शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
3
यावेळी तीन तुकडेच करा! पीएम मोदींनी काल पाच उच्चस्तरीय बैठका घेतल्या
4
आजचे राशीभविष्य, १ मे २०२५: व्यापारात फायदा अन् नोकरीत बढतीची शक्यता
5
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
6
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
7
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
8
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
9
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
10
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
11
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
12
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
13
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
14
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
15
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
16
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
17
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
18
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
19
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
20
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!

गटांच्या मतदार याद्यांचा सावळागोंधळ

By admin | Updated: January 30, 2017 02:11 IST

कर्जत तालुक्यात रायगड जिल्हा परिषदेच्या सहा गटांसाठी आणि कर्जत पंचायत समितीच्या १२ गणांसाठी २१ फेब्रुवारी रोजी सार्वत्रिक निवडणूक होत आहे

नेरळ : कर्जत तालुक्यात रायगड जिल्हा परिषदेच्या सहा गटांसाठी आणि कर्जत पंचायत समितीच्या १२ गणांसाठी २१ फेब्रुवारी रोजी सार्वत्रिक निवडणूक होत आहे. त्या निवडणुकीसाठी कर्जत तहसील कार्यालयाने प्रसिद्ध केलेल्या मतदार याद्यात सावळागोंधळ असल्याचे दिसून येत आहे. मात्र जागरूक कार्यकर्ता आणि नागरिक यांनी आपला आक्षेप नोंदविल्यानंतर तहसील कार्यालयाने आपली चूक सुधारली आहे.कर्जत तालुक्यात वाढलेल्या लोकसंख्येमुळे १९९२ नंतर पुन्हा रायगड जिल्हा परिषदेसाठी सहा गट तयार झाले आहेत. कर्जत नगरपरिषद अस्तित्वात आल्यानंतर कर्जत तालुक्यात जिल्हा परिषदेचा एक गट कमी झाला होता. त्यामुळे आपोआप कर्जत पंचायत समितीचे दोन गण कमी झाले. २०१७ ची सार्वत्रिक निवडणूक जाहीर होण्याआधी कर्जत तहसील कार्यालयातील निवडणूक विभागाने तयार केलेल्या सहा गटांच्या मतदार याद्या तालुक्यातील ग्रामस्थांना अवलोकन करण्यासाठी तहसील कार्यालयाच्या व्हरांड्यात ठेवल्या. जिल्हा परिषदेचे पाच गटांचे सहा गट तयार करण्याचे काम याच निवडणूक विभागाने केले होते. त्यात गट वाढल्याने २०१२ च्या सार्वत्रिक निवडणुकीतील सर्व पाच गटांमध्ये समाविष्ट असलेल्या ग्रामपंचायती कमी होऊन त्यातून सहावा गट तयार झाला. त्यावेळी अख्खी ग्रामपंचायत लगतच्या गटात टाकली. ग्रामपंचायतीमधील एखादे गाव उचलून अन्य गटात टाकण्यास राज्य निवडणूक आयोगाची परवानगी आवश्यक असल्याने त्याबद्दल कोणीही आक्षेप घेतला नाही. परंतु निवडणुकीचा कार्यक्र म जाहीर होताच निवडणूक लढविण्याची तयारी करणारे इच्छुक आणि राजकीय पक्षांचे कार्यकर्ते यांनी कर्जत तहसील कार्यालयात गटाच्या मतदार याद्या पाहण्यास सुरु वात केली.भाजपाचे तालुका सरचिटणीस राजेश भगत हे पक्षाच्या इच्छुक उमेदवारांची यादी घेऊन त्यांची नावे मतदार यादीत शोधत होते. त्यांना स्वत:चे चिंचवली आणि शेजारचे वडवली गाव उमरोली जिल्हा परिषद गटात सापडले नाही. त्यांनी नेरळ आणि सावेळे गटाच्या मतदार याद्यांचा शोध घेतला असता ही दोन्ही गावे सावेळे गटाच्या मतदार यादीत सापडली. त्यांनी तक्र ार केल्यानंतर कर्जत तहसील कार्यालयाने चिंचवली आणि वडवली ही दोन्ही गावे उमरोली गटाच्या मतदार यादीत समाविष्ट करून मतदार यादी नव्याने बनवून घेतली. दुसरीकडे २० जानेवारी रोजी कर्जत तहसील कार्यालयात तहसीलदारांनी बैठक आयोजित केली होती. त्यावेळी एक नागरिक नेरळ गटाची मतदार यादी तपासत असताना त्यांना नेरळ ग्रामपंचायतीमधील जुम्मापट्टी आणि धसवाडी येथील मतदारांची नावे उमरोली गटात टाकल्याचे त्यांचा शोध घेतला असता दिसून आले. त्याबाबत माहिती तहसीलदार अविनाश कोष्टी यांना दिली असता त्यांनी नायब तहसीलदार संजय भालेराव यांना माहिती घेण्यास सांगितले. भालेराव यांनी कोणताही बदल करता येणार नाही असे सांगितले. (वार्ताहर)