शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईकरांनो काळजी घ्या! पुढील २४ तासांसाठी पावसाचा रेडअलर्ट, हवामान खात्याचा इशारा
2
आता खामेनेईचा खात्मा करणारच..: हॉस्पिटलवरील हल्ल्यानंतर इस्त्रायलचे खुले चॅलेंज
3
इराणच्या हल्ल्यात इस्त्रायली एअर डिफेन्स फेल; मित्राची झाली आठवण, भारताला आला कॉल, आता...
4
जगाला हादरवणारी बातमी! इराणने इस्रायलचा शेअर बाजार उडवला; तुमच्या गुंतवणुकीवर काय परिणाम होणार?
5
Rain Update: रायगडमधील तीन नद्यांनी ओलांडली धोक्याची पातळी, तीन पर्यटन ठिकाणी जाण्यास बंदी
6
...तर अमेरिका किम जोंग उन यांच्या देशावर अणुबॉम्ब टाकेल; यांनी केला मोठा दावा
7
₹८,००० कोटींची गुंतवणूक... अंबानींनी केली Coca-Cola आणि Pepsi ला टक्कर देण्याची तयारी; काय आहे प्लान?
8
मुंबई, रायगड, रत्नागिरी जिल्ह्यासह पुणे घाट, सातारा घाट परिसरात 24 तासांसाठी ऑरेंज अलर्ट
9
धक्कादायक! "लग्न ठरल्यानंतर सोनम दिवसातून फक्त..."; राजा रघुवंशीच्या मित्राचा मोठा खुलासा
10
बसच्या तिकिटामुळे हत्या उघडकीस आली! पाच वर्षाचे रिलेशन, लग्नाची इच्छा, घडलं वेगळंच
11
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर: १० राशी मालामाल, इच्छापूर्ती काळ; अचानक पैसे मिळतील, चांगले घडेल!
12
Video: इलॉन मस्क यांना मोठा धक्का; प्रक्षेपणादरम्यान SpaceX च्या स्टारशिप रॉकेटमध्ये स्फोट
13
Air India Plane Crash: 'असं वाटलं पाकिस्ताननेच मिसाईल हल्ला केला, चार मित्र गमावले'; अपघातातून वाचलेल्या केशवने सांगितला थरार
14
ठाकरेंसोबत रात्रीतून खेळ झाला! काल मातोश्रीवर आलेले 'ते' दोन नेते आज शिंदेंच्या शिवसेनेत
15
लीड्स टेस्टपूर्वीच टीम इंडियाला मोठा झटका, 259 धावा करणाऱ्या 'या' क्रिकेटरला दुखापत! नेमकं काय घडलं? आता कशी असेल प्लेइंग 11?
16
Ashadhi Ekadashi 2025: संत नामदेवांनी पांडुरंगाच्या आरतीत उल्लेखलेली 'राही' नेमकी कोण?
17
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राहुल गांधी यांना वाढदिवसानिमित्त दिल्या खास शुभेच्छा, म्हणाले...
18
Shree Swami Samarth: एक पैशाचा खर्च नाही, ‘हा’ उपाय एकदा करून पाहा; स्वामी कायम पाठीशी असतील, अशक्यही शक्य होईल!
19
चालत्या रिक्षात अचानक झाला स्फोट; आगीत महिला प्रवासी जिवंत जळाली, ५ जण जखमी
20
Air India Plane Crash Insurance Claim : अहमदाबाद विमान अपघात: Air India ४,०८० कोटी रुपयांचा 'इन्श्युरन्स क्लेम' करणार, इतिहासातील सर्वाधिक आकडा ठरणार?

कर्जत आगारात एसटी कर्मचाऱ्यांचे उपोषण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 2, 2019 00:13 IST

कार्यमुक्त करा : सेवाज्येष्ठता डावलून बदल्या केल्याचा आरोप

कर्जत : कर्जत आगारातील चालक कर्मचाऱ्यांच्या बदल्या होऊन चार महिने झाले तरी अद्यापि त्यांना बदलीच्या ठिकाणी कार्यमुक्त केले नसल्याने वरिष्ठ कार्यालयाच्या आदेशाचा भंग केल्याने कर्जत आगार प्रमुखांवर कारवाई व्हावी व आम्हाला त्वरित बदलीच्या ठिकाणी कार्यमुक्त करावे, या मागणीसाठी येथील कर्मचाºयांनी आमरण उपोषणाला बुधवारी कामगार दिनाच्या दिवशीच कर्जत एसटी आगाराच्या बाहेर सुरु वात केली आहे.

कर्जत आगारात एकूण १९२ चालक व वाहक असे १४ कर्मचाऱ्यांची पदे रिक्त आहेत. येथील कर्मचारी १५ ते १६ वर्षे एकाच ठिकाणी कार्यरत आहेत. शासकीय नियमानुसार अनेक वेळा बदलीची मागणी करूनही वरिष्ठ कार्यालयाने त्यांची मागणी कधीच मान्य केली नाही. नियमानुसार तीन वर्षे एकाच ठिकाणी नोकरीत कर्तव्य बजावल्यावर बदलीची मागणी केल्यास बदली होणे गरजेचे असते. यावेळी मध्यवर्ती कार्यालय मुंबई व विभागीय कार्यालय राज्य परिवहन रायगड विभाग यांनी २८ कर्मचाºयांच्या बदल्या केल्या आहेत. आज चार महिने झाले तरी आदेशाची अंमलबजावणी करण्यात आली नाही. याबाबत आगार व्यवस्थापक शंकर यादव यांना बदली झालेल्या कर्मचाºयांनी विचारले असता होळी झाल्यावर कार्यमुक्त करू, असे तोंडी सांगण्यात आले होते. मात्र, कर्मचाºयांची दिशाभूल करून त्यांच्या मर्जीतील पाच कर्मचाºयांची आर्थिक देवाण-घेवाण करून बदली केल्याचे उपोषणकर्त्या कर्मचाºयांनी आरोप केला आहे. ज्या पाच जणांची बदली केली ती सेवाज्येष्ठता यादी डावलून केल्याचे त्यांचे म्हणणे आहे. कर्जत व्यवस्थापकांना सेवाज्येष्ठता यादीनुसार बदली करा, आमच्याही कौटुंबिक अडचणी आहेत असे सांगितले असता चालकांची कमतरता आहे, असे कारण पुढे केले जाते.

कर्जत आगार व्यवस्थापक शंकर यादव यांनी चालकांची कमतरता आहे, याबाबतीत वरिष्ठ कार्यालयास अद्यापपर्यंत कधीच पत्रव्यवहार केलेला नाही, तर येथे जादा कर्मचाºयांची गरज नाही, असे वरिष्ठांना सांगितल्याचे उपोषणकर्ते राजेश दौलत अपोतीकर यांनी सांगितले. जून महिन्यात आम्हाला कार्यमुक्त केल्यावर मुलांचे दाखले, कुटुंबाला येथून स्थलांतर करताना अनेक अडचणी येतील म्हणून आताच कार्यमुक्त करण्याची मागणी केली आहे. या वेळी राजेश आपोतीकर, हुसेन गेडाम, गणेश चांदेकर, उमेश चांदेकर ,विनोद उइके, विनोद कनाके, विनोद आत्राम, बाजीराव शिंदे आदी कर्मचारी आमरण उपोषणाला बसले. या आंदोलनाला काँग्रेस इंटक संघटनेने पाठिंबा दिल्याचे सचिव एस.एस.हिले यांनी सांगितले.

ज्या पाच कर्मचाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत, त्यात कुठलाही आर्थिक देवाण-घेवाणीचा व्यवहार झाला नाही, हा आरोप खोटा आहे. चालकांची कमतरता असल्याने प्रवासीवर्गाची गैरसोय होऊ नये, म्हणून १ जूनला सर्वांना बदलीच्या ठिकाणी कार्यमुक्त केले जाईल.- शंकर यादव, आगार व्यवस्थापक, कर्जत

टॅग्स :Karjatकर्जतST Strikeएसटी संप