शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Chawl Collapsed: वांद्र्यात तीन मजली चाळ कोसळली, अनेकजण ढिगाऱ्याखाली अडकले, बचावकार्य सुरू
2
Mumbai: मालवणी परिसरातून अपहरण झालेल्या तीन मुलींची सुखरूप सुटका
3
Share Market Today: शेअर बाजाराची रेड झोनमध्ये सुरुवात; 'या' शेअर्समध्ये दिसली मोठी घसरण
4
राड्याच्या काही क्षण अगोदर काय घडले? पडळकर यांच्याशी चर्चा सुरू असतानाच बाचाबाची नंतर...
5
तुमची मुलगी बनेल लखपती; महिन्याला वाचवा १००० रुपये, २१ व्या वर्षी मिळतील ₹५.५ लाख
6
Padalkar Awhad: विधान भवनात देशमुखांना मारहाण, पडळकरांचा कार्यकर्ता ऋषिकेश टकले कोण?
7
दूध गरम करताना सिलेंडर फुटला, २० घरांची राखरांगोळी; महिलेचा होरपळून मृत्यू
8
पहलगाम हल्ल्यानंतर अमेरिकेने ‘TRF’बद्दल घेतला मोठा निर्णय; पाकिस्तानच्या कुरापतींना चाप बसणार!
9
आव्हाड-पडळकर राडा रात्रभर चालला! नितीन देशमुखला पोलिसांनी पकडले, आव्हाड रात्रभर पोलीस स्टेशन बाहेर...
10
आजचे राशीभविष्य, १८ जुलै २०२५: 'या' राशींसाठी आजचा दिवस ठरणार लय भारी!
11
मंत्रालय, ठाणे अन् नाशिक बनले ‘हनी ट्रॅप’चे केंद्र; पटोलेंनी विधानसभेत पेनड्राइव्ह दाखविला
12
संपादकीय: धन-धान्य कृषी योजना योजना चांगली; पण...
13
पडळकर-आव्हाड यांच्या कार्यकर्त्यांमध्ये लाॅबीमध्ये तुंबळ हाणामारी, ‘म’-‘भ’च्या भाषेत शिवीगाळ
14
फडणवीस-उद्धव ठाकरे यांच्यात २० मिनिटे ‘वन टू वन’; आदल्या दिवशी ऑफर, दुसऱ्या दिवशी संवाद
15
महाराष्ट्रात सिनेमांचे तिकिट २०० रुपये कधी? कर्नाटकाने केली... अव्वाच्या सव्वा तिकिटांच्या दरांनी प्रेक्षक हैराण...
16
...तर पेट्रोल अन् डिझेल होणार स्वस्त; कच्च्या तेलाची किंमत ६५ डॉलर प्रतिबॅरलवर राहिली तर...
17
...हा तर १९ जणांच्या खुनाचा प्रकार : सुप्रीम कोर्ट; पीएम जनआरोग्य योजनेत गरज नसताना अँजिओप्लास्टी 
18
न्या. वर्मा यांच्यावरील महाभियोग प्रस्ताव लोकसभेत की राज्यसभेत? सरकार ठरवणार
19
धनंजय मुंडेंच्या बंगल्यातून फोन आल्यानेच तपास थांबला? महादेव मुंडे खून प्रकरण; ज्ञानेश्वरी मुंडेंचा आरोप
20
सरकार कुणाचे आणायचे हे आता तरुण पोरं ठरवणार, मतदानाचे वय सोळा वर्षे; ब्रिटन सरकारचा निर्णय

पुलावरून विद्यार्थ्यांचा जीवघेणा प्रवास ; पर्यायी मार्गासाठी दोन किमीची पायपीट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2018 02:58 IST

महाड तालुक्यातील आंबेशिवथर ग्रामपंचायतीमधील काळ नदीपात्रावरील धोकादायक साकवामुळे (पूल) विद्यार्थ्यांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे.

बिरवाडी : महाड तालुक्यातील आंबेशिवथर ग्रामपंचायतीमधील काळ नदीपात्रावरील धोकादायक साकवामुळे (पूल) विद्यार्थ्यांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. जिल्हा परिषदेच्या दुर्लक्षपणामुळे विद्यार्थ्यांना दोन कि.मी.चा पायी प्रवास करावा लागत असल्याची माहिती समोर आली आहे.जुलै २०१७ मध्ये आंबेशिवथर व कुंभे शिवथर या गावांना जोडणारा काळ नदीवरील साकवाचा काही भाग वाहून गेला होता, त्यामुळे स्थानिक ग्रामस्थांनी लाकडी काठ्या व पत्रे टाकून हा साकव तात्पुरता वापरात आणला होता. मात्र, रायगड जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाने हा साकव ये-जा करण्याकरिता धोकादायक असल्याचे जाहीर केल्याने अतिवृष्टीच्या काळात विद्यार्थ्यांना आंबेशिवथर मधून कुंभे शिवथर येथील समर्थ विद्यामंदिर शिवथर या शाळेमध्ये जाण्याकरिता पायपीट करावी लागते.नदीपात्राच्या पलीकडे असणाऱ्या सह्याद्रीवाडी येथील २२ विद्यार्थ्यांना जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाने घेतलेल्या या निर्णयामुळे दोन कि.मी.ची पायपीट करावी लागत आहे. सदरचा साकव वापराकरिता बंद करण्याचा निर्णय जाहीर केला असला, तरी बांधकाम विभागाने या साकवाची दुरुस्ती अथवा नूतनीकरण केले नसल्याने त्याचा फटका विद्यार्थ्यांना बसत आहे.याबाबत अधिक माहिती घेण्याकरिता जि.प. सदस्य मनोज काळीजकर यांच्याशी संपर्क साधला असता, धोकादायक साकवाच्या दुरुस्तीचा व नूतनीकरणाचा प्रस्ताव एक वर्षापूर्वीच जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाकडे पाठविला आहे. याबाबत जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेतही प्रश्न उपस्थित करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.बांधकाम विभागाने उत्तर देताना सदरचा साकव हा पूरहानीमुळे नादुरु स्त झाल्याचे उत्तर दिले असले, तरी जिल्हा परिषदेने या कामाकरिता तत्काळ निधी उपलब्ध करावा, अशी मागणी केली आहे.

टॅग्स :Raigadरायगड