शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
4
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
5
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
6
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
7
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
8
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
9
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
10
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
11
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
12
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
13
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
14
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
15
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
16
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
17
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
18
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
19
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
20
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

नेरळ बसस्थानकात साचले पाणी

By admin | Updated: July 6, 2016 02:30 IST

नियोजनशून्य वाहतूक व्यवस्था व अतिक्रमणामुळे सतत वादाचा भोवऱ्यात असलेल्या नेरळ बसस्थानकात सांडपाण्याच्या विल्हेवाटीचा प्रश्न गहण बनला असून पावसाळ्याच्या

नेरळ : नियोजनशून्य वाहतूक व्यवस्था व अतिक्रमणामुळे सतत वादाचा भोवऱ्यात असलेल्या नेरळ बसस्थानकात सांडपाण्याच्या विल्हेवाटीचा प्रश्न गहण बनला असून पावसाळ्याच्या सुरुवातीलाच या बसस्थानकाला तलावाचे स्वरूप आले आहे. या साचलेल्या गुडघाभर पाण्यातून वाट काढताना वाहनचालकांना कसरत करावी लागत असून प्रवाशांकडून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.कर्जत आगाराच्या अंतर्गत हे बसस्थानक येत असून नेरळ शहर आणि कोल्हरे गावाच्या मध्यस्थानी असलेल्या नेरळ बसस्थानकाला कुणी वालीच नसल्याचे चित्र स्पष्ट होत आहे. नेरळ बसस्थानकातून दररोज हजारो वाहनांतून प्रवासी व मालाची वाहतूक होत असते. नेरळ शहर व नेरळ पूर्व भागातील सुमारे २५ गावातील रहिवासी येथून नित्य प्रवास करीत असतात. येथे एसटीची सुमारे ३५ वर्षे वहिवाट आहे. मात्र ही जागा खासगी मालकीची असून अद्याप ही जागा शासनाला एसटीकरिता संपादित करण्यात यश आलेले नाही. विशेष म्हणजे याकरिता कोणी पुढाकार घेतल्याचे दिसून येत नाही. प्रवाशांकरिता येथे खासगी वाहतूकदार व सार्वजनिक सेवा यात रस्सीखेच नेहमी सुरू असते. पावसाळ्यात या स्थानकात थांबण्यापेक्षा लवकर मिळेल त्या वाहनातून घर गाठण्यासाठी प्रत्येक प्रवासी धडपडत असतो.त्यातच थोडा जरी पाऊस झाला तरी हे पावसाचे पाणी स्थानकाबाहेर पडण्यास मार्ग नसल्याने पाणी स्थानकाच्या मध्यभागी तुंबते, यामुळे बसस्थानकास तलावाचे स्वरूप येते. त्यामुळे डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे. या साचलेल्या पाण्यातून कसा मार्ग काढायचा ही नित्याची डोकेदुखी बनली आहे. या तलावातून बाहेर पडताना लहान वाहन चालकांची दमछाक होते, तर एसटी चालकांनाही खूप त्रास सहन करावा लागत आहे. पाऊस कमी पडला तरी चिखल होत असल्याने या दलदलीतून वाहन चालताना नाकीनऊ येते. स्थानकाच्या चारही बाजूंनी होत असलेले अतिक्र मण व अवैध बांधकाम यावर स्थानिक प्राधिकरण अथवा शासन यापैकी कुणाचेही नियंत्रण नाही. या स्थानकात रस्ता बांधकाम करताना टाकण्यात आलेला मोठा ढिगारा अद्याप तसाच पडून आहे. या ढिगाऱ्यातील माती पावसाबरोबर वाहून स्थानकात चिखलाचे साम्राज्य निर्माण झाले आहे. (वार्ताहर)- नेरळ स्थानकात प्रवास करणाऱ्यांमध्ये शालेय विद्यार्थी व नोकरदार प्रवाशांची संख्या जास्त आहे. या सर्वांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. यावर स्थानिक पातळीवर तातडीने उपाययोजना केली जावी, अशी मागणी अनेक वर्षांपासून होत असताना याकडे सर्वांनीच दुर्लक्ष केले आहे. नेरळ बसस्थानक हा नेरळ व परिसरातील प्रवाशांचा जिव्हाळ्याचा प्रश्न असून स्थानिक तसेच तालुक्याच्या लोकप्रतिनिधींनी याकडे लक्ष घालून या बसस्थानकाचा कायमचा प्रश्न सोडवावा, अशी मागणी प्रवाशांकडून केली जात आहे.दुर्गंधी पसरली : नेरळ बसस्थानकात मोठ्या प्रमाणात पाणी साचून दुर्गंधी पसरली आहे. याचा परिणाम नागरिकांच्या आरोग्यावरही होण्याची शक्यता आहे. हे पाणी साचल्याने मोठ्या प्रमाणात प्रवाशांना त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे प्रवाशांना पाण्यातून वाट शोधावी लागत आहे. दरवर्षीप्रमाणे यावर्षी या स्थानकाची ही अवस्था असून एसटी प्रशासन व लोकप्रतिनिधी उदासीन असल्याचे चित्र यावरून स्पष्ट दिसत आहे. नेरळ बसस्थानकाची जागा ही खासगी मालकीची असल्याने आम्हाला यात काहीही करता येत नाही. यासंदर्भात अनेक वेळा कर्जत तहसीलदार, कर्जत पंचायत समिती, कोल्हारे ग्रामपंचायत यांच्याकडे पत्रव्यवहार केला आहे. परंतु यांच्याकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही.- डी. एस. देशमुख, आगारप्रमुख, कर्जत