शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup 2025: मोहसीन नक्वी टीम इंडियाला ट्रॉफी द्यायला झाले तयार, पण आता ठेवली 'ही' एक अट
2
तब्बल २२ वाहने चोरणाऱ्या आंतरराज्य चोरट्याला सांगलीत अटक; १६ लाखांचा मुद्देमाल जप्त
3
चांदी दीड लाख रूपये किलो, सप्टेंबरमध्ये २१,५२७ रुपयांची झेप; सोन्याचीही ११ हजारांची उडी
4
भरधाव ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार पती-पत्नी जागीच ठार; कोहमारा-वडसा मार्गावरील घटना
5
भाजपा पदाधिकाऱ्याची पत्नीसह ३ ठिकाणी मतदारयादीत नावे, एका दुकानावर २५ नावे- काँग्रेसचा आरोप
6
पंतप्रधान मोदी करणार ‘मुख्यमंत्री अल्पमुदतीचे रोजगारक्षम अभ्यासक्रम’ कार्यक्रमाचे उद्घाटन
7
'या' दिवसापर्यंत गपचूप ट्रॉफी भारताला द्या नाहीतर...; BCCIचे मोहसीन नक्वी यांना 'अल्टीमेटम'
8
दहिसर टोलनाका वाहतूककोंडी दूर करण्यासाठी मंत्री प्रताप सरनाईक यांनी सुचवल्या उपाययोजना
9
१०० वर्षांनी हंस महालक्ष्मी योग: ८ राशींचे कल्याण, कल्पनेपलीकडे लाभ; अपार यश, भरघोस भरभराट!
10
“शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान, भरीव मदत सरकार देईल, उद्या मंत्रिमंडळ बैठकीत...”: संजय शिरसाट
11
"दुसऱ्याच महिन्यात रंगेहाथ पकडलं...!" धनश्री वर्माचा खळबळजनक खुलासा, युजवेंद्र चहलनं लग्नाच्या पहिल्याच वर्षात दिला होता धोका?
12
अंधेरी क्रीडा संकुल महापालिकेने स्वतः उभारावे; गोपाळ शेट्टी यांची पालिका आयुक्तांकडे मागणी
13
"ही सगळी नाटकं, पाकिस्तानसोबत खेळायलाच नको होतं"; भारत-पाक सामन्यावरुन आदित्य ठाकरेंनी सुनावलं
14
भाजप कार्यालय आमच्यासाठी इमारत नाही, मंदिर आहे; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केल्या भावना...
15
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय! आता 'या' उद्योगावर लादला १००% कर; भारताला सर्वाधिक फटका...
16
“दसरा मेळाव्याबाबत सदसद्विवेकबुद्धीला स्मरून निर्णय घ्यावा”; अजित पवारांचा रोख कुणाकडे?
17
१० वर्षांपासून सत्ता असलेल्या राज्यात भाजपाला जबर धक्का, निवडणुकीत मिळाल्या ४० पैकी केवळ ५ जागा   
18
कुठलाही क्रिकेट सामना हे सत्य बदलू शकत नाही; PM मोदींच्या ट्विटवर मोहसीन नक्वींची दर्पोक्ती
19
विघ्नहर्ता बाप्पा संकटात धावला! श्री सिद्धीविनायक मंदिर अतिवृष्टीबाधितांसाठी १० कोटी देणार
20
IND vs PAK Final : "ते स्वतः स्ट्राइकवर येऊन..." PM मोदींसंदर्भात नेमकं काय म्हणाला सूर्यकुमार यादव?

जिल्ह्यात १४ पालकांच्या चेहऱ्यावर ‘मुस्कान’

By admin | Updated: July 22, 2015 03:24 IST

मुक्तपणे खेळण्या-बागडण्याच्या कोवळ्या वयातच चेहऱ्यावरील

जयंत धुळप, अलिबागमुक्तपणे खेळण्या-बागडण्याच्या कोवळ्या वयातच चेहऱ्यावरील हास्य हरविलेल्या मुलांच्या चेहऱ्यावर आणि पालकांपासून दुरावलेल्या, हरवलेल्या वा अपहरण केलेल्या बालकांना पुन्हा त्यांच्या आई-वडिलांची भेट घालून देण्यासाठी राज्य सरकारच्या गृह विभागामार्फत १ जुलैपासून हाती घेतलेल्या ‘आॅपरेशन मुस्कान’या मोहिमेस रायगड जिल्ह्यात चांगला प्रतिसाद लाभला आहे. गेल्या २१ दिवसांत, हरवलेल्या नऊ बालकांना त्यांच्या आई-वडिलांच्या ताब्यात देण्यात रायगड पोलिसांना यश आल्याची माहिती रायगडचे अप्पर जिल्हा पोलीस अधीक्षक राजा पवार यांनी दिली आहे. ही नऊ बालके हरवली असल्याच्या तक्रारी दाखल झालेल्या नव्हत्या, ही बालके सापडल्यावर त्यांच्या पालकांचा शोध पोलिसांनी घेऊन या बालकांना त्यांच्या पालकांच्या ताब्यात देण्यात आले आहे. जून २०१५ अखेर जिल्ह्यात एकूण ३२ बालके हरवली असल्याची नोंद झाली होती. त्यापैकी पाच मुलांचा शोध लागला असून त्यांनाही त्यांच्या पालकांकडे सुपूर्द करण्यात आले आहे. राज्यात दहशतवादी कारवायांमध्ये लहान मुलांचा वापर करण्यात येत असल्याचे राज्याच्या गुन्हे अन्वेषण विभागाच्या निदर्शनास आले असून, यामध्ये बेवारस, बेपत्ता, रागाच्या भरात घर सोडून गेलेल्या मुलांचा मोठ्या प्रमाणात वापर करण्यात येत आहे. गेल्या १ जुलैपासून ‘आॅपरेशन मुस्कान’ राबविण्यात येत आहे. हरवलेल्या आणि बेवारस सापडलेल्या मुलांची माहिती पोलिसांना देण्यासाठी जनसामान्यांनी सक्रिय योगदान दिल्यास ‘आॅपरेशन मुस्कान’ला खऱ्या अर्थाने मोठे बळ मिळू शकणार असल्याने नागरिकांचा सहभाग वाढणे पोलिसांना अपेक्षित आहे.बेवारस, बेपत्ता, रागाच्या भरात घर सोडून गेलेल्या मुलांच्या समस्येचे विश्लेषण करताना बालक-पालक सुसकारात्मक अशा ‘चला मुलांना घडवू या’ या उपक्रमाचे प्रणेते ज्येष्ठ बालरोग तज्ज्ञ तथा राष्ट्रीय बालरोग तज्ज्ञ परिषदेचे कार्यकारिणी सदस्य डॉ.चंद्रशेखर दाभाडकर म्हणाले, मुलांच्या मनावरील पालकांच्या अपेक्षांचा ताण, परीक्षेतील यशापयशाचा ताण वाढत आहे. त्यांच्यातील वैफल्याची भावना, त्यांच्या मनातील मतप्रवाह हे जाणून घेण्याचे सातत्यपूर्ण प्रयत्न, पालकांनी वेळ देऊन त्यांच्याशी संवाद साधून जाणीवपूर्वक केले पाहिजेत. आपण त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे आहोत, ही विश्वासाची भावना त्यांच्यामध्ये निर्माण करून आत्मविश्वासाची पातळी वृद्धिंगत करण्याचे काम करणे आवश्यक असल्याचे डॉ.दाभाडकर यांनी सांगितले.