शहरं
Join us  
Trending Stories
1
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
2
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
3
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
4
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
5
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
6
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
7
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
8
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
9
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
10
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
11
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
12
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
13
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
14
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
15
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
16
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
17
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
18
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
19
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
20
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?

हे तर टिष्ट्वटरवर चालणारे सरकार

By admin | Updated: August 18, 2015 02:57 IST

गेल्या दहा महिन्यांपूर्वी राज्यात सत्तेवर आलेल्या सरकारमध्ये सामान्य जनतेचे प्रश्न समजावून घेण्याबाबत प्रचंड अभाव असून हे ट्विटरवर चालणारे सरकार असल्याची

महाड : गेल्या दहा महिन्यांपूर्वी राज्यात सत्तेवर आलेल्या सरकारमध्ये सामान्य जनतेचे प्रश्न समजावून घेण्याबाबत प्रचंड अभाव असून हे ट्विटरवर चालणारे सरकार असल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आ. सुनील तटकरे यांनी केले. पक्षाच्या संघटनात्मक कोकण दौऱ्यावर जाताना शासकीय विश्रामगृहात पत्रकार परिषदेत ते बोलत होते.राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेनंतर आज १५ वर्षांनंतर प्रथमच राज्यात आणि केंद्रात विरोधी पक्ष म्हणून पक्षाला सामोरे जावे लागत असले तरी एक प्रबळ विरोधी पक्ष म्हणून जनतेच्या प्रश्नांवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष संघर्ष करणार असल्याचे तटकरे यांनी सांगताना दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी पंधराशे रुपये नुकसानभरपाई देण्याची शासनाने केलेली घोषणा म्हणजे बळीराजाची क्रूर चेष्टा असल्याचा आरोप तटकरे यांनी केला. काही महापालिका हद्दीत एलबीटी रद्द करण्याच्या निर्णयाचा फटका ग्रामीण भागातील व्यापाऱ्यांना बसणार आहे. याचा कुठलाही विचार राज्य शासनाने केला नाही. त्यामुळे महापालिकेला आपले स्वत:चे आर्थिक स्रोत गमवावे लागले आहे. अशा महापालिकांना निधी कसा उपलब्ध करुन देणार याबाबत राज्य शासनाने निर्णयात स्पष्टता केली नसल्याचे तटकरे यांनी सांगितले. आर्थिक घोटाळाप्रकरणी आज अटक केलेल्या मोहोळचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आ. रमेश कदम यांच्यावर पक्ष काय कारवाई करणार, याबाबत विचारणा केली असता कदम यांना पक्ष पाठीशी घालणार नसल्याचे तटकरे यांनी सांगितले. कदम यांच्यावर कायद्यानुसार कारवाई करावी, असेही त्यांनी स्पष्ट केले. ग्रामीण भागातील प्रश्नांबाबत उपाययोजना करण्याची सरकारमध्ये धमकच नाही, अशी टीकाही तटकरे यांनी केली. (वार्ताहर)