शहरं
Join us  
Trending Stories
1
उज्ज्वला थिटेंना झटका! राजन पाटलांच्या सुनबाईच अनगरच्या नगराध्यक्ष होणार, न्यायालयात नेमके काय घडले?
2
'ब्लॅक फ्रायडे' म्हणजे काळा शुक्रवार...! मग भरमसाठ डिस्काऊंट देऊन साजरा का करतात कंपन्या...? 
3
Travel : कोल्डड्रिंकपेक्षाही स्वस्त पेट्रोल, इतर गोष्टीही खिशाला परवडणाऱ्या; भारतीयांसाठी व्हिसा फ्री आहे 'हे' बेट!
4
दत्त जयंती २०२५: श्री स्वामी समर्थ चरित्र सारामृत पारायण कसे कराल? पाहा, नियम-योग्य पद्धत
5
हर्बालाइफचा नवा 'लिफ्ट ऑफ' – शून्य साखर असलेलं, ऊर्जा देणारं इफर्व्हेसंट ड्रिंक, तुमचा दिवस बनवा अधिक जोमदार 
6
बिहार काँग्रेसच्या पराभवाची फाईल दिल्लीत उघडणार; ६१ उमेदवार जिल्हावार अहवाल सादर करणार
7
भारताला २० वर्षांनी पुन्हा मान! शताब्दी 'राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा २०३०' चे यजमानपद या शहराच्या पारड्यात...
8
मोठी बातमी! २ कोटी लोकांचे आधार क्रमांक कायमचे बंद झाले; UIDAI ने सुरु केली मोहिम...
9
Cyclone Senyar: 'सेन्यार'ने वेग घेतला! दक्षिण आणि पूर्व किनाऱ्यावर ७२ तास राहणार मोठा धोका
10
Pune Crime: "तिच्या बेडरुममध्ये झोपवलं आणि..."; कोल्हापुरातील व्यक्तीसोबत पुण्यातील महिलेने काय काय केलं?
11
१० रुपयांपेक्षाही कमी किंमतीच्या शेअरची कमाल, झटक्यात २०% वाढला भाव; खरेदीसाठी गुंतवणूकदारांची झुंबड
12
सात जन्माच्या साथीदारानेच केली क्रूरता! पतीमुळे ४ वर्षांच्या चिमुकल्याची आई ९ महिने तडफडत राहिली.. 
13
निवडणूक अधिकाऱ्यांना धोका, आयोगाने बंगाल पोलिसांना पत्र लिहिले; त्या घटनेची आठवून करून दिली
14
सोनिया जी, राहुल जी आन् मी..., कर्नाटक सत्तासंघर्षावर खर्गेंचे मोठे सेंकत! पुढचे 48 तास महत्वाचे; "200% 'तेच' CM होणार"
15
कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय; रेअर अर्थ मॅग्नेट उत्पादनाला भारतात मोठी गती मिळणार
16
मायक्रोसॉफ्टचा बाजार उठणार की काय? गुगल कॉम्प्युटर, लॅपटॉपसाठी आणतेय ऑपरेटिंग सिस्टीम...
17
टीम इंडियाचा दबदबा संपत चाललाय, काही जण तर..; लाजिरवाण्या पराभवानंतर हर्षा भोगलेंनी सुनावलं
18
पंडित देशमुख खुनाचा मुद्दा २० वर्षांनंतर प्रचारात, मोहोळच्या देशमुखांसोबत काय घडलं होतं?
19
'थोडी वाट पाहा, फोन करतो', मुख्यमंत्री बदलाच्या चर्चेदरम्यान राहुल गांधींचा डीके शिवकुमार यांना मेसेज
20
एकनाथ शिंदे सत्ता मिळवून दिघे साहेबांचे स्वप्न साकारणार की गणेश नाईक पुन्हा दूर ठेवणार?
Daily Top 2Weekly Top 5

रायगडमध्ये गंभीर स्वरूपाचे दिवसाला सात ते आठ रुग्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 6, 2021 00:29 IST

जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांचे प्रमाण सध्या कमी 

निखिल म्हात्रेलोकमत न्यूज नेटवर्क अलिबाग :  कोरोना विषाणूची दुसरी लाट रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनासह आरोग्य विभागाला काही प्रमाणात यश आले असले, तरी दमा, हायपर टेन्शन, हृदय विकाराच्या आजारांनी डोके वर काढले आहे. दिवसाला सात ते आठ गंभीर स्वरूपाचे रुग्ण उपचार करून घेण्यासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल होत आहेत. कोरोनाबाधित रुग्णांचे प्रमाण सध्या कमी झाले आहे.

    ताणतणाव, चुकीचा आहार आणि आरामदायी जीवनशैली यांच्यामुळे आज समाजात हृदयविकाराची समस्या झपाट्याने वाढत चालली आहे. आजारातून बरे होण्यासाठी रुग्णाला काही माहिती देणे ही प्राथमिक अवस्था असली, तरी चुकीची माहिती देणे किंवा अनावश्यक माहिती फार मोठ्या प्रमाणावर देण्यातून रुग्णाचे नुकसानच अधिक होऊ शकते. विशेषतः सध्याच्या परिस्थितीत, कोरोना साथीच्या निमित्ताने कोणती औषधे घ्यावीत, रोग कसा टाळावा, त्याची लक्षणे अशा माहितीची देवाण-घेवाण प्रचंड प्रमाणात होत आहे. अशा प्रसंगी, हृदयविकाराची खरी लक्षणे ओळखणे, उच्च रक्तदाबाचा धोका कोणता आणि त्यामध्ये कोरोनाचा संबंध कसा येतो, याविषयी खरी माहिती रुग्णांना मिळणे आवश्यक आहे. सततच्या बदलत्या हवामानामुळे थंडी-तापासह घसादुखी आणि खोकला यांची तक्रार करणाऱ्या रुग्णांची संख्या वाढल्याचे दिसते. हे आजार गंभीर नसले, तरी याकडे दुर्लक्ष केल्याने त्यांची लागण इतरांनाही होऊन रुग्णांमध्ये वाढ होण्याची भीती असल्याचे डॉक्टर सांगतात. 

यंदा हवामान बदलामुळे वाढली रोगराई यंदा हवामानाच्या या बदलत्या वेळापत्रकामुळे रोगराई वाढली आहे. घसादुखी, खोकला यांसारखे आजार सामान्य असल्याने घाबरून जाऊ नये. मात्र, केवळ घरगुती उपायांवर अवलंबून न राहता, गांभीर्य ओळखून वैद्यकीय सल्ला घेतल्यास आजार आटोक्यात येतो, अशी प्रतिक्रिया जिल्हा सामान्य रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी डाॅ.राजीव तंबाळे यांनी दिली आहे.