शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Crime: 'किती मुलांसोबत झोपलात?', कोथरुडमधील प्रकरण; रोहित पवार 'त्या' तरुणींसह पोलीस आयुक्तालयात, काय घडलं?
2
IND vs ENG 5th Test Day 4 Stumps : कोण जिंकणार? 'दिल अन् दिमाग' यांची 'टेस्ट' घेणाऱ्या प्रश्नासह थांबला खेळ
3
भगवा दहशतवादी असेल, तर तुम्ही त्याची पूजा करणार का?; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांचा सवाल
4
IND vs ENG : टेस्टमध्ये ट्विस्ट; खांदा बांधून बसलेला क्रिस वोक्स एका हाताने बॅटिंग करण्याच्या तयारीत
5
मुलींवर हात टाकणाऱ्यांना हातपाय तोडून पोलिसांकडे दिले पाहिजे; अमित ठाकरे यांचे विधान
6
हा दरोडा भारतातील सर्वात मोठा होता; एका रात्रीत ८० किलो सोने गेले होते चोरीला
7
विमानतळावर मारहाण करणाऱ्या लष्करी अधिकाऱ्याच्या अडचणी वाढणार! भारतीय लष्कराने निवेदन प्रसिद्ध केले
8
महादेवी हत्तीण वनतारामधून परत आणणार?  मुख्यमंत्र्यांनी ५ ऑगस्टला बोलावली बैठक, फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
9
Joe Root Century : शतक साजरे करताच हेल्मट काढलं अन् Headband बांधला; जो रुटनं असं का केलं?
10
पत्नी आजारी म्हणून लिव्ह इनमध्ये राहू लागला अन् प्रेयसीनेच केली हत्या; दोघांमध्ये कशावरून बिनसलं?
11
युगेंद्र पवार-तनिष्का कुलकर्णींचा मुंबईत झाला साखरपुडा, कोण आहेत तनिष्का?
12
IND vs ENG : ...अन् सिराजनं कॅच घेऊन दिलेला 'तो' सिक्सर Harry Brook नं सेंच्युरीत बदलला!
13
एका फिचरमुळे ChatGPT चॅट्स लीक होण्याचा धोका! गुगल सर्चमध्ये खाजगी गोष्टी दिसतात?
14
"लोकांचा सहभाग वाढवून...", उद्योजकांसमोर नितीन गडकरींनी मांडले गांधी-नेहरूंचे विचार; नागपूरमध्ये काय बोलले?
15
IND vs ENG : जो रुटनं साधला मोठा डाव! WTC मध्ये ६००० धावांचा पल्ला गाठणारा ठरला पहिला फलंदाज
16
कोल्हापुरात १९३१ मध्ये होते त्याच जुन्या सर्वोच्च न्यायालयाच्या इमारतीत नवे सर्किट बेंच
17
संजय शिरसाटांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून पाठराखण; म्हणाले, "मंत्री कधी कधी..."
18
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
19
VIDEO : इथंही सिराज ठरला कमनशिबी! हॅरी ब्रूकचा कॅच घेतला; पण सीमारेषेवर अंदाज चुकला अन्...
20
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला

सुधागड किल्ल्याचे झाले वादळामुळे प्रचंड नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 12, 2020 23:57 IST

मंदिरांवरील छत उडाले : वाड्याची भिंतही कोसळली; वृक्ष उन्मळून पडले

नामदेव मोरे

नवी मुंबई : निसर्ग चक्रीवादळामुळे रायगड जिल्ह्यातील सुधागड किल्ल्यावरही प्रचंड नुकसान झाले आहे. गडावरील मंदिरांचे छत उडाले आहे. एक मंदिरावर वृक्ष कोसळला आहे. पंतसचिवांच्या वाड्याची भिंतही कोसळली असून पायवाटेसह सर्वत्र वृक्ष उन्मळून पडले आहेत. या संकटाने खचून न जाता गडावरील मंदिरांची व इमारतींची डागडुजी करून गडास पुन्हा गतवैभव मिळवून देण्याचा संकल्प शिवप्रेमी नागरिकांनी केला आहे.

रायगड जिल्ह्यातील प्रमुख ऐतिहासिक वारसास्थळांमध्ये सुधागड किल्ल्याचाही समावेश होतो. स्वराज्याची राजधानी करण्यासाठीही या किल्ल्याचा विचार करण्यात आला होता. छत्रपती संभाजी महाराज व औरंगजेबाच्या मुलाची भेट याच किल्ल्याच्या पायथ्याशी झाली होती. या किल्ल्याचे ऐतिहासिक महत्त्व टिकवून येथील मंदिरांसह ऐतिहासिक वास्तूंचे जतन करण्यासाठी बा रायगड परिवार संस्थेच्या वतीने चार वर्षांपासून संवर्धन मोहिमांचे आयोजन केले जात आहे. महिन्यातून किमान दोन रविवार संस्थेचे शिलेदार संवर्धनाचे काम करत आहेत. नुकत्याच आलेल्या वादळाने होत्याचे नव्हते झाले. शिवप्रेमींनी अथक परिश्रम करून उभारलेल्या शिवमंदिर व गजलक्ष्मी मंदिराचे छत उडाले. भिंतींना तडे गेले. गडावरील पंतसचिवांच्या वाड्याची भिंतही कोसळली. पुरातन भोराई देवी मंदिराचेही संपूर्ण छत उडाले आहे. वाड्याजवळ असलेल्या मंदिरावरही वृक्ष कोसळला आहे. गडावरील दोन गार्इंचाही मृत्यू झाला आहे. गडावर सर्वत्र व पायवाटेवर असंख्य वृक्ष उन्मळून पडले आहेत.

वादळ थांबल्यानंतर स्थानिक नागरिक व बा रायगड परिवारच्या स्थानिक टीमने गडावर जाऊन पाहणी केली असता गडावरील परिस्थिती लक्षात आली.गडावरील नुकसानीची माहिती वनविभागालाही देण्यात आली आहे. परिसरातील गाव व शेतीचे पंचनामे झाल्यानंतर प्रशासनाकडून गडावरील नुकसानीचे पंचनामे केले जाणार आहेत. बा रायगड परिवारच्या वतीनेही गडावरील संवर्धनाचे काम करण्यासाठी मदतीचे आवाहन करण्यात आले आहे. लवकरच मंदिर व वाड्यावर ताडपत्री टाकली जाणार आहे. भोराई देवी मंदिर व वाड्याची देखभाल ट्रस्टच्या वतीने केली जाते.या दोन्ही वास्तूंच्या उभारणीसाठी ट्रस्टला सहकार्य केले जाणार आहे. इतर मंदिरांचे काम ग्रामस्थ व प्रशासनाला विश्वासात घेऊन शिवप्रेमी करणार आहेत.वादळामुळे गडावरील मंदिरांचे छत उडाले आहे. एका मंदिरावर वृक्ष कोसळला आहे. वाड्याची भिंत कोसळली आहे. नुकसान खूप झाले आहे. भोराई ट्रस्ट, स्थानिक नागरिक व प्रशासनाला विश्वासात घेऊन पुन्हा नव्या जोमाने पुनर्बांधणीचे काम करण्यात येणार असून यासाठी सर्वांनी सहकार्य करावे.- रूपेश शेळके, सदस्य, बा रायगड परिवार

टॅग्स :RaigadरायगडNavi Mumbaiनवी मुंबई