शहरं
Join us  
Trending Stories
1
आयटी पार्क पुण्यातून बाहेर चालले..! अजित पवारांनी हिंजवडीच्या सरपंचांनाही सुनावले खडेबोल
2
२६ जुलै हा दिवस मुंबईकर कधीच विसरू शकत नाही! २० वर्षापूर्वी काय घडलं होतं त्या दिवशी?
3
Thailand- Cambodia Conflict :'सीमेवर प्रवास टाळा', थायलंड- कंबोडिया संघर्षादरम्यान भारताच्या पर्यटकांसाठी दूतावासाने सूचना दिल्या
4
विवाहित वर्गमैत्रिणीला भेटला; पत्नीला घटस्फोट देत तिच्यासोबत लिव्ह इनमध्ये राहिला, मग जे घडलं...
5
कॉलेजला जाण्यापूर्वी हवी होती लीन बॉडी; ऑनलाईन ट्रेंड, लिक्विड डाएट बेतलं जीवावर, मुलाचा मृत्यू
6
आता सैनिकांसाठी अरबी भाषा आणि इस्लाम शिकणे अनिवार्य, इस्रायलचा मोठा निर्णय! कारण काय?
7
अरेरे! 'सैयारा' पाहून तुफान राडा; गर्लफ्रेंडसाठी थिएटरबाहेर भिडले २ तरुण, लाथा-बुक्क्यांनी मारहाण
8
Rain Update : ठाणे, रायगड, मुंबईत मुसळधार, ऑरेंज अलर्ट, पालघरसाठी रेड अलर्ट, भरती-ओहोटीबाबतही इशारा
9
५ वर्षांत १० पट वाढला TATA Sons चा नफा; समूहाच्या 'या' कंपनीनं केली सर्वाधिक कमाई, तुमच्याकडे स्टॉक आहे का?
10
'मला बुटाने मारा', सिद्धरामय्या अन् शिवकुमार यांच्या विशेष अधिकाऱ्यांमध्ये दिल्लीत हाणामारी; कारण काय?
11
शाहरुख फिटनेससाठी कोणते पदार्थ खात नाही? किती वाजता झोपतो? काय जेवतो? जाणून घ्या एका क्लिकवर
12
पहिल्यांदा नोकरी करणाऱ्यांना सरकार देणार १५ हजार रुपये; फक्त पूर्ण कराव्या लागतील 'या' २ अटी
13
"तुम्हाला आनंद देणाऱ्या गोष्टींवरदेखील खर्च करा..," राधिका गुप्ता यांनी दिला हृदयस्पर्शी सल्ला
14
आमदार रोहित पवारांच्या अडचणीत वाढ; मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ईडीकडून मोठी कारवाई
15
महायुतीत २ मंत्र्यांमध्ये रंगलं मानापमान नाट्य; शिंदेसेनेचे मंत्री नाराज, भाजपा मंत्र्यांचा पलटवार
16
सुनील शेट्टीने 'हेरा फेरी ३'मधील परेश रावलच्या एंट्रीवर दिली प्रतिक्रिया, म्हणाली- "नजर लागते..."
17
२ मुलांना विष पाजलं, पत्नीचा गळा दाबला अन् मग पतीने...; एकाच कुटुंबातील चौघांची जीवनयात्रा संपली
18
धक्कादायक घटना! एक वर्षाच्या मुलाने नागाचा चावा घेतला, कोब्राचा मृत्यू झाला; पण मुलगाही...
19
पाकिस्तानने अमेरिकेसमोर TRF'वर सूर बदलला! म्हणाले, आम्हाला काही हरकत नाही', हुशारीही दाखवली
20
₹३० वरुन ₹३००० पार गेला हा शेअर; आता कंपनीनं मोठ्या गुंतवणुकीची केली घोषणा, तुमच्याकडे आहे का?

सैनिकांमुळेच देशाच्या सीमा सुरक्षित

By admin | Updated: December 12, 2015 01:43 IST

देशाच्या सीमेचे रक्षण सैनिक करत असतात. प्रसंगी ते आपल्या प्राणाची आहुती देतात. त्यांच्यामुळेच देशाच्या सीमा सुरक्षित आहेत

अलिबाग : देशाच्या सीमेचे रक्षण सैनिक करत असतात. प्रसंगी ते आपल्या प्राणाची आहुती देतात. त्यांच्यामुळेच देशाच्या सीमा सुरक्षित आहेत. सीमा सुरक्षित राहिल्यामुळेच आपण सुरक्षित राहू शकतो. म्हणूनच सैनिकांच्या कल्याणासाठी ध्वजनिधी संकलनात सहभाग घेणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. शासकीय विभागानेही त्यांना दिलेला ध्वजदिन निधी संकलनाचे उद्दिष्ट पूर्ण करावे, असे आवाहन रायगडच्या जिल्हाधिकारी शीतल तेली- उगले यांनी गुरुवारी येथे केले.जिल्हाधिकारी कार्यालयातील राजस्व सभागृहात जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते सशस्त्र सेना ध्वजदिन निधी संकलन कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. त्यावेळी त्या बोलत होत्या. जिल्हाधिकारी म्हणाल्या, देशाला स्वातंत्र्य मिळण्यासाठी अनेक स्वातंत्र्य सैनिकांनी आपल्या प्राणाची आहुती दिली आहे. देशाच्या सीमेचे रक्षण करण्यासाठी अनेक सैनिक आपले बलिदान देतात. अशा आजी-माजी सैनिकांच्या कल्याणासाठी ध्वजदिन निधी संकलनासाठी प्रत्येकाने आपला खारीचा वाटा उचलावा. ध्वजदिन निधी संकलनातून आजी-माजी सैनिकांच्या पाल्यांसाठी शिक्षण शिष्यवृत्ती, वस्तिगृहासाठी निधी, अशा विविध योजना राबविण्यात येतात. तसेच माजी सैनिकांच्या पुनर्वसनासाठी सैनिक कल्याण विभागामार्फत काम केले जाते, ध्वजदिन निधी संकलनाचा राज्याचा इष्टांक २६ कोटी २६ लाख रु पये इतका होता तर रायगड जिल्ह्याचा इष्टांक ४९ लाख ५९ हजार इतका असल्याची माहिती जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी माजी कॅप्टन विद्या रत्नपारखी यांनी दिली. याप्रसंगी रायगड जिल्ह्याने ध्वजदिन निधी संकलनात उत्कृष्ट काम केल्याबद्दल जिल्हाधिकारी शीतल तेली-उगले यांना राज्य शासनाचे स्मृतीचिन्ह माजी कॅप्टन विद्या रत्नपारखी यांनी दिले. गुणवत्ता यादीत आलेल्या आजी-माजी सैनिकांच्या पाल्यांचा सत्कार यावेळी करण्यात आला. (विशेष प्रतिनिधी)