शहरं
Join us  
Trending Stories
1
उज्ज्वला थिटेंना झटका! राजन पाटलांच्या सुनबाईच अनगरच्या नगराध्यक्ष होणार, न्यायालयात नेमके काय घडले?
2
'ब्लॅक फ्रायडे' म्हणजे काळा शुक्रवार...! मग भरमसाठ डिस्काऊंट देऊन साजरा का करतात कंपन्या...? 
3
Travel : कोल्डड्रिंकपेक्षाही स्वस्त पेट्रोल, इतर गोष्टीही खिशाला परवडणाऱ्या; भारतीयांसाठी व्हिसा फ्री आहे 'हे' बेट!
4
दत्त जयंती २०२५: श्री स्वामी समर्थ चरित्र सारामृत पारायण कसे कराल? पाहा, नियम-योग्य पद्धत
5
हर्बालाइफचा नवा 'लिफ्ट ऑफ' – शून्य साखर असलेलं, ऊर्जा देणारं इफर्व्हेसंट ड्रिंक, तुमचा दिवस बनवा अधिक जोमदार 
6
बिहार काँग्रेसच्या पराभवाची फाईल दिल्लीत उघडणार; ६१ उमेदवार जिल्हावार अहवाल सादर करणार
7
भारताला २० वर्षांनी पुन्हा मान! शताब्दी 'राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा २०३०' चे यजमानपद या शहराच्या पारड्यात...
8
मोठी बातमी! २ कोटी लोकांचे आधार क्रमांक कायमचे बंद झाले; UIDAI ने सुरु केली मोहिम...
9
Cyclone Senyar: 'सेन्यार'ने वेग घेतला! दक्षिण आणि पूर्व किनाऱ्यावर ७२ तास राहणार मोठा धोका
10
Pune Crime: "तिच्या बेडरुममध्ये झोपवलं आणि..."; कोल्हापुरातील व्यक्तीसोबत पुण्यातील महिलेने काय काय केलं?
11
१० रुपयांपेक्षाही कमी किंमतीच्या शेअरची कमाल, झटक्यात २०% वाढला भाव; खरेदीसाठी गुंतवणूकदारांची झुंबड
12
सात जन्माच्या साथीदारानेच केली क्रूरता! पतीमुळे ४ वर्षांच्या चिमुकल्याची आई ९ महिने तडफडत राहिली.. 
13
निवडणूक अधिकाऱ्यांना धोका, आयोगाने बंगाल पोलिसांना पत्र लिहिले; त्या घटनेची आठवून करून दिली
14
सोनिया जी, राहुल जी आन् मी..., कर्नाटक सत्तासंघर्षावर खर्गेंचे मोठे सेंकत! पुढचे 48 तास महत्वाचे; "200% 'तेच' CM होणार"
15
कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय; रेअर अर्थ मॅग्नेट उत्पादनाला भारतात मोठी गती मिळणार
16
मायक्रोसॉफ्टचा बाजार उठणार की काय? गुगल कॉम्प्युटर, लॅपटॉपसाठी आणतेय ऑपरेटिंग सिस्टीम...
17
टीम इंडियाचा दबदबा संपत चाललाय, काही जण तर..; लाजिरवाण्या पराभवानंतर हर्षा भोगलेंनी सुनावलं
18
पंडित देशमुख खुनाचा मुद्दा २० वर्षांनंतर प्रचारात, मोहोळच्या देशमुखांसोबत काय घडलं होतं?
19
'थोडी वाट पाहा, फोन करतो', मुख्यमंत्री बदलाच्या चर्चेदरम्यान राहुल गांधींचा डीके शिवकुमार यांना मेसेज
20
एकनाथ शिंदे सत्ता मिळवून दिघे साहेबांचे स्वप्न साकारणार की गणेश नाईक पुन्हा दूर ठेवणार?
Daily Top 2Weekly Top 5

कोंढवी किल्ल्यावर खोदकामात सापडल्या शिवकालीन मूर्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 00:46 IST

तालुक्यातील आठगाव भैरी म्हणून प्रसिद्ध असलेल्या कोंढवीसह चोळई, गाजवणे, खडकवणे, धामणदेवी, फणसकोंड, गोलदरा, तळ्याचीवाडी या गावांचे आराध्यदैवत जोगेश्वरी मंदिराच्या पूर्व बाजूस पाण्याच्या साठवण टाकीसाठी खोदकाम करीत असताना या मूर्ती आढळल्या. या मूर्ती मध्ययुगीन व शिवकाळातील आहेत. या मूर्तींमध्ये श्री गणेश, भैरी, जोगेश्वरी, वाघजाई वीर इत्यादींचा समावेश आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क पोलादपूर : तालुक्यातील ऐतिहासिक कोंढवी किल्ल्यावर भैरवनाथ, जोगेश्वरी मंदिराच्या जीर्णोद्धार समयी खोदकाम करताना शिवकाळातील १५ मूर्ती सापडल्या आहेत.             तालुक्यातील आठगाव भैरी म्हणून प्रसिद्ध असलेल्या कोंढवी येथे मंदिराचे काम करताना पाण्याची टाकी बांधण्यासाठी शिवकाळातील १५ मूर्ती सापडल्या. या मूर्तीमध्ये भैरी, जोगेश्वरी, वाघजाई, वीर मूर्ती तसेच गणेश मूर्ती इत्यादी मूर्तींचा समावेश आहे. मोठ्या प्रमाणात मूर्ती सापडल्यामुळे पोलादपूर तालुक्यासह कोकणातील भाविकांची या कोंढवी गडाकडे दर्शनासाठी रीघ लागली आहे.तालुक्यातील आठगाव भैरी म्हणून प्रसिद्ध असलेल्या कोंढवीसह चोळई, गाजवणे, खडकवणे, धामणदेवी, फणसकोंड, गोलदरा, तळ्याचीवाडी या गावांचे आराध्यदैवत जोगेश्वरी मंदिराच्या पूर्व बाजूस पाण्याच्या साठवण टाकीसाठी खोदकाम करीत असताना या मूर्ती आढळल्या. या मूर्ती मध्ययुगीन व शिवकाळातील आहेत. या मूर्तींमध्ये श्री गणेश, भैरी, जोगेश्वरी, वाघजाई वीर इत्यादींचा समावेश आहे.कोकण इतिहास परिषदेचे प्रा. अंजय धनावडे तसेच इतिहास संशोधक प्रवीण भोसले यांनी या मूर्तींसंदर्भात त्या चौदाव्या शतकापासून अठराव्या शतकापर्यंतच्या असल्याचे नमूद केले आहे. या मूर्तीअगोदरसुद्धा येथे शिवलिंगाखालील पीठ, दिवा तसेच मध्ययुगीन भांड्यांचे अवशेष सापडले.

श्री भैरवनाथ जोगेश्वरी प्राचीन मंदिर n कोंढवी हे आदिलशाही काळापासून एक प्रमुख परगणा म्हणून महत्त्वाचे ठिकाण प्रसिद्ध आहे. शिवकाळात या कोंढवी गडाचे फार महत्त्व होते. कोकण व घाटमाथ्यावर जाणाऱ्या प्रमुख मार्गावर लक्ष ठेवण्यासाठी या किल्ल्याचा वापर केला गेला. श्री भैरवनाथ जोगेश्वरी हे मंदिर प्राचीन काळापासून कोंढवी येथे अस्तित्वातआहे.n येथे मुंबई, पुणे, बडोदे या ठिकाणांवरून मोठ्या प्रमाणात  पर्यटक व शिवभक्त भेटी देतात. मात्र, येथे कोणत्याही प्रकारची सुविधा नसल्यामुळे भक्तांची गैरसोय होते. तरी या स्थळास शासनाने पर्यटनस्थळ व तीर्थक्षेत्राचा दर्जा देण्यात यावा, व येथे यात्रा सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, ही आमची प्रमुख मागणी असल्याचे आठगाव भैरी देवस्थानचे अध्यक्ष श्री भाई एकनाथ गायकवाड यांनी सांगितले.