शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
2
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
3
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
4
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
5
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
6
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
7
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
8
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
9
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
10
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
11
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
12
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
13
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
14
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
15
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
16
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
17
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
18
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
19
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
20
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले

कोणी नदी, कोणी तलाव, कोणी समुद्र किनाऱ्यावर बुडाले; महिन्यात १३ मृत्यू

By निखिल म्हात्रे | Updated: June 30, 2024 15:24 IST

जिल्ह्यात पर्यटकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

लोकमत न्यूज नेटवर्क, अलिबाग : पावसाळा सुरू झाल्यापासून रायगड जिल्ह्यात गेल्या एका महिन्यात सात अल्पवयीन मुलांसह १३ जणांचा बुडून मृत्यू झाला. मृतांमध्ये सात पर्यटकांचा समावेश आहे. या घटनांमुळे जिल्ह्यात पर्यटकांच्या सुरक्षेचा प्रश्नही ऐरणीवर आला आहे.

अलिबाग तालुक्यातील मुनवली गावात २३ जून रोजी दोन किशोरवयीन मुलांचा तलावात बुडून मृत्यू झाला, तर २२ जून रोजी दादली गावातील २१ वर्षीय तरुणाचा सावित्री नदीत पाय घसरून बुडाल्याने मृत्यू झाला. त्याच दिवशी काल नदीत पोहताना ३२ वर्षीय व्यक्तीचा बुडून मृत्यू झाला. खालापूर तालुक्यातील पोखरवाडी धरणात २१ जून रोजी मुंबईतील १७ ते २६ वयोगटातील चार विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू झाल्याची माहिती पोलिसांनी दिली. अलिबाग समुद्रात पोहण्यासाठी मोठ्या प्रमाणात पर्यटक येत आहेत. अशाच एका २७ वर्षांच्या तरुणचा १३ जून रोजी समुद्रात बुडून मृत्यू झाला.

उरण तालुक्यातील पिरकोन गावात ९ जून रोजी हृदयद्रावक घटनेत २५ वर्षीय महिला आणि तिच्या ७ वर्षांच्या मुलाचा तलावात बुडून मृत्यू झाला. ही महिला तलावात कपडे धुवत असताना ही घटना घडली होती. या आधी २८ मे रोजी मुंबईतील एका व्यक्तीचा काशीद समुद्रकिनारी समुद्रात बुडून मृत्यू झाला, तर २५ मे रोजी भिरा गावात एका पर्यटकाचा पाण्यात बुडून मृत्यू झाला होता. पोहण्यासाठी गेलेल्या १३ जणांना गेल्या महिनाभरात जीव गमवावा लागला. अतिउत्साहीपणा न करता पाण्याचा अंदाज घेऊन नागरिकांनी पोहण्यासाठी उतरावे. पर्यटकांनी काळजी घेणे आवश्यक आहे.- सोमनाथ घार्गे, जिल्हा पोलिस अधीक्षक

पर्यटकांना समुद्राच्या पाण्याचा अंदाज येत नाही. त्यामुळे दुर्घटना होत आहेत. समुद्रावर असलेल्या सुरक्षा रक्षकांच्या सूचनांकडे दुर्लक्ष करणे चुकीचे आहे. अनेकांना समुद्राच्या उधाणाचा अंदाज येत नाही. पोहण्यासाठी जाण्याआगोदर त्या स्थळाविषयीची माहिती आवर्जून घ्यावी.- मंदार पावशे, नागरीक

टॅग्स :Raigadरायगड