शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प प्रशासनाचा नवा नियम! नवीन व्हिसा ऑर्डरनुसार, लठ्ठपणा किंवा मधुमेहामुळे अमेरिकेत प्रवेश मिळणार नाही; इतर आजारांचाही उल्लेख
2
धक्कादायक! ऑनलाइन क्रीम खरेदी केली, महिलेच्या शरीरावर सापासारखे व्रण; १० वर्षांत १२ लाख रुपये खर्च
3
हिवाळी अधिवेशन ८ डिसेंबरपासूनच, दोन आठवड्यांचे कामकाज; २८ नोव्हेंबरपासून सचिवालय नागपुरात, पत्र आले
4
अधिकाऱ्यांना वाचवण्याच्या नादात दोघांचा मृत्यू; सॅण्डहर्स्ट रेल्वे अपघातामध्ये मुलीचा मृत्यू; आई जखमी
5
सरकार कुणालाही पाठीशी घालणार नाही, अहवालात जो दोषी आढळेल त्याच्यावर कारवाई, जमीन घोटाळ्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती
6
Women's World Cup : भारताच्या लेकींसह प्रेक्षकांनीही रचला इतिहास; ते पाहून ICC चा ऐतिहासिक निर्णय!
7
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
8
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
9
पाकिस्तानला बेकायदेशीर अणु कारवायांचा इतिहास, आम्ही ट्रम्प यांच्या विधानाची दखल घेतली: भारत सरकार
10
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
11
माझ्या नवऱ्याला महिन्यापासून दारु पाजून जरांगेविरुद्ध षडयंत्र रचलं; अमोल खुणेंच्या कुटुंबीयांनी सगळंच सांगितलं
12
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
13
IPL 2026 : डेफिनेटली! MS धोनी पुन्हा मैदानात उतरण्यास तयार; CSK च्या ताफ्यातील आतली गोष्ट आली समोर
14
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
15
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
16
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
17
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
18
Maharashtra Crime: तुकाराम स्वत:च लपून बसला आणि अपहरणाचा बनाव केला; पण असं का केलं?
19
"धन्या, तू आता पक्का अडकला"; धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख, मनोज जरांगेंनी थेट ऑडिओ क्लिपच ऐकवली
20
AI Industry: 'एआय'चा फुगा फुटू लागला? अमेरिकेमध्ये १.५ लाख लोकांनी नोकऱ्या गमावल्या; गुंतवणूकदारही झाले अलर्ट

सुधागड किल्ल्याचे झाले वादळामुळे प्रचंड नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 12, 2020 23:57 IST

मंदिरांवरील छत उडाले : वाड्याची भिंतही कोसळली; वृक्ष उन्मळून पडले

नामदेव मोरे

नवी मुंबई : निसर्ग चक्रीवादळामुळे रायगड जिल्ह्यातील सुधागड किल्ल्यावरही प्रचंड नुकसान झाले आहे. गडावरील मंदिरांचे छत उडाले आहे. एक मंदिरावर वृक्ष कोसळला आहे. पंतसचिवांच्या वाड्याची भिंतही कोसळली असून पायवाटेसह सर्वत्र वृक्ष उन्मळून पडले आहेत. या संकटाने खचून न जाता गडावरील मंदिरांची व इमारतींची डागडुजी करून गडास पुन्हा गतवैभव मिळवून देण्याचा संकल्प शिवप्रेमी नागरिकांनी केला आहे.

रायगड जिल्ह्यातील प्रमुख ऐतिहासिक वारसास्थळांमध्ये सुधागड किल्ल्याचाही समावेश होतो. स्वराज्याची राजधानी करण्यासाठीही या किल्ल्याचा विचार करण्यात आला होता. छत्रपती संभाजी महाराज व औरंगजेबाच्या मुलाची भेट याच किल्ल्याच्या पायथ्याशी झाली होती. या किल्ल्याचे ऐतिहासिक महत्त्व टिकवून येथील मंदिरांसह ऐतिहासिक वास्तूंचे जतन करण्यासाठी बा रायगड परिवार संस्थेच्या वतीने चार वर्षांपासून संवर्धन मोहिमांचे आयोजन केले जात आहे. महिन्यातून किमान दोन रविवार संस्थेचे शिलेदार संवर्धनाचे काम करत आहेत. नुकत्याच आलेल्या वादळाने होत्याचे नव्हते झाले. शिवप्रेमींनी अथक परिश्रम करून उभारलेल्या शिवमंदिर व गजलक्ष्मी मंदिराचे छत उडाले. भिंतींना तडे गेले. गडावरील पंतसचिवांच्या वाड्याची भिंतही कोसळली. पुरातन भोराई देवी मंदिराचेही संपूर्ण छत उडाले आहे. वाड्याजवळ असलेल्या मंदिरावरही वृक्ष कोसळला आहे. गडावरील दोन गार्इंचाही मृत्यू झाला आहे. गडावर सर्वत्र व पायवाटेवर असंख्य वृक्ष उन्मळून पडले आहेत.

वादळ थांबल्यानंतर स्थानिक नागरिक व बा रायगड परिवारच्या स्थानिक टीमने गडावर जाऊन पाहणी केली असता गडावरील परिस्थिती लक्षात आली.गडावरील नुकसानीची माहिती वनविभागालाही देण्यात आली आहे. परिसरातील गाव व शेतीचे पंचनामे झाल्यानंतर प्रशासनाकडून गडावरील नुकसानीचे पंचनामे केले जाणार आहेत. बा रायगड परिवारच्या वतीनेही गडावरील संवर्धनाचे काम करण्यासाठी मदतीचे आवाहन करण्यात आले आहे. लवकरच मंदिर व वाड्यावर ताडपत्री टाकली जाणार आहे. भोराई देवी मंदिर व वाड्याची देखभाल ट्रस्टच्या वतीने केली जाते.या दोन्ही वास्तूंच्या उभारणीसाठी ट्रस्टला सहकार्य केले जाणार आहे. इतर मंदिरांचे काम ग्रामस्थ व प्रशासनाला विश्वासात घेऊन शिवप्रेमी करणार आहेत.वादळामुळे गडावरील मंदिरांचे छत उडाले आहे. एका मंदिरावर वृक्ष कोसळला आहे. वाड्याची भिंत कोसळली आहे. नुकसान खूप झाले आहे. भोराई ट्रस्ट, स्थानिक नागरिक व प्रशासनाला विश्वासात घेऊन पुन्हा नव्या जोमाने पुनर्बांधणीचे काम करण्यात येणार असून यासाठी सर्वांनी सहकार्य करावे.- रूपेश शेळके, सदस्य, बा रायगड परिवार

टॅग्स :RaigadरायगडNavi Mumbaiनवी मुंबई