शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारताने ५ फायटर जेट पाडले'; पाकिस्तानचा थयथयाट, संरक्षण मंत्री आसिफ म्हणाले...
2
वैष्णो देवी दर्शनाचा मार्ग आणखी सुकर होणार; तर महाराष्ट्राला मिळणार आणखी एक वंदे भारत, 'या' मार्गावर धावणार?
3
महाराष्ट्रातील 'या' नऊ राजकीय पक्षांना निवडणूक यादीतून हटवले; निवडणूक आयोगाची कारवाई कुणावर?
4
नागपूर: महालक्ष्मी मंदिराच्या प्रवेशद्वाराचे छत कोसळले, अनेक मजूर जखमी; NDRF कडून शोध कार्य सुरू
5
'निघालो तेव्हा बाजार होता, परतलो तेव्हा स्मशान'; धरालीतील ढगफुटीनंतर लोकांनी सांगितला थरारक अनुभव
6
ती आली अन् पाहुणेही आले... हार, तोरणं, पताका आणि फुलांनी भव्य सभामंडपही सज्ज
7
कबुतरांना कारवर ट्रे ठेवून खाद्य, महेंद्र संकलेचाला पोलिसांचा दणका; गाडीही केली जप्त
8
'आधी तक्रार करायला सांगितलं नाही'; माजी मुख्य निवडणूक आयुक्त रावतांचं मोठं विधान, आयोगाबद्दल काय म्हणाले?
9
धक्कादायक! डोनाल्ड ट्रम्प यांनी फायद्यासाठी पहिल्या पत्नीला गोल्फ कोर्समध्ये पुरलं? केला जातोय असा दावा
10
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, देशभरातील तब्बल ३३४ पक्षांना दिला दणका   
11
महान तपस्वी, ऋषिमुनीसारखा तो २३३ वर्षांपासून देतो आहे आसरा
12
हा निर्णय सोपा नाही; त्यात संघातून बाहेर फेकले जाण्याचीही जोखीम! रहाणेचं बुमराहसंदर्भात मोठं वक्तव्य
13
जीर्ण पाईप फुटून आण्विक कचरा समुद्रात पडला, नौदलाच्या चुकीमुळे या देशात हाहाकार
14
'अजिबात तडजोड स्विकारणार नाही', डोनाल्ड ट्रम्प-पुतीन भेटीआधीच युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींचा इशारा
15
"देशात इंग्रजांच्या राजवटीपेक्षा भयंकर परिस्थिती, लोकशाही आणि संविधान गिळंकृत करू पाहणाऱ्या प्रवृत्तींनो चले जाव’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा इशारा
16
रिंकूच्या प्रॅक्टिस वेळी खासदार मॅडम प्रिया सरोज यांची थेट ग्राउंडमध्ये एन्ट्री, व्हिडिओ व्हायरल
17
मिस्टर इंडियाप्रमाणे तुरुंगातून गायब कैदी झाला, बाहेर गेला की आतच लपला? काही कळेना, झाडांपासून, गटारांपर्यंत पोलीस घेताहेत शोध  
18
भाजप खासदार निशिकांत दुबे आणि मनोज तिवारी यांच्या विरोधात गुन्हा, वैद्यनाथ मंदिर प्रकरण काय?
19
'शरद पवारांवर राहुल गांधींच्या भेटीचा परिणाम' निवडणूक आयोगाबाबत केलेलं वक्तव्य फडणवीसांना खटकलं
20
१५ दिवस चहा प्यायला नाहीत तर काय होईल? तुम्हाला आवडतील शरिरातील 'हे' ५ पॉझिटिव्ह बदल

रायगड जिल्ह्यातील स्थिती; शिवारात डोलतेय ३१ लाख क्विंटल भाताचे पीक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 10, 2020 23:01 IST

विविध नैसर्गिक आपत्तीमुळे १५ टक्के उत्पादनात घट

रायगड : जिल्ह्यात ९३ हजार हेक्टर क्षेत्रावर भातपीक घेण्यात आले आहे. जून आणि आॅगस्ट महिन्यात आलेली नैसर्गिक आपत्ती वगळता निसर्गाने शेतकऱ्यांना चांगलीच साथ दिली आहे. या वर्षी १५ टक्के नुकसान वगळता ३१ लाख ६२ हजार क्विंटल भाताचे उत्पादन शिवारातून निघण्याची शक्यता आहे. बळीराजाच्या आर्थिक परिस्थितीसाठी ही समाधानाची बाब असल्याचे सांगितले जाते आहे.

जिल्ह्यातील शेतकरी प्रामुख्याने भातपिकाची शेती करतो. त्याच्या जोडीला पालेभाज्यांच्या पिकाचेही उत्पादन घेतो. बहुतांश तालुक्यांमध्ये तब्बल ९३ हजार हेक्टर क्षेत्रावर भाताचे पीक घेण्यात आले आहे. विविध नैसर्गिक आपत्ती, पिकावर पडणारे रोग यांचा सामना करून शेतकऱ्यांना आपल्या शिवारातील पिकाचे संरक्षण करावे लागते. जून महिन्यात निसर्ग चक्रीवादळ आले होते. या कालावधीत पेरणीला सुरुवात झाली होती. त्यामुळे म्हणावे तसा भातपिकाला फटका बसला नाही. मात्र जुलै महिन्यामध्ये पोलादपूर तालुक्यातील ०.९८ हेक्टर भातशेतीचे नुकसान झाले. त्यामध्ये नऊ शेतकºयांना आर्थिक फटका बसला होता. आॅगस्ट महिन्यामध्ये आलेल्या नैसर्गिक आपत्तीमुळे मुरूड तालुक्यातील १६.८५ हेक्टर क्षेत्रातील ५० शेतकºयांचे भातपिकाचे नुकसान झाले होते, तर महाडमध्ये ०.१९ हेक्टरवरील दोन शेतकºयांचे आणि पनवेल तालुक्यातील ३.०१ हेक्टरवरील १७ शेतकºयांच्या शेतातील भाजीपाला जमीनदोस्त झाला होता. आॅगस्ट महिन्यामध्ये एकूण ६९ शेतकºयांचे १९.६९ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले.

हे सुमारे १५ टक्के नुकसान वगळता अन्य ठिकाणी चांगले उत्पादन आलेले आहे. ९३ हजार हेक्टरमधून प्रति हेक्टरी ४० क्विंटल भाताचे उत्पादन होते. त्यानुसार ३७ लाख २० हजार क्विंटल भाताचे उत्पादन निघणे अपेक्षित होते. मात्र नैसर्गिक आपत्तीमुळे त्यामध्ये १५ टक्क्यांची घट म्हणजेच पाच लाख ५८ हजार क्विंटल भाताची नासाडी झाली आहे. आजघडीला ३१ लाख ६२ हजार क्विंटल भाताचे पीक शिवारामध्ये डोलत आहे.

काही ठिकाणी आपत्तीमुळे नुकसान झाले आहे. परंतु उर्वरित भाताचे उत्पादन चांगले होईल असे वातावरण दिसत असल्याचे अलिबाग तालुक्यातील शेतकरी नंदू सोडवे यांनी सांगितले. आता पाऊस पडला तर हातचे आलेले पीक जाऊन शेतकरी वर्गाला चांगलाच आर्थिक फटका बसण्याची शक्यता असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.रायगड जिल्ह्यात ९३ हजार हेक्टर क्षेत्रावर भाताचे पीक घेण्यात आले आहे. जुलै, आॅगस्ट महिन्यात आलेल्या विविध नैसर्गिक आपत्तीमुळे उत्पादनामध्ये १५ टक्के घट होणार आहे. मात्र या वर्षीदेखील भाताचे उत्पादन चांगलेच निघणार आहे.- पांडुरंग शेळके, जिल्हा कृषी अधीक्षक, कृषी अधिकारी, रायगड