शहरं
Join us  
Trending Stories
1
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
2
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
3
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
4
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
5
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
6
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
7
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
8
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
9
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
10
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
11
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
12
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
13
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
14
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
15
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
16
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
17
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
18
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
19
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
20
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर

गटांच्या मतदार याद्यांचा सावळागोंधळ

By admin | Updated: January 30, 2017 02:11 IST

कर्जत तालुक्यात रायगड जिल्हा परिषदेच्या सहा गटांसाठी आणि कर्जत पंचायत समितीच्या १२ गणांसाठी २१ फेब्रुवारी रोजी सार्वत्रिक निवडणूक होत आहे

नेरळ : कर्जत तालुक्यात रायगड जिल्हा परिषदेच्या सहा गटांसाठी आणि कर्जत पंचायत समितीच्या १२ गणांसाठी २१ फेब्रुवारी रोजी सार्वत्रिक निवडणूक होत आहे. त्या निवडणुकीसाठी कर्जत तहसील कार्यालयाने प्रसिद्ध केलेल्या मतदार याद्यात सावळागोंधळ असल्याचे दिसून येत आहे. मात्र जागरूक कार्यकर्ता आणि नागरिक यांनी आपला आक्षेप नोंदविल्यानंतर तहसील कार्यालयाने आपली चूक सुधारली आहे.कर्जत तालुक्यात वाढलेल्या लोकसंख्येमुळे १९९२ नंतर पुन्हा रायगड जिल्हा परिषदेसाठी सहा गट तयार झाले आहेत. कर्जत नगरपरिषद अस्तित्वात आल्यानंतर कर्जत तालुक्यात जिल्हा परिषदेचा एक गट कमी झाला होता. त्यामुळे आपोआप कर्जत पंचायत समितीचे दोन गण कमी झाले. २०१७ ची सार्वत्रिक निवडणूक जाहीर होण्याआधी कर्जत तहसील कार्यालयातील निवडणूक विभागाने तयार केलेल्या सहा गटांच्या मतदार याद्या तालुक्यातील ग्रामस्थांना अवलोकन करण्यासाठी तहसील कार्यालयाच्या व्हरांड्यात ठेवल्या. जिल्हा परिषदेचे पाच गटांचे सहा गट तयार करण्याचे काम याच निवडणूक विभागाने केले होते. त्यात गट वाढल्याने २०१२ च्या सार्वत्रिक निवडणुकीतील सर्व पाच गटांमध्ये समाविष्ट असलेल्या ग्रामपंचायती कमी होऊन त्यातून सहावा गट तयार झाला. त्यावेळी अख्खी ग्रामपंचायत लगतच्या गटात टाकली. ग्रामपंचायतीमधील एखादे गाव उचलून अन्य गटात टाकण्यास राज्य निवडणूक आयोगाची परवानगी आवश्यक असल्याने त्याबद्दल कोणीही आक्षेप घेतला नाही. परंतु निवडणुकीचा कार्यक्र म जाहीर होताच निवडणूक लढविण्याची तयारी करणारे इच्छुक आणि राजकीय पक्षांचे कार्यकर्ते यांनी कर्जत तहसील कार्यालयात गटाच्या मतदार याद्या पाहण्यास सुरु वात केली.भाजपाचे तालुका सरचिटणीस राजेश भगत हे पक्षाच्या इच्छुक उमेदवारांची यादी घेऊन त्यांची नावे मतदार यादीत शोधत होते. त्यांना स्वत:चे चिंचवली आणि शेजारचे वडवली गाव उमरोली जिल्हा परिषद गटात सापडले नाही. त्यांनी नेरळ आणि सावेळे गटाच्या मतदार याद्यांचा शोध घेतला असता ही दोन्ही गावे सावेळे गटाच्या मतदार यादीत सापडली. त्यांनी तक्र ार केल्यानंतर कर्जत तहसील कार्यालयाने चिंचवली आणि वडवली ही दोन्ही गावे उमरोली गटाच्या मतदार यादीत समाविष्ट करून मतदार यादी नव्याने बनवून घेतली. दुसरीकडे २० जानेवारी रोजी कर्जत तहसील कार्यालयात तहसीलदारांनी बैठक आयोजित केली होती. त्यावेळी एक नागरिक नेरळ गटाची मतदार यादी तपासत असताना त्यांना नेरळ ग्रामपंचायतीमधील जुम्मापट्टी आणि धसवाडी येथील मतदारांची नावे उमरोली गटात टाकल्याचे त्यांचा शोध घेतला असता दिसून आले. त्याबाबत माहिती तहसीलदार अविनाश कोष्टी यांना दिली असता त्यांनी नायब तहसीलदार संजय भालेराव यांना माहिती घेण्यास सांगितले. भालेराव यांनी कोणताही बदल करता येणार नाही असे सांगितले. (वार्ताहर)