शहरं
Join us  
Trending Stories
1
कॅचच्या निर्णयावरून भारतीय खेळाडूंचा अंपायरशी वाद; पाकिस्तानकडून वैभव सूर्यवंशीच्या संघाचा पराभव
2
दिल्ली ब्लास्ट : रोहतकची डॉक्टर प्रियंका शर्मा अनंतनागमधून ताब्यात, कुटुंबीयांनी काय सांगितंल?
3
IND A vs PAK A : भारत-पाक मॅचमध्ये Relay Catch वरुन वाद; नेमकं काय घडलं? चिटिंग झाली की...
4
ब्रेकिंग! मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईचा गॅस पुरवठा खंडित; पाईपलाईनचे मोठे नुकसान, घरगुती गॅस बंद, CNG स्टेशनवर तुटवडा
5
सैन्यभरतीसाठी गेलेल्या तरुणांच्या मोटरसायकलला उसाच्या ट्रकची धडक; दोघांचाही जागीच मृत्यू
6
भारत-पाकिस्तान हायव्होल्टेज मॅच! वैभव सुर्यवंशीचा संघ ढेपाळला; एका मागोमाग एक १० विकेट, झालेत इतकेच रन्स...
7
मोठी बातमी! लाल किल्ला स्फोटाची जबाबदारी टीआरएफने स्वीकारली; 'पहलगाम' हल्ल्याशी जोडले स्फोटाचे धागेदोरे
8
दिल्ली ब्लास्ट प्रकरणात NIA ची मोठी कारवाई, उमरच्या जवळच्या सहकाऱ्याला अटक; याच्याच नावावर होती i-20 कार
9
'विशेष मतदार यादी सुधारणा' प्रक्रियेच्या कामाच्या ताणामुळे बीएलओ अधिकाऱ्याने आयुष्य संपविले; कर्मचारी वर्गात संताप
10
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार! 'मिशन कॅबिनेट'ची तयारी पूर्ण; मुख्यमंत्री कोणाचा होणार यावर मात्र...
11
तेजस्वी यांनी पराभवासाठी बहीण रोहिणीला ठरवलं जबाबदार; फेकली होती चप्पल? अशी आहे संपूर्ण इनसाइड स्टोरी!
12
पाकिस्तानच्या गोळीबार गमावला पाय; आता 'गौरी'ला मिळाले नवीन आयुष्य
13
दिल्ली ब्लास्टचे बांग्लादेश कनेक्शन उघड; मुर्शिदाबाद मार्गे भारतात आणली स्फोटके
14
युरोपने केलेली 'ही' मोठी चूक अमेरिकेला ३० वर्षांत गरीब करेल; जे पी मॉर्गनचा इशारा
15
तेजस्वी यादवांच्या अन्य तिन्ही बहिणींनी पाटणाचे घर सोडले; मोठ्या बहिणीनंतर...
16
मी दिलेला '२५ जागांचा शाप' खरा ठरला!; तेजस्वी यादवांनी तिकीट नाकारले तेव्हा रडणाऱ्या नेत्याचा दावा 
17
तेजप्रताप यादवांचा राज्यातील NDA सरकारला पाठिंबा; रोहिणी आचार्य यांना मोठी जबाबदारी देणार
18
रशिया आणि युक्रेनमध्ये मोठा करार होणार, राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींनी केली घोषणा; म्हणाले...
19
“जो जीता वही सिकंदर, पण सिकंदर बनायचे राज समजू शकले नाही”; बिहार निकालावर उद्धव ठाकरे बोलले
20
"सुन लो जयचंदों...! माझ्या वडिलांनी एक इशारा दिला तर...!", रोहिणी आचार्य वादावरून तेजप्रताप भडकले
Daily Top 2Weekly Top 5

मासळीचे प्रमाण घटल्याने महत्त्वाचे मासे झाले दुर्मीळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2020 00:42 IST

Murud : २०२० हे वर्ष मच्छीमारांना खूप संकटाचे गेले असून, अवकाळी पाऊस व निसर्ग चक्रीवादळाचा मोठा फटका सहन करावा लागल्याने, मोठ्या आर्थिक संकटात कोळी समाज सापडला आहे.

मुरुड : संपूर्ण कोकणाला ७२० किलोमीटरचा समुद्रकिनारा लाभला आहे, तर रायगड जिल्ह्याला २४० किलोमीटरचा समुद्रकिनारा असून, किनाऱ्यावर राहणाऱ्या कोळी समाजाचा प्रमुख व्यवसाय हा मासेमारीवर अवलंबून आहे. देशाला परकीय चलन मिळवून देऊन आंतरराष्ट्रीय बाजारात भारताची पत सुधारण्याचे महत्त्वपूर्ण कामगिरी मच्छीमार करतात. मात्र, हे मच्छीमार मासळीचे प्रमाण घटल्याने आर्थिक संकटात सापडले आहेत.२०२० हे वर्ष मच्छीमारांना खूप संकटाचे गेले असून, अवकाळी पाऊस व निसर्ग चक्रीवादळाचा मोठा फटका सहन करावा लागल्याने, मोठ्या आर्थिक संकटात कोळी समाज सापडला आहे. रायगड जिल्ह्यातील श्रीर्वर्धन, मुरुड, उरण, अलिबाग या महत्त्वाच्या तालुक्यात मच्छीमारांचा सर्वात मोठा व्यवसाय चालतो. येथील सर्व मासळी जिल्ह्याच्या अन्य भागात पोहोचून मासळीची कमतरता दूर केली जाते. रायगड जिल्हा हा पर्यटन क्षेत्र असल्याने येथे वर्षाला लाखो पर्यटक भेट देत असतात. अशा वेळी पर्यटकांना आवडणारी मासळी येथे मुबलक प्रमाणात मिळत असते, परंतु गेल्या काही दिवसापासून मासळी बाजारात मासळीचे प्रमाण घटल्याने मोठा तुटवडा निर्माण झाल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. पापलेट, घोळ, रावस, सुरमय, हलवा, फिलसा ही मासळी दिसेनासी झाली आहे. फक्त तुरळक मासळीच बाजारात येत असल्याने पर्यटक व स्थानिक नागरिक यांची हिरमोड होताना दिसत आहे.समुद्रात जेली फिश जास्त सापडू लागल्याने मच्छीमारांना मासळी मिळेनाशी झाली आहे. अचानकपणे गेल्या काही दिवसांपासून मासळीचे प्रमाण घटले आहे. 

खोल समुद्रातही मासळी नाही या परिस्थितीबाबत काही मच्छीमारांनी खोल समुद्रात मासेमारीसाठी गेलो, तरी पुरेशी मासळी मिळत नाही. मासळीसाठी टाकलेल्या जाळ्यात मोठ्या प्रमाणात जेली फिश मिळत आहे, डिझेलचा खर्च परवडत नाही, त्यामुळे आमच्यावर कर्जाचा बोजा वाढत असल्याची प्रतिक्रिया दिली आहे.

गेल्या काही दिवसापासून मासळी मिळेनाशी झाली आहे. ही परिस्थती रायगड जिल्ह्यात सर्वच ठिकाणी आहे. हवामानात मोठ्या प्रमाणात बदल झाला आहे. जेली फिश मोठ्या प्रमाणात खोल समुद्रात सापडत आहे. त्यामुळेही मासळी खूप दूर निघून गेली आहे. सध्या डिझेलचे दर खूप मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. त्यामुळे खोल समुद्रात मच्छीमारी करणे आता मच्छीमारांना खूप कठीण जात आहे. वाढत्या डिझेलच्या दरामुळे लहान व माध्यम स्वरूपाच्या बोटींना हा खर्च परवडेनासा झाला आहे.- मनोहर बैले, उपाध्यक्ष, रायगड जिल्हा मच्छीमार संघ

टॅग्स :Raigadरायगड