शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Rain Alert: नवरात्रोत्सवात पावसाचाच 'गरबा', जाता जाता तडाखा देणार; IMD कडून सतर्कतेचा इशारा
2
उडणाऱ्या कारचा जगातील पहिलाच अपघात; दोन फ्लाइंग कार एकमेकांवर आदळल्या, एक बनली आगीचा गोळा...
3
Maharashtra Rain: संपूर्ण आठवडा पावसाचा, शुक्रवारनंतर मुसळधार पावसाची शक्यता, बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र
4
USA Hanuman Statue: आता अमेरिकेचा हनुमानावरही आक्षेप; म्हणाले, 'खोट्या देवांची मूर्ती....'
5
"आधी नवरा गेला, आता मुलगी..."; विद्यार्थिनीचा शाळेत संशयास्पद मृत्यू, आईने फोडला टाहो
6
चेक क्लिअरन्स आता एका दिवसातच! 'या' तारखेपासून नवा नियम लागू, जाणून घ्या कसा घ्यायचा फायदा
7
Rahul Gandhi : "भारताला बेरोजगारी आणि मतचोरीच्या संकटातून मुक्त करणं ही आताची सर्वात मोठी देशभक्ती"
8
Katrina Kaif Pregnancy: गुडन्यूज! कतरिना कैफने शेअर केला बेबी बंप फोटो, ४२ व्या वर्षी देणार बाळाला जन्म
9
कलियुगातला कंस! सूनेसोबतच मामाचे प्रेमबंध जुळले, अडथळा ठरणाऱ्या भाच्याला संपवले
10
नवरात्री २०२५: अखंड ज्योत संकल्प केला, अचानक दिवा विझला तर...; देवी कोप-अशुभ-अवकृपा होईल का?
11
BMC च्या मुदत ठेवींत ८ महिन्यांत २ हजार कोटींनी घट; मागील ३ वर्षात १२ हजार कोटींची घसरण
12
सार्वजनिक निधीचा वापर नेत्यांच्या पुतळ्यांसाठी करता येणार नाही- सर्वोच्च न्यायालय
13
आयआयटी कॉलेजच्या वसतिगृहात विद्यार्थ्याला नग्न करून चप्पलांनी मारहाण; ३ विद्यार्थ्यांविरुद्ध गुन्हा दाखल, वॉर्डन निलंबित
14
PAK v SL: २१८० दिवस... श्रीलंका त्याचाच फायदा घेणार, पाकिस्तान आज आशिया कपमधून बाहेर होणार?
15
कोणी बिजनेसवुमन तर कोणी बॉलिवूड स्टार! 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'च्या नवदुर्गा काय करतात?
16
Aadhaar App :'आधार कार्ड'मध्ये बदल करणे होणार सोपे, नवीन अ‍ॅप लाँचच्या तयारीत;मिळणार खास फीचर
17
हाय गर्मी! उष्णतेचा प्रकोप जीवघेणा; युरोपमध्ये ६२,७०० जणांचा मृत्यू, वाढत्या तापमानाचा जगाला धोका
18
९४ मिनिटांचा थरार! विमानांच्या चाकांमध्ये लपून दिल्लीत आलेल्या अफगाणी मुलासोबत पुढे काय घडलं?
19
VIRAL : एका झटक्यात महिला झाली कोट्यधीश; ChatGPTने पालटलं नशीब! वाचून व्हाल हैराण
20
महिंद्रा, PNB आणि L&T... दिवाळीपूर्वी मोठी कमाईची संधी! बाजारातील 'हे' ५ शेअर्स ठरू शकतात गेमचेंजर

सहा मार्गांचे राष्ट्रीय महामार्गात रूपांतर

By admin | Updated: April 11, 2017 02:01 IST

रायगड जिल्ह्यातील महत्त्वाच्या सहा मार्गांचे रूपांतर राष्ट्रीय महामार्गात होणार आहे. राष्ट्रीय महामार्ग विभाग सुमारे ९० किलोमीटरच्या रस्त्यांचा आता विकास करणार

- आविष्कार देसाई,  अलिबागरायगड जिल्ह्यातील महत्त्वाच्या सहा मार्गांचे रूपांतर राष्ट्रीय महामार्गात होणार आहे. राष्ट्रीय महामार्ग विभाग सुमारे ९० किलोमीटरच्या रस्त्यांचा आता विकास करणार असल्याने नागरिकांना उच्च प्रतिचे आणि वेगवान रस्ते मिळणार आहेत. त्यामुळे पैशासह वेळेच्या बचतीबरोबरच वाहतूक आणि पर्यटन उद्योगाला वेगळा आयाम प्राप्त होणार आहे. महामार्गाच्या विकासाबरोबरच रस्त्यालगतच्या जमिनींचाही भाव चांगलाच वधारणार आहे. त्यामुळे रिअल इस्टेटच्या व्यवसायाला नवी झळाळी मिळणार आहे.अलिबाग-वडखळ २२ किलोमीटर, अलिबाग-रेवस २० किलोमीटर, अलिबाग-बाह्यवळण सुमारे दीड किलोमीटर, सारळ- शिरोली- सहा किलोमीटर, मुरुड- आगारदांडा १० किलोमीटर आणि सारळ- मुरुड ३० असे एकूण तब्बल ९० किलोमीटर रस्ते आता राष्ट्रीय महामार्गाच्या अखत्यारीत जाणार आहेत. त्यापैकी अलिबाग-वडखळ रस्ता मार्च २०१६ मध्येच राष्ट्रीय महामार्गाकडे वर्ग करण्यात आला आहे. २०१५ साली या रस्त्याची मागणी राष्ट्रीय महामार्गाने केली होती. २०१६ मध्ये उर्वरित रस्ते राष्ट्रीय महामार्गाकडे वर्ग करण्याबाबत अलिबागच्या सार्वजनिक बांधकाम खात्याला कळविले होते. ते रस्ते राष्ट्रीय महामार्गाकडे वर्ग करण्याला मंजुरी मिळाली आहे.वाढती लोकसंख्या आणि वाढते नागरीकरण याचा विचार करता या मार्गावर वाहतुकीची समस्या जाणवणार आहे. त्यामुळे तेथील रस्त्यांचा राष्ट्रीय महामार्गात समावेश केला जातो. अलिबाग सार्वजनिक बांधकाम विभागाच्या सहा रस्त्यांचे राष्ट्रीय महामार्गात रूपांतर होणार असल्याचे अलिबाग सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपकार्यकारी अभियंता अजय खोब्रागडे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.वाहतूक व्यवस्थेला वेगळा आयाम सहा मार्गांचा विकास होणार असल्याने तेथील वाहतूक व्यवस्थेला वेगळा आयाम प्राप्त होणार आहे. राष्ट्रीय महामार्ग त्या रस्त्यांचा विकास करणार असल्याने त्यांचा दर्जा, गुणवत्ता हा अधिक चांगला राहणार आहे. त्यामुळे नागरिकांचा प्रवास सुखकर आणि वेगवान होणार असल्याने त्यांच्या वेळेची आणि पैशाची बचत होणार आहे. रस्त्यांचा विकास होणार असल्याने त्या रस्त्यांच्या लगतच्या आणि परिसरतील जमिनींचेही भाव चांगलेच वधारणार असल्याने तेथे रिअल इस्टेटचा व्यवसायही तेजीत येणार आहे. रस्ते चांगले झाल्याने जिल्ह्यातील पर्यटन उद्योग तेजीत येणार आहे. त्यामुळे विविध रोजगारांच्या संधीही उपलब्ध होणार आहेत.- अलिबाग-वडखळ २२ किलोमीटर, अलिबाग-रेवस २० किलोमीटर, अलिबाग-बाह्यवळण सुमारे दीड किलोमीटर, सारळ- शिरोली- सहा किलोमीटर, मुरुड- आगारदांडा १० किलोमीटर आणि सारळ- मुरुड ३० असे एकूण तब्बल ९० किलोमीटर रस्ते आता राष्ट्रीय महामार्गाच्या अखत्यारीत जाणार आहेत.