शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; कोण मारणार बाजी?
2
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
3
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
4
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
5
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
6
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
7
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
8
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
9
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
10
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
11
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
12
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
13
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
14
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
15
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
16
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
17
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
18
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
19
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
20
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

मासळीचे प्रमाण घटल्याने महत्त्वाचे मासे झाले दुर्मीळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2020 00:42 IST

Murud : २०२० हे वर्ष मच्छीमारांना खूप संकटाचे गेले असून, अवकाळी पाऊस व निसर्ग चक्रीवादळाचा मोठा फटका सहन करावा लागल्याने, मोठ्या आर्थिक संकटात कोळी समाज सापडला आहे.

मुरुड : संपूर्ण कोकणाला ७२० किलोमीटरचा समुद्रकिनारा लाभला आहे, तर रायगड जिल्ह्याला २४० किलोमीटरचा समुद्रकिनारा असून, किनाऱ्यावर राहणाऱ्या कोळी समाजाचा प्रमुख व्यवसाय हा मासेमारीवर अवलंबून आहे. देशाला परकीय चलन मिळवून देऊन आंतरराष्ट्रीय बाजारात भारताची पत सुधारण्याचे महत्त्वपूर्ण कामगिरी मच्छीमार करतात. मात्र, हे मच्छीमार मासळीचे प्रमाण घटल्याने आर्थिक संकटात सापडले आहेत.२०२० हे वर्ष मच्छीमारांना खूप संकटाचे गेले असून, अवकाळी पाऊस व निसर्ग चक्रीवादळाचा मोठा फटका सहन करावा लागल्याने, मोठ्या आर्थिक संकटात कोळी समाज सापडला आहे. रायगड जिल्ह्यातील श्रीर्वर्धन, मुरुड, उरण, अलिबाग या महत्त्वाच्या तालुक्यात मच्छीमारांचा सर्वात मोठा व्यवसाय चालतो. येथील सर्व मासळी जिल्ह्याच्या अन्य भागात पोहोचून मासळीची कमतरता दूर केली जाते. रायगड जिल्हा हा पर्यटन क्षेत्र असल्याने येथे वर्षाला लाखो पर्यटक भेट देत असतात. अशा वेळी पर्यटकांना आवडणारी मासळी येथे मुबलक प्रमाणात मिळत असते, परंतु गेल्या काही दिवसापासून मासळी बाजारात मासळीचे प्रमाण घटल्याने मोठा तुटवडा निर्माण झाल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. पापलेट, घोळ, रावस, सुरमय, हलवा, फिलसा ही मासळी दिसेनासी झाली आहे. फक्त तुरळक मासळीच बाजारात येत असल्याने पर्यटक व स्थानिक नागरिक यांची हिरमोड होताना दिसत आहे.समुद्रात जेली फिश जास्त सापडू लागल्याने मच्छीमारांना मासळी मिळेनाशी झाली आहे. अचानकपणे गेल्या काही दिवसांपासून मासळीचे प्रमाण घटले आहे. 

खोल समुद्रातही मासळी नाही या परिस्थितीबाबत काही मच्छीमारांनी खोल समुद्रात मासेमारीसाठी गेलो, तरी पुरेशी मासळी मिळत नाही. मासळीसाठी टाकलेल्या जाळ्यात मोठ्या प्रमाणात जेली फिश मिळत आहे, डिझेलचा खर्च परवडत नाही, त्यामुळे आमच्यावर कर्जाचा बोजा वाढत असल्याची प्रतिक्रिया दिली आहे.

गेल्या काही दिवसापासून मासळी मिळेनाशी झाली आहे. ही परिस्थती रायगड जिल्ह्यात सर्वच ठिकाणी आहे. हवामानात मोठ्या प्रमाणात बदल झाला आहे. जेली फिश मोठ्या प्रमाणात खोल समुद्रात सापडत आहे. त्यामुळेही मासळी खूप दूर निघून गेली आहे. सध्या डिझेलचे दर खूप मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. त्यामुळे खोल समुद्रात मच्छीमारी करणे आता मच्छीमारांना खूप कठीण जात आहे. वाढत्या डिझेलच्या दरामुळे लहान व माध्यम स्वरूपाच्या बोटींना हा खर्च परवडेनासा झाला आहे.- मनोहर बैले, उपाध्यक्ष, रायगड जिल्हा मच्छीमार संघ

टॅग्स :Raigadरायगड