शहरं
Join us  
Trending Stories
1
जगदीप धनखड गायब? राऊतांना वेगळाच संशय; म्हणाले, “रशिया-चीनची पद्धत भारतात सुरू केली का?”
2
“RSS शिस्तबद्ध संघटना, ७५ वर्षे अटीचे पालन करेल”; शरद पवारांचा नाव न घेता PM मोदींकडे रोख!
3
RCBच्या यश दयालवर बंदीची कारवाई; अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरणी 'या' स्पर्धेतून बाद
4
गडकरींचे ३.५० लाख मतदार वगळले, कुटुंबीयांचाही समावेश; अजून पुरावे मागणार की माफी?; काँग्रेसचा सवाल
5
पाकिस्तानला झाले तब्बल 'इतक्या' कोटींचे नुकसान; भारतीय विमानांसाठी हवाई क्षेत्र बंद करणे पडले महागात!
6
सर्वाधिक धावा कुटल्या, मग कर्णधाराला माघारी धाडलं, २२ वर्षांच्या ऑलराउंडरने जिंकवला सामना
7
सोशल मीडियावर मैत्री केली; चार तरुणींच्या जाळ्यात अडकलेल्या आजोबांनी आयुष्यभराची कमाई गमावली!
8
साप्ताहिक राशीभविष्य: मोठी जोखीम टाळा, पैसे उसने देऊ नये; ८ राशींना लाभ, सुख-सुबत्ता-कल्याण!
9
५ लाख देण्याचे आश्वासन अन् हातात पडले अवघ्या ५ हजाराचे धनादेश; उत्तरकाशीतील नागरिकांचा संताप
10
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये कोण जिंकलं? सेना प्रमुखांनी पाकिस्तानला थेट उत्तर दिलं! म्हणाले...
11
जिला गर्लफ्रेंड म्हटलं तिनेच राखी बांधली! मोहम्मद सिराज आणि आशा भोसलेंच्या नातीचं रक्षाबंधन, फोटो समोर
12
'धकधक गर्ल' माधुरीचं सौंदर्य पाहून घायाळ झालेला अभिनेता, एकही रुपया मानधन न घेता केला सिनेमा
13
तुरुंगात असलेल्या सोनम रघुवंशीच्या आजीचे निधन; नातीच्या क्रूर कृत्यामुळे बसलेला धक्का
14
आजचे राशीभविष्य, १० ऑगस्ट २०२५: ७ राशींना शुभ दिवस, सरकारी कामात यश; धनलाभ योग
15
Bigg Boss 19: पहलगाम हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीला 'बिग बॉस'ची ऑफर! शोमध्ये दिसणार असल्याची चर्चा
16
लाडकी बहीण योजनेचे पैसे योग्य वेळी वाढवणार; योजनेत भ्रष्टाचार असल्याचा मुख्यमंत्र्यांनी केला इन्कार
17
भारत-पाकिस्तान युद्ध मीच थांबवले, डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा एकदा दावा, पाच विमाने पाडल्याच्या दाव्याची पुनरावृत्ती
18
वाराणसीच्या मंदिरात पूजेदरम्यान आग; पूजाऱ्यासह ९ जण होरपळले, ४ जणांची प्रकृती गंभीर  
19
विद्यार्थ्यांची जबाबदारी शासन घेणार का? गणपती विसर्जन, दहीहंडीची सुट्टी रद्द केल्याने शिक्षक नाराज
20
फसवणुकीच्या गुन्ह्यातील कैद्यांनी चार तास ढोसली दारू! ऑन ड्युटी नसलेल्या पाेलिस हवालदाराचा ‘हात’

बिरवाडी ग्रामसभेत गोंधळ, शिवसेना-काँग्रेस कार्यकर्ते भिडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2019 01:16 IST

वादविवाद :सत्ताधारी शिवसेना-काँग्रेस कार्यकर्ते भिडले

बिरवाडी : महाड तालुक्यातील श्रीमंत ग्रामपंचायत म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बिरवाडी ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेत सत्ताधारी शिवसेना व काँग्रेस कार्यकर्ते समोरासमोर भिडल्याने गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. एकंदर परिस्थिती लक्षात घेऊन ग्रामसभा अध्यक्ष शिवाजी तांबे यांनी सभा संपविल्याने पुढील अनर्थ टळल्याचे दिसून आले.

बिरवाडी ग्रामपंचायतीची तहकूब ग्रामसभा २३ डिसेंबर रोजी ग्रामपंचायतीच्या क्रांतीसिंह नानासाहेब पुरोहित सभागृहात सकाळी ११ वाजता आयोजित करण्यात आली होती. या ग्रामसभेच्या अध्यक्षस्थानी शिवाजी तांबे यांची निवड करण्यात आली, त्यानंतर मागील ग्रामसभेचे इतिवृत्त वाचून मंजूर करणे, वार्षिक अंदाजपत्रकाला मंजुरी देणे, तंटामुक्त समिती विषय विचारविनिमय करणे व अन्य विषयांवर चर्चा झाली. आयत्या वेळच्या विषयांवर चर्चा सुरू असताना बिरवाडी ग्रामपंचायतीचे माजी सदस्य सचिन बागडे यांनी ग्रामपंचायतीमार्फत नागरिकांना वेळेत दाखले उपलब्ध करून दिले जात नाहीत. या उलट सत्ताधारी शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना ग्रामपंचायतींमधून तत्काळ दाखले मिळतात, असा आक्षेप घेतला. या दरम्यान ग्रामपंचायतीचे माजी सरपंच माधव बागडे यांनी बिरवाडी ग्रामपंचायतीची महिला सरपंच असताना या ठिकाणी काही नागरिक दारू पिऊन येतात दमदाटी करतात, असा प्रकार दुर्दैवी असल्याचे सांगतानाच ग्रामसभेशी निगडित नसलेला विषय सभागृहामध्ये उपस्थित केल्याने काँग्रेस कार्यकर्ते सचिन बागडे व माजी सरपंच माधव बागडे यांच्यात शाब्दिक बाचाबाची सुरू झाली. या गोंधळामध्ये ग्रामपंचायतीच्या सरपंच मेघना माधव बागडे यांनी हस्तक्षेप केल्याने ग्रामसभेचे अध्यक्ष शिवाजी तांबे असताना सरपंचांनी मध्ये बोलू नये, असा आक्षेप सचिन बागडे यांनी घेतल्याने ग्रामसभेमध्ये प्रचंड गोंधळ सुरू झाला. गोंधळाची परिस्थिती नियंत्रणात न आल्याने ग्रामसभेचे अध्यक्ष शिवाजी तांबे यांनी आपले अधिकार वापरून ग्रामसभा समाप्त करीत असल्याचे जाहीर करून या प्रकरणावर पडदा टाकला.रात्रीच्या वेळी रु ग्णांची गैरसोयच्बिरवाडी ग्रामपंचायतीमधील नागरिक केदार धारिया यांनी आपण बिरवाडी ग्रामपंचायतीकडे माहिती अधिकारामध्ये माहिती मागितली असून आपल्याला माहिती उपलब्ध होत नाही, त्यासोबतच दाखले देण्यात दिरंगाई का होते, असा प्रश्न उपस्थित केला.च्यावर उत्तर देताना बिरवाडी ग्रामपंचायतीचे ग्रामविकास अधिकारी नागनाथ घाडगे यांनी नागरिकांना दाखले वेळेत प्राप्त झाले पाहिजेत हा त्यांचा अधिकार असून दाखले घेऊन ग्रामपंचायतीचा कर्मचारी संबंधित व्यक्तीकडे गेला असता ती व्यक्ती उपलब्ध होऊ न शकल्याने दिरंगाई झाली असेल, असे सांगितले.च्तर बिरवाडी ग्रामपंचायतींमधील प्रवीण गायकवाड यांनी खासगी वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून रात्रीच्या वेळी रुग्णांची गैरसोय होत असल्याने याबाबत आरोग्य विभागाकडे पत्रव्यवहार करण्याची मागणी ग्रामसभेमध्ये करून ग्रामसभेच्या ठरावाची प्रत आरोग्यमंत्री आरोग्य विभागाच्या अधिकारी यांना पाठविण्यात यावी, असे नमूद केले.

टॅग्स :Raigadरायगड