शहरं
Join us  
Trending Stories
1
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
2
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
3
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकानांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
4
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
5
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
6
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
7
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
8
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
9
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
10
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
11
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
12
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
13
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
14
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
15
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
16
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
17
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
18
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
19
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
20
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
Daily Top 2Weekly Top 5

चौथ्या बंदरावर शिवसेनेची धडक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2018 00:28 IST

प्रकल्पग्रस्तांना जाणीवपूर्वक नोक-यांमधून डावलले जात आहे. त्यामुळे जोपर्यंत स्थानिकांना नोक-या व रोजगारांमध्ये सामावून घेतले जात नाही

उरण : प्रकल्पग्रस्तांना जाणीवपूर्वक नोक-यांमधून डावलले जात आहे. त्यामुळे जोपर्यंत स्थानिकांना नोक-या व रोजगारांमध्ये सामावून घेतले जात नाही, तोपर्यंत शिवसेना संघर्ष करत राहील, असा इशारा खासदार श्रीरंग बारणे यांनी दिला. जेएनपीटीचे चौथे बंदर आणि एनएसआयजीटी या बंदरात स्थानिकांना डावलल्याच्या निषेधार्थ शुक्रवारी शिवसेनेतर्फे चौथ्या बंदरावर (बीएमसीटी) मोर्चा काढण्यात आला होता.चौथ्या बंदरात प्रकल्पग्रस्तांसाठी मोठ्या प्रमाणात नोकºया व रोजगार उपलब्ध होतील, असे सुरुवातीला सांगण्यात आले होते. मात्र, प्रत्यक्षात ५५ प्रकल्पग्रस्तांनाच नोकºया मिळाल्या आहेत. कंपनीच्या ठेकेदारांकडून प्रकल्पग्रस्तांना डावलून परप्रांतीयांना नोकरीत प्राधान्य देत आहेत. त्यामुळे जेएनपीटी व बीएमसीटी प्रशासनाबाबत येथील स्थानिकांमध्ये प्रचंड असंतोष आहे. शुक्रवारी मोर्चाच्या माध्यमातून शिवसैनिकांनी आपला रोष व्यक्त केला.जोपर्यंत प्रकल्पग्रस्तांना न्याय मिळत नाही, तोपर्यंत परप्रांतीय कामगारांना बंदरात पाऊल ठेवू देणार नाही. वेळ पडल्यास समुद्रातही बीएमसीटीची नाकाबंदी करणार असून, ड्रेजिंगचे काम बंद करू, असा इशारा मनोहर भोईर यांनी जेएनपीटी प्रशासनाला दिला. मनोहर भोईर यांनी या वेळी शेकापचे माजी आमदार विवेक पाटील आणि सर्वपक्षीय नोकरी बचाव समितीवरही टीका केली. या वेळी संपर्कप्रमुख संजय मोरे, माजी जिल्हाप्रमुख बबन पाटील यांची भाषणे झाली. यानंतर शिवसेनेचे शिष्टमंडळाने जेएनपीटी प्रशासनाला निवेदन दिले.१८ गावांतील प्रकल्पग्रस्त तसेच उरण तालुक्यातील बेरोजगारांना नोकरीत सामावून घ्यावे, ज्या प्रकल्पग्रस्त उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या आहेत त्यांना कामावर घ्यावे. या बंदरामुळे जे मच्छीमार बाधित झाले आहेत त्यांचे पुनर्वसन करावे, आदी प्रमुख मागण्या या वेळी जेएनपीटी प्रशासनाकडे करण्यात आल्या. त्यावर येत्या १५ दिवसांत बीएमसीटी प्रशासन आणि एनएसआयजीटीच्या अधिकाºयां-सोबत बैठक बोलावून प्रश्न सोडविला जाईल व बंदरामध्ये भरती केलेल्या सर्व कामगारांची यादी शिवसेनेला दिली जाईल, असे आश्वासन दिले.

टॅग्स :Shiv Senaशिवसेना