शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

आंबेत पुलाचे काम आठ दिवसात सुरू करा, पालकमंत्री उदय सामंत यांचे निर्देश

By राजेश भोस्तेकर | Updated: October 31, 2022 14:09 IST

निविदा पुढे ढकलणे कामाची चौकशी करण्याचे पालकमंत्रीचे संकेत

अलिबाग : आंबेत पुलाच्या कामाची निविदा पुढे पुढे ढकलली जात आहे. याबाबत मला चौकशी लावावी लागेल आणि श्रेय वादावरून निविदा प्रक्रिया पुढे जात असेल तर ते चुकीचे आहे. टेंडर प्रक्रिया रखडल्याने जनतेच्या रोषाला आम्हाला सामोरे जावे लागत आहे. जनतेची गैरसोय होत आहे. याचे उत्तर काय असा जाब पालकमंत्री उदय सामंत यांनी अधिकाऱ्यांना विचारला आहे. टेंडर प्रक्रिया आज पूर्ण करून आठ दिवसात पुलाचे काम सुरू करा. जर तर वर कोणाचा विश्वास नाही. कामाचा नारळ फोडण्यास आम्ही येणार असल्याची ताकीद पालकमंत्री उदय सामंत यांनी अधिकाऱ्यांना दिली आहे. या पुलासाठी दहा कोटींचा खर्च होणार आहे.

रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्याला जोडणारा आंबेत पुल स्वर्गीय तत्कालीन मुख्यमंत्री ए आर अंतुले यांच्या दूरदृष्टी तून निर्माण झाला होता. त्यामुळे रत्नागिरी ला वळसा न घालता प्रवाशाचा वेळ वाचत होता. मात्र गेल्या तीन चार वर्षापासून पुल हा नादुरुस्त झाला असून साडे सोळा कोटी खर्च करण्यात आला आहे. मात्र तरीही हा पूल वाहतुकीस बंद ठेवण्यात आलेला आहे. त्यामुळे रायगड, रत्नागिरी जाणाऱ्या प्रवाशांना वळसा घेऊन प्रवास करावा लागत आहे. 

आंबेत पुल बंद असल्याने प्रवाशांमध्ये नाराजी पसरली आहे. शासन आणि प्रशासनाला यामुळे प्रवाशाच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे. १३ ऑक्टोंबर रोजी जिल्हा नियोजन समिती बैठक पालकमंत्री उदय सामंत याच्या अध्यक्षतेखाली झाली. त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत पत्रकारांनी आंबेत पुलाचा प्रश्न उपस्थित केला होता. त्यानुसार आज ३१ ऑक्टोंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात राजस्व सभागृहात आंबेत पुलाबाबत अधिकाऱ्याची आढावा बैठक घेतली. यावेळी अधिकाऱ्यांना पालकमंत्री यांनी फैलावर घेतले. आमदार महेंद्र दळवी, आमदार महेंद्र थोरवे, जिल्हाधिकारी महेंद्र कल्याणकर तसेच अधिकारी वर्ग यावेळी उपस्थित होते.

आज निविदा उघडली जाणार असल्याचे अधिकारी यांनी सांगितले. त्यावेळी काम पंधरा दिवसात नाही तर आठ दिवसात ठेकेदाराने काम सुरू करण्याचे निर्देश पालकमंत्री उदय सामंत यांनी दिले आहेत. त्यामुळे आंबेत पुलाचा प्रश्न पालकमंत्री याच्या निर्देशानुसार लवकर सुटेल आणि प्रवाशाची समस्या सुटण्याची आशा निर्माण झाली आहे. नवीन पुल बांधला गेला असता....आंबेत पुलाचे दुरुस्तीचे काम दोन वर्षापासून सुरू असून अपूर्णच आहे. दुरुस्तीच्या कामावर साडे सोळा कोटी खर्च करण्यात आला आहे. नवीन दुरुस्ती साठी दहा कोटी खर्च होणार आहे. यावर नवीनच पुल बांधला असता तर बरे झाले असते असे पालकमंत्री उदय सामंत यांनी म्हटले आहे. 

राज्य परिवहन विभागाशी बोलून रोरोतून बस सेवा सुरू कराआंबेत पुल बंद असल्याने वाहतूक बंद ठेवली आहे. पर्यायी सेवा म्हणून नदीतून रो रो सेवा सुरू आहे. अवजड वाहने रो रो मधून जात आहेत. मात्र एस टी बस नेली जात नाही. यासाठी राज्य परिवहन रायगड विभागच्या अधिकाऱ्यांशी बोलून ती सुरू करण्याबाबत अधिकाऱ्यांना सूचना केल्या आहेत. बसच्या क्षमतेपेक्षा कमी प्रवसी संख्या बसवून बस सोडण्याबाबत प्रयत्न करा अशा सूचनाही पालकमंत्री सामंत यांनी केल्या आहेत.