शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
2
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
3
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
4
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
5
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला
6
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
7
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
8
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
9
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
10
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
11
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
12
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
13
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
14
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
15
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
16
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
17
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
18
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
19
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
20
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...

मासळीचे प्रमाण घटल्याने महत्त्वाचे मासे झाले दुर्मीळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2020 00:42 IST

Murud : २०२० हे वर्ष मच्छीमारांना खूप संकटाचे गेले असून, अवकाळी पाऊस व निसर्ग चक्रीवादळाचा मोठा फटका सहन करावा लागल्याने, मोठ्या आर्थिक संकटात कोळी समाज सापडला आहे.

मुरुड : संपूर्ण कोकणाला ७२० किलोमीटरचा समुद्रकिनारा लाभला आहे, तर रायगड जिल्ह्याला २४० किलोमीटरचा समुद्रकिनारा असून, किनाऱ्यावर राहणाऱ्या कोळी समाजाचा प्रमुख व्यवसाय हा मासेमारीवर अवलंबून आहे. देशाला परकीय चलन मिळवून देऊन आंतरराष्ट्रीय बाजारात भारताची पत सुधारण्याचे महत्त्वपूर्ण कामगिरी मच्छीमार करतात. मात्र, हे मच्छीमार मासळीचे प्रमाण घटल्याने आर्थिक संकटात सापडले आहेत.२०२० हे वर्ष मच्छीमारांना खूप संकटाचे गेले असून, अवकाळी पाऊस व निसर्ग चक्रीवादळाचा मोठा फटका सहन करावा लागल्याने, मोठ्या आर्थिक संकटात कोळी समाज सापडला आहे. रायगड जिल्ह्यातील श्रीर्वर्धन, मुरुड, उरण, अलिबाग या महत्त्वाच्या तालुक्यात मच्छीमारांचा सर्वात मोठा व्यवसाय चालतो. येथील सर्व मासळी जिल्ह्याच्या अन्य भागात पोहोचून मासळीची कमतरता दूर केली जाते. रायगड जिल्हा हा पर्यटन क्षेत्र असल्याने येथे वर्षाला लाखो पर्यटक भेट देत असतात. अशा वेळी पर्यटकांना आवडणारी मासळी येथे मुबलक प्रमाणात मिळत असते, परंतु गेल्या काही दिवसापासून मासळी बाजारात मासळीचे प्रमाण घटल्याने मोठा तुटवडा निर्माण झाल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. पापलेट, घोळ, रावस, सुरमय, हलवा, फिलसा ही मासळी दिसेनासी झाली आहे. फक्त तुरळक मासळीच बाजारात येत असल्याने पर्यटक व स्थानिक नागरिक यांची हिरमोड होताना दिसत आहे.समुद्रात जेली फिश जास्त सापडू लागल्याने मच्छीमारांना मासळी मिळेनाशी झाली आहे. अचानकपणे गेल्या काही दिवसांपासून मासळीचे प्रमाण घटले आहे. 

खोल समुद्रातही मासळी नाही या परिस्थितीबाबत काही मच्छीमारांनी खोल समुद्रात मासेमारीसाठी गेलो, तरी पुरेशी मासळी मिळत नाही. मासळीसाठी टाकलेल्या जाळ्यात मोठ्या प्रमाणात जेली फिश मिळत आहे, डिझेलचा खर्च परवडत नाही, त्यामुळे आमच्यावर कर्जाचा बोजा वाढत असल्याची प्रतिक्रिया दिली आहे.

गेल्या काही दिवसापासून मासळी मिळेनाशी झाली आहे. ही परिस्थती रायगड जिल्ह्यात सर्वच ठिकाणी आहे. हवामानात मोठ्या प्रमाणात बदल झाला आहे. जेली फिश मोठ्या प्रमाणात खोल समुद्रात सापडत आहे. त्यामुळेही मासळी खूप दूर निघून गेली आहे. सध्या डिझेलचे दर खूप मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. त्यामुळे खोल समुद्रात मच्छीमारी करणे आता मच्छीमारांना खूप कठीण जात आहे. वाढत्या डिझेलच्या दरामुळे लहान व माध्यम स्वरूपाच्या बोटींना हा खर्च परवडेनासा झाला आहे.- मनोहर बैले, उपाध्यक्ष, रायगड जिल्हा मच्छीमार संघ

टॅग्स :Raigadरायगड