शहरं
Join us  
Trending Stories
1
India Lifts First ODI World Cup Trophy: हरमनप्रीतसह संघातील खेळाडूंनी खास अंदाजात उंचावली ट्रॉफी (VIDEO)
2
लेख: एकीकडे शांततेच्या गप्पा, दुसरीकडे अणुबॉम्ब परीक्षण! डोनाल्ड ट्रम्प यांचा खरा चेहरा उघड
3
‘परिवहन’ची मंजुरी इलेक्ट्रिकला अन् सुसाट धावतात पेट्रोल बाइक टॅक्सी; कारवाईला ठेंगा
4
महापौर आमचाच होऊ दे; उद्धव ठाकरे यांचे महोत्सवात देवाला गाऱ्हाणे; कार्यकर्त्यांना सल्ला
5
पॅलेस्टाइन-इस्रायल युद्धाच्या झळांनी होरपळलेले नागरिक आणि ‘कलिंगड’ आइस्क्रीम!
6
अग्रलेख: ‘सत्या’च्या मोर्चात ‘महा-मनसे’! मविआ + राज ठाकरे : शक्तिप्रदर्शन अर्थातच मोठे !!
7
विशेष लेख: शेतकऱ्यांना कर्जमुक्ती नाही, तर आम्ही थांबणार नाही; हा एल्गार थांबणार नाही..!!
8
भारताच्या लेकींनी 'जग जिंकलं'! द. आफ्रिकेला हरवून टीम इंडिया अजिंक्य; स्वप्ननगरीत अधुरं स्वप्न साकार!
9
धक्कादायक! बंगालमध्ये सातवीत शिकणाऱ्या मुलीवर सामुहिक अत्याचार; तिघांना अटक
10
IND vs SA Final :अमनजोत कौरनं घेतलेल्या लॉराच्या कॅचवर फिरली मॅच; व्हिडिओ बघाच
11
निवडणुकांमुळे हिवाळी अधिवेशन दहा दिवस पुढे ढकलले जाणार ? राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
12
Womens World Cup Final:'वाइल्ड कार्ड' एन्ट्रीसह आली अन् बॅटिंगनंतर बॉलिंगमध्येही 'ट्रम्प कार्ड' ठरली (VIDEO)
13
महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेचे अध्यक्षपद अजित पवारांकडेच; चौथ्यांदा मिळवली जबाबदारी
14
IND vs SA Womens World Cup 2025 Final : ...अन् अमनजोतच्या 'रॉकेट थ्रो'सह मिळाला मोठा दिलासा (VIDEO)
15
शफालीसह दीप्तीचं अर्धशतक! दक्षिण आफ्रिकेसमोर टीम इंडियानं सेट केलं २९९ धावांचे टार्गेट
16
मोठे आश्वासन देऊ नका; 10-20%..; अमेरिकन टॅरिफबाबत रघुराम राजन यांचा इशारा
17
वर्ल्ड कप फायनलमध्ये 'लेडी सेहवाग'चा विक्रमी धमाका! धोनी-गंभीरला मागे टाकण्याचीही होती संधी, पण...
18
पाकिस्तान करतोय हल्ले, भारतानं पाठवली 'अनमोल' मदत...; दिल्लीच्या निर्णयानं अफगाणिस्तानचं मन जिंकलं, मुनीरला मिरची लागणार!
19
2026 मध्ये किती रुपयांपर्यंत जाऊ शकतं सोनं? जाणून थक्क व्हाल! आता ₹10 हजारनं स्वस्त मिळतंय, एक्सपर्ट म्हणतायत चांगली संधी
20
Fact Check: आधार कार्ड दाखवून फुकटात मिळतेय बाईक? मोदींचा व्हिडीओ व्हायरल! सत्य समोर!

भाऊचा धक्का-मोरा सागरी मार्गावरील स्पीड बोट सेवा अद्याप बंदच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2018 03:11 IST

मोरा - भाऊचा धक्का दरम्यान स्पीड बोटीची १६ जूनपासून बंद करण्यात आलेली प्रवासी वाहतूक १५ आॅगस्टनंतरही अद्याप सुरू झालेली नाही.

उरण - मोरा - भाऊचा धक्का दरम्यान स्पीड बोटीची १६ जूनपासून बंद करण्यात आलेली प्रवासी वाहतूक १५ आॅगस्टनंतरही अद्याप सुरू झालेली नाही. आर. एन. शिपिंग कंपनीने १५ आॅगस्टपासून स्पीडबोट सेवा सुरू करण्याच्या लेखी आश्वासनानंतरही सेवा सुरू झाली नसल्याने प्रवाशांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.मोरा - भाऊचा धक्का दरम्यान सुरू करण्यात आलेल्या स्पीड बोटी वारंवार बंद पडत आहे. त्यामुळे स्पीड बोटीच्या इंजिन आणि बोटींच्या इतर कामांची डागडुजी करणे, सुरू झालेला पावसाळी हंगाम, मोरा बंदरात साचत असलेला गाळ आणि इतर तकलादू कारणे पुढे करत प्रवाशांसाठी मोरा - भाऊचा धक्का दरम्यान सुरू करण्यात आलेली स्पीड बोट सेवा १६ जूनपासून १५ आॅगस्टपर्यंत बंद ठेवली आहे.भाऊचा धक्का - मोरा या सागरी मार्गावरून दररोज हजारो प्रवासी आणि कामगार प्रवास करतात. सागरी मार्गावरील ५० वर्षांपासून चालत असलेल्या जुनाट प्रवासी बोटी मोरा हे ९ किमी सागरी अंतर कापण्यासाठी तासाभराचा अवधी घेतात. या सागरी प्रवासादरम्यान प्रवाशांना अनियमित सेवेचा सामना करावा लागतोच. त्याशिवाय कोणत्याही सुविधा उपलब्ध करून दिल्या जात नाहीत. मोरा सागरी मार्गावरून पावसाळी हंगामात हवामानाच्या आणि मालक, कर्मचाऱ्यांच्या लहरीवरच प्रवासी बोटी सोडल्या जातात. या सागरी मार्गावर मागील ५० वर्षांपासून खासगी लाँच मालकांचीच मक्तेदारी आहे. लाँचमालकांची मक्तेदारी मोडीत काढण्यासाठी मोरा सागरी मार्गावर स्पीड बोटीने प्रवासी वाहतूक करण्यासाठी आर. एन. शिपिंग कंपनीला परवानगी देण्यात आली आहे. केंद्रीय नौकानयन मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि इतर भाजप मंत्र्यांच्या उपस्थितीत वर्षापूर्वी भाऊचा धक्का येथे या स्पीड बोट सेवेचा तीन वर्षापूर्वी शुभारंभही करण्यात आला होता. त्यामुळे सुरू करण्यात आलेल्या स्पीड बोटींमुळे ४० मिनिटात मुंबई गाठणे शक्य झाले आहे. मात्र विविध कारणांमुळे प्रवासी वाहतूक खंडित होण्याचे प्रकार घडू लागले होते.स्पीड बोट सेवा सुरू झाल्यापासूनच वादाच्या भोवºयात सापडलेली आहे. कधी इंजिनमध्ये बिघाड तर कधी दुरुस्तीसाठी होणारा विलंब, कधी खराब हवामान तर कधी समुद्राच्या ओहोटीमुळे जेट्टीला बोटी लागणे अशक्य होत असल्याने स्पीड बोटी प्रवाशांसाठी बंद ठेवण्यात येत होत्या. आता तर पावसाळी हंगाम सुरू होताच स्पीड बोटीची डागडुजी, समुद्राच्या ओहोटीमुळे उद्भवणारी चढउताराची आणि गाळाची समस्या आदि कारणे देत आर. एन. शिपिंग कंपनीने मोरा - भाऊचा धक्का दरम्यान सागरी प्रवासी वाहतूक १६ जूनपासून बंद ठेवण्यात येत असल्याचे लेखी पत्रच बंदर विभागाकडे दिले होते.आर. एन. शिपिंग कंपनीने १५ आॅगस्टपासून स्पीड बोट सेवा सुरू केलेली नाही. किंबहुना स्पीड बोट सेवा सुरू करण्याबाबत अद्याप तरी कोणत्याही प्रकारे कंपनी कार्यालयाशी संपर्क साधलेला नाही. त्यामुळे स्पीडबोट सेवा कधी सुरू होईल, याबाबत काही एक सांगणे कठीण झाले असल्याची माहिती मोरा बंदर निरीक्षक पी. बी. पवार यांनी दिली.मात्र दोन महिने बंद ठेवल्यानंतरही स्पीड बोटीची दुरुस्ती अथवा इंजिनची कामे करण्यात मालकांकडूनच दिरंगाई केली जात आहे. स्पीडबोटींचे दुरुस्तीची कामेच झाली नसल्याचे स्पीड बोटीने प्रवासी वाहतूक सुरू करण्याबाबतच प्रश्नचिन्ह निर्माण झाले असल्याचे कामगारांकडून सांगण्यात येत आहे. याबाबत आर. एन. शिपिंग कंपनीशी संपर्क साधला असता तो होऊ शकला नाही.

टॅग्स :Raigadरायगडnewsबातम्या