शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

चौपदरीकरणाचे काम रखडल्याने शेकाप आक्रमक

By admin | Updated: July 7, 2016 02:30 IST

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम गेल्या काही वर्षांपासून रखडले आहे. पनवेल ते इंदापूर या दरम्यान रस्त्याची दुरवस्था झाली असून पावसामुळे रस्त्यावर प्रचंड

खालापूर : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम गेल्या काही वर्षांपासून रखडले आहे. पनवेल ते इंदापूर या दरम्यान रस्त्याची दुरवस्था झाली असून पावसामुळे रस्त्यावर प्रचंड खड्डे पडले आहेत. त्यामुळे या रस्त्यावरून प्रवास करताना प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. खराब रस्त्यामुळे अपघातांची संख्याही वाढली आहे. या रस्त्याचे काम करण्याची मागणी अनेक वर्षांपासून केली जात असून त्यासाठी आंदोलनेही झाली आहेत. मात्र या रस्त्याचे काम अर्धवट असल्याने शेकापक्ष आक्र मक झाला असून ११ जुलै रोजी शेकापच्या वतीने अनोखे आंदोलन केले जाणार असून पळस्पे ते इंदापूर या दरम्यान मानवी साखळी तयार करून शासनाचा निषेध केला जाणार आहे. माजी आ. विवेक पाटील यांनी खोपोली येथे पत्रकारांशी बोलताना ही माहिती दिली असून या अनोख्या आंदोलनात नागरिकांनीही मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहनही विवेक पाटील यांनी केले आहे.पळस्पे ते इंदापूर या दरम्यानच्या रस्त्याचे चौपदरीकरण काही वर्षांपूर्वी सुरू करण्यात आले. मात्र हे काम अर्धवट असून संथगतीने काम सुरू आहे. मुंबईतून गोव्याला जाण्यासाठी या मार्गाचा वापर केला जातो. सतत गजबजलेल्या या रस्त्यावरून प्रवास करताना वाहन चालक व प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागत असल्याचे विवेक पाटील यांनी सांगितले. पेण, अलिबाग, माणगाव, रोहा, सुधागड, मुरूड या तालुक्यातील रूग्णांना मुंबई किंवा पनवेल येथे उपचारासाठी न्यायचे असेल तर रस्त्यावरील खड्ड्यांमुळे वेळेत रूग्णालयात पोहचता येत नसल्याने अनेकांना प्राण गमवावे लागले आहेत, असेही त्यांनी सांगितले.आघाडी सरकारने सुरू केलेल्या या रस्त्याचे काम सध्याच्या सरकारलाही पूर्ण करता आले नाही हे सरकारचे अपयश असल्याची टीका आ. धैर्यशील पाटील यांनी केली. सरकारचे लक्ष वेधणाररास्ता रोको केल्यानंतर प्रवाशांना त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे शेकापक्षाच्या वतीने ११ जुलै रोजी पळस्पे ते इंदापूर या दरम्यान मानवी साखळी तयार करून शासनाचे लक्ष वेधले जाणार आहे. यावेळी प्रवाशांना थांबवून पाण्याची बाटली व केळी देणार असल्याचेही आ. धैर्यशील पाटील यांनी सांगितले.