शहरं
Join us  
Trending Stories
1
Shaktipeeth Expressway: ...हा तर आर्थिक संकटाचा महामार्ग;  वित्त विभागाचा कर्जवाढीचा इशारा
2
विशेष लेख: एकनाथ शिंदे आणि अजित पवारांचे जमत का नाही?
3
वीज आणखी स्वस्त होणार; खरेदी खर्चातील ६६ हजार कोटींच्या बचतीमुळे दरांत कपात
4
जगभर: चीनमध्ये ५ मिनिटांच्या मिठीसाठी ६०० रुपये, ‘मॅन मम्स’ प्रकरण काय?
5
अग्रलेख: आता शक्तिपीठाचा मनोरा... राज्याला ते परवडणार आहे का?
6
हिंदीचा मुद्दा पेटला! सक्तीविरोधात राज ठाकरे, उद्धव ठाकरेंचे दोन वेगवेगळे मोर्चे
7
Maharashtra Rain: आधी हूल, आता पुरेपूर; सर्वदूर पावसाचे धुमशान, विदर्भ, मराठवाडा अन्  खान्देशात मुसळधार
8
मुंबईतले सर्वधर्मीय १५०० भोंगे उतरवले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मोहिमेला यश
9
कुरघोडी कसली? आक्षेप घेणे ही ‘वित्त’ची जबाबदारीच; मुख्यमंत्री फडणवीस यांनी मांडली भूमिका
10
लेख: सैरभैर जगाला हवा आहे ‘मुत्सद्दी मध्यस्थ’
11
एमएमआरसह महाराष्ट्रात आता टाटा पॉवरची वीज, नियामक आयोगाकडे अर्ज दाखल
12
...तर शेतकरी जातील काळ्या यादीत अन् पाच वर्षे मिळणार नाही कोणत्याच योजनेचा लाभ
13
राज्यात उद्धव ठाकरेंनीच स्वीकारले हिंदी सक्तीचे धोरण; उदय सामंत यांचा गंभीर आरोप
14
15 दिवसांत गाझा युद्ध संपणार! आता हमासच्या जागेवर कोण राज्य करणार? नेतान्याहू-ट्रम्प यांनी घेतला मोठा निर्णय
15
चीन-पाकिस्तानसोबतच्या 'तिकडी'ला बांगलादेशचा नकार! युनूस सरकारची भारताला मोठी ऑफर
16
आणीबाणीच्या काळात संविधानाच्या प्रस्तावनेत 'धर्मनिरपेक्ष', 'समाजवादी' शब्द जोडले गेले, समीक्षा  व्हावी; संघाची मागणी
17
"जय हिंद, जय भारत..."; आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातून शुभांशू शुक्ला यांचं पहिलं भाषण, काय म्हणाले...?
18
“इंदिरा गांधींनी आणीबाणी उठवली, पण मतचोरी करुन निवडणुका घेतल्या नाहीत”; काँग्रेसची टीका
19
अमेरिका, रशिया,यूएई, सौदी...; 'या' यादीत लवकरच भारतही येईल, सर्व काही 'सेट'
20
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान

मतदारसंघात आतापर्यंत ६०% उमेदवारांचे डिपॉझिट झाले जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2019 23:50 IST

लोकमत स्पेशल रिपोर्ट । ७९ उमेदवारांपैकी ४७ जणांचे डिपॉझिट जप्त

आविष्कार देसाईलोकमत न्यूज नेटवर्क-अलिबाग : निवडणुका लढण्याची खुमखुमी काही औरच असते. काही प्रमुख राजकीय पक्ष सोडल्यास ज्यांची ताकद नसते तेही निवडणुकीत उडी घेतात; परंतु त्यांचे डिपॉझिट वाचेल एवढेदेखील त्यांना मतदान होत नाही. १९६२ ते २०१४ या कालावधीत पार पडलेल्या लोकसभेच्या निवडणुकीत तब्बल ७९ जणांनी नशीब आजमावले होते. मात्र, ५९.४९ म्हणजेच सुमारे ६० टक्के उमेदवारांचे डिपॉझिट जप्त होण्याची नामुष्की त्यांच्यावर आली होती.आताचा रायगड आणि आधीचा कुलाबा लोकसभा मतदारसंघामध्ये १९५२ पासून निवडणुका होत आहेत. या मतदारसंघावर काँग्रेस आणि शेकाप यांच्या उमेदवाराने आलटून पालटून खासदारकीची सत्ता उपभोगली आहे. काँग्रेसचा उमेदवार आठ वेळा, शेकापचा सहा वेळा आणि शिवसेनाचा दोन वेळा उमेदवार निवडून आलेला आहे.रायगड जिल्ह्यामध्ये काँग्रेस, शेकाप, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना हे प्रमुख पक्ष आहेत. त्यांच्या पाठीशी मतदारांची मोठी व्होटबँक आहे. असे असतानाही काही राजकीय पक्ष आणि अपक्ष उमेदवारांनी सातत्याने निवडणूक लढल्याचे दिसून येते. त्या निवडणुकीत त्यांचा पराभव तर झालाच आहे. शिवाय, उमेदवारी अर्ज दाखल करताना त्यांना भरावी लागलेली डिपॉझिटची रक्कम ते वाचवू शकलेले नाहीत.डिपॉझिट जप्त होऊ नये म्हणून किती लागतात मते?एखाद्या उमेदवाराचे डिपॉझिट जप्त होणार की नाही हे त्याला मिळालेली मते आणि एकूण वैध मते यांच्या प्रमाणावर अवलंबून असते. कोणत्याही उमेदवाराला एकूण वैध मतांच्या किमान १६ टक्के मते मिळवावी लागतात. तेवढी मिळाली नाही तर त्या उमेदवाराचे डिपॉझिट जप्त होते.