शहरं
Join us  
Trending Stories
1
बडगुजर यांच्या प्रवेशावरून भाजपमध्ये घमासान, बावनकुळे अंधारात, गिरीश महाजन यांचा पुढाकार
2
अश्रूंचा बांध फुटला... राजवीर यांना शेवटचा निरोप देताना पत्नी कर्नल दीपिका चौहान भावूक ( Video )
3
MHT CET 2025 Result: एमएचटी सीईटीच्या परीक्षेत पीसीएममध्ये राज्यातील २२ जण अव्वल!
4
इराण-इस्त्रायल यांच्यातील युद्धात कोण बनणार शांतीदूत?; चीन आणि रशियानेही दिली ऑफर
5
Sonam Raghuwanshi: सोनम आणि तिच्या बॉयफ्रेंडने कशी केली राजाची हत्या? पोलीस आरोपींना घेऊन 'त्या' ठिकाणी
6
प्रक्षेपण सुरू असतानाच झाला होता हल्ला, आता इस्राइलच्या नाकावर टिच्चून त्या महिला अँकरने दिल्या बातम्या  
7
"भारतीय एजंट्सनं अपहरण केलं होतं..," फरार हिरे व्यापारी मेहुल चोक्सीचा खळबळजनक दावा
8
आर. अश्विनच्या टीमवरील बॉल टेम्परिंगचा आरोप खरा की, खोटा? TNPL आयोजकांनी निर्णय दिला, आता...
9
तुम्ही 'या' क्षेत्रात काम करताय का? सरकार दरमहा देणार ३,००० रुपये, आजच अर्ज करा!
10
अहमदाबाद विमान अपघातात २३ वर्षीय क्रिकेटपटूचा दुर्दैवी मृत्यू; टीमने वाहिली श्रद्धांजली
11
कधीही अण्वस्त्र तयार करू शकणार नाही इराण? G7 शिखर परिषदेतून तेहरानला इशारा; या सर्व देशांचा इस्रायलला पाठिंबा
12
Groww, Zerodha सह टॉप ब्रोकर्सनं २ महिन्यांत गमावले ४.७ लाख अ‍ॅक्टिव्ह ग्राहक, काय आहे कारण?
13
Israel Iran Conflict : अमेरिका आता इराणवर हल्ला करणार? ट्रम्प यांनी दिला इशारा; म्हणाले, तेहरान रिकामे करा...
14
'केवळ एका फोन कॉलने इराण-इस्रायल युद्ध थांबवता येऊ शकतं..."; परराष्ट्र मंत्री अराघची यांचा दावा
15
"इराणच्या अयातुल्ला खामेनींना संपवल्यानंतरच हा संघर्ष थांबेल"; बेंजामिन नेतन्याहूंचे मोठे विधान
16
Devendra Fadnavis: स्थलांतरित शाळाबाह्य मुलांना जबरदस्तीने शाळेत आणा, मुख्यमंत्र्यांचे आवाहन
17
'सैराट'मधील हा अभिनेता लवकरच गर्लफ्रेंडसोबत बांधणार लग्नगाठ, ती दिसायला आहे खूप सुंदर
18
UPI Changes: ट्रान्झॅक्शन टाईम, बॅलन्स चेक लिमिट... UPI शी निगडीत या मोठ्या बदलांबाबत जाणून घ्या 
19
रस्त्यावरील लोखंडी वस्तूमुळे पायाला पडले १८ टाके, महापालिकेचा ढिसाळ कारभार अभिनेत्रीला पडला महागात
20
नाशिक भाजपाचा आज प्रवेशोत्सव ! माजी मंत्री बबनराव घोलप, उद्धव सेनेचे सुधाकर बडगुजर यांच्यासह दहा ते बारा माजी नगरसेवक कमळ हातात घेणार 

नेरळ बसस्थानकात साचले पाणी

By admin | Updated: July 6, 2016 02:30 IST

नियोजनशून्य वाहतूक व्यवस्था व अतिक्रमणामुळे सतत वादाचा भोवऱ्यात असलेल्या नेरळ बसस्थानकात सांडपाण्याच्या विल्हेवाटीचा प्रश्न गहण बनला असून पावसाळ्याच्या

नेरळ : नियोजनशून्य वाहतूक व्यवस्था व अतिक्रमणामुळे सतत वादाचा भोवऱ्यात असलेल्या नेरळ बसस्थानकात सांडपाण्याच्या विल्हेवाटीचा प्रश्न गहण बनला असून पावसाळ्याच्या सुरुवातीलाच या बसस्थानकाला तलावाचे स्वरूप आले आहे. या साचलेल्या गुडघाभर पाण्यातून वाट काढताना वाहनचालकांना कसरत करावी लागत असून प्रवाशांकडून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.कर्जत आगाराच्या अंतर्गत हे बसस्थानक येत असून नेरळ शहर आणि कोल्हरे गावाच्या मध्यस्थानी असलेल्या नेरळ बसस्थानकाला कुणी वालीच नसल्याचे चित्र स्पष्ट होत आहे. नेरळ बसस्थानकातून दररोज हजारो वाहनांतून प्रवासी व मालाची वाहतूक होत असते. नेरळ शहर व नेरळ पूर्व भागातील सुमारे २५ गावातील रहिवासी येथून नित्य प्रवास करीत असतात. येथे एसटीची सुमारे ३५ वर्षे वहिवाट आहे. मात्र ही जागा खासगी मालकीची असून अद्याप ही जागा शासनाला एसटीकरिता संपादित करण्यात यश आलेले नाही. विशेष म्हणजे याकरिता कोणी पुढाकार घेतल्याचे दिसून येत नाही. प्रवाशांकरिता येथे खासगी वाहतूकदार व सार्वजनिक सेवा यात रस्सीखेच नेहमी सुरू असते. पावसाळ्यात या स्थानकात थांबण्यापेक्षा लवकर मिळेल त्या वाहनातून घर गाठण्यासाठी प्रत्येक प्रवासी धडपडत असतो.त्यातच थोडा जरी पाऊस झाला तरी हे पावसाचे पाणी स्थानकाबाहेर पडण्यास मार्ग नसल्याने पाणी स्थानकाच्या मध्यभागी तुंबते, यामुळे बसस्थानकास तलावाचे स्वरूप येते. त्यामुळे डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे. या साचलेल्या पाण्यातून कसा मार्ग काढायचा ही नित्याची डोकेदुखी बनली आहे. या तलावातून बाहेर पडताना लहान वाहन चालकांची दमछाक होते, तर एसटी चालकांनाही खूप त्रास सहन करावा लागत आहे. पाऊस कमी पडला तरी चिखल होत असल्याने या दलदलीतून वाहन चालताना नाकीनऊ येते. स्थानकाच्या चारही बाजूंनी होत असलेले अतिक्र मण व अवैध बांधकाम यावर स्थानिक प्राधिकरण अथवा शासन यापैकी कुणाचेही नियंत्रण नाही. या स्थानकात रस्ता बांधकाम करताना टाकण्यात आलेला मोठा ढिगारा अद्याप तसाच पडून आहे. या ढिगाऱ्यातील माती पावसाबरोबर वाहून स्थानकात चिखलाचे साम्राज्य निर्माण झाले आहे. (वार्ताहर)- नेरळ स्थानकात प्रवास करणाऱ्यांमध्ये शालेय विद्यार्थी व नोकरदार प्रवाशांची संख्या जास्त आहे. या सर्वांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. यावर स्थानिक पातळीवर तातडीने उपाययोजना केली जावी, अशी मागणी अनेक वर्षांपासून होत असताना याकडे सर्वांनीच दुर्लक्ष केले आहे. नेरळ बसस्थानक हा नेरळ व परिसरातील प्रवाशांचा जिव्हाळ्याचा प्रश्न असून स्थानिक तसेच तालुक्याच्या लोकप्रतिनिधींनी याकडे लक्ष घालून या बसस्थानकाचा कायमचा प्रश्न सोडवावा, अशी मागणी प्रवाशांकडून केली जात आहे.दुर्गंधी पसरली : नेरळ बसस्थानकात मोठ्या प्रमाणात पाणी साचून दुर्गंधी पसरली आहे. याचा परिणाम नागरिकांच्या आरोग्यावरही होण्याची शक्यता आहे. हे पाणी साचल्याने मोठ्या प्रमाणात प्रवाशांना त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे प्रवाशांना पाण्यातून वाट शोधावी लागत आहे. दरवर्षीप्रमाणे यावर्षी या स्थानकाची ही अवस्था असून एसटी प्रशासन व लोकप्रतिनिधी उदासीन असल्याचे चित्र यावरून स्पष्ट दिसत आहे. नेरळ बसस्थानकाची जागा ही खासगी मालकीची असल्याने आम्हाला यात काहीही करता येत नाही. यासंदर्भात अनेक वेळा कर्जत तहसीलदार, कर्जत पंचायत समिती, कोल्हारे ग्रामपंचायत यांच्याकडे पत्रव्यवहार केला आहे. परंतु यांच्याकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही.- डी. एस. देशमुख, आगारप्रमुख, कर्जत