शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
3
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
4
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
5
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
6
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
7
Health Tips: लघवीची दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
8
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
9
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
10
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
11
Summer Special: भेळ तर नेहमीच खाता, पण 'हा' सिक्रेट' मसाला वाढवेल सुकी भेळेची लज्जत
12
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
13
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
14
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
15
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
16
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
17
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
18
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
19
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
20
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
Daily Top 2Weekly Top 5

सैनिकांमुळेच देशाच्या सीमा सुरक्षित

By admin | Updated: December 12, 2015 01:43 IST

देशाच्या सीमेचे रक्षण सैनिक करत असतात. प्रसंगी ते आपल्या प्राणाची आहुती देतात. त्यांच्यामुळेच देशाच्या सीमा सुरक्षित आहेत

अलिबाग : देशाच्या सीमेचे रक्षण सैनिक करत असतात. प्रसंगी ते आपल्या प्राणाची आहुती देतात. त्यांच्यामुळेच देशाच्या सीमा सुरक्षित आहेत. सीमा सुरक्षित राहिल्यामुळेच आपण सुरक्षित राहू शकतो. म्हणूनच सैनिकांच्या कल्याणासाठी ध्वजनिधी संकलनात सहभाग घेणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. शासकीय विभागानेही त्यांना दिलेला ध्वजदिन निधी संकलनाचे उद्दिष्ट पूर्ण करावे, असे आवाहन रायगडच्या जिल्हाधिकारी शीतल तेली- उगले यांनी गुरुवारी येथे केले.जिल्हाधिकारी कार्यालयातील राजस्व सभागृहात जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते सशस्त्र सेना ध्वजदिन निधी संकलन कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. त्यावेळी त्या बोलत होत्या. जिल्हाधिकारी म्हणाल्या, देशाला स्वातंत्र्य मिळण्यासाठी अनेक स्वातंत्र्य सैनिकांनी आपल्या प्राणाची आहुती दिली आहे. देशाच्या सीमेचे रक्षण करण्यासाठी अनेक सैनिक आपले बलिदान देतात. अशा आजी-माजी सैनिकांच्या कल्याणासाठी ध्वजदिन निधी संकलनासाठी प्रत्येकाने आपला खारीचा वाटा उचलावा. ध्वजदिन निधी संकलनातून आजी-माजी सैनिकांच्या पाल्यांसाठी शिक्षण शिष्यवृत्ती, वस्तिगृहासाठी निधी, अशा विविध योजना राबविण्यात येतात. तसेच माजी सैनिकांच्या पुनर्वसनासाठी सैनिक कल्याण विभागामार्फत काम केले जाते, ध्वजदिन निधी संकलनाचा राज्याचा इष्टांक २६ कोटी २६ लाख रु पये इतका होता तर रायगड जिल्ह्याचा इष्टांक ४९ लाख ५९ हजार इतका असल्याची माहिती जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी माजी कॅप्टन विद्या रत्नपारखी यांनी दिली. याप्रसंगी रायगड जिल्ह्याने ध्वजदिन निधी संकलनात उत्कृष्ट काम केल्याबद्दल जिल्हाधिकारी शीतल तेली-उगले यांना राज्य शासनाचे स्मृतीचिन्ह माजी कॅप्टन विद्या रत्नपारखी यांनी दिले. गुणवत्ता यादीत आलेल्या आजी-माजी सैनिकांच्या पाल्यांचा सत्कार यावेळी करण्यात आला. (विशेष प्रतिनिधी)