शहरं
Join us  
Trending Stories
1
तेल कंपन्यांना 30,000 कोटींचे अनुदान, उज्ज्वला योजनेसाठी...; केंद्र सरकारने घेतले पाच मोठे निर्णय
2
सरकारने आयकर विधेयक २०२५ मागे घेतले; टॅक्स स्लॅबमध्ये काय बदल होणार? जाणून घ्या...
3
ज्या आदित्य श्रीवास्तवचं नाव घेऊन राहुल गांधींनी ECI ला घेरले; तोच आता समोर आला, सांगितलं 'सत्य'
4
Eknath Shinde : ज्यांनी स्वाभिमान गुंडाळून ठेवला, त्यांचं....; उद्धव ठाकरेंना मागची जागा दिल्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
5
राहुल गांधींच्या आरोपानंतर काँग्रेस आक्रमक; दादरमध्ये रास्ता रोको, भाजपाविरोधात घोषणाबाजी
6
NASA : नासाचा मोठा निर्णय! इंटरनॅशनल स्पेस स्टेशन समुद्रात पाडणार! कारण ऐकून धक्का बसेल
7
अतुल परचुरेंच्या आठवणीत भावुक झाले दिलीप प्रभावळकर; म्हणाले, "डॉक्टरांनी त्याला..."
8
IND vs AUS: टीम इंडियाविरुद्ध ऑस्ट्रेलियाचा संघ जाहीर, भारतीय वंशाच्या दोन खेळाडूंना संधी!
9
हृदयस्पर्शी! "तुम्ही माझ्यासाठी श्रीकृष्णासारखे..."; महिलेने साडी फाडून मुख्यमंत्र्यांना बांधली राखी
10
Donald Trump Tariff News : अमेरिकाच टॅरिफबाबत गंडली! ट्रम्प यांची भारताबद्दल कडक भूमिका, पण परराष्ट्र मंत्रालय करतंय कौतुक
11
२ तासांचा हायव्हॉल्टेज ड्रामा, गर्लफ्रेंडच्या मिठीत सापडला नेता; पत्नीला पाहून पती पळाला, पण...
12
आकाश 'वाणी'! वैभव सूर्यवंशीमुळे स्टार विकेट किपर बॅटर संजूवर आलीये संघ सोडण्याची वेळ!
13
भारतीयांसाठी कॅनडा ठरतोय मृत्युचं घर; गेल्या ५ वर्षातील आकडे चिंताजनक!
14
प्राजक्ता माळीने वाढदिवशी घेतलं भीमाशंकरचं दर्शन; म्हणाली, "१२ ज्योतिर्लिंग यात्रा पूर्ण..."
15
चालत्या बसवर झाड कोसळलं, ५ जणांचा मृत्यू; महिला म्हणते, "आयुष्याचा प्रश्न, तुम्ही Video बनवताय"
16
BCCI: बीसीसीआय नव्या प्रशिक्षकाच्या शोधात, अर्जही मागवले! जाणून घ्या पात्रता
17
धनंजय मुंडेंनी मंत्रिपद स्वप्नातही पाहू नये, पुन्हा घेतले तर अजितदादांचा पक्ष संपेल: जरांगे
18
Video: हृदयस्पर्शी! हत्तीच्या पिंजऱ्यात पडला चिमुकला; गजराजाने जे केले त्यानं सर्वांचीच मने जिंकली
19
काय आहे युनिव्हर्सल बँकिंग? ११ वर्षांत पहिल्यांदाच RBI नं कोणत्या बँकेला दिला असा लायसन्स
20
Donald Trump Tariff News : ज्याची भीती होती तेच घडले! वॉलमार्ट अन् अमेझॉनसह अनेक कंपन्यांनी भारतातील ऑर्डर्स रोखून ठेवल्या

श्रीवर्धन-बोर्लीपंचतन रस्ता खचल्याने धोका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2019 00:59 IST

अपघाताची शक्यता; दुरुस्तीची प्रवाशांकडून मागणी

दिघी : श्रीवर्धन तालुक्याला पुणे, मुंबई इतर जिल्ह्याकडे जोडणारा मुख्य रहदारी असणारा रस्ता प्रवासाकरिता धोकादायक ठरत आहे. श्रीवर्धन - बोर्लीपंचतन मार्गावरील आदिवासीवाडीजवळ असलेल्या साकवावरील रस्ता खचला आहे. मात्र, नव्याने बनलेल्या रस्त्याच्या निकृष्ट कामाकडे सार्वजनिक बांधकाम विभाग दुर्लक्ष करत असल्याने या खड्ड्यात अपघात होण्याची शक्यता आहे. याची त्वरित दखल घेण्याची मागणी होत आहे.श्रीवर्धन-बोर्लीपंचतन हा सरळ मार्ग १७ कि. मी. अंतराचा आहे. आदिवासीवाडी जवळील रस्ता महिन्यांपूर्वी नव्याने बनला आहे. काही दिवस पडत असलेल्या पावसामुळे रस्ता खचला. त्यामुळे येथून वाहने चालवणे धोकादायक बनले आहे. या मार्गावर दररोज शेकडो वाहने प्रवास करत असतात. रस्ता खचलेल्या ठिकाणी कोणताही धोकादर्शक फलक लावलेला नाही. शिवाय खड्ड्यात भरावदेखील टाकला नाही. रोजच वर्दळ असल्याने तसेच उन्हाळ्यात पावसाळ्यात श्रीवर्धन तालुक्यात मोठ्या प्रमाणात पर्यटकांची ये-जा असते. त्यामुळे येथील खड्डे लक्षात न आल्यास जीवितहानी होण्याची शक्यता आहे. जोरदार पावसात हा रस्ता पूर्ण खचण्याची भीती आहे. रस्त्याला खोल खड्डा तयार झाला आहे. समोरून येणारी वाहने खड्ड्यात आदळून एकमेकांवर धडकू नअपघात होण्याची शक्यता नाकरता येत नाही. सध्या रस्त्यावरून भीतिदायक प्रवास करण्याची वेळ आली आहे. मात्र, संबंधित विभाग याकडे लक्ष देत नसल्याने अनर्थ घडू शकतो. यामुळे या रस्त्यावरून प्रवास करताना वाहनचालक संताप व्यक्त करताना दिसत आहेत.या रस्त्याला दोन दिवसांत किरकोळ अपघात झाल्याच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे खचलेल्या रस्त्याची लवकरात लवकर दुरुस्ती करावी, अशी मागणी होत आहे. रस्ता सरळ असल्याने कार्ले आदिवासीवाडी जवळचा खचलेला भाग लक्षात येत नाही, त्यामुळे येथे दुचाकी अथवा मोठ्या वाहनांचा अपघात होऊ शकतो. सार्वजनिक बांधकाम खात्याने खचलेल्या या भागात भराव टाकावा, अशी मागणी प्रवाशांकडून होत असल्याचे रिक्षाचालक प्रवीण वडके यांनी सांगितले. अधिक माहितीसाठी श्रीवर्धन येथील बोर्लीपंचतन बांधकाम विभागीय कनिष्ठ अभियंता एस. एम. शेट्टे यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता होऊ शकला नाही.

टॅग्स :road safetyरस्ते सुरक्षा