शहरं
Join us  
Trending Stories
1
कॉकपिटमध्ये घुसण्याचा प्रयत्न; नऊ प्रवासी ताब्यात, एअर इंडियाच्या विमानात नेमकं काय घडलं?
2
मराठवाड्यातील अतिवृष्टीचा एकनाथ शिंदेंनी घेतला आढावा; जिल्हाधिकाऱ्यांशी फोनवरून संवाद
3
पाकिस्तानात निसर्गाचा हाहाकार; मुसळधार पाऊस अन् पुरामुळे 1 हजारहून अधिक जणांचा मृत्यू
4
काँग्रेसचे नेते आणि हिमाचलमधील मंत्री विक्रमादित्य सिंह यांनी केलं दुसरं लग्न, कोण आहे त्यांची दुसरी पत्नी?
5
“युद्धाची गरजच भासणार नाही, एक दिवस POKतील जनता म्हणेल की आम्ही भारतवासी आहोत”: राजनाथ सिंह
6
जुगाराच्या व्यसनामुळे बनला 'चोर'; वडिलांशी खोटं बोलून मित्रांच्या नावाने घेतलं ३३ लाखांचं कर्ज
7
टाटा-महिंद्राच्या कंपनीचे शेअर आपटले! पण अदानींचा 'हा' स्टॉक ठरला टॉप गेनर; IT क्षेत्राला सर्वाधिक फटका
8
मेट्रोचे सर्व टप्पे २०२६च्या अखेरपर्यंत प्रवाशांकरता खुले होतील- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
9
“आता रिकामे ठेवू नका, काहीतरी जबाबदारी द्या, चुकलो असेन तर...”; धनंजय मुंडेंची भरसभेत विनंती
10
Air India Plane Crash : अहमदाबाद विमान अपघातावर मोठी अपडेट; सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारला नोटीस पाठवली, AAIB अहवालाबाबत सांगितली ही बाब
11
VIDEO: आईची माया! सिंहीणने रेडकूवर घातली झडप, म्हशीने शिंगाने लावलं उडवून अन् पुढे...
12
बगरम हवाई तळावर अमेरिकेचा 'डोळा'; ट्रम्प यांना आता का हवंय अफगाणिस्तानचं 'एअरफील्ड'?
13
ज्या सुटकेसवर बसून रील बनवलं, त्यातच तिला भरून नदीत फेकलं; लव्हस्टोरीचा भयंकर शेवट
14
कहो ना कहो...! इमरान हाश्मीसमोर गाताना राघव जुयालच्या डोळ्यात आलेलं पाणी, म्हणाला...
15
आजपासून स्वस्त झालं Rail Neer; जीएसटी रिव्हिजननंतर रेल्वेनं कमी केली MRP
16
नेपाळ, फ्रान्सनंतर आता फिलिपिन्समध्येही भडका! लोक रस्त्यावर; धुमश्चक्रीत ९५ पोलीस जखमी, २१६ जणांना अटक
17
स्टार क्रिकेटपटूने निवृत्ती घेतली मागे, आता आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये करणार पुनरागमन  
18
५ कपन्यांमधील हिस्सा विकण्याच्या विचारात मोदी सरकार! लिस्ट मध्ये आहेत या सरकारी कंपन्यांची नावं
19
"५० हजार देतो, शरीरसंबंध ठेव", मुलाच्या वयाच्या निर्मात्याने अभिनेत्रीकडे केलेली धक्कादायक मागणी
20
अशी धुलाई कधीच पाहिली नव्हती...; अभिषेक शर्माच्या फटकेबाजीनंतर पाकिस्तानी पत्रकाराची कबुली

शिवसेनेचे आमदार अडकले कात्रीत; आंदोलकांना टाळून केली नुकसानीची पहाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2020 01:15 IST

विक्रम-मिनीडोर संघटनेत नाराजी; जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

अलिबाग : कोरोनामुळे विक्रम-मिनीडोर व्यावसायिकांची उपासमार सुरू आहे. त्यासाठी आवाज उठवायचा अथवा निसर्ग वादळाचा तडाखा बसलेल्यांना आधार द्यायचा, अशी द्विधा मन:स्थिती आज अलिबागच्या स्थानिक आमदारांची झाल्याचे पाहायला मिळाले.मोर्चा काढू नका, बुधवारी जिल्हाधिकारी निधी चौधरी यांची आपण भेट घेऊ, असे आश्वासन अलिबागमधील शिवसेनेचे आमदार महेंद्र दळवी यांनी विक्रम-मिनीडोर चालक-मालक संघटनेचे अध्यक्ष विजय पाटील यांना दिले होते. आमदारांनी शब्द दिल्याने विजय पाटील यांनी आपले आंदोलन मागे घेतले, परंतु बुधवारी सकाळी ११ वाजता पाटील आणि त्यांचे ठरावीक सहकारी जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ आमदार दळवी यांची वाट पहात होते. मात्र, आमदार दळवी आले नाहीत. पाटील यांनी दळवी यांना मोबाइलवर फोन केला असता, मी निसर्ग चक्रीवादळातील नुकसानीची पाहणी करण्यासाठी बाहेर आलो आहे, असे सांगितल्याने पाटील यांच्यासह सहकाऱ्यांचा चांगलाच हिरमोड झाला. त्यांनी येता येणार नसल्याचे आम्हाला साधे कळवलेही नाही. नुकसानग्रस्तांची पाहणी करण्यासाठी गेले हे चांगले आहे. मात्र, आधीच स्पष्ट सांगितले असते तर आमचा वेळ वाया गेला नसता. आमचा आता कोणावरच विश्वास राहीलेला नाही. आमची लढाई आता आम्हालाच लढावी लागणार आहे. यासाठी लवकरच रणनीती तयार करण्यात येईल, असे विजय पाटील यांनी ‘लोकमत’ला सांगितले.काही कालावधीनंतर विजय पाटील, दिलीप भोईर, प्रमोद म्हात्रे यांनी जिल्हाधिकारी निधी चौधरी यांना निवेदन दिले. गेल्या ९० दिवसांपासून आमचा रोजगार बुडाला आहे. १२ हजार कुटुंबांवर उपासमारीची वेळ आली आहे. व्यवसाय सुरू करण्यासाठी सरकारने अटी, शर्तींवर परवानगी दिली आहे. मात्र, चार प्रवासी घेऊन व्यवसायामध्ये नुकसान होत आहे. दिल्ली सरकार आणि आंध्र प्रदेश सरकारने टॅक्सी परमीट असणाºयांना पाच ते दहा हजार रुपयांचे अर्थसाहाय्य दिले आहे. त्याच धर्तीवर राज्य सरकारने निर्णय घ्यावा, अशी मागणी संघटनेने निवेदनाद्वारे केली आहे.दरम्यान, राज्यामध्ये शिवसेनेचा मुख्यमंत्री आहे. त्यामुळे आपल्याच सत्ताधाºयांच्या विरोधात आंदोलन कसे करायचे असा प्रश्न शिवसेनेचे आमदार महेंद्र दळवी यांना पडला असेल. याचसाठी त्यांनी आंदोलन मोडून काढण्यासाठी राजकीय खेळी केली असेल, अशी चर्चा परिसरात सुरु होती.मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार निसर्ग वादळातील नुकसानीची पाहणी करण्यासाठी चौल येथे गेलो होतो. कोरोनाच्या कालावधीत, तसेच संचारबंदी असल्याने आंदोलन करू नये, असे मी विक्रम मिनीडोर संघटनेचे अध्यक्ष विजय पाटील आणि त्यांच्या सहकाºयांना सांगितले होते. त्यांचा प्रश्न गंभीर असल्याने परिवहनमंत्री अनिल परब यांच्याशीही चर्चा केली आहे. गुरुवारी आंदोलकांची भेट घेणार आहे.- महेंद्र दळवी, आमदार

टॅग्स :Shiv Senaशिवसेना