शहरं
Join us  
Trending Stories
1
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
2
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
3
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
4
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
5
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
6
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
7
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
8
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
9
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
10
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
11
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
12
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
13
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
14
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
15
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
16
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
17
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
18
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
19
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
20
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...

सुधागड किल्ल्याचे झाले वादळामुळे प्रचंड नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 12, 2020 23:57 IST

मंदिरांवरील छत उडाले : वाड्याची भिंतही कोसळली; वृक्ष उन्मळून पडले

नामदेव मोरे

नवी मुंबई : निसर्ग चक्रीवादळामुळे रायगड जिल्ह्यातील सुधागड किल्ल्यावरही प्रचंड नुकसान झाले आहे. गडावरील मंदिरांचे छत उडाले आहे. एक मंदिरावर वृक्ष कोसळला आहे. पंतसचिवांच्या वाड्याची भिंतही कोसळली असून पायवाटेसह सर्वत्र वृक्ष उन्मळून पडले आहेत. या संकटाने खचून न जाता गडावरील मंदिरांची व इमारतींची डागडुजी करून गडास पुन्हा गतवैभव मिळवून देण्याचा संकल्प शिवप्रेमी नागरिकांनी केला आहे.

रायगड जिल्ह्यातील प्रमुख ऐतिहासिक वारसास्थळांमध्ये सुधागड किल्ल्याचाही समावेश होतो. स्वराज्याची राजधानी करण्यासाठीही या किल्ल्याचा विचार करण्यात आला होता. छत्रपती संभाजी महाराज व औरंगजेबाच्या मुलाची भेट याच किल्ल्याच्या पायथ्याशी झाली होती. या किल्ल्याचे ऐतिहासिक महत्त्व टिकवून येथील मंदिरांसह ऐतिहासिक वास्तूंचे जतन करण्यासाठी बा रायगड परिवार संस्थेच्या वतीने चार वर्षांपासून संवर्धन मोहिमांचे आयोजन केले जात आहे. महिन्यातून किमान दोन रविवार संस्थेचे शिलेदार संवर्धनाचे काम करत आहेत. नुकत्याच आलेल्या वादळाने होत्याचे नव्हते झाले. शिवप्रेमींनी अथक परिश्रम करून उभारलेल्या शिवमंदिर व गजलक्ष्मी मंदिराचे छत उडाले. भिंतींना तडे गेले. गडावरील पंतसचिवांच्या वाड्याची भिंतही कोसळली. पुरातन भोराई देवी मंदिराचेही संपूर्ण छत उडाले आहे. वाड्याजवळ असलेल्या मंदिरावरही वृक्ष कोसळला आहे. गडावरील दोन गार्इंचाही मृत्यू झाला आहे. गडावर सर्वत्र व पायवाटेवर असंख्य वृक्ष उन्मळून पडले आहेत.

वादळ थांबल्यानंतर स्थानिक नागरिक व बा रायगड परिवारच्या स्थानिक टीमने गडावर जाऊन पाहणी केली असता गडावरील परिस्थिती लक्षात आली.गडावरील नुकसानीची माहिती वनविभागालाही देण्यात आली आहे. परिसरातील गाव व शेतीचे पंचनामे झाल्यानंतर प्रशासनाकडून गडावरील नुकसानीचे पंचनामे केले जाणार आहेत. बा रायगड परिवारच्या वतीनेही गडावरील संवर्धनाचे काम करण्यासाठी मदतीचे आवाहन करण्यात आले आहे. लवकरच मंदिर व वाड्यावर ताडपत्री टाकली जाणार आहे. भोराई देवी मंदिर व वाड्याची देखभाल ट्रस्टच्या वतीने केली जाते.या दोन्ही वास्तूंच्या उभारणीसाठी ट्रस्टला सहकार्य केले जाणार आहे. इतर मंदिरांचे काम ग्रामस्थ व प्रशासनाला विश्वासात घेऊन शिवप्रेमी करणार आहेत.वादळामुळे गडावरील मंदिरांचे छत उडाले आहे. एका मंदिरावर वृक्ष कोसळला आहे. वाड्याची भिंत कोसळली आहे. नुकसान खूप झाले आहे. भोराई ट्रस्ट, स्थानिक नागरिक व प्रशासनाला विश्वासात घेऊन पुन्हा नव्या जोमाने पुनर्बांधणीचे काम करण्यात येणार असून यासाठी सर्वांनी सहकार्य करावे.- रूपेश शेळके, सदस्य, बा रायगड परिवार

टॅग्स :RaigadरायगडNavi Mumbaiनवी मुंबई