शहरं
Join us  
Trending Stories
1
अंतरिम दिलासा हवा असेल तर मजबूत युक्तिवाद सादर करा; वक्फ सुनावणीत सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
2
गावालाच जवानांचा वेढा, ५ जहाल माओवादी ताब्यात; तीन महिलांचा समावेश, ३६ लाख रुपयांचे होते बक्षीस
3
कल्याणमध्ये स्लॅब कोसळून सहा ठार; सहा जखमी; मृतांच्या कुटुंबीयांना ५ लाखांचे अर्थसहाय्य
4
आंदोलनाची धार कमी झाल्यानंतर भुजबळांना मिळाली मंत्रिपदाची संधी; धनंजय मुंडेंचे दोर कापले
5
राज्यात पाच वर्षांत ३५ लाख घरे; झोपडपट्टीमुक्त शहरांचा संकल्प 
6
Pune Rains: पुण्यात पावसाचा हैदोस! अनेक ठिकाणी रस्ते पाण्याखाली, घरात शिरले पाणी
7
वैभव सूर्यंवशीनं धरले MS धोनीचे पाय; मग रंगली स्फोटक बॅटरमध्ये दडलेल्या संस्कारी मुलाची चर्चा
8
मुंबईसह उपनगराला पावसाने झोडपले! गोरेगाव, मालाडमध्ये तुफान पाऊस, अंधेरी भुयारी मार्ग बंद
9
RR vs CSK : धोनीसमोर संजू ठरला भारी! विजयासह राजस्थाननं शेवट केला गोड
10
कामात दिरंगाई झाली तर अधिकाऱ्यांवर कारवाई; पालकमंत्री बावनकुळे यांचा इशारा
11
कहानी पुरी फिल्मी है : चिमुकले गाडीत, आई फलाटावर पाणी भरत राहिली अन् ट्रेन मुंबईच्या दिशेने निघाली
12
Kalyan Building Collapses: कल्याण दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांसाठी राज्य सरकारची मोठी घोषणा
13
पाकिस्तानने असीम मुनीरचे केले प्रमोशन, लष्करात फील्ड मार्शल रँक किती महत्त्वाची?
14
गुड न्यूज! नागपूर -बिलासपूर मार्गावरील वंदे भारत एक्सप्रेसला आणखी आठ डब्बे जोडणार
15
IPL 2025 : १४ वर्षीय वैभव सूर्यंवशीची 'परिपक्व' खेळी; सिक्सर मारत साजरी केली फिफ्टी!
16
'मीर जाफर vs एक बिर्याणी देशावर भारी'; भाजप-काँग्रेसमध्ये पोस्टर वॉर! का वाढला वाद?
17
आयुष म्हात्रेनं २०० च्या स्ट्राइक रेटनं कुटल्या धावा; माफाकानं बेस्ट कॅचसह साधला विकेटचा डाव
18
सातारा: जेवणाचा डब्बाच डोक्यात मारला, प्रेमसंबंधास अडथळा ठरत असल्याने तरुणाचा खून
19
परीक्षेच्या शेवटच्या दिवशी विद्यार्थिनीने केली आत्महत्या; लातूरच्या शासकीय महिला तंत्रनिकेतनच्या वसतिगृहात घेतला गळफास
20
क्षुल्लक मुद्द्याला जास्त महत्व देऊ नका, हे प्रकरण इथेच थांबवा; सरन्यायाधीश गवई यांचे आवाहन

‘सर...आम्ही आपले आभारी आहोत’...विद्यार्थ्यांची अनोखी कल्पकता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 4, 2018 05:13 IST

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय शासकीय वसतिगृह : वसतिगृहातील विद्यार्थ्यांच्या आभारपत्राने भारावले जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी

जयंत धुळप 

अलिबाग : सोमवारी लोकशाही दिनाच्या दिवशी सकाळी गोंधळपाडा येथे असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांच्या शासकीय वसतिगृहातील विद्यार्थी पुन्हा एकदा थेट रायगडचे जिल्हाधिकारी डॉ.विजय सूर्यवंशी कार्यालयात पोहोचले आणि सर्व विद्यार्थ्यांच्या स्वाक्षऱ्यांचे ‘सर...आम्ही आपले आभारी आहोत’ असे अनोखे आभारपत्र जिल्हाधिकाºयांच्या हाती दिले आणि काही क्षण जिल्हाधिकारी डॉ.विजय सूर्यवंशी भारावून गेले. यावेळी लोकशाही दिनास उपस्थित नागरिक देखील सुखावून गेले.मी देखील वसतिगृहात राहिलो आहे. वसतिगृहात राहून अभ्यास केला आहे. वसतिगृहात धमाल-मस्ती करायची पण त्याच बरोबर अभ्यास करुन मोठे व्हायचे असे मार्गदर्शन जिल्हाधिकारी डॉ.सूर्यवंशी यांनी या सर्व मुलांना केले. अभ्यास करुन मोठे होणार अशा विश्वास जिल्हाधिकाºयांना देवून सर्व मुलांनी त्यांचा निरोप घेतला.जिल्हाधिकाºयांचे आभार मानणे गरजेचेच्डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांच्या शासकीय वसतिगृहातील मुलांना अर्वाच्च भाषेत शिवीगाळ आणि मारहाण करणाºया वसतिगृहाच्या महिला गृहपाल एम. जे. नरहरे यांना चोवीस तासांच्या आत बदलून त्यांच्या जागी अनिल मोरे यांची नियुक्ती करुन गेल्या चार वर्षांपासूनच्या त्रासातून या सर्व मुलांची जिल्हाधिकारी डॉ.सूर्यवंशी यांनी मुक्तता केल्यावर या मुलांनी रविवारी आनंदोत्सव साजरा केला. परंतु त्याच वेळी आपण जिल्हाधिकाºयांचे आभार मानणे गरजेचे असल्याचे त्यांच्या डोक्यात आले.कल्पकतेने आगळ्या आभारपत्राची निर्मितीच्रविवारी वसतिगृहाचा विद्यार्थी प्रतिनिधी लक्ष्मण केंडे याने अलिबागमध्ये येवून कार्डबोर्ड, स्केटपेन्स आदि सामग्री खरेदी केली. रात्री वसतिगृहात बसून लक्ष्मण केंडे आणि त्याचे सहकारी विद्यार्थी सुनील बोडेकर, जयेश झोरे, राजू लोभी, गजानन पारधी, अशोक पिंगळा, हौशीराम आढळ आणि जयवंत लोभी यांनी डोके चालवून कल्पकतेने ‘सर...आम्ही आपले आभारी आहोत’ या आगळ््या आभार पत्राची निर्मिती केली आणि सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयातील लोकशाही दिनाच्या प्रारंभी जिल्हाधिकारी डॉ.सूर्यवंशी यांना आदरपूर्व देवून उपस्थितांना अनोखा धक्काच दिला. यावेळी सहाय्यक समाज कल्याण अधिकारी रविकिरण पाटील, वसतिगृहाचे नूतन गृहपाल अनिल मोरे हे देखील उपस्थित होते.विद्यार्थ्यांना गवसला आत्मविश्वासच्जिल्हाधिकारी डॉ.सूर्यवंशी यांच्या सत्वर निर्णयाच्या कार्यवाहीतून वसतिगृहातील या मुलांची केवळ त्रासातून मुक्ती झाली असे नाही तर तरुण पिढीमध्ये प्रशासना बाबत मोठी सकारात्मकता निर्माण झाली आहे. त्याच वेळी योग्य वेळी अचूक निर्णय घेवून संभाव्य अशांतता निर्माण होणारच नाही, परिस्थिती चिघळणारच नाही याची दक्षता कशी घ्यावी याचा आदर्श वस्तुपाठ देखील निमित्ताने प्रशासनास घालून देण्यात डॉ.सूर्यवंशी यशस्वी झाले आहे. आमचे प्रश्न आम्ही स्वत: सोडवू शकतो असा आत्मविश्वास या सर्व विद्यार्थ्यांना गवसला हे देखील तितकेच महत्त्वाचे आहे.

टॅग्स :Raigadरायगड