शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
6
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
7
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
8
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
9
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
10
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
11
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
12
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
13
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
14
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
15
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
16
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
17
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
18
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
19
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

एसटी आगार नव्हे समस्यांचे भांडार, अलिबागमध्ये प्रवाशांची गैरसोय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2018 06:59 IST

 जिल्हा मुख्यालयाच्या ठिकाणी असणारे आणि पर्यटकांचे हॉट डेस्टिनेशन म्हणून अलीकडेच अलिबागची ओळख झाली आहे; परंतु अलिबाग येथील प्रमुख एसटी आगाराची प्रचंड दुरवस्था झाली आहे. दररोज हजारो प्रवाशांची ये-जा असणाऱ्या आणि दिवसाला लाखो रुपयांनी एसटी महामंडळाची तिजोरी भरणाºया एसटी आगारात सोयी-सुविधांची चांगलीच वानवा असल्याचे दिसून येते.

- आविष्कार देसाईअलिबाग   जिल्हा मुख्यालयाच्या ठिकाणी असणारे आणि पर्यटकांचे हॉट डेस्टिनेशन म्हणून अलीकडेच अलिबागची ओळख झाली आहे; परंतु अलिबाग येथील प्रमुख एसटी आगाराची प्रचंड दुरवस्था झाली आहे. दररोज हजारो प्रवाशांची ये-जा असणाऱ्या आणि दिवसाला लाखो रुपयांनी एसटी महामंडळाची तिजोरी भरणाºया एसटी आगारात सोयी-सुविधांची चांगलीच वानवा असल्याचे दिसून येते. प्लॅटफार्म तुटलेले आहेत, तर आगाराच्या इमारतीची एवढी दुरवस्था झाली आहे की, ते कधी कोसळेल याचा नेम नाही. वीकेंडला येथे प्रवाशांची मोठ्या संख्येने गर्दी असते. लोकप्रतिनिधींसह प्रशासनानेही या गंभीर समस्येकडे दुर्लक्ष होत असल्याने प्रवाशांच्या जीविताला धोका निर्माण झाला आहे.अलिबाग हे जिल्ह्याचे मुख्यालय आहे. त्यामुळे या ठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालाय, जिल्हा पोलीस मुख्यालय, जिल्हा रुग्णालय, जिल्हा न्यायालय, जिल्हा परिषद अशी महत्त्वाची सरकारी कार्यालये आहेत. त्याचप्रमाणे जिल्हा आणि तालुकास्तरावरील विविध सरकारी आणि निमसरकारी आस्थापना आहेत. विविध माध्यमिक विद्यालये, महाविद्यालये, शाळा आहेत. कामानिमित्त जिल्ह्याच्या कानाकोपºयातून येथे मोठ्या संख्येने लोक येत असतात. ग्रामीण भागातून तसेच तालुका ठिकाणाहून येणाºयांसाठी एसटी हे प्रवासाचे महत्त्वपूर्ण आणि सुरक्षित साधन आहे. मोठ्या संख्येने एसटीने प्रवास करणाºयांची संख्या आजही कायम असल्याचे आपल्याला दिसून येते. रायगड जिल्ह्यामध्ये धार्मिक पर्यटन, ऐतिहासिक पर्यटन, बौद्धकालीन लेण्या त्याचप्रमाणे सुंदर आणि विस्तृत समुद्रकिनारे आहेत. येथील पर्यटन स्थळांचे आकर्षण पर्यटकांना मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे वीकेंडला सुुमारे पाच हजार पर्यटक येथे येत असतात. यातील सर्वच पर्यटक एसटीने प्रवास करणारे नसले तरी, त्यातील ५० टक्के हे एसटीने प्रवास करणारेच असतात. त्यांना आकर्षित करण्यासाठी एसटी महामंडळाने विविध सवलतीच्या प्रवासाचे प्लॅन सुरू केले आहेत. त्यावरून येथे असणारी गर्दी स्पष्ट होते. त्यामुळे हजारोंच्या संख्येने प्रवासी हे येथून ये-जा करीत असतात. त्यांच्यामार्फत एसटी महामंडळाच्या तिजोरीत लाखो रुपये जातात; परंतु अलिबागच्या एसटी आगाराची प्रचंड दुरवस्था झाल्याने प्रवाशांची गैरसोय होत आहे. स्थानिक लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाकडून कोणत्याही उपाययोजना होत नसल्याने प्रवाशांचे हाल होत आहेत.१अलिबाग येथील एसटी आगाराची इमारत जीर्ण झाल्यामुळे तेथील छपराला तडे गेले आहेत. त्यामुळे छप्पर कधीही कोसळून मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. वेळच्या वेळी इमारतीची डागडुजी होत नसल्यामुळे इमारतीची अशी अवस्था झाली आहे, असा आरोप प्रवासी संघटनेने वेळोवेळी केला आहे. इमारतीला रंग दिलेला नसल्याने तिला बकाल स्वरूप आले आहे.२आगाराच्या परिसरामध्ये निर्माण होणाºया कचºयाची विल्हेवाट रोजच्या रोज लावली जात नसल्याने तेथे कचºयाचे ढीग जमा होतात. त्यामुळे परिसरामध्ये दुर्गंधी पसरलेली असते. आगारामध्ये उनाड गुरे-ढोरे, बकºया, भटकी कुत्री यांचे वास्तव्य असल्याने त्यांनी केलेल्या घाणीचाही त्रास होतो. त्याचप्रमाणे हे जागोजागी बसलेले असल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण होतो.मनोरुग्ण, भिकाºयांमुळे प्रवासी हैराणआगारामध्ये मोठ्या प्रमाणात भिकारी, मनोरुग्ण सातत्याने दिसून येतात. त्यामुळेही प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागतो. भिकारी थेट महिलांच्या पर्सला हात लावून भीक मागतात. याच आगारामध्ये बिनकामाच्या व्यक्ती बसलेल्या दिसून येतात, तर काही प्रवाशांना बसण्याची सोय केलेली आहे, तेथील सिमेंटच्या बाकड्यावर झोपलेलेही असतात. त्यामुळे प्रवाशांना गाडीची वाट पाहताना ताटकळत उभेराहावे लागते.आगार परिसरामध्ये खासगी वाहने पार्किंग करता यावीत, यासाठी तेथे पे अ‍ॅण्ड पार्क सुविधा सुरू केली आहे. मात्र, बहुतांश खासगी वाहने ही एसटी आगाराच्या मुख्य द्वारापाशीच तळ ठोकून उभी असलेली दिसून येतात. त्याच मुख्यद्वारावर पोलीस चौकी आहे; परंतु या सर्व घटनांकडे तेही गांभीर्याने पाहत नसल्याने तेथे दिवसागणिक खासगी वाहनांची गर्दी वाढली आहे.स्वच्छ पिण्याच्या पाण्याची व्यवस्थाही आगारात नसल्याने पाण्यावाचून प्रवाशांचे हाल होतात. पाणी उपलब्ध नसल्याने नाइलाजाने तेथील स्टॉलवरून बाटलीबंद पाणी विकत घ्यावे लागते. त्यामुळे पाण्यासाठी प्रवाशांच्या खिशाला चाट बसत आहे. लायन्स क्लबने तेथे पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केली आहे. मात्र, तेथील पाणपोई कायमस्वरूपी बंदच असल्याचे दिसून येते.एसटी आगार परिसरामध्ये असणारे स्वच्छतागृह हेही सातत्याने अस्वच्छ असल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे तेथील दुर्गंधीचा सामना प्रवाशांना करावा लागतो. स्वच्छतागृहाचीही दैना उडाली असल्याने प्रवाशांचीही चांगलीच गैरसोय होत आहे. त्यामध्ये विशेष करून महिलांना त्रास सहन करावा लागत आहे.अलिबाग आगारप्रमुख एस.पी.यादव यांच्याशी संपर्क साधला असता ते रजेवर असल्याचे सांगण्यात आले. आगाराच्या दुरवस्थेबाबत रजेवरून आल्यावर बोलू, असे त्यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.

टॅग्स :Raigadरायगड