शहरं
Join us  
Trending Stories
1
सुधीर मुनगंटीवारांनी 'राज्यभर दौरा गुंडाळला', भाजप नेत्यांसोबत आज चर्चा; ठाकरे बंधुबद्दलही बरंच बोलले
2
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
3
ठाकरे बंधुंमधील दादर, शिवडीचा तिढा अखेर सुटला, मोठ्या भावासाठी धाकट्याने घेतले झुकते माप
4
महापालिका निवडणूक २०२६ : प्रस्तावच नाही; काँग्रेस-'वंचित'ची युती होणार की नाही? गोंधळ कायम 
5
दीपूचंद्र दासच्या मित्रांनीच केली 'गद्दारी', मारणाऱ्या धर्मांध जमावातच झाले सामील अन्...! सामोर आलं धक्कादायक सत्य
6
खळबळजनक! सकाळी एन्काऊंटर, संध्याकाळी फरार; पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळाला आरोपी
7
महाविकास आघाडी फुटणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या, "...तर आम्ही इतर पर्यायांचा विचार करू"
8
पहाटे ५ ची वेळ, उर्फी जावेद घाबरलेल्या अवस्थेत पोलिस स्टेशनमध्ये पोहोचली; नक्की काय घडलं?
9
इंडिगो एअरलाइन्स मार्चनंतर तुर्कीकडून घेतलेली विमानांचे उड्डाण करणार नाही; DGCA ने दिला स्पष्ट नकार
10
सोलापुरात अजित पवारांचा भाजपाला धक्का! अतुल पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश
11
आठ कोटी, बारा पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
12
८ लाखांच्या गुंतवणुकीवर मिळवा ३,२८,००० रुपये फिक्स व्याज! ज्येष्ठ नागरिकांसाठी पोस्टाची 'खास' भेट
13
"मनसेचे जे काही नगरसेवक निवडून येतील, तेदेखील पळवतील", भाजपचा राज ठाकरेंना सावधगिरीचा सल्ला
14
गॅल्व्हेस्टनजवळ मेक्सिकन नौदलाच्या विमानाचा भीषण अपघात, पाच जणांचा मृत्यू
15
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
16
२०२५चे शेवटचे पंचक: ५ दिवस अशुभ, पण ‘ही’ कामे करणे शुभ; दोष लागणार नाही, नेमके काय टाळावे?
17
Bigg Boss Marathi: लावणी डान्सरला 'बिग बॉस मराठी'ची ऑफर? म्हणाली- "मला त्यांच्याकडून मेल आलाय..."
18
बांगलादेशात युनूस सरकार उलथवून टाकण्याची तयारी सुरू! उस्मान हादीच्या संघटनेने दिला मोठा इशारा
19
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, न्याय विभागाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
20
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
Daily Top 2Weekly Top 5

श्रीवर्धन, म्हसळा, तळा तालुक्यांत सात वर्षांत आमसभा नाही!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2019 23:07 IST

नियमांचे उल्लंघन : पंचायतराज समितीच्या शिफारसींना पंचायत समितीने नाकारले

अरुण जंगम ।लोकमत न्यूज नेटवर्कम्हसळा : श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघातील श्रीवर्धन, म्हसळा, तळा तालुक्यांत मागील सात वर्षांत आमसभा झाली नाही. पंचायत समितीच्या माध्यमातून पंचायतराज समितीच्या शिफारसीनुसार दरवर्षी आमसभा घेतली जावी, असे संकेत आहेत. या तीनही गटविकास अधिकाऱ्यांनी या संकेतवजा नियमांचे उल्लंघन केले, असे विरोधकांचे म्हणणे आहे. तालुक्याची आमसभा पंचायत समितीच्या गटविकास आधिकाऱ्यांनी व जिल्ह्याची आमसभा जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाºयांनी पालकमंत्र्यांबरोबर सुसंवाद साधून लावावी, असे म्हणणे आहे.

पंचायतराज समितीने १९७६-१९७७ च्या आठव्या अहवालातील शिफारशीनुसार ९ मे १९७८ रोजी राज्यातील सर्व जिल्हा परिषद व पंचायत समित्यांना आर्थिक वर्षाची सुरुवात होण्याअगोदर प्रत्येक स्तरावर आमसभा घ्याव्यात, असे बंधनकारक केले आहे. या सभांमध्ये कोणते विषय चर्चेला घ्यावेत, या संदर्भात संसद सदस्य, विधानसभा सदस्य व अन्य लोकप्रतिनिधींकडून सूचना मागवून घ्याव्यात व त्या अनुषंगाने सभेचे कामकाज करावे, अशी शासनाची अपेक्षा आहे. पंचायत समितीची आमसभा जिल्हा परिषदेच्या आमसभेपूर्वी एक महिनाअगोदर घ्यावी. त्यात जिल्हा परिषदेच्या कार्यक्षेत्रातील झालेले निर्णय व लोकप्रतिनिधींनी केलेल्या सूचना जिल्हा परिषदेकडे कळवाव्या, जिल्ह्यांतील प्रत्येक तालुक्यातून पंचायत समितीच्या आमसभेतून आलेल्या सूचनांचा आभ्यास करून जिल्हा परिषदेने पुढील वर्षाचा कार्यक्रम निश्चित करावा, असे या मागील पंचायतराज समितीचे धोरण असताना श्रीवर्धन, म्हसळा व तळा या तीनही गटविकास अधिकाºयांनी पंचायतराज आदेशाचे पालनच केले नसल्याचे दिसते.

तालुक्यातील विविध विकासकामाचे प्रस्ताव अभ्यासूपणे आमसभेत पारित करून त्यासाठी लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून निधीची व्यवस्था करून जनहिताची कामे होत असतात, यासाठी विकासकामांचा व त्यावर खर्ची घातलेल्या निधीचा माहितीचा बोर्ड लावणे, कामावर दक्षता समितीची नेमणूक करणे, कामात झालेल्या भ्रष्टाचाराबाबत आमसभेपुढे पुरावे सादर करणे नागरिकांचे कर्तव्य आहे, त्यामुळे विकासकामात पारदर्शकता येते. यासाठी ग्रामसभा, आमसभांचे आयोजन वेळेवर होणे महत्त्वाचे असते.

या पूर्वीची तळा पंचायत समितीची आमसभा २ डिसेंबर २०१२ ला आणि श्रीवर्धन व म्हसळा पंचायत समितीची आमसभा ३ डिसेंबर २०१२ ला झाली होती. मागील सात वर्षांत आमसभा झाली नाही हे धक्कादायक वास्तव पुढे येत आहे.