दिसणार? भारतात कुठे-कुठे दिसणार? जाणून घ्या
20
अजय देवगनकडे या कंपनीचे १०००००० शेअर, आता कंपनीने  घेतला मोठा निर्णय; दिलाय 6000% चा बंपर परतावा!
Daily Top 2Weekly Top 5

सुधागडात कवेळे धरणाला गळती, पाण्याचा अपव्यय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2019 00:33 IST

रायगड जिल्ह्यातील सुधागड तालुक्यातील कवेळे धरणाला गळती लागली आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात पाण्याचा अपव्यय होत आहे. धरणाच्या कालव्याच्या बंदिस्त नलिका अनेक ठिकाणी कचरा व मुळ्या जाऊन चोकअप झाल्या आहेत.

- विनोद भोईरपाली : रायगड जिल्ह्यातील सुधागड तालुक्यातील कवेळे धरणाला गळती लागली आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात पाण्याचा अपव्यय होत आहे. धरणाच्या कालव्याच्या बंदिस्त नलिका अनेक ठिकाणी कचरा व मुळ्या जाऊन चोकअप झाल्या आहेत. त्यामुळे धरण व बंदिस्त नलिकांची ताबडतोब दुरुस्तीची आवश्यकता आहे. या धरणाच्या पाण्यावर असलेले सिंचनक्षेत्रही झपाट्याने घटले आहे. त्यामुळे धरणाच्या दुरुस्तीची मागणी परिसरातील नागरिकांकडून करण्यात येत आहे.लघु पाटबंधारे विभागामार्फत १९७३ मध्ये कवेळे धरणाचे बांधकाम करण्यात आले. यावेळी १६.६८ लाखांचा खर्च आला होता. धरणाचे सिंचनक्षेत्र ८१२ हेक्टर आहे. सिंचनाच्या उद्देशाने धरणाची निर्मिती करण्यात आली. तालुक्यातील इतर चार धरणांपेक्षा सर्वाधिक सिंचनक्षेत्र या धरणाचे आहे. मात्र यातील १० टक्क्यांपेक्षा कमी पाण्याचा सिंचनक्षेत्राचा वापर केला जात आहे.गेली कित्येक वर्षे धरणाची दुरु स्ती करण्यात आलेली नाही. कवेळे धरणाला गळती लागल्याने पाण्याचा अपव्यय होत आहे. यावर लघुपाटबंधारे विभागाकडून जलद उपाययोजना करण्याची गरज आहे.अतितातडीचे म्हणून कवेळे धरणाच्या दुरु स्तीचे काम केले जाणार आहे. सिंचनक्षेत्र वाढविण्यासाठी दरवर्षी स्थानिकांची बैठक घेतली जाते. बंदिस्त नलिकांची किरकोळ दुरु स्ती देखील केली जाते. मात्र जोपर्यंत सिंचनाखालील क्षेत्र वाढत नाही तोपर्यंत यांच्या दुरु स्तीसाठी शासनाकडून खर्च किंवा अनुदान दिले जात नाही.- आर. के. सुपे, शाखा अभियंता, पाटबंधारे विभाग कोलाडआधी खोदलेले कालवे बरे होते. त्याच्यावर भातशेती केली जायची. आता वारंवार जलवाहिनी चोक होत असल्याने शेवटपर्यंत पाणी पोहोचतच नाही. शिवाय गळतीचाही फटका शेतीला बसतो. त्यामुळे अनेकांनी शेतात लागवड करणेच बंद केले आहे. काही ठिकाणी कडधान्याचे पीक घेतले जात आहे.- अंकिता विशाल चिले, सरपंच, ग्रुपग्रामपंचायत, वाघोशी

टॅग्स :Raigadरायगड