शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
‘उद्धवसेनेसाठी मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी’,एकनाथ शिंदे यांची टीका  
3
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
4
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
5
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
6
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
7
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
8
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
9
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
10
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
11
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

पुलावरून विद्यार्थ्यांचा जीवघेणा प्रवास ; पर्यायी मार्गासाठी दोन किमीची पायपीट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2018 02:58 IST

महाड तालुक्यातील आंबेशिवथर ग्रामपंचायतीमधील काळ नदीपात्रावरील धोकादायक साकवामुळे (पूल) विद्यार्थ्यांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे.

बिरवाडी : महाड तालुक्यातील आंबेशिवथर ग्रामपंचायतीमधील काळ नदीपात्रावरील धोकादायक साकवामुळे (पूल) विद्यार्थ्यांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. जिल्हा परिषदेच्या दुर्लक्षपणामुळे विद्यार्थ्यांना दोन कि.मी.चा पायी प्रवास करावा लागत असल्याची माहिती समोर आली आहे.जुलै २०१७ मध्ये आंबेशिवथर व कुंभे शिवथर या गावांना जोडणारा काळ नदीवरील साकवाचा काही भाग वाहून गेला होता, त्यामुळे स्थानिक ग्रामस्थांनी लाकडी काठ्या व पत्रे टाकून हा साकव तात्पुरता वापरात आणला होता. मात्र, रायगड जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाने हा साकव ये-जा करण्याकरिता धोकादायक असल्याचे जाहीर केल्याने अतिवृष्टीच्या काळात विद्यार्थ्यांना आंबेशिवथर मधून कुंभे शिवथर येथील समर्थ विद्यामंदिर शिवथर या शाळेमध्ये जाण्याकरिता पायपीट करावी लागते.नदीपात्राच्या पलीकडे असणाऱ्या सह्याद्रीवाडी येथील २२ विद्यार्थ्यांना जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाने घेतलेल्या या निर्णयामुळे दोन कि.मी.ची पायपीट करावी लागत आहे. सदरचा साकव वापराकरिता बंद करण्याचा निर्णय जाहीर केला असला, तरी बांधकाम विभागाने या साकवाची दुरुस्ती अथवा नूतनीकरण केले नसल्याने त्याचा फटका विद्यार्थ्यांना बसत आहे.याबाबत अधिक माहिती घेण्याकरिता जि.प. सदस्य मनोज काळीजकर यांच्याशी संपर्क साधला असता, धोकादायक साकवाच्या दुरुस्तीचा व नूतनीकरणाचा प्रस्ताव एक वर्षापूर्वीच जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाकडे पाठविला आहे. याबाबत जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेतही प्रश्न उपस्थित करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.बांधकाम विभागाने उत्तर देताना सदरचा साकव हा पूरहानीमुळे नादुरु स्त झाल्याचे उत्तर दिले असले, तरी जिल्हा परिषदेने या कामाकरिता तत्काळ निधी उपलब्ध करावा, अशी मागणी केली आहे.

टॅग्स :Raigadरायगड