शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
3
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
4
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
5
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
6
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
7
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
8
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
9
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
10
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
11
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
12
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
13
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
14
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
15
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
16
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
17
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात
18
LIC चे तिमाही निकाल जाहीर; नफा 31% ने वाढला अन् ₹10,098 कोटींचा आकडा गाठला...
19
बांगलादेश, नेपाळनंतर आता पाकिस्तानात Gen Z आंदोलन पेटले; शहबाज शरीफ यांच्या सत्तेला हादरा?
20
पार्थ पवारांच्या जमीन व्यवहार प्रश्नावर अजित पवार शांतपणे निघून गेले; पत्रकारांना काहीच उत्तर दिले नाही

चौपदरीकरणाचे काम रखडल्याने शेकाप आक्रमक

By admin | Updated: July 7, 2016 02:30 IST

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम गेल्या काही वर्षांपासून रखडले आहे. पनवेल ते इंदापूर या दरम्यान रस्त्याची दुरवस्था झाली असून पावसामुळे रस्त्यावर प्रचंड

खालापूर : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम गेल्या काही वर्षांपासून रखडले आहे. पनवेल ते इंदापूर या दरम्यान रस्त्याची दुरवस्था झाली असून पावसामुळे रस्त्यावर प्रचंड खड्डे पडले आहेत. त्यामुळे या रस्त्यावरून प्रवास करताना प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. खराब रस्त्यामुळे अपघातांची संख्याही वाढली आहे. या रस्त्याचे काम करण्याची मागणी अनेक वर्षांपासून केली जात असून त्यासाठी आंदोलनेही झाली आहेत. मात्र या रस्त्याचे काम अर्धवट असल्याने शेकापक्ष आक्र मक झाला असून ११ जुलै रोजी शेकापच्या वतीने अनोखे आंदोलन केले जाणार असून पळस्पे ते इंदापूर या दरम्यान मानवी साखळी तयार करून शासनाचा निषेध केला जाणार आहे. माजी आ. विवेक पाटील यांनी खोपोली येथे पत्रकारांशी बोलताना ही माहिती दिली असून या अनोख्या आंदोलनात नागरिकांनीही मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहनही विवेक पाटील यांनी केले आहे.पळस्पे ते इंदापूर या दरम्यानच्या रस्त्याचे चौपदरीकरण काही वर्षांपूर्वी सुरू करण्यात आले. मात्र हे काम अर्धवट असून संथगतीने काम सुरू आहे. मुंबईतून गोव्याला जाण्यासाठी या मार्गाचा वापर केला जातो. सतत गजबजलेल्या या रस्त्यावरून प्रवास करताना वाहन चालक व प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागत असल्याचे विवेक पाटील यांनी सांगितले. पेण, अलिबाग, माणगाव, रोहा, सुधागड, मुरूड या तालुक्यातील रूग्णांना मुंबई किंवा पनवेल येथे उपचारासाठी न्यायचे असेल तर रस्त्यावरील खड्ड्यांमुळे वेळेत रूग्णालयात पोहचता येत नसल्याने अनेकांना प्राण गमवावे लागले आहेत, असेही त्यांनी सांगितले.आघाडी सरकारने सुरू केलेल्या या रस्त्याचे काम सध्याच्या सरकारलाही पूर्ण करता आले नाही हे सरकारचे अपयश असल्याची टीका आ. धैर्यशील पाटील यांनी केली. सरकारचे लक्ष वेधणाररास्ता रोको केल्यानंतर प्रवाशांना त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे शेकापक्षाच्या वतीने ११ जुलै रोजी पळस्पे ते इंदापूर या दरम्यान मानवी साखळी तयार करून शासनाचे लक्ष वेधले जाणार आहे. यावेळी प्रवाशांना थांबवून पाण्याची बाटली व केळी देणार असल्याचेही आ. धैर्यशील पाटील यांनी सांगितले.