शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Flood: "ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होतेय, पण..."; CM फडणवीसांनी सांगितली निर्णय घेण्यातील अडचण
2
फायदाच फायदा...! गाजाच्या निर्मितीत भारताला मोठी संधी! पार पाडू शकतो महत्वाची भूमिका, असा आहे इस्रायलचा संपूर्ण प्लॅन?
3
महात्मा गांधींना शरण जाणे हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा वैचारिक पराभव; काँग्रेसचा खोचक टोला
4
गावात वास्तव्य, सायकलवरून प्रवास आणि..., असं आहे Arattaiचे संस्थापक श्रीधर वेंबू यांचं साधं राहणीमान
5
मोठी बातमी! दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात मदत पोहचणार; पुढच्या आठवड्यात घोषणा करू - CM देवेंद्र फडणवीस
6
Colab Platforms Stock Price: ७३ दिवसांपासून शेअरला लागतंय अपर सर्किट, वर्षभरात ८४२% ची वाढ; गुंतवणूकदार मालामाल
7
Motorola G35 5G: डॉल्बी साउंड असलेला मोटोरोलाचा 5G फोन ८,९९९ रुपयांत लॉन्च! 
8
Anju Yadav : चौकट मोडली, भरारी घेतली! २१ व्या वर्षी लग्न, पतीचा मृत्यू... सिंगल मदर झाली राजस्थानची DSP
9
Amravati: गर्लफ्रेंड पोलीस ठाण्यात जाताच ६व्या मजल्या गेला अन् व्हिडीओ कॉल केला; नंतर बॉयफ्रेंडने सगळ्यांनाच फोडला घाम
10
"तरुणांच्या मनातील शंका..."; थेट आंदोलक तरुणांना भेटण्यासाठी पोहोचले CM धामी, परीक्षा प्रकरणात CBI चौकशीला सहमती 
11
गुंतवणूकदारांची चिंता वाढवणारी बातमी! सलग आठव्या दिवशी बाजार कोसळला; 'ही' आहेत ४ कारणे
12
कुणी कर्ज देता का कर्ज?... पाकिस्तानने पुन्हा IMF पुढे पसरले हात, महापुराचं कारण देत मागितला मोठा निधी
13
Rule Change: उद्यापासून बदलणार 'हे' महत्त्वाचे आर्थिक नियम; सामान्यांवर होणार परिणाम, पटापट चेक करा लिस्ट
14
भारतीय शास्त्रज्ञ डॉ. संध्या यांचा जागतिक स्तरावर डंका, अव्वल २ टक्के शास्त्रज्ञांमध्ये स्थान
15
दिवाळीची भेट! सरकारच्या लाखो कर्मचाऱ्यांसाठी मोठा बोनस जाहीर; दसऱ्यापूर्वीच रक्कम हातात येणार
16
चमत्कार दाखवा आणि २१ लाख जिंका! अंनिसचे बुवा-बाबांना आव्हान; ३६ वर्षांत कोणीच पुढे आले नाही
17
Man-Animal Conflict: "आमचं सरकार तुमच्या प्रत्येक दुःखात सोबत", मुख्यमंत्री योगींचे पीडितांना आश्वासन
18
नमाज पढत होते विद्यार्थी, तेवढ्यात झाला मोठा आवाज, शाळेची इमारत कोसळून ६५ विद्यार्थी अडकले 
19
"शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून लक्ष हटवण्यासाठी अहिल्यानगरमध्ये सरकार पुरस्कृत दंगल झाली’’ काँग्रेसचा गंभीर आरोप
20
बाबाचे 'चाळे'! इन्स्टिट्यूटमधील महिलांसोबतच स्वामी चैतन्यानंदचे संबंध; मोबाईलमध्ये मिळाले फोटो

सैनिकांमुळेच देशाच्या सीमा सुरक्षित

By admin | Updated: December 12, 2015 01:43 IST

देशाच्या सीमेचे रक्षण सैनिक करत असतात. प्रसंगी ते आपल्या प्राणाची आहुती देतात. त्यांच्यामुळेच देशाच्या सीमा सुरक्षित आहेत

अलिबाग : देशाच्या सीमेचे रक्षण सैनिक करत असतात. प्रसंगी ते आपल्या प्राणाची आहुती देतात. त्यांच्यामुळेच देशाच्या सीमा सुरक्षित आहेत. सीमा सुरक्षित राहिल्यामुळेच आपण सुरक्षित राहू शकतो. म्हणूनच सैनिकांच्या कल्याणासाठी ध्वजनिधी संकलनात सहभाग घेणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. शासकीय विभागानेही त्यांना दिलेला ध्वजदिन निधी संकलनाचे उद्दिष्ट पूर्ण करावे, असे आवाहन रायगडच्या जिल्हाधिकारी शीतल तेली- उगले यांनी गुरुवारी येथे केले.जिल्हाधिकारी कार्यालयातील राजस्व सभागृहात जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते सशस्त्र सेना ध्वजदिन निधी संकलन कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. त्यावेळी त्या बोलत होत्या. जिल्हाधिकारी म्हणाल्या, देशाला स्वातंत्र्य मिळण्यासाठी अनेक स्वातंत्र्य सैनिकांनी आपल्या प्राणाची आहुती दिली आहे. देशाच्या सीमेचे रक्षण करण्यासाठी अनेक सैनिक आपले बलिदान देतात. अशा आजी-माजी सैनिकांच्या कल्याणासाठी ध्वजदिन निधी संकलनासाठी प्रत्येकाने आपला खारीचा वाटा उचलावा. ध्वजदिन निधी संकलनातून आजी-माजी सैनिकांच्या पाल्यांसाठी शिक्षण शिष्यवृत्ती, वस्तिगृहासाठी निधी, अशा विविध योजना राबविण्यात येतात. तसेच माजी सैनिकांच्या पुनर्वसनासाठी सैनिक कल्याण विभागामार्फत काम केले जाते, ध्वजदिन निधी संकलनाचा राज्याचा इष्टांक २६ कोटी २६ लाख रु पये इतका होता तर रायगड जिल्ह्याचा इष्टांक ४९ लाख ५९ हजार इतका असल्याची माहिती जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी माजी कॅप्टन विद्या रत्नपारखी यांनी दिली. याप्रसंगी रायगड जिल्ह्याने ध्वजदिन निधी संकलनात उत्कृष्ट काम केल्याबद्दल जिल्हाधिकारी शीतल तेली-उगले यांना राज्य शासनाचे स्मृतीचिन्ह माजी कॅप्टन विद्या रत्नपारखी यांनी दिले. गुणवत्ता यादीत आलेल्या आजी-माजी सैनिकांच्या पाल्यांचा सत्कार यावेळी करण्यात आला. (विशेष प्रतिनिधी)