शहरं
Join us  
Trending Stories
1
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
2
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
3
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
4
इलेक्ट्रिक व्हेईकल घेणाऱ्यांसाठी CM फडणवीसांची मोठी घोषणा; टोलमाफी देण्याचा मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय
5
...म्हणून मुलाचं नाव बॉबी ठेवलं! किशोरी शहाणेंनी सांगितलं कारण, म्हणाल्या- "मी मराठी, नवरा पंजाबी आणि सासू..."
6
ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न अंगलट; दुचाकीवर पाठी बसलेल्या तरुणीचा ट्रकखाली चिरडून मृत्यू
7
पाकिस्तानने कुठे लपवलाय अण्वस्त्रांचा साठा? 'या' अहवालाने केली पाकची पोलखोल...
8
Pune: पुण्याच्या विमानतळ परिसरात बिबट्या, सगळ्यांना फुटला घाम; तुम्ही व्हिडीओ बघितला का?
9
डॉलरच्या तुलनेत रुपयाची जोरदार कामगिरी; आशियातील सर्वात मजबूत चलन, ही आहेत ५ कारणे
10
टक्केवारीच्या आरोपानंतर परभणीचे जिल्हा नियोजन अधिकारी कार्यमुक्त; अधिकाऱ्यांमध्ये खळबळ
11
पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठीचा प्लॅन तयार, पंतप्रधान मोदी बुधवारी घेणार चार बैठका, त्यानंतर...  
12
'बुके नको बुकं द्या'! बिरदेव डोणेचं आवाहन, बॉलिवूड अभिनेत्रीच्या बॉयफ्रेंडने पाठवली हजार पुस्तकं
13
'जबाबदारीच्या वेळीच बेपत्ता'; काँग्रेसचा PM मोदींवर वार, भाजपचे नेतेही भडकले
14
इन्फोसिसमध्ये वर्षात तिसरी नोकरकपात! १९५ कर्मचाऱ्यांना दाखवला बाहेरचा रस्ता; काय आहे कारण?
15
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
16
माजी पाकिस्तानी खासदार भारतात हलाखीच्या परिस्थितीत; कुल्फी विकून उदरनिर्वाह, कोण आहेत ?
17
माणुसकी म्हणून तरी आमच्या भावनांशी खेळू नका; पहलगामच्या राजकारणावर असावरीच्या आईची प्रतिक्रिया
18
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
19
देशाच्या सुरक्षेचा विषय असेल तर हेरगिरी करण्यात काय अडचण?; पेगाससवरुन सुप्रीम कोर्टाचा सवाल
20
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद

श्रीवर्धन-बोर्लीपंचतन रस्ता खचल्याने धोका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2019 00:59 IST

अपघाताची शक्यता; दुरुस्तीची प्रवाशांकडून मागणी

दिघी : श्रीवर्धन तालुक्याला पुणे, मुंबई इतर जिल्ह्याकडे जोडणारा मुख्य रहदारी असणारा रस्ता प्रवासाकरिता धोकादायक ठरत आहे. श्रीवर्धन - बोर्लीपंचतन मार्गावरील आदिवासीवाडीजवळ असलेल्या साकवावरील रस्ता खचला आहे. मात्र, नव्याने बनलेल्या रस्त्याच्या निकृष्ट कामाकडे सार्वजनिक बांधकाम विभाग दुर्लक्ष करत असल्याने या खड्ड्यात अपघात होण्याची शक्यता आहे. याची त्वरित दखल घेण्याची मागणी होत आहे.श्रीवर्धन-बोर्लीपंचतन हा सरळ मार्ग १७ कि. मी. अंतराचा आहे. आदिवासीवाडी जवळील रस्ता महिन्यांपूर्वी नव्याने बनला आहे. काही दिवस पडत असलेल्या पावसामुळे रस्ता खचला. त्यामुळे येथून वाहने चालवणे धोकादायक बनले आहे. या मार्गावर दररोज शेकडो वाहने प्रवास करत असतात. रस्ता खचलेल्या ठिकाणी कोणताही धोकादर्शक फलक लावलेला नाही. शिवाय खड्ड्यात भरावदेखील टाकला नाही. रोजच वर्दळ असल्याने तसेच उन्हाळ्यात पावसाळ्यात श्रीवर्धन तालुक्यात मोठ्या प्रमाणात पर्यटकांची ये-जा असते. त्यामुळे येथील खड्डे लक्षात न आल्यास जीवितहानी होण्याची शक्यता आहे. जोरदार पावसात हा रस्ता पूर्ण खचण्याची भीती आहे. रस्त्याला खोल खड्डा तयार झाला आहे. समोरून येणारी वाहने खड्ड्यात आदळून एकमेकांवर धडकू नअपघात होण्याची शक्यता नाकरता येत नाही. सध्या रस्त्यावरून भीतिदायक प्रवास करण्याची वेळ आली आहे. मात्र, संबंधित विभाग याकडे लक्ष देत नसल्याने अनर्थ घडू शकतो. यामुळे या रस्त्यावरून प्रवास करताना वाहनचालक संताप व्यक्त करताना दिसत आहेत.या रस्त्याला दोन दिवसांत किरकोळ अपघात झाल्याच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे खचलेल्या रस्त्याची लवकरात लवकर दुरुस्ती करावी, अशी मागणी होत आहे. रस्ता सरळ असल्याने कार्ले आदिवासीवाडी जवळचा खचलेला भाग लक्षात येत नाही, त्यामुळे येथे दुचाकी अथवा मोठ्या वाहनांचा अपघात होऊ शकतो. सार्वजनिक बांधकाम खात्याने खचलेल्या या भागात भराव टाकावा, अशी मागणी प्रवाशांकडून होत असल्याचे रिक्षाचालक प्रवीण वडके यांनी सांगितले. अधिक माहितीसाठी श्रीवर्धन येथील बोर्लीपंचतन बांधकाम विभागीय कनिष्ठ अभियंता एस. एम. शेट्टे यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता होऊ शकला नाही.

टॅग्स :road safetyरस्ते सुरक्षा