शहरं
Join us  
Trending Stories
1
"गंभीर परिणाम भोगावे लागतील"; ट्रम्प यांचा मस्क यांच्याशी समेट करण्यास नकार, दिला मोठा इशारा
2
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींचे शुभ कल्याण, ६ राशींना काहीसा संमिश्र काळ; तुमची रास कोणती?
3
Bengaluru Stampede: कर्नाटक सरकारने भरपाईची वाढवली रक्कम; मृतांच्या कुटुंबियांना देणार २५ लाख रुपये
4
आता रिपब्लिकन घडवणार ट्रम्प-मस्क यांच्यात समेट, दोघांतील वादामुळे भविष्यात अडचणी वाढण्याची पक्षाला भीती
5
आजचे राशीभविष्य : ०८ जून २०२५; आर्थिक लाभ संभवतात, विवाद व बौद्धिक चर्चेपासून दूर राहा
6
शैक्षणिक दाखले, शपथपत्रासाठी स्टॅम्प पेपरची मागणी नियमबाह्य! महसूलमंत्री बावनकुळे यांची अधिकाऱ्यांना तंबी
7
पिनकाेड विसरा; आता हा ‘पीन’ सांगेल हवा असलेला अचूक पत्ता, टपाल विभागाने सुरू केली नवीन डिजिपीन प्रणाली
8
छोट्या-छोट्या गरजांसाठी आधी घ्यावे लागायचे कर्ज, शेती क्षेत्रात झाले चांगले बदल, पंतप्रधान नरेंद्र मोदी
9
गृहप्रकल्पाच्या साइट प्रमोशनसाठी ड्रोन उडविले, अंधेरी येथे तिघे जण पोलिसांच्या ताब्यात
10
निकृष्ट अन्नधान्य कैद्यांना पुरविले; राजू शेट्टींच्या आरोपांमुळे अमिताभ गुप्ताही घेऱ्यात; जालिंदर सुपेकर, कंत्राटदार झंवर हेही रडारवर
11
छत्तीसगड सीमेवर चकमक : नक्षल कमांडर ‘भास्कर’ला कंठस्नान, ३ दिवसांत ७ नक्षलवादी ठार
12
महाराष्ट्रात ‘मॅच-फिक्सिंग’, राहुल गांधींचा आरोप; छाननीवेळी आक्षेप घेतला नाही. आयाेगाचं उत्तर
13
छोट्याशा चुकीमुळे भडकलेली, ४५ वर्षांपासून धगधगणारी ‘नरकाच्या दारा’ची आग मंदावली
14
विराट का म्हणतोय, ‘महान बनायचे, तर कसोटी खेळा!’
15
मुर्शिदाबाद हिंसाचार; १३ जणांविरोधात आरोपपत्र दाखल
16
Coronavirus: देशातील अनेक राज्यात कोरोना रुग्णसंख्येत वाढ; महाराष्ट्रात ८६ नवीन रुग्ण आढळले
17
राजासोबत 'ते' तिघे कोण होते, ज्यांच्या मागून सोनम चालत होती; स्थानिक गाईडचा खुलासा
18
तेलंगणा सीमेवरील गोदापात्रात सहा मुले बुडाली; नदीकाठी काळीज पिळवटणाारा आक्रोश
19
भारत-पाकिस्ताननंतर आशियातील आणखी २ देशात युद्धजन्य स्थिती; सीमेवर वाढवले सशस्त्र सैन्य
20
"उद्धव-राज एकत्र येऊ शकतात, उद्धवजींनी त्या लोकांपासून सावध राहावं", गजानन कीर्तिकरांचा ठाकरेंना महत्त्वाचा सल्ला

सामाजिक संस्थांचा मदतीचा हात

By admin | Updated: April 18, 2017 06:46 IST

कर्जत तालुक्यात दरवर्षीप्रमाणे या वर्षीही आदिवासी बांधवांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. तालुक्यात जवळपास २५ ते ३० आदिवासी वाड्या आणि गावांना

नेरळ : कर्जत तालुक्यात दरवर्षीप्रमाणे या वर्षीही आदिवासी बांधवांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. तालुक्यात जवळपास २५ ते ३० आदिवासी वाड्या आणि गावांना संभाव्य पाणीटंचाईच्या झळा पोहचत आहेत. त्यामुळे त्याचे नियोजन करण्यासाठी स्थानिक आमदार सुरेश लाड यांच्या अध्यक्षतेखाली टंचाई निवारण आराखडा बैठक घेण्यात आली. या बैठकीत तालुक्याचा तक्र ारी निवारण आराखडा मंजूर करण्यात आला. मात्र शासनाकडून टँकरमार्फत होणाऱ्या पाणीपुरवठ्यास विलंब होत असल्याने काही सामाजिक संस्थांनी स्वत:हून पुढाकार घेत स्वखर्चाने टँकरने पाणीपुरवठा सुरु केला आहे. त्यामध्ये या आदिवासी वाड्यांमध्ये सामाजिक संघटनेच्या माणुसकीचे झरे पाहायला मिळत आहेत.कर्जत तालुक्यात उल्हास नदी, चिल्हार नदी आणि बारमाही वाहणारी पेज नदी आहे. तालुक्यात खांडस, काशेळे, आर्ढे, वरई, जांमरु ंग असे पाझर तलाव आहेत. मात्र यातील एक दुसरा पाझर तलाव सोडला तर बाकीचे तलाव एप्रिल महिन्याच्या आत खोली गाठतात. तसेच कर्जतपासून जवळच पाली भूतिवली धरण आहे. परंतु या धरणाच्या कालव्याचे काम रखडल्याने या परिसरातही पाणीटंचाईची झळ बसत आहे. दरवर्षी विशेष मार्चपासूनच पाणीटंचाईची झळ या परिसरातील आदिवासी वाड्यापाड्यांना बसत आहे. याचे कारण म्हणजे आजही या आदिवासी वाड्यांमध्ये पाणी योजना पोहोचल्याच नाहीत.काही ठिकाणी काम हाती घेतले आहे, परंतु ते अर्धवट आहे. परिणामी या वाड्यांमधील नागरिकांना आपली तहान भागविण्यासाठी भर रखरखत्या उन्हात डोक्यावर हंडे घेऊन पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे. बंगरवाडी, मालेगाव, ताडवाडी, जांभूळवाडी, मोग्रज, धामणी मोरेवाडी अशी सुमारे २५ ते ३० गावे व आदिवासी वाड्यांना पाणीटंचाई जाणवत आहे. नुकतेच तालुक्यातील संभाव्य पाणीटंचाई नियोजनासाठी कर्जत-खालापूर आमदार सुरेश लाड यांच्या अध्यक्षतेखाली, तहसीलदार अविनाश कोष्टी, गटविकास अधिकारी शबाना मोकाशी, लघुपाटबंधारे विभागाचे अधिकारी यांची बैठक घेऊन टंचाई आराखडा मंजूर करण्यात आला आहे.दरवर्षी जिल्हा परिषद, आदिवासी विकास विभाग, ग्रामविकास, पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग तसेच आमदार व खासदार निधी आदी शासनाच्या विविध योजनांमधून पाणीटंचाई निवारणासाठी निधी वापरला जातो. तरीही कर्जतमध्ये आदिवासी वाड्यापाड्यांमधील पाणीटंचाई कायम आहे. (वार्ताहर)