शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

पालीत दरवाजाशिवाय धावली एसटी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2019 00:46 IST

बसची दुरवस्था : प्रवाशांचा जीव टांगणीला

पाली : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या अनेक बसची दुरवस्था झाली आहे. याचा प्रत्यय पाली बसस्थानकात नुकताच आला. पाली-अलिबाग ही एसटी पाली स्थानकात आली त्या वेळी बसला दरवाजाच नव्हता. त्यामुळे विद्यार्थी व प्रवाशांनी जीव मुठीत घेऊन या बसमधून प्रवास करावा लागला.

परिवहन महामंडळ तसेच स्थानिक डेपोकडून एसटी बसच्या दुरुस्ती व देखभालीकडे दुर्लक्ष केले जात असल्याने दरवाजा नसलेल्या एसटी बसेस सेवेत कार्यरत असल्याचा आरोप प्रवासी वर्गाने केला आहे. दरवाजा नसलेल्या बसमधून नाइलाजास्तव जीव मुठीत घेऊन प्रवास करण्याची वेळ विद्यार्थी व प्रवाशांवर ओढवली आहे. याबाबत वाहतूक नियंत्रक जी. बी. कोळी यांची प्रतिक्रि या घेतली असता दरवाजा नसलेली एसटी डेपोतून कशी पाठविण्यात आली याबाबत माहिती नसल्याचे त्यांनी सांगितले. मात्र, या दरवाजा नसलेल्या बसमधून प्रवासी बाहेर पडून अपघात झाल्यास याला जबाबदार कोण? असा प्रश्न जनतेतून विचारला जात आहे. एसटी बसच्या देखभालीच्या अभावाने एसटीची दुरवस्था झालेली आहे. दरवाजा नसलेल्या एसटी कार्यरत राहणे ही बाब अत्यंत गंभीर आहे. एसटी महामंडळाने यावर तत्काळ उपाययोजना करणे गरजेचे आहे. अपघात घडल्यानंतर इलाज करण्यापेक्षा, अपघात घडू नयेत यासाठी खबरदारी घेणे गरजेचे आहे, अशी प्रतिक्रिया सामाजिक कार्यकर्ते रवींद्रनाथ ओव्हाळ यांनी दिली.