शहरं
Join us  
Trending Stories
1
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
2
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
3
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
4
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
5
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
6
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
7
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
8
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
9
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
10
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
11
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
12
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
13
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
14
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
15
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
16
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
17
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
18
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
19
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
20
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!

कृषी, कामगार कायद्याच्या विरोधात शेकापचे रणशिंग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 19, 2020 23:26 IST

२६ नोव्हेंबरला ‘भारत बंद’ची हाक

लोकमत न्यूज नेटवर्करायगड : केंद्रीय कृषी कायद्याविरोधात शेतकरी कामगार पक्ष आक्रमक झाला आहे. केंद्राच्या शेतकरी आणि कामगार कायद्यांना विरोध करण्याचा निर्धार राज्यातील शेतकरी कामगार पक्षासह सर्व शेतकरी संघटनांनी केला आहे. केंद्र सरकारला ठिकाणावर आणण्यासाठी २६ नोव्हेंबरला ‘भारत बंद’ची हाक देण्यात आली आहे, अशी माहिती शेकापचे सरचिटणीस आमदार जयंत पाटील यांनी दिली. याच दिवशी अलिबाग येथील जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे. मोर्चात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहनही त्यांनी केले.

केंद्र सरकारने शेतकरी आणि कामगारांना देशोधडीला लावण्याचा घाट घातला आहे. त्यांचा हा डाव कदापि यशस्वी होऊ दिला जाणार नाही. या कायद्यातील तरतुदी अतिशय भयानक आहेत. सिलिंग रद्द, शेतकरी असण्याची अट रद्द करण्यात आली आहे. शेतकऱ्यांच्या पिकाला हमीभाव दिला जाणार नाही. कृषी उत्पन्न बाजार समित्याच रद्द करण्यात येणार आहेत. याला देशभरातून कडाडून विराेध होणे गरजेचे असल्याकडे त्यांनी लक्ष वेधले. निसर्ग चक्रिवादळात झालेले नुकसान अजूनही भरून देण्यात आलेले नाहीत. कित्येक नुकसानग्रस्त अद्यापि मदतीपासून वंचितच आहेत. झाडनिहाय मदत देतानाही अतिशय अन्याय करण्यात आला आहे, असे सांगून त्यांनी राज्य सरकारवरही टीकेची झोड उठवली. कोरोनामुळे ओढवलेल्या परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी छोट्या-मोठ्या उद्योगांना सरकारने आर्थिक मदत करण्याची गरज आहे. या कालावधीत आलेले भरमसाट वीजबिल पूर्णपणे माफ केलेच पाहिजे, अशी मागणीही आमदार पाटील यांनी केली. अतिवृष्टीत उद्ध्वस्त झालेल्या शेतकऱ्यांनाही पुरेशी नुकसानभरपाई दिलेली नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. योग्य पंचनामे करण्यात आलेले नाहीत. जिल्ह्यात आरोग्य सेवा योग्य नसल्याने अनेकांचे जीव जात असल्याने ही सेवा सुधारण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. रोहा तालुक्यातील प्रस्तावित औद्योगिक कारणांसाठी जमीन खरेदीबाबतही जयंत पाटील यांनी नाराजी व्यक्त करीत स्थानिक भुमिपूत्रांना उध्वस्त करणाऱ्या सरकारच्या धोरणाविरोधात शेकापक्ष ठामपणे उभा राहणार असल्याची ग्वाही दिली. मोर्चा यशस्वी करण्यासाठी गावागावांत बैठका घेऊन वातावरणनिर्मिती करण्याचे आवाहन त्यांनी केले.

याप्रसंगी आमदार बाळाराम पाटील, माजी आमदार सुभाष पाटील, माजी आमदार धैर्यशील पाटील, जिल्हा परिषद अध्यक्षा योगिता पारधी, जिल्हा चिटणीस आस्वाद पाटील, पनवेलचे माजी नगराध्यक्ष जे. एम. म्हात्रे, औरंगाबादचे जिल्हा चिटणीस काका शिंदे, जिल्हा परिषदेेच्या अर्थ व बांधकाम सभापती अ‍ॅड. नीलिमा पाटील, समाजकल्याण सभापती दिलीप भोईर, माजी सभापती प्रमोद पाटील, महिला आघाडीच्या नेत्या नगरसेविका चित्रलेखा पाटील, रायगड बाजारचे अध्यक्ष नृपाल पाटील, अ‍ॅड. प्रसाद पाटील, राजिम बँकेचे उपाध्यक्ष सुरेश खैरे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.