शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG : "मी रोहित भाईला पाहिलं अन्..." शतकी खेळीनंतर यशस्वीनं शेअर केली ती खास गोष्ट (VIDEO)
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
7
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
8
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
9
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
10
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
11
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
12
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
13
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
14
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
15
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
16
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
17
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
18
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
19
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
20
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!

आंबेत पुलाचे काम आठ दिवसात सुरू करा, पालकमंत्री उदय सामंत यांचे निर्देश

By राजेश भोस्तेकर | Updated: October 31, 2022 14:09 IST

निविदा पुढे ढकलणे कामाची चौकशी करण्याचे पालकमंत्रीचे संकेत

अलिबाग : आंबेत पुलाच्या कामाची निविदा पुढे पुढे ढकलली जात आहे. याबाबत मला चौकशी लावावी लागेल आणि श्रेय वादावरून निविदा प्रक्रिया पुढे जात असेल तर ते चुकीचे आहे. टेंडर प्रक्रिया रखडल्याने जनतेच्या रोषाला आम्हाला सामोरे जावे लागत आहे. जनतेची गैरसोय होत आहे. याचे उत्तर काय असा जाब पालकमंत्री उदय सामंत यांनी अधिकाऱ्यांना विचारला आहे. टेंडर प्रक्रिया आज पूर्ण करून आठ दिवसात पुलाचे काम सुरू करा. जर तर वर कोणाचा विश्वास नाही. कामाचा नारळ फोडण्यास आम्ही येणार असल्याची ताकीद पालकमंत्री उदय सामंत यांनी अधिकाऱ्यांना दिली आहे. या पुलासाठी दहा कोटींचा खर्च होणार आहे.

रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्याला जोडणारा आंबेत पुल स्वर्गीय तत्कालीन मुख्यमंत्री ए आर अंतुले यांच्या दूरदृष्टी तून निर्माण झाला होता. त्यामुळे रत्नागिरी ला वळसा न घालता प्रवाशाचा वेळ वाचत होता. मात्र गेल्या तीन चार वर्षापासून पुल हा नादुरुस्त झाला असून साडे सोळा कोटी खर्च करण्यात आला आहे. मात्र तरीही हा पूल वाहतुकीस बंद ठेवण्यात आलेला आहे. त्यामुळे रायगड, रत्नागिरी जाणाऱ्या प्रवाशांना वळसा घेऊन प्रवास करावा लागत आहे. 

आंबेत पुल बंद असल्याने प्रवाशांमध्ये नाराजी पसरली आहे. शासन आणि प्रशासनाला यामुळे प्रवाशाच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे. १३ ऑक्टोंबर रोजी जिल्हा नियोजन समिती बैठक पालकमंत्री उदय सामंत याच्या अध्यक्षतेखाली झाली. त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत पत्रकारांनी आंबेत पुलाचा प्रश्न उपस्थित केला होता. त्यानुसार आज ३१ ऑक्टोंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात राजस्व सभागृहात आंबेत पुलाबाबत अधिकाऱ्याची आढावा बैठक घेतली. यावेळी अधिकाऱ्यांना पालकमंत्री यांनी फैलावर घेतले. आमदार महेंद्र दळवी, आमदार महेंद्र थोरवे, जिल्हाधिकारी महेंद्र कल्याणकर तसेच अधिकारी वर्ग यावेळी उपस्थित होते.

आज निविदा उघडली जाणार असल्याचे अधिकारी यांनी सांगितले. त्यावेळी काम पंधरा दिवसात नाही तर आठ दिवसात ठेकेदाराने काम सुरू करण्याचे निर्देश पालकमंत्री उदय सामंत यांनी दिले आहेत. त्यामुळे आंबेत पुलाचा प्रश्न पालकमंत्री याच्या निर्देशानुसार लवकर सुटेल आणि प्रवाशाची समस्या सुटण्याची आशा निर्माण झाली आहे. नवीन पुल बांधला गेला असता....आंबेत पुलाचे दुरुस्तीचे काम दोन वर्षापासून सुरू असून अपूर्णच आहे. दुरुस्तीच्या कामावर साडे सोळा कोटी खर्च करण्यात आला आहे. नवीन दुरुस्ती साठी दहा कोटी खर्च होणार आहे. यावर नवीनच पुल बांधला असता तर बरे झाले असते असे पालकमंत्री उदय सामंत यांनी म्हटले आहे. 

राज्य परिवहन विभागाशी बोलून रोरोतून बस सेवा सुरू कराआंबेत पुल बंद असल्याने वाहतूक बंद ठेवली आहे. पर्यायी सेवा म्हणून नदीतून रो रो सेवा सुरू आहे. अवजड वाहने रो रो मधून जात आहेत. मात्र एस टी बस नेली जात नाही. यासाठी राज्य परिवहन रायगड विभागच्या अधिकाऱ्यांशी बोलून ती सुरू करण्याबाबत अधिकाऱ्यांना सूचना केल्या आहेत. बसच्या क्षमतेपेक्षा कमी प्रवसी संख्या बसवून बस सोडण्याबाबत प्रयत्न करा अशा सूचनाही पालकमंत्री सामंत यांनी केल्या आहेत.