शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

‘मध्यान्ह भोजन’ ११ कोटींचा निधी शिल्लक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2017 01:11 IST

मध्यान्ह भोजनासाठी रायगड जिल्हा परिषदेकडे ११ कोटी ८७ लाख ८ हजार रु पयांचा निधी शिल्लक आहे. त्यामुळे कोणत्याही शाळेमधील विद्यार्थी दुपारच्या भोजनावाचून वंचित राहणार नाही, असा दावा शिक्षण विभागाने केला आहे.

आविष्कार देसाई अलिबाग : मध्यान्ह भोजनासाठी रायगड जिल्हा परिषदेकडे ११ कोटी ८७ लाख ८ हजार रु पयांचा निधी शिल्लक आहे. त्यामुळे कोणत्याही शाळेमधील विद्यार्थी दुपारच्या भोजनावाचून वंचित राहणार नाही, असा दावा शिक्षण विभागाने केला आहे. केंद्र सरकारच्या विविध योजनांचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय मंत्री अनंत गीते यांची बैठक शुक्र वारी जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडणार आहे. जिल्ह्यात कोठेही शालेय पोषण आहाराबाबत काही तक्र ारी असल्यास त्यांची दखल या बैठकीत घेण्याची शक्यता सूत्रांनी व्यक्त केली आहे.शालेय पोषण आहार ही केंद्र पुरस्कृत योजना आहे. राज्यात ही योजना २२ नोेव्हेंबर ११९५ पासून राबविण्यात येत आहे. सुरु वातीला या योजनेंतर्गत इयत्ता पहिली ते पाचवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना महिन्याला तीन किलोप्रमाणे मोफत तांदूळ देण्यात येत होता. २००१मध्ये सर्वोच्च न्यायालयाने शालेय पोषण आहार योजनेंतर्गत विद्यार्थ्यांना कोरडा तांदूळ न देता, शाळेमध्ये अन्न शिजवून द्यावे, असे आदेश दिले. त्यानुसार २००२ पासून या योजनेचे स्वरूप बदलून घरी तांदूळ देण्याऐवजी विद्यार्थ्यांना शाळेमध्येच शिजवलेला आहार देण्यात येतो. २००८ मध्ये या योजनेचा विस्तार करण्यात आला. इयत्ता सहावी ते आठवीच्या विद्यार्थ्यांनाही या योजनेचा लाभ देण्यात येतो.प्राथमिक शिक्षणाचे सार्वत्रीकरण करणे, पटनोंदणी आणि उपस्थितीचे प्रमाण वाढविणे, विद्यार्थ्यांची गळती थांबविणे, भेदभाव नष्ट करणे, विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता वाढविणे, ही या योजनेची ठळक वैशिष्ट्ये आहेत.एवढे सगळे करूनही गेल्या काही वर्षांपासून जिल्हा परिषदेतील शाळेतील विद्यार्थ्यांची संख्या कमी झाली होती. मात्र, गेल्या दोन वर्षांपासून विद्यार्थी गळतीचा आकडा थांबला आहे. पटसंख्या वाढण्याच्या आकडेवारीमध्ये शेकडोच्या संख्येने वाढ होत असल्याचे जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी शेषराव बडे यांनी या वेळी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.पटसंख्या वाढीमध्ये शालेय पोषण आहाराबरोबरच अन्य बाबीही कारणीभूत असल्याचे शेषराव बडे यांनी सांगितले.समितीवर विद्यार्थ्यांचे पालककेंद्रीय मंत्री अनंत गीते हे केंद्राच्या विविध योजनांचा आढावा घेण्यासाठी शुक्र वारी रायगडमध्ये येणार आहेत. त्या बैठकीमध्ये विविध तक्र ारींची ते दखल घेण्याची शक्यता सूत्रांनी व्यक्त केली आहे. शालेय पोषण आहारामध्ये काही ना काहीतक्र ारी येण्याचे प्रमाण हे सुरूच असते. त्यामुळे शालेय पोषण आहार समितीवर विद्यार्थ्यांच्या पालकांनाच घेतले जाते.त्यांनीच आपल्या मुलांना चांगला, पोषक आणि स्वच्छ आहार कसा मिळेल, हे पाहायचे आहे. त्यामुळे तक्र ारी येण्याचा प्रश्नच राहिलेला नाही.त्या उपरही काही तक्र ारी आढळल्यास शिक्षण विभागाच्या निदर्शनास आणून दिल्यास त्यावर तातडीने कठोर कारवाई केली जाईल, असे जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी शेषराव बडे यांनी स्पष्ट केले.