शहरं
Join us  
Trending Stories
1
"इंग्रजीचा पुरस्कार अन् भारतीय भाषांचा तिरस्कार हे योग्य नाही, आपली भाषा..."; CM फडणवीसांचे राज यांना उत्तर
2
हैदराबादच्या बेगमपेट विमानतळाला बॉम्बने उडवण्याची धमकी; सुरक्षा यंत्रणा अलर्टवर, शोधमोहिम सुरू
3
सोनमने २५ दिवसांत केला ११२ वेळा फोन, तो संजय वर्मा कोण? राजा रघुवंशी हत्या प्रकरणाला नवं वळण  
4
मुकेश अंबानींनी लावलं जबरदस्त डोकं, ५०० कोटींच्या गुंतवणूकीतून कमावले ९००० कोटी रुपये
5
पंतप्रधान नरेंद्र मोदी ३७ दिवस शांत बसले अन् आता..; मोदी-ट्रम्प चर्चेवर काँग्रेसचा निशाणा
6
खासगी टेलिकॉम कंपन्यांचे धाबे दणाणले; लवकरच सुरू होणार BSNL ची 5G सेवा; नावही ठरले...
7
करून दाखवलं! ११ व्या वर्षी लग्न... समाजासमोर 'तो' झुकला नाही, स्वप्नासाठी लढला; होणार डॉक्टर
8
BMC School: १३ वर्षांत मुंबई महापालिकेच्या १३१ मराठी शाळा बंद!
9
मुलांच्या उच्च शिक्षणाची चिंता सतावतेय? SIP, SSY आणि PPF मधून करा करोडपती होण्याची तयारी!
10
गुरुचरित्रात ‘असे’ येते गणेशाचे अद्भूत वर्णन; बाप्पाच्या महात्म्याचा संदर्भ कुठे, कसा येतो?
11
डोनाल्ड ट्रम्प यांनी विचारलं, कॅनडातून परतताना अमेरिकेत थांबू शकता? पंतप्रधान मोदींनी दिला नकार, म्हणाले...
12
'मम्मीने दरवाजा उघडला, काशी काका आता आले अन्...'; 9 वर्षाच्या मुलाने सांगितले कशी झाली बापाची हत्या?
13
'आता पुन्हा शरद पवारांकडे जायचे नाही, असं ठरवलंय'; पवारांचा निष्ठावंत दुखावला, बळीराम काका साठेंनी मन केलं मोकळं
14
Swami Samartha: 'भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे' हे स्वामींचे वचन; पण आहे 'ही' एक अट!
15
रोहित शर्माच्या पत्नीचा पाठलाग करत घरापर्यंत पोहोचला, फोटोही काढू लागला, पाहतात रितिकाचा राग अनावर, त्यानंतर...  
16
हिंदी सक्तीवरून राज ठाकरेंचं महाराष्ट्रातील शाळांच्या मुख्याध्यापकांना खुलं पत्र, वाचा जसच्या तसं...
17
कुंडलीत ‘या’ स्थानी राहु-केतु आहेत? अपार धनलाभ, भरघोस भरभराट; कुणी काही वाकडे करू शकणार नाही!
18
Mumbai: नियोजनाच्या अभावामुळे विक्रोळीत वाहतूककोंडी
19
Israel Iran War : 'मोसाद'ची नवीन खेळी!, इराण अलर्टवर, नागरिकांना मोबाईलमधून WhatsApp डिलिट करण्याचे आदेश
20
दूधवाल्याची चूक अन् छत्रपती संभाजीनगरजवळ कारसह दोन बस एकमेकांवर धडकल्या

केंबुर्ली गावाजवळ गंधकाने घेतला पेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2019 23:01 IST

महिन्याभरापूर्वी ट्रक उलटला : पोलीस प्रशासनाची तारांबळ

दासगाव : मुंबई-गोवा महामार्गावर केंबुर्ली गावाजवळ रसायन घेऊन जाणारा ट्रक जून महिन्यात पलटी झाला होता. यातील गंधकाची पावडर रस्त्यालगत अपघातामुळे पसरली गेली. या घटनेला आता महिना झाला असला तरी अद्याप हे गंधक काढण्यात आले नव्हते. गंधक पावडरला रविवारी अचानक आग लागली. यामुळे स्थानिक पोलीस प्रशासनाची चांगलीच धावपळ झाली. नदी आणि महामार्गाच्या मध्ये पडलेल्या या गंधक पावडरकडे पोलीस आणि स्थानिक प्रशासनाने दुर्लक्ष केले.

केंबुर्ली गावाजवळ २२ जून रोजी रात्री १० च्या सुमारास एक ट्रक पलटी झाला होता, यामध्ये दोन जण जखमी झाले होते तर ट्रकमधील गंधकही पसरले होते. आता या घटनेला एक महिना होत आला तरीदेखील संबंधित ट्रकमालक, कंपनी आणि प्रशासनाने याची दखल घेतली नाही. या ठिकाणी पडलेला ट्रक केवळ उचलून नेण्यात आला. मात्र, पिवळ्या रंगाचे गंधक तिथेच पडून राहिले. इंडस्ट्री वापरासाठी असलेल्या या गंधकाबाबत दुर्लक्ष केल्याने रविवारी या गंधकाने अचानक पेट घेतला. या घटनेची माहिती स्थानिक ग्रामस्थांकडून पोलिसांना समजताच पोलिसांची तारांबळ उडाली. नदी आणि महामार्ग यादरम्यान पडलेल्या गंधकाने नदीलादेखील धोका निर्माण होऊ शकत होता. या गंधकाबाबत दुर्लक्ष केल्याने हा प्रकार झाला असल्याचे स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे.

रविवारी सकाळी पडलेले गंधक धुमसू लागले आणि कालांतराने या गंधकाने पेट घेतला. त्यानंतर पोलिसांकडून महाड एम.आय.डी.सी.च्या अग्निशमन पथकाचे बंब मागवण्यात आले. मात्र, पाण्याशी संपर्क आल्याने या गंधकाने अधिकच पेट घेतला. यामुळे पोलीस प्रशासन चांगलेच हादरले. अखेर महामार्ग बांधकाम विभागाच्या ठेकेदार कंपनीकडून माती मागवण्यात आली आणि ही माती वरून टाकण्यात आली, यामुळे गंधकाला लागलेली आग आटोक्यात आली. घटनास्थळी नायब तहसीलदार अरविंद घेमुड हेदेखील दाखल झाले.

पोलीस प्रशासनाची डोळेझाकजून महिन्यातील २२ तारखेला हा अपघात झाला होता. या अपघातात ट्रक पलटी झाला, तर दोन जण जखमी झाले होते. या ठिकाणाहून ट्रक काढण्यात आला. मात्र, ज्या कंपनीचा माल होता त्याने मात्र हा माल येथून काढून नेला नाही. पोलीस प्रशासनानेही या कंपनीला बजावले नाही. यामुळे गंधकासारखे रसायन गावाशेजारी पडून राहिले. या गंधकाचा धोका जनावरे आणि लहान मुलांना असतानाही याबाबत बेजबाबदारी पोलीस प्रशासनाने दाखवली. या गंधकाबाबत आजही अनभिज्ञता आहे.