शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

डॉक्टरांवर हल्ला करणाऱ्यांवर कडक कारवाई व्हावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 15, 2019 01:24 IST

आयएमए संघटनेच्या डॉक्टरांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

अलिबाग : कोलकात्यात झालेल्या डॉक्टरांवरील हिंस्र हल्ल्याच्या आरोपींना कडक शिक्षा व्हावी आणि डॉक्टरांवर वारंवार होणारे हल्ले थांबावेत या मागणीकरिता इंडियन मेडिकल असोसिएशन (आयएमए ) अलिबागचे अध्यक्ष डॉ. राजेंद्र चांदोरकर यांच्या नेतृत्वाखाली शहरातील आयएमए सदस्य डॉक्टरांनी शुक्रवारी रायगड जिल्हाधिकाºयांना लेखी निवेदन दिले. उप जिल्हाधिकारी वैशाली माने यांनी हे निवेदन स्वीकारले.

कोलकाता येथील एन. आर. एस. वैद्यकीय महाविद्यालयात ११ जून रोजी सुमारे दोनशे जणांच्या जमावाने कर्तव्यावर उपस्थित डॉक्टर व प्रशिक्षणार्थी डॉक्टर्सवर (इंटर्न) सशस्त्र हल्ला केला. त्यामध्ये अनेक डॉक्टर्स गंभीर जखमी झाले. डॉक्टर मुखर्जी यांच्या डोक्याला गंभीर इजा झाल्यामुळे ते अजूनही कोमामध्ये आहेत. डॉक्टरांवर जमावाकडून असे हल्ले होण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहे. ही अत्यंत चिंतेची व निंदनीय बाब असल्याचे लेखी निवेदनात म्हटले आहे.केंद्र शासनाने आरोग्य आस्थापनावर होणारा हिंसाचार रोखण्यासाठी तातडीने एक केंद्रीय कायदा करून, आरोग्य रक्षकांचे संरक्षण करावे, अशी मागणी त्यांनी केली. वर्ल्ड मेडिकल असोसिएशनने देखील ‘आयएमए’ला पाठिंबा दिला असून, सर्व सदस्य देशांनी असा हिंसाचार रोखण्यासाठी तातडीने कडक कायदे करावेत, अशी मागणी एका ठरावाद्वारे केली असल्याचे निवेदनात पुढे नमूद करण्यात आले आहे.हिंसाचारामुळे रु ग्ण वेठीस धरले जातात. रुग्णालय कर्मचारी आणि वैद्यकीय व्यावसायिक सातत्याने दहशतीच्याखाली असल्याने त्यांची कार्यक्षमता देखील खालावते. याचा थेट रुग्णांच्या म्हणजे समाजाच्या आरोग्य व्यवस्थेवर दीर्घकालीन आणि विपरीत परिणाम होऊ शकतो. कोणीही डॉक्टर अशा हिंसाचाराच्या भीतीने अत्यवस्थ रु ग्ण दाखल करून घेण्यास धजावणार नसल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.काळ्या फिती लावून निषेधआजकाल वैद्यकीय व्यावसायिक आणि रुग्णालय यावर हिंसाचार वाढत आहे. ‘आयएमए’ने वेळोवेळी याविरु द्ध आवाज उठविला आहेच. शुक्र वारी देशव्यापी आंदोलन करण्यात आले आहे. देशभरात सर्व डॉक्टर्स काळ्या फिती लावून काम करत आहेत, तसेच जागोजागी धरणे धरत आहेत.

टॅग्स :alibaugअलिबागRaigadरायगडdoctorडॉक्टर