शहरं
Join us  
Trending Stories
1
ओला दुष्काळ जाहीर करणार का? देवेंद्र फडणवीसांनी म्हणाले, 'त्याकरिता जेवढ्या पद्धतीची..."
2
"...ही चांगली गोष्ट नाही!"; राहुल गांधी यांच्या 'मत चोरी' संदर्भातील आरोपांवरून शरद पवार यांचं मोठं विधान, नेमकं काय म्हणाले?
3
Maharashtra Rain Alert: नवरात्रोत्सवात पावसाचाच 'गरबा', जाता जाता तडाखा देणार; IMD कडून सतर्कतेचा इशारा
4
उडणाऱ्या कारचा जगातील पहिलाच अपघात; दोन फ्लाइंग कार एकमेकांवर आदळल्या, एक बनली आगीचा गोळा...
5
बिहारमध्ये NDAचा जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला, हा पक्ष लढवणार सर्वाधिक जागा
6
Maharashtra Rain: संपूर्ण आठवडा पावसाचा, शुक्रवारनंतर मुसळधार पावसाची शक्यता, बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र
7
नवरात्री २०२५: विनायक चतुर्थी कधी? व्रताचा संकल्प करा; गणपती पूजन ठरेल वरदान, कायम कृपा-लाभ!
8
USA Hanuman Statue: आता अमेरिकेचा हनुमानावरही आक्षेप; म्हणाले, 'खोट्या देवांची मूर्ती....'
9
Navratri 2025: नवरात्रीत लावलेला अखंड दिवा घालवतो 'अकाल मृत्यू'ची भीती; मात्र... 
10
"आधी नवरा गेला, आता मुलगी..."; विद्यार्थिनीचा शाळेत संशयास्पद मृत्यू, आईने फोडला टाहो
11
नवरात्री २०२५: अखंड ज्योत संकल्प केला, अचानक दिवा विझला तर...; देवी कोप-अशुभ-अवकृपा होईल का?
12
आर अश्विन पुन्हा मैदानात दिसणार; निवृत्तीनंतर परदेशातील ४ संघाकडून खेळण्याची ऑफर!
13
चेक क्लिअरन्स आता एका दिवसातच! 'या' तारखेपासून नवा नियम लागू, जाणून घ्या कसा घ्यायचा फायदा
14
Rahul Gandhi : "भारताला बेरोजगारी आणि मतचोरीच्या संकटातून मुक्त करणं ही आताची सर्वात मोठी देशभक्ती"
15
Katrina Kaif Pregnancy: गुडन्यूज! कतरिना कैफने शेअर केला बेबी बंप फोटो, ४२ व्या वर्षी देणार बाळाला जन्म
16
कलियुगातला कंस! सूनेसोबतच मामाचे प्रेमबंध जुळले, अडथळा ठरणाऱ्या भाच्याला संपवले
17
BMC च्या मुदत ठेवींत ८ महिन्यांत २ हजार कोटींनी घट; मागील ३ वर्षात १२ हजार कोटींची घसरण
18
सार्वजनिक निधीचा वापर नेत्यांच्या पुतळ्यांसाठी करता येणार नाही- सर्वोच्च न्यायालय
19
आयआयटी कॉलेजच्या वसतिगृहात विद्यार्थ्याला नग्न करून चप्पलांनी मारहाण; ३ विद्यार्थ्यांविरुद्ध गुन्हा दाखल, वॉर्डन निलंबित
20
PAK v SL: २१८० दिवस... श्रीलंका त्याचाच फायदा घेणार, पाकिस्तान आज आशिया कपमधून बाहेर होणार?

श्रीवर्धन-बोर्लीपंचतन रस्ता खचल्याने धोका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2019 00:59 IST

अपघाताची शक्यता; दुरुस्तीची प्रवाशांकडून मागणी

दिघी : श्रीवर्धन तालुक्याला पुणे, मुंबई इतर जिल्ह्याकडे जोडणारा मुख्य रहदारी असणारा रस्ता प्रवासाकरिता धोकादायक ठरत आहे. श्रीवर्धन - बोर्लीपंचतन मार्गावरील आदिवासीवाडीजवळ असलेल्या साकवावरील रस्ता खचला आहे. मात्र, नव्याने बनलेल्या रस्त्याच्या निकृष्ट कामाकडे सार्वजनिक बांधकाम विभाग दुर्लक्ष करत असल्याने या खड्ड्यात अपघात होण्याची शक्यता आहे. याची त्वरित दखल घेण्याची मागणी होत आहे.श्रीवर्धन-बोर्लीपंचतन हा सरळ मार्ग १७ कि. मी. अंतराचा आहे. आदिवासीवाडी जवळील रस्ता महिन्यांपूर्वी नव्याने बनला आहे. काही दिवस पडत असलेल्या पावसामुळे रस्ता खचला. त्यामुळे येथून वाहने चालवणे धोकादायक बनले आहे. या मार्गावर दररोज शेकडो वाहने प्रवास करत असतात. रस्ता खचलेल्या ठिकाणी कोणताही धोकादर्शक फलक लावलेला नाही. शिवाय खड्ड्यात भरावदेखील टाकला नाही. रोजच वर्दळ असल्याने तसेच उन्हाळ्यात पावसाळ्यात श्रीवर्धन तालुक्यात मोठ्या प्रमाणात पर्यटकांची ये-जा असते. त्यामुळे येथील खड्डे लक्षात न आल्यास जीवितहानी होण्याची शक्यता आहे. जोरदार पावसात हा रस्ता पूर्ण खचण्याची भीती आहे. रस्त्याला खोल खड्डा तयार झाला आहे. समोरून येणारी वाहने खड्ड्यात आदळून एकमेकांवर धडकू नअपघात होण्याची शक्यता नाकरता येत नाही. सध्या रस्त्यावरून भीतिदायक प्रवास करण्याची वेळ आली आहे. मात्र, संबंधित विभाग याकडे लक्ष देत नसल्याने अनर्थ घडू शकतो. यामुळे या रस्त्यावरून प्रवास करताना वाहनचालक संताप व्यक्त करताना दिसत आहेत.या रस्त्याला दोन दिवसांत किरकोळ अपघात झाल्याच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे खचलेल्या रस्त्याची लवकरात लवकर दुरुस्ती करावी, अशी मागणी होत आहे. रस्ता सरळ असल्याने कार्ले आदिवासीवाडी जवळचा खचलेला भाग लक्षात येत नाही, त्यामुळे येथे दुचाकी अथवा मोठ्या वाहनांचा अपघात होऊ शकतो. सार्वजनिक बांधकाम खात्याने खचलेल्या या भागात भराव टाकावा, अशी मागणी प्रवाशांकडून होत असल्याचे रिक्षाचालक प्रवीण वडके यांनी सांगितले. अधिक माहितीसाठी श्रीवर्धन येथील बोर्लीपंचतन बांधकाम विभागीय कनिष्ठ अभियंता एस. एम. शेट्टे यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता होऊ शकला नाही.

टॅग्स :road safetyरस्ते सुरक्षा