शहरं
Join us  
Trending Stories
1
15 दिवसांत गाझा युद्ध संपणार! आता हमासच्या जागेवर कोण राज्य करणार? नेतान्याहू-ट्रम्प यांनी घेतला मोठा निर्णय
2
आणीबाणीच्या काळात संविधानाच्या प्रस्तावनेत 'धर्मनिरपेक्ष', 'समाजवादी' शब्द जोडले गेले, समीक्षा  व्हावी; संघाची मागणी
3
चीन-पाकिस्तानसोबतच्या 'तिकडी'ला बांगलादेशचा नकार! युनूस सरकारची भारताला मोठी ऑफर
4
"जय हिंद, जय भारत..."; आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातून शुभांशू शुक्ला यांचं पहिलं भाषण, काय म्हणाले...?
5
“इंदिरा गांधींनी आणीबाणी उठवली, पण मतचोरी करुन निवडणुका घेतल्या नाहीत”; काँग्रेसची टीका
6
अमेरिका, रशिया,यूएई, सौदी...; 'या' यादीत लवकरच भारतही येईल, सर्व काही 'सेट'
7
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
8
“मराठी भाषा अनिवार्य, हिंदीसह इतर भारतीय भाषा ऐच्छिक”: शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे
9
शुभांशू शुक्ला यांचं आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात जबरदस्त स्वागत, ठरले अशी कामगिरी करणारे दुसरे भारतीय; बघा VIDEO
10
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
11
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
12
ENG vs IND : जसप्रीत बुमराहला दुसऱ्याच सामन्यात दिली जाणार विश्रांती; त्याच्या जागी कुणाची लागणार वर्णी?
13
राज ठाकरेंच्या मोर्चात जाणार का? शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले, “दोन्ही ठाकरे बंधू...”
14
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
15
भारताच्या 'ध्वनि'मुळे शत्रू हादरेल, पाकिस्तान अन् चीनमध्येही उडेल खळबळ! कसं आहे नवं क्षेपणास्त्र?
16
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
17
आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र
18
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
19
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
20
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत

दिव्यांगांच्या मतदानासाठी विशेष सुविधा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2019 23:09 IST

विस्तार अधिकारी, ग्रामसेवकांवर कें द्रावरने-आणची जबाबदारी; कुचराई केल्यास निवडणूक कायद्याप्रमाणे कडक कारवाई

जयंत धुळप ।लोकमत न्यूज नेटवर्कअलिबाग : दिव्यांग मतदारांना मतदान करता येणे सोयीचे व्हावे म्हणून त्यांना सर्व मतदान केंद्रांवर आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्याचे निवडणूक आयोगाचे निर्देश आहेत. रायगड जिल्ह्यातील विस्तार अधिकारी, ग्रामसेवक यांनी जे मतदान केंद्रांवर पोहोचू शकत नाहीत, अशा दिव्यांग मतदारांना मतदान केंद्रांवर ने-आण करण्यासाठी कोणत्याही परिस्थितीत वाहनांची व्यवस्था करावी, यामध्ये कुचराई केल्यास किंवा टाळाटाळ केल्यास निवडणूक कायद्याप्रमाणे संबंधितांवर कडक कारवाई केली जाईल, असे आदेश रायगडचे जिल्हाधिकारी तथा रायगड लोकसभा मतदार संघाचे निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी गुरुवारी दिले आहेत.

याच्या सुयोग्य अंमलबजावणीकरिता रायगड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप हाळदे यांनादेखील यासंदर्भात आवश्यक त्या सूचना देण्यात येत असल्याचे डॉ. सूर्यवंशी यांनी स्पष्ट केले आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात गुरुवारी डॉ. सूर्यवंशी यांनी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने स्थापन करण्यात आलेल्या दिव्यांग मतदार सनियंत्रण समितीने केलेल्या कामाचा आढावा घेतला. या बैठकीस जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक प्रकाश देवऋषी, उपजिल्हा निवडणूक अधिकारी वैशाली माने आदी उपस्थित होते.प्रशासनाने दिव्यांगांसाठी मतदान केंद्रांवर सर्व सुविधा पुरविल्या आहेत. ६७३ व्हीलचेअर्सची आवश्यकता असून, ४३४ व्हीलचेअर्स खरेदी करण्यात आल्या आहेत. १५ तालुक्यांतील ८०७ ग्रामपंचायत क्षेत्रातील दिव्यांगांसाठी त्या उपयोगात आणल्या जातील. ज्यांना दिव्यांग मतदारांना आपल्या अपंगत्वामुळे स्वत: मतदान केंद्रावर येणे शक्य नाही, अशा दिव्यांग मतदारांना ग्रामसेवकांनी स्थानिक वाहने उपलब्ध करून द्यायची असून, २३ एप्रिल पूर्वी त्यांनी आपल्या गावांतील अशा दिव्यांग मतदारांचा शोध घेऊन तशी नोंद करून ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. दिव्यांग मतदारांना ने-आण करण्यासाठी येणारा खर्च ग्रामपंचायत निधीतून करता येईल, असेही डॉ. सूर्यवंशी यांनी स्पष्ट केले आहे. दिव्यांगांना मतदान करता येईल आणि त्यांचे १०० टक्के मतदान होईल, असे पाहावे. विस्तार अधिकारी यांच्यावर ही जबाबदारी असून याविषयी कोणतीही तक्र ार येणार नाही याची काळजी घ्यावी, अन्यथा या राष्ट्रीय कार्यात निवडणूक आयोगाच्या निर्देशाचे पालन केले नाही म्हणून कडक कारवाई करण्यात येईल,असेही डॉ. सूर्यवंशी यांनी स्पष्ट केले आहे.

मतदान केंद्रांवर दिव्यांगांना रांगेशिवाय प्रवेश, संख्या अधिक असल्यास दिव्यांगांसाठी स्वतंत्र रांग, रॅम्प सुविधा, अधिक प्रकाश व्यवस्था, व्हीलचेअर जाऊ शकेल, असा मोठा दरवाजा या सुविधा उपलब्ध करून देण्याची जबाबदारी समाजकल्याण विभाग, जिल्हा परिषद, नगरपरिषद यांची असून या संदर्भात अतिशय गांभीर्याने काम झाले पाहिजे, असे स्पष्ट निर्देश त्यांनी या वेळी दिले. जिल्हा अपंग संघटनेचे अध्यक्ष साईनाथ पवार, हाशिवरे येथील अंधशिक्षक व समिती सदस्य अशोक अभंगे, प्रीझम सामाजिक संस्थेच्या तपस्वी गोंधळी यांनीदेखील या वेळी आपल्या सूचना मांडल्या.एक दिव्यांग संचालित केंद्र असावेच्भारत निवडणूक आयोगाच्या सूचनेप्रमाणे एक मतदान केंद्र दिव्यांग कर्मचारी संचालित असावे. दिव्यांग कर्मचारी शारीरिकदृष्ट्या इतरांपेक्षा काहीसे कमकुवत असले तरी प्रशासनात ते खूप चांगले आणि प्रभावी कार्यक्षमतेने काम करीत आहेत. शिवाय, महत्त्वाची जबाबदारीही सांभाळत आहेत, अशी उदाहरणे आहेत. त्यामुळे एक मतदान केंद्र तरी दिव्यांग अधिकारी व कर्मचारी संचालित असेल यादृष्टीने डॉ. सूर्यवंशी यांनी सूचना दिल्या.