शहरं
Join us  
Trending Stories
1
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
2
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
3
स्विस बँकेत प्रचंड पैसा, ४० अब्ज डॉलर्सचा बिझनेस; पाकिस्तानचं सैन्यच आहे देशाचा खरा 'मालक'
4
महाराष्ट्राचे सुपुत्र न्या. भूषण गवई होणार देशाचे ५२ वे सरन्यायाधीश; १४ मे रोजी घेणार शपथ
5
पळून गेलेले सासू-जावई सापडले, ७२ तास पोलिसांना दिला चकमा; म्हणाली, "मी फक्त माझ्या..."
6
कोलकाता आगीत १४ जणांचा होरपळून मृत्यू; PM मोदींनी शोक व्यक्त करत जाहीर केली २ लाखांची मदत
7
PF सदस्यांच्या किमान पेन्शनमध्ये ३ पट वाढ होणार? कोट्यवधी कर्मचाऱ्यांना होईल फायदा
8
IPL सामन्यानंतर मोठी घटना! कुलदीप यादवने रिंकू सिंहच्या दोनदा कानशिलात लगावली; Video व्हायरल...
9
नरसिंह मंदिरात दर्शनासाठी रांगेत उभ्या असलेल्या भाविकांवर कोसळली भिंत, 8 जणांचा मृत्यू
10
Stock Market Today: पळून थकला का शेअर बाजार? ८२ अंकांच्या तेजीसह शेअर बाजार उघडला; ऑटो-PSU Bank मध्ये विक्री
11
आता अमेरिकेतील दीड लाख भारतीय ट्रकचालक संकटात; अस्खलित इंग्रजीतच बोलण्याचा ट्रम्प यांनी काढला नवा आदेश
12
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
13
₹७७ लाखांचं घर : Home Loan EMI भरावे की SIP करावी, घर खरेदीची स्मार्ट पद्धत कोणती? पाहा कॅलक्युलेश
14
MBBS युवतीचा संशयास्पद मृत्यू, दिल्लीला परीक्षेला गेली होती; जळालेल्या अवस्थेत...
15
'या' कंपनीनं केली दुधाच्या दरात वाढ; आजपासून लागू होणार नवे दर, कारण काय?
16
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
17
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
18
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू
19
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
20
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं

भात लावणीची लगबग सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2018 03:14 IST

चार दिवसांपासून जिल्ह्यात पावसाने चांगला जोर धरला असून शेतातील नागरणीअंती चिखलणी पूर्ण होवून भात लावण्या रंगात येवू लागल्या आहेत.

अलिबाग : चार दिवसांपासून जिल्ह्यात पावसाने चांगला जोर धरला असून शेतातील नागरणीअंती चिखलणी पूर्ण होवून भात लावण्या रंगात येवू लागल्या आहेत. यंदाच्या खरीप हंगामात जिल्ह्यात भात पिकाखालील क्षेत्र १ लाख ५ हजार हेक्टर होणे कृषी विभागास अपेक्षित आहे.भात शेतीच्या मशागतीचे उलकटणी, राब पेरणी असे महत्त्वाचे टप्पे आटोपल्यानंतर आता सध्या सर्वत्र चिखलणी सुरू झाली आहे. या दरम्यान पिकाला नत्राचा पुरवठा द्यावा लागतो, त्यादृष्टीने खतांचे डोस दिले जातात. त्यासाठी खताचीही मुबलक उपलब्धता करून देण्यात आली आहे. लावणीनंतरही चाळीस दिवसात दोनदा नत्राची मात्रा दिली जाते. यासंदर्भात शासनाचा कृषी विभाग शेतकऱ्यांना मार्गदर्शन आणि तांत्रिक सहाय्य उपलब्ध करून देत आहे.शेतकºयांना बियाण्यांची उपलब्धता यापूर्वीच करून देण्यात आली आहे. राबांची उगवण चांगली झाल्याने भात रोपे देखील लावणी योग्य झाली आहेत. खताचा व कीटकनाशकांचा साठा शेतकºयांच्या मागणीनुसार उपलब्ध असल्याची माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी पांडुरंग शेळके यांनी दिली आहे. भाताच्या काही जाती या ४८ दिवसांत, काही ५२ तर काही ६२ दिवसांत तयार होतात. त्यादृष्टीने शेतकरी आपल्या शेती कामांचे नियोजन करीत असतात.भाताबरोबर नागली आणि तुरीची लागवडजिल्ह्याच्या खरीप हंगामासाठी एकूण १ लाख १४ हजार ४४३ हेक्टर क्षेत्रावर पेरणीचे नियोजन आहे. त्यात सर्वाधिक क्षेत्र हे भात पिकाखाली राहणार असून भात पेरणी १ लाख ५ हजार २६२ हेक्टर क्षेत्रावर झाली आहे.त्या खालोखाल ७ हजार १२८ हेक्टरवर नागली, ९७५ हेक्टरवर इतर तृणधान्य, ९०६ हेक्टरवर तूर तर १७३ हेक्टरवर इतर कडधान्य लागवड नियोजित आहे.खते-बियाण्यांची उपलब्धताखरीप हंगामासाठी जिल्ह्यात १५ हजार १५५ क्विंटल भात बियाण्यांची उपलब्धता करण्यात आली होती तर २४ हजार ६०० मेट्रिक टन इतक्या रासायनिक खताची उपलब्धता शेतकºयांच्या मागणीनुसार करण्यात आली आहे. तसेच ३४ हजार ९०० लिटर्स कीटकनाशके व बुरशी नाशकांची उपलब्धता करण्यात आली आहे.