शहरं
Join us  
Trending Stories
1
"त्या रायफली विमानाने..."; दहशतवाद्यांना ठार केल्यानंतर रात्रभर धावपळ कशासाठी? अमित शाहांनी संसदेत सगळं सांगितलं
2
'पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांना आधीच पकडले होते, काल मारले'; काँग्रेस नेत्याने ऑपरेशन महादेववर व्यक्त केला संशय
3
UPI व्यवहारांवर नवे निर्बंध; १ ऑगस्टपासून ‘डिजिटल शिस्त’ लागू, तुमच्यावर काय परिणाम होणार
4
मनसे-उद्धवसेना युती झाल्यास शिंदेंकडे गेलेल्या माजी नगरसेवकांच्या जागांवर दावा कुणाचा राहणार?
5
भारताची नक्कल करायला गेला अन् पाकिस्तान तोंडावर पडला! १३ चाचण्या करूनही क्षेपणास्त्र अयशस्वी
6
हलगर्जीपणाचा कळस! डॉक्टर काढत होते झोपा; मिळाले नाही उपचार, रुग्णाचा तडफडून मृत्यू
7
माजी कमांडो मारला जाताच पाकिस्तान तडफडू लागला; तीन दहशतवाद्यांना 'निष्पाप पाकिस्तानी' म्हणू लागला...
8
बँकांमध्ये ₹६७,००० कोटींची रक्कम पडून; कोणीही दावा केला नाही, सर्वाधिक पैसे कुठे?
9
माझ्या बाप्पाचं नाव मी शाहरुख ठेवलंय, तर सिद्धिविनायकाचं..., हर्षदा खानविलकर असं का म्हणाल्या?
10
पहलगामचा बदला घेतला; २६ पर्यटकांची हत्या करणारे तीन दहशतवादी ठार, अमित शाहांची माहिती
11
PF पेन्शन वाढीवर सरकारचा 'यू-टर्न'? ७,५०० रुपये पेन्शन मिळणार की नाही? संसदेत केलं स्पष्ट
12
माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घेणार?, अजित पवारांच्या निर्णयाकडे लक्ष; ३० मिनिटे बैठकीत चर्चा
13
पत्नीचा विरह सहन होईना! घटस्फोटानंतर पतीनं जेवण सोडलं; ३० दिवस फक्त बिअर पिऊन जगला, मग जे घडले...
14
'डोनाल्ड ट्रम्प यांची मध्यस्थी नाहीच; पाकिस्तानच्या विनंतीवरुन युद्धविराम,' जयशंकर यांची स्पष्टोक्ती
15
Nag Panchami 2025: नागपंचमीला उघडतो मंदिराचा तिसरा दरवाजा; काय दडले आहे तिथे?
16
"जा, तुझ्या बायकोला ठेवून घेतली, काय करायचं ते कर.."; पत्नीच्या प्रियकराची धमकी, पतीनं संपवलं जीवन
17
Jio- Airtel समोर टिकू शकणार नाही इलॉन मस्क यांची स्टारलिंक, असं काय केलंय सरकारनं? जाणून घ्या
18
नर्स निमिषा प्रियाची फाशीची शिक्षा खरंच रद्द झाली का? काय आहे या दाव्याचं सत्य? जाणून घ्या...
19
पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांचं गडकरींना पत्र, केली 'ही' मागणी
20
'ऑपरेशन सिंदूर हा फक्त एक तमाशा होता', प्रणिती शिंदेंच्या वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटले

कोणी नदी, कोणी तलाव, कोणी समुद्र किनाऱ्यावर बुडाले; महिन्यात १३ मृत्यू

By निखिल म्हात्रे | Updated: June 30, 2024 15:24 IST

जिल्ह्यात पर्यटकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

लोकमत न्यूज नेटवर्क, अलिबाग : पावसाळा सुरू झाल्यापासून रायगड जिल्ह्यात गेल्या एका महिन्यात सात अल्पवयीन मुलांसह १३ जणांचा बुडून मृत्यू झाला. मृतांमध्ये सात पर्यटकांचा समावेश आहे. या घटनांमुळे जिल्ह्यात पर्यटकांच्या सुरक्षेचा प्रश्नही ऐरणीवर आला आहे.

अलिबाग तालुक्यातील मुनवली गावात २३ जून रोजी दोन किशोरवयीन मुलांचा तलावात बुडून मृत्यू झाला, तर २२ जून रोजी दादली गावातील २१ वर्षीय तरुणाचा सावित्री नदीत पाय घसरून बुडाल्याने मृत्यू झाला. त्याच दिवशी काल नदीत पोहताना ३२ वर्षीय व्यक्तीचा बुडून मृत्यू झाला. खालापूर तालुक्यातील पोखरवाडी धरणात २१ जून रोजी मुंबईतील १७ ते २६ वयोगटातील चार विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू झाल्याची माहिती पोलिसांनी दिली. अलिबाग समुद्रात पोहण्यासाठी मोठ्या प्रमाणात पर्यटक येत आहेत. अशाच एका २७ वर्षांच्या तरुणचा १३ जून रोजी समुद्रात बुडून मृत्यू झाला.

उरण तालुक्यातील पिरकोन गावात ९ जून रोजी हृदयद्रावक घटनेत २५ वर्षीय महिला आणि तिच्या ७ वर्षांच्या मुलाचा तलावात बुडून मृत्यू झाला. ही महिला तलावात कपडे धुवत असताना ही घटना घडली होती. या आधी २८ मे रोजी मुंबईतील एका व्यक्तीचा काशीद समुद्रकिनारी समुद्रात बुडून मृत्यू झाला, तर २५ मे रोजी भिरा गावात एका पर्यटकाचा पाण्यात बुडून मृत्यू झाला होता. पोहण्यासाठी गेलेल्या १३ जणांना गेल्या महिनाभरात जीव गमवावा लागला. अतिउत्साहीपणा न करता पाण्याचा अंदाज घेऊन नागरिकांनी पोहण्यासाठी उतरावे. पर्यटकांनी काळजी घेणे आवश्यक आहे.- सोमनाथ घार्गे, जिल्हा पोलिस अधीक्षक

पर्यटकांना समुद्राच्या पाण्याचा अंदाज येत नाही. त्यामुळे दुर्घटना होत आहेत. समुद्रावर असलेल्या सुरक्षा रक्षकांच्या सूचनांकडे दुर्लक्ष करणे चुकीचे आहे. अनेकांना समुद्राच्या उधाणाचा अंदाज येत नाही. पोहण्यासाठी जाण्याआगोदर त्या स्थळाविषयीची माहिती आवर्जून घ्यावी.- मंदार पावशे, नागरीक

टॅग्स :Raigadरायगड