शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

घनकचरा व्यवस्थापनात घोळ, श्रीवर्धनमध्ये नागरिकांची दिशाभूल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 12, 2018 04:45 IST

श्रीवर्धन नगरपालिकेतील घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प पुन्हा एकदा पेटला आहे. कचऱ्यापासून खतनिर्मिती होत नसताना ठेकेदार कंपनीला लाखो रु पयांचे बिल अदा करण्यात आले आहे.

- आविष्कार देसाईअलिबाग : श्रीवर्धन नगरपालिकेतील घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प पुन्हा एकदा पेटला आहे. कचऱ्यापासून खतनिर्मिती होत नसताना ठेकेदार कंपनीला लाखो रु पयांचे बिल अदा करण्यात आले आहे. सत्ताधारी आणि नगरपालिका प्रशासन नागरिकांची दिशाभूल करून आर्थिक लूट करीत असल्याचा आरोप विरोधी पक्ष असलेल्या शिवसेनेकडून करण्यात आला आहे.श्रीवर्धनमध्ये शहरीकरण वाढत असल्याने घनकचºयाची विल्हेवाट लावण्यासाठी नगर पालिका प्रशासनामार्फत तेथे घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प राबवण्यात आला. २०१४ मध्ये तत्कालीन पालकमंत्री सुनील तटकरे यांच्या हस्ते प्रकल्पाचे उद्घाटन करण्यात आले होते. कोकणातील पहिला घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प असल्याने चांगलीच वाहवा झाली. मात्र २०१४ पासून प्रकल्पातून खतनिर्मिती झाली नसल्याचा आरोप श्रीवर्धनकर यांनी निवेदनात केला आहे. जुन्या यंत्रसामग्रीला रंगरंगोटी करून प्रकल्पाचे उद्घाटन करण्यात आल्याची तक्रार त्यांनी केलीआहे.शेड, विहीर, कामगार वसतिगृह, संरक्षक भिंतीचे काम पूर्ण केल्यानंतर या प्रकल्पाचे पुन्हा उद्घाटन विद्यमान नगराध्यक्ष नरेंद्र भुसाणे यांनी ३ जुलै २०१७ रोजी केले.खतनिर्मिती करण्यासाठी सद्गुरु बहुउद्देशीय संस्थेला तब्बल ६४ लाख ८० हजार रु पयांचा ठेका मंजूर करण्यात आला. अद्यापही प्रकल्पातून खतनिर्मिती झालेली नाही तरी ठेकेदार संस्थेला १३ लाख रु पयांचे बिल अदा करण्यात आल्याकडे श्रीवर्धनकर यांनी लक्ष वेधले.शहरामधील कचरा गेल्या वर्षभरापासून जाळण्याचा प्रकारही केला जात आहे. यातील गंभीर बाब म्हणजे शहरातील कचरा शहराबाहेरील खासगी जागेमध्ये टाकून त्यावर मातीचा भराव करण्यात येतो. याबाबत विचारणा केली असता, निकामी कचरा टाकण्यात आल्याचे सांगण्यात येत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.जनतेच्या पैशाची लूट करणाºयांवर तातडीने कारवाई करु न फौजदारी गुन्हे दाखल करावेत, अन्यथा शिवसेना जनआंदोलन उभारेल असा इशारा श्रीवर्धन नगर पालिकेचे विरोधी पक्षनेते प्रीतम श्रीवर्धनकर यांनी दिला आहे. याबाबतचे निवेदन त्यांनी सोमवारी जिल्हा प्रशासनाला दिले. जिल्हा प्रशासनाच्या वतीने निवासी उपजिल्हाधिकारी किरण पाणबुडे यांनी निवेदन स्वीकारले.ज्या कचºयापासून खतनिर्मिती होऊ शकत नाही तोच कचरा डंप केला जातोय. त्याचप्रमाणे कचºयाची विल्हेवाट लावण्यासाठी तो पेटवलाही जात नाही. घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पातून खतनिर्मिती केली जाते त्याचा रेकॉर्डही आहे.- अर्चना दिवे, मुख्याधिकारी,श्रीवर्धन नगरपालिका

टॅग्स :Raigadरायगडnewsबातम्या