शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुणाशीही संबंध ठेवा पण भाजपशी..."; राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्यावर शरद पवारांचे स्पष्ट मत
2
पुन्हा तेच! एअर इंडियाच्या विमानात तांत्रिक बिघाड; अहमदाबादहून लंडनला जाणारे विमान रद्द
3
डोनाल्ड ट्रम्प यांनी आणला स्वत:च्याच ब्रँडचा स्मार्टफोन; अमेरिकेत भूकंप, कमी किंमतीत एवढे फिचर्स देणार की...
4
भारताला अंदमानात २ लाख कोटी लिटर कच्च्या तेलाचं भांडार मिळालं, GDP २० ट्रिलियन डॉलर्सवर जाणार?
5
इस्रायल-इराण यांचे एकमेकांवर बॉम्ब; सरकारी न्यूज चॅनेलच्या इमारतीवर हल्ले
6
ऑल टाईम हायवरुन सोन्याचे दर घसरले, चांदीच्या दरात मात्र तेजी; पाहा लेटेस्ट किंमत
7
'या सगळ्यांना मुंबई बॉम्ब स्फोटातील आरोपी करायला हवे', खासदार संजय राऊत नितेश राणेंवर भडकले
8
Census of India: ३५ लाख कर्मचारी करणार जनगणना, नागरिकांनाही करता येणार स्वयंनोंदणी!
9
अरेरे! लग्नानंतर बॉयफ्रेंडसोबत पळून गेली बायको; नवरा म्हणतो, "राजा रघुवंशी होण्यापासून वाचलो"
10
सेलिब्रिटी जोडप्याने फिल्ममेकरचं केले अपहरण, गुन्हा दाखल; रस्त्यात एकट्याला अडवले, मग...
11
'समृद्धी'वर दगडफेक करून लुटीचा प्रयत्न; छ. संभाजीनगर ते नागपूर मार्गावरील प्रकार वाढले!
12
Tata Motors Shares: परदेशातून चांगली बातमी, तरीही आपटले टाटा मोटर्सचे शेअर्स; गुतवणूकदारांनी काय करावं?
13
४८ तासानंतरही केरळमध्ये उभं आहे जगातील सर्वात महागडं लढाऊ विमान; नेमकं कारण काय?
14
गुरुवारी गुरुपौर्णिमा: ४ गुरुवार करा स्वामी सेवा, कृपा होईलच विश्वास ठेवा; नेमके काय करावे?
15
घाईगडबडीत चुकीची कर व्यवस्था निवडली? घाबरू नका! ITR दाखल करताना 'ही' ट्रिक वापरा आणि टॅक्स वाचवा
16
इस्राइलने इराणचा आणखी एक बडा मोहरा टिपला, चीफ ऑफ आर्मी स्टाफ अली शादमानी यांना मारल्याचा दावा  
17
डॉली चायवाला Starbucks चा ब्रँड अ‍ॅम्बेसेडर बनणार का? समोर आलं सत्य, कंपनी म्हणाली...
18
हुल्लडबाजांच्या दुचाकी पुलावर आल्याने गर्दी झाली अन् होत्याचे नव्हते झाले!
19
विमानात बॉम्ब ठेवल्याची धमकी, इंडिगोने नागपुरमध्ये आपत्कालीन लँडिंग केले
20
बुधादित्य त्रिग्रही धनयोग: ५ राशींना लक्ष्मी कृपेने भरभराट, भरघोस शुभ-लाभ; भाग्योदयाचा काळ!

बिरवाडी ग्रामसभेत गोंधळ, शिवसेना-काँग्रेस कार्यकर्ते भिडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2019 01:16 IST

वादविवाद :सत्ताधारी शिवसेना-काँग्रेस कार्यकर्ते भिडले

बिरवाडी : महाड तालुक्यातील श्रीमंत ग्रामपंचायत म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बिरवाडी ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेत सत्ताधारी शिवसेना व काँग्रेस कार्यकर्ते समोरासमोर भिडल्याने गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. एकंदर परिस्थिती लक्षात घेऊन ग्रामसभा अध्यक्ष शिवाजी तांबे यांनी सभा संपविल्याने पुढील अनर्थ टळल्याचे दिसून आले.

बिरवाडी ग्रामपंचायतीची तहकूब ग्रामसभा २३ डिसेंबर रोजी ग्रामपंचायतीच्या क्रांतीसिंह नानासाहेब पुरोहित सभागृहात सकाळी ११ वाजता आयोजित करण्यात आली होती. या ग्रामसभेच्या अध्यक्षस्थानी शिवाजी तांबे यांची निवड करण्यात आली, त्यानंतर मागील ग्रामसभेचे इतिवृत्त वाचून मंजूर करणे, वार्षिक अंदाजपत्रकाला मंजुरी देणे, तंटामुक्त समिती विषय विचारविनिमय करणे व अन्य विषयांवर चर्चा झाली. आयत्या वेळच्या विषयांवर चर्चा सुरू असताना बिरवाडी ग्रामपंचायतीचे माजी सदस्य सचिन बागडे यांनी ग्रामपंचायतीमार्फत नागरिकांना वेळेत दाखले उपलब्ध करून दिले जात नाहीत. या उलट सत्ताधारी शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना ग्रामपंचायतींमधून तत्काळ दाखले मिळतात, असा आक्षेप घेतला. या दरम्यान ग्रामपंचायतीचे माजी सरपंच माधव बागडे यांनी बिरवाडी ग्रामपंचायतीची महिला सरपंच असताना या ठिकाणी काही नागरिक दारू पिऊन येतात दमदाटी करतात, असा प्रकार दुर्दैवी असल्याचे सांगतानाच ग्रामसभेशी निगडित नसलेला विषय सभागृहामध्ये उपस्थित केल्याने काँग्रेस कार्यकर्ते सचिन बागडे व माजी सरपंच माधव बागडे यांच्यात शाब्दिक बाचाबाची सुरू झाली. या गोंधळामध्ये ग्रामपंचायतीच्या सरपंच मेघना माधव बागडे यांनी हस्तक्षेप केल्याने ग्रामसभेचे अध्यक्ष शिवाजी तांबे असताना सरपंचांनी मध्ये बोलू नये, असा आक्षेप सचिन बागडे यांनी घेतल्याने ग्रामसभेमध्ये प्रचंड गोंधळ सुरू झाला. गोंधळाची परिस्थिती नियंत्रणात न आल्याने ग्रामसभेचे अध्यक्ष शिवाजी तांबे यांनी आपले अधिकार वापरून ग्रामसभा समाप्त करीत असल्याचे जाहीर करून या प्रकरणावर पडदा टाकला.रात्रीच्या वेळी रु ग्णांची गैरसोयच्बिरवाडी ग्रामपंचायतीमधील नागरिक केदार धारिया यांनी आपण बिरवाडी ग्रामपंचायतीकडे माहिती अधिकारामध्ये माहिती मागितली असून आपल्याला माहिती उपलब्ध होत नाही, त्यासोबतच दाखले देण्यात दिरंगाई का होते, असा प्रश्न उपस्थित केला.च्यावर उत्तर देताना बिरवाडी ग्रामपंचायतीचे ग्रामविकास अधिकारी नागनाथ घाडगे यांनी नागरिकांना दाखले वेळेत प्राप्त झाले पाहिजेत हा त्यांचा अधिकार असून दाखले घेऊन ग्रामपंचायतीचा कर्मचारी संबंधित व्यक्तीकडे गेला असता ती व्यक्ती उपलब्ध होऊ न शकल्याने दिरंगाई झाली असेल, असे सांगितले.च्तर बिरवाडी ग्रामपंचायतींमधील प्रवीण गायकवाड यांनी खासगी वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून रात्रीच्या वेळी रुग्णांची गैरसोय होत असल्याने याबाबत आरोग्य विभागाकडे पत्रव्यवहार करण्याची मागणी ग्रामसभेमध्ये करून ग्रामसभेच्या ठरावाची प्रत आरोग्यमंत्री आरोग्य विभागाच्या अधिकारी यांना पाठविण्यात यावी, असे नमूद केले.

टॅग्स :Raigadरायगड