शहरं
Join us  
Trending Stories
1
"युद्धाला सुरुवात झालीय, आता कोणतीही दया नाही"; खामेनींनी इस्रायलविरुद्ध केली युद्धाची घोषणा
2
तुकोबांच्या पालखीचे आज प्रस्थान, कोणत्या ठिकाणी कधी पोहोचणार? A टू Z माहिती
3
Team India, IND vs ENG: इंग्लंडविरूद्धच्या पहिल्या कसोटीत 'या' तिघांचा Playing XI मधून होणार पत्ता कट, कॅप्टन गिल मोठा निर्णय घेणार
4
"हवे ते निर्बंध लादून दहशतवाद्यांना पाठिंबा देणाऱ्या देशांना बक्षीस देता, दुटप्पीपणा चालणार नाही"; PM मोदींचा इशारा
5
Air India Plane Crash: 'टेकऑफसाठी जास्त वेळ अन् ओव्हरलोडिंग', माजी वैमानिकाने दोन मुद्द्यांवर ठेवलं बोट
6
अनेक तर्कवितर्कांनंतर अखेर पंतप्रधान मोदी आणि कॅनडाच्या पंतप्रधानांची भेट, चर्चेत झाला मोठा निर्णय   
7
Sant Tukaram Maharaj palkhi 2025: 'ज्ञानोबा तुकाराम'चा जयघोष; तुकोबांच्या पालखी प्रस्थानासाठी देहूनगरी सज्ज
8
सलग दुसऱ्या दिवशी शेअर बाजार 'धडाम'; Sensex २६९ अंकांच्या घसरणीसह उघडला, 'या' वृत्तानं दिलं टेन्शन
9
Air India: एअर इंडिया ड्रीमलाइनरची जगभरातील सहा उड्डाणे रद्द
10
२५,३०,३५ किती वर्षांचे आहात तुम्ही; रिटायरमेंटवर ५ कोटी हवे असतील तर केव्हापासून, किती करावी लागेल गुंतवणूक?
11
राज्यात हिंदीची सक्ती नाही, पण सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी अनिवार्य!
12
Supreme Court: मुंबईविषयी तुम्हाला काही तरी वाटू द्या, अन्यथा तिथे सर्वत्र अतिक्रमण होईल- सर्वोच्च न्यायालय
13
Purushottam Chavan: पुरुषोत्तम चव्हाण यांच्या अडचणीत वाढ!
14
आजचे राशीभविष्य - १८ जून २०२५, खूप मोठा आर्थिक लाभ होईल, सामाजिक स्तरावर यश आणि कीर्ती वाढेल
15
ठाणे, रायगडमधील अनेक पूल बनले धोकादायक!
16
आजचा अग्रलेख: तेलाचा भडका निश्चित!
17
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
18
Stamp Duty: मुद्रांक शुल्कात ४५ कोटी रुपयांची सवलत!
19
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
20
Ahmedabad Plane Crash: कॅप्टन सुमित सभरवाल यांच्यावर अंत्यसंस्कार!

रायगडमध्ये गंभीर स्वरूपाचे दिवसाला सात ते आठ रुग्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 6, 2021 00:29 IST

जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांचे प्रमाण सध्या कमी 

निखिल म्हात्रेलोकमत न्यूज नेटवर्क अलिबाग :  कोरोना विषाणूची दुसरी लाट रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनासह आरोग्य विभागाला काही प्रमाणात यश आले असले, तरी दमा, हायपर टेन्शन, हृदय विकाराच्या आजारांनी डोके वर काढले आहे. दिवसाला सात ते आठ गंभीर स्वरूपाचे रुग्ण उपचार करून घेण्यासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल होत आहेत. कोरोनाबाधित रुग्णांचे प्रमाण सध्या कमी झाले आहे.

    ताणतणाव, चुकीचा आहार आणि आरामदायी जीवनशैली यांच्यामुळे आज समाजात हृदयविकाराची समस्या झपाट्याने वाढत चालली आहे. आजारातून बरे होण्यासाठी रुग्णाला काही माहिती देणे ही प्राथमिक अवस्था असली, तरी चुकीची माहिती देणे किंवा अनावश्यक माहिती फार मोठ्या प्रमाणावर देण्यातून रुग्णाचे नुकसानच अधिक होऊ शकते. विशेषतः सध्याच्या परिस्थितीत, कोरोना साथीच्या निमित्ताने कोणती औषधे घ्यावीत, रोग कसा टाळावा, त्याची लक्षणे अशा माहितीची देवाण-घेवाण प्रचंड प्रमाणात होत आहे. अशा प्रसंगी, हृदयविकाराची खरी लक्षणे ओळखणे, उच्च रक्तदाबाचा धोका कोणता आणि त्यामध्ये कोरोनाचा संबंध कसा येतो, याविषयी खरी माहिती रुग्णांना मिळणे आवश्यक आहे. सततच्या बदलत्या हवामानामुळे थंडी-तापासह घसादुखी आणि खोकला यांची तक्रार करणाऱ्या रुग्णांची संख्या वाढल्याचे दिसते. हे आजार गंभीर नसले, तरी याकडे दुर्लक्ष केल्याने त्यांची लागण इतरांनाही होऊन रुग्णांमध्ये वाढ होण्याची भीती असल्याचे डॉक्टर सांगतात. 

यंदा हवामान बदलामुळे वाढली रोगराई यंदा हवामानाच्या या बदलत्या वेळापत्रकामुळे रोगराई वाढली आहे. घसादुखी, खोकला यांसारखे आजार सामान्य असल्याने घाबरून जाऊ नये. मात्र, केवळ घरगुती उपायांवर अवलंबून न राहता, गांभीर्य ओळखून वैद्यकीय सल्ला घेतल्यास आजार आटोक्यात येतो, अशी प्रतिक्रिया जिल्हा सामान्य रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी डाॅ.राजीव तंबाळे यांनी दिली आहे.