शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

सन्मान यात्रा ठरली एकतेचे प्रतीक; अलिबागकरांच्या स्वागताने भारावले लष्करी अधिकारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2019 23:48 IST

लष्करी सेवेत शौर्य गाजवणाऱ्या अधिका-यांना प्रत्यक्ष पहिल्यावर, त्यांना सलाम करण्यासाठी अलिबागकरांनी प्रचंड गर्दी केली होती, तर दुसरीकडे समाजातील विविध घटकांनी सन्मान यात्रेत सहभागी होऊन अधिका-यांची आरती करून जल्लोषात स्वागत केल्याने अधिकारीही भारावून गेले होते.

अलिबाग : ‘भारतमाता की जय’, ‘वंदे मातरम...’, ‘जय जवान जय किसान’ अशा घोषणांनी अलिबाग शहर दणाणून गेले होते. लष्करी सेवेत शौर्य गाजवणाऱ्या अधिका-यांना प्रत्यक्ष पहिल्यावर, त्यांना सलाम करण्यासाठी अलिबागकरांनी प्रचंड गर्दी केली होती, तर दुसरीकडे समाजातील विविध घटकांनी सन्मान यात्रेत सहभागी होऊन अधिका-यांची आरती करून जल्लोषात स्वागत केल्याने अधिकारीही भारावून गेले होते.निमित्त होते लोकमत रायगड कार्यालयाच्या पाचव्या वर्धापन दिनाचे. यावेळी आरसीएफ कंपनीने लोकमतच्या सहकार्याने ‘लष्करी ध्यासाचा सिक्सपॅक’ या अभूतपूर्व कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.अलिबाग समुद्रकिनारी गुरुवारी सकाळी अलिबागचे नगराध्यक्ष प्रशांत नाईक यांनी झेंडा दाखवून सन्मान यात्रेला सुरुवात झाली. याप्रसंगी सन्मान रथामध्ये लेफ्टनंट जनरल (नि.) राजेंद्र निंभोरकर, एअर मार्शल (नि.) अरुण गरुड, ब्रिगेडीअर विनोद श्रीखंडे, कर्नल मदन सावंत, मेज. जनरल सतीश वासाडे, कर्नल (नि.) विनायक सुपेकर, जिल्हाधिकारी विजय सूर्यवंशी, आरसीएफ (थळ युनिट) कार्यकारी संचालक रवींद्र जावळे यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.सन्मान यात्रेमधील पोलीस बॅण्ड आणि लयबद्ध परेड करणाºया एनसीसीच्या विद्यार्थ्यांनी सर्वांचेच लक्ष वेधून घेतले. रायगड जिल्हा परिषद प्रशासनाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी निखिलकुमार ओसवाल यांनी सर्व अधिकाºयांचा शाल, श्रीफळ देऊन सन्मानकेला.आंब्याच्या पानांचा अनोखा पुष्पगुच्छअलिबाग-चेंढरे येथील मारुती मंदिरासमोरील चौकात तालुक्यातील शेतकरी संघर्ष समितीने मान्यवरांना भाताच्या लोंब्या आणि आंब्याच्या पानांनी बनवलेला पुष्पगुच्छ, शाल आणि श्रीफळ दिले. याप्रसंगी सर्वजण आगरी कोळी समाजाचा पारंपरिक वेश परिधान करून आले होते.सन्मान यात्रेत सहभागी झालेली गर्दी पाहून भारावून गेलेल्या लष्करी अधिकाºयांनीच या वेळी शेतकºयांच्या सोबतीने ‘जय जवान, जय किसान’ असा नारा दिल्याने परिसर दणाणून गेला. पीएनपी नाट्यगृहाजवळ आल्यावर सन्मान यात्रेची सांगता झाली. शहरात ठिकठिकाणी मिळालेल्या अनोख्या मानवंदनेने अधिकारी भारावून गेले.

टॅग्स :Raigadरायगड