शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या हल्ल्यात ११ नाही तर अनेक पाकिस्तानी सैनिक ठार; पाक लष्कराने केले मान्य
2
Operation Sindoor: पाकिस्तानच्या आण्विक सुविधा केंद्रामधून किरणोत्सर्ग झालाय का, IAEA ने काय सांगितले?
3
Boycott Turkey: एकनाथ शिंदेंनी भारतीय व्यापारी आणि पर्यटकांची थोपाटली पाठ, तुर्की-अझरबैजानला फटका!
4
पहलगामचा बदला; आता स्थानिक दहशतवादी भारतीय सैन्याच्या निशाण्यावर, आतापर्यंत 6 ठार
5
Viral Video : आईस्क्रीममध्ये सापडली पालीची शेपूट; व्हिडीओ पाहून तुम्हालाही किळस येईल
6
निफ्टीने ७ महिन्यांनंतर ओलांडला २५,००० चा टप्पा; डिफेन्समधील तेजी कायम, हे शेअर्स घसरले
7
IND vs ENG: तब्बल ५०५५ दिवसांनंतर टीम इंडियाच्या बाबतीत घडून येणार 'असा' योगायोग
8
यावेळी मोठा धमाका करायचा... PM मोदींनी पहलगाम हल्ल्याची बातमी मिळताच मनात आखलेला 'प्लॅन'
9
'तो' वाद पिझ्झाच्या क्वालिटीवरून, मराठी न बोलण्यावरून नाही; महिलेने सांगितली खरी स्टोरी
10
उल्हासनगरात संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त! पत्नी व मुलीची हत्या करून पवन पाहुजा यांनी घेतला गळफास
11
Video - दहशतवाद्याच्या हातात बंदूक, चेहऱ्यावर भीती...; त्राल चकमकीचं ड्रोन फुटेज आलं समोर
12
WTC Finalच्या विजेत्याला मिळणार मोठ्ठी रक्कम, टीम इंडियाही मालामाल, पाकिस्तानला किती बक्षीस?
13
आमिर खान-राजकुमार हिरानी पुन्हा एकत्र, महाराष्ट्राच्या 'या' सुपुत्रावर घेऊन येणार बायोपिक!
14
पाकिस्तानातून गाढवांची खरेदी का करतो भारताचा शेजारी देश? काय आहे चिनी कनेक्शन?
15
इंग्लंड दौऱ्याआधी टीम इंडियाचा कोच गौतम गंभीरने पत्नीसह घेतले सिद्धिविनायकाचे दर्शन
16
सोशल मीडियावर लाईव्ह होती प्रसिद्ध इन्फ्लुएंसर, भेटवस्तू देण्याच्या बहाण्याने आलेल्या इसमाने झाडल्या गोळ्या!
17
Swami Samartha: स्वामी कृपा व्हावी वाटत असेल तर त्यांना नावडणारी 'ही' गोष्ट ताबडतोब सोडा!
18
कहाणी १९६५ च्या युद्धाची! आदमपूर एअरबेसवर कब्जा करण्यासाठी उतरले ५५ पाकिस्तानी कमांडो, १२ ठार तर बाकी...
19
मुकेश अंबानी यांनी घेतली डोनाल्ड ट्रम्प यांची भेट; आखाती देशात किती पसरलाय व्यवसाय?
20
IAS-IPS बनण्याची सूवर्णसंधी; UPSC ने जारी केले परीक्षांचे वेळापत्रक, जाणून घ्या संपूर्ण माहिती...

चौथ्या बंदरावर शिवसेनेची धडक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2018 00:28 IST

प्रकल्पग्रस्तांना जाणीवपूर्वक नोक-यांमधून डावलले जात आहे. त्यामुळे जोपर्यंत स्थानिकांना नोक-या व रोजगारांमध्ये सामावून घेतले जात नाही

उरण : प्रकल्पग्रस्तांना जाणीवपूर्वक नोक-यांमधून डावलले जात आहे. त्यामुळे जोपर्यंत स्थानिकांना नोक-या व रोजगारांमध्ये सामावून घेतले जात नाही, तोपर्यंत शिवसेना संघर्ष करत राहील, असा इशारा खासदार श्रीरंग बारणे यांनी दिला. जेएनपीटीचे चौथे बंदर आणि एनएसआयजीटी या बंदरात स्थानिकांना डावलल्याच्या निषेधार्थ शुक्रवारी शिवसेनेतर्फे चौथ्या बंदरावर (बीएमसीटी) मोर्चा काढण्यात आला होता.चौथ्या बंदरात प्रकल्पग्रस्तांसाठी मोठ्या प्रमाणात नोकºया व रोजगार उपलब्ध होतील, असे सुरुवातीला सांगण्यात आले होते. मात्र, प्रत्यक्षात ५५ प्रकल्पग्रस्तांनाच नोकºया मिळाल्या आहेत. कंपनीच्या ठेकेदारांकडून प्रकल्पग्रस्तांना डावलून परप्रांतीयांना नोकरीत प्राधान्य देत आहेत. त्यामुळे जेएनपीटी व बीएमसीटी प्रशासनाबाबत येथील स्थानिकांमध्ये प्रचंड असंतोष आहे. शुक्रवारी मोर्चाच्या माध्यमातून शिवसैनिकांनी आपला रोष व्यक्त केला.जोपर्यंत प्रकल्पग्रस्तांना न्याय मिळत नाही, तोपर्यंत परप्रांतीय कामगारांना बंदरात पाऊल ठेवू देणार नाही. वेळ पडल्यास समुद्रातही बीएमसीटीची नाकाबंदी करणार असून, ड्रेजिंगचे काम बंद करू, असा इशारा मनोहर भोईर यांनी जेएनपीटी प्रशासनाला दिला. मनोहर भोईर यांनी या वेळी शेकापचे माजी आमदार विवेक पाटील आणि सर्वपक्षीय नोकरी बचाव समितीवरही टीका केली. या वेळी संपर्कप्रमुख संजय मोरे, माजी जिल्हाप्रमुख बबन पाटील यांची भाषणे झाली. यानंतर शिवसेनेचे शिष्टमंडळाने जेएनपीटी प्रशासनाला निवेदन दिले.१८ गावांतील प्रकल्पग्रस्त तसेच उरण तालुक्यातील बेरोजगारांना नोकरीत सामावून घ्यावे, ज्या प्रकल्पग्रस्त उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या आहेत त्यांना कामावर घ्यावे. या बंदरामुळे जे मच्छीमार बाधित झाले आहेत त्यांचे पुनर्वसन करावे, आदी प्रमुख मागण्या या वेळी जेएनपीटी प्रशासनाकडे करण्यात आल्या. त्यावर येत्या १५ दिवसांत बीएमसीटी प्रशासन आणि एनएसआयजीटीच्या अधिकाºयां-सोबत बैठक बोलावून प्रश्न सोडविला जाईल व बंदरामध्ये भरती केलेल्या सर्व कामगारांची यादी शिवसेनेला दिली जाईल, असे आश्वासन दिले.

टॅग्स :Shiv Senaशिवसेना