शहरं
Join us  
Trending Stories
1
SRH vs DC : दिल्लीच्या फलंदाजांनी नांगी टाकली; पण पावसाच्या बॅटिंगमुळे हैदराबाद फक्त बॉलिंग करून 'आउट'
2
"९० हजार सैनिकांचे पायजमे आजही तिथे टांगलेले आहेत’’, मुनीर आणि पाकिस्तानचं बलूच नेत्याकडून वस्रहरण   
3
IPL 2025 Playoffs Race : आता ४ जागेसाठी ७ दावेदार! कोणत्या संघासाठी कसे आहे प्लेऑफ्सचे समीकरण?
4
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं सरपंच संतोष देशमुख यांची कन्या वैभवीचं कौतुक
5
दोन्ही दिल्लीकर एकाच क्रीजमध्ये; रन आउटसाठी स्टँडमध्ये काव्या मारनची 'दातओठ खात' तळमळ (VIDEO)
6
"वेगळे राजकारण करून पॅनलला गालबोट लावण्याचा प्रयत्न केल्यास माझ्या दारात येऊ नका",अजित पवार यांचा इशारा
7
SRH vs DC : पॅट कमिन्सचा विकेट्सचा खास पॅटर्न! स्पेल बघून काव्या मारनही झाली शॉक
8
निकाल ऐकण्यापूर्वीच विद्यार्थिनीने संपवलं जीवन, नापास झाल्याच्या भीतीतून उचलले पाऊल
9
Shivalik Sharma: क्रिकेटरला अटक; लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर अत्याचार केल्याचा आरोप
10
रेल्वे स्थानकाच्या पायऱ्यांवर पाकिस्तानी ध्वज चिकटवला; पाहताच महिलेने घातला गोंधळ, व्हिडीओ व्हायरल
11
SRH vs DC : "डिअर क्रिकेट प्लीज प्लीज ..." दुसऱ्यांदा पदरी भोपळा पडल्यावर करूण नायर झाला ट्रोल
12
"महायुती म्हणजे 'तीन तिघाडा, काम बिघाडा"; काँग्रेस फोडण्याच्या मुद्द्यावरून प्रणिती शिंदेंची टीका
13
ड्रग्स टेस्टमध्ये दोषी आढळलेला कगिसो रबाडा पुन्हा IPL खेळणार, 'या' संघाविरूद्ध होणार 'कमबॅक'
14
हवाई हल्ल्याची तयारी... पाकिस्तानसोबत तणावाच्या पार्श्वभूमीवर गृह मंत्रालयाचे सर्व राज्यांना निर्देश
15
भारताच्या संरक्षण वेबसाईट्सवर पाकिस्तानकडून सायबर हल्ला, महत्त्वपूर्ण गोपनीय माहिती लीक झाल्याचा संशय
16
काही लोक काँग्रेस सोडत आहेत, आमची वेळ आल्यावर आम्हीही बदला घेऊ- विजय वडेट्टीवार
17
वाहतुकीचे नियम तोडले तर मिळतील निगेटिव्ह पॉईंट्स, ड्रायव्हिंग लायसन होणार सस्पेंड, अशी आहे नवी पॉईंट सिस्टिम
18
ही आहे भारताची ताकद; जर्मनी-फ्रान्सचा पाकिस्तानबाबत मोठा निर्णय, जाणून घ्या...
19
पाकवर आर्थिक हल्ला; ADB अध्यक्षांना भेटल्या निर्मला सीतारामण, निधी रोखण्याची केली मागणी
20
२२ महीने राबला, पगार मागताच हॉटेल मालक, मॅनेजरने स्वयंपाक्याचा गुप्तांग ठेचून खून केला

घनकचरा व्यवस्थापनात घोळ, श्रीवर्धनमध्ये नागरिकांची दिशाभूल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 12, 2018 04:45 IST

श्रीवर्धन नगरपालिकेतील घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प पुन्हा एकदा पेटला आहे. कचऱ्यापासून खतनिर्मिती होत नसताना ठेकेदार कंपनीला लाखो रु पयांचे बिल अदा करण्यात आले आहे.

- आविष्कार देसाईअलिबाग : श्रीवर्धन नगरपालिकेतील घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प पुन्हा एकदा पेटला आहे. कचऱ्यापासून खतनिर्मिती होत नसताना ठेकेदार कंपनीला लाखो रु पयांचे बिल अदा करण्यात आले आहे. सत्ताधारी आणि नगरपालिका प्रशासन नागरिकांची दिशाभूल करून आर्थिक लूट करीत असल्याचा आरोप विरोधी पक्ष असलेल्या शिवसेनेकडून करण्यात आला आहे.श्रीवर्धनमध्ये शहरीकरण वाढत असल्याने घनकचºयाची विल्हेवाट लावण्यासाठी नगर पालिका प्रशासनामार्फत तेथे घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प राबवण्यात आला. २०१४ मध्ये तत्कालीन पालकमंत्री सुनील तटकरे यांच्या हस्ते प्रकल्पाचे उद्घाटन करण्यात आले होते. कोकणातील पहिला घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प असल्याने चांगलीच वाहवा झाली. मात्र २०१४ पासून प्रकल्पातून खतनिर्मिती झाली नसल्याचा आरोप श्रीवर्धनकर यांनी निवेदनात केला आहे. जुन्या यंत्रसामग्रीला रंगरंगोटी करून प्रकल्पाचे उद्घाटन करण्यात आल्याची तक्रार त्यांनी केलीआहे.शेड, विहीर, कामगार वसतिगृह, संरक्षक भिंतीचे काम पूर्ण केल्यानंतर या प्रकल्पाचे पुन्हा उद्घाटन विद्यमान नगराध्यक्ष नरेंद्र भुसाणे यांनी ३ जुलै २०१७ रोजी केले.खतनिर्मिती करण्यासाठी सद्गुरु बहुउद्देशीय संस्थेला तब्बल ६४ लाख ८० हजार रु पयांचा ठेका मंजूर करण्यात आला. अद्यापही प्रकल्पातून खतनिर्मिती झालेली नाही तरी ठेकेदार संस्थेला १३ लाख रु पयांचे बिल अदा करण्यात आल्याकडे श्रीवर्धनकर यांनी लक्ष वेधले.शहरामधील कचरा गेल्या वर्षभरापासून जाळण्याचा प्रकारही केला जात आहे. यातील गंभीर बाब म्हणजे शहरातील कचरा शहराबाहेरील खासगी जागेमध्ये टाकून त्यावर मातीचा भराव करण्यात येतो. याबाबत विचारणा केली असता, निकामी कचरा टाकण्यात आल्याचे सांगण्यात येत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.जनतेच्या पैशाची लूट करणाºयांवर तातडीने कारवाई करु न फौजदारी गुन्हे दाखल करावेत, अन्यथा शिवसेना जनआंदोलन उभारेल असा इशारा श्रीवर्धन नगर पालिकेचे विरोधी पक्षनेते प्रीतम श्रीवर्धनकर यांनी दिला आहे. याबाबतचे निवेदन त्यांनी सोमवारी जिल्हा प्रशासनाला दिले. जिल्हा प्रशासनाच्या वतीने निवासी उपजिल्हाधिकारी किरण पाणबुडे यांनी निवेदन स्वीकारले.ज्या कचºयापासून खतनिर्मिती होऊ शकत नाही तोच कचरा डंप केला जातोय. त्याचप्रमाणे कचºयाची विल्हेवाट लावण्यासाठी तो पेटवलाही जात नाही. घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पातून खतनिर्मिती केली जाते त्याचा रेकॉर्डही आहे.- अर्चना दिवे, मुख्याधिकारी,श्रीवर्धन नगरपालिका

टॅग्स :Raigadरायगडnewsबातम्या