शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
4
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
5
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
6
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
7
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
8
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
9
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
10
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
11
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!

खंडित वीजपुरवठ्यावर तोडगा काढण्याच्या सूचना , आपत्ती नियंत्रणासाठी चार कक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 8, 2018 05:18 IST

गेल्या काही दिवसांपासून परिसरात सातत्याने वीजपुरवठा खंडित होत आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. गतवर्षी अशाच प्रकारे वीजपुरवठा खंडित होत असल्याने संतप्त नागरिकांनी वीज वितरणच्या कार्यालयाची तोडफोड केली होती.

मुरुड जंजिरा : गेल्या काही दिवसांपासून परिसरात सातत्याने वीजपुरवठा खंडित होत आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. गतवर्षी अशाच प्रकारे वीजपुरवठा खंडित होत असल्याने संतप्त नागरिकांनी वीज वितरणच्या कार्यालयाची तोडफोड केली होती. या घटनेची पुनरावृत्ती होऊ नये, यासाठी वीज मंडळाने परिसरातील वीजसमस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढावा, त्यासाठी मनुष्यबळाचा अभाव असल्यास वरिष्ठ कार्यालयाशी पत्रव्यवहार करावा, अशा सूचना तहसीलदार उमेश पाटील यांनी आपत्ती व्यवस्थापनाच्या सभेत दिल्या आहेत.मुरुड तहसील कार्यालयात तहसीलदार पाटील यांच्या दालनात विविध खात्यांमधील अधिकारीवर्गाची आपत्ती व्यवस्थपनाबाबत सभा घेण्यात आली होती. या वेळी वीज मंडळाचे शहर विभागाचे अभियंता सूरज आंबुर्ले, गटशिक्षण अधिकारी मेघना धायगुडे, कृषी अधिकारी नारायण गोसावी, मत्सविकास अधिकारी रत्नाकर राजम, तसेच खार बंदिस्ती अधिकारी, सार्वजनिक बांधकाम खाते आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.पावसाळा आला की, वीज खंडित होण्याचे प्रमाण वाढते, याबाबत नेमके कारणही वीजग्राहकांना दिले जात नाही. शिवाय, वीज किती वेळात येणार याबाबतही कर्मचाऱ्यांकडून माहिती दिली जात नाही, बँक, कार्यालयांतील व्यवहार ठप्प होत असल्याने नागरिकांची गैरसोय होत असल्याचेही पाटील यांनी सांगितले.बैठकीत जीर्ण इमारती, धोकादायक शाळांना नोटीस बजावा, सार्वजनिक बांधकाम खात्याने कुठे झाड अथवा दरड कोसळल्यास जेसीपी तयार ठेवण्याच्या सूचनाही या वेळी दिल्या. आपत्ती व्यवस्थापनासाठी मुरु ड तालुक्यात चार नियंत्रण कक्ष तयार करण्यात आले आहेत. तहसील कार्यालय, पंचायत समिती, मुरुड नगरपरिषद व मुरुड पोलीस ठाणे यांच्या सर्व अधिकारीवर्गाला त्यांचे दूरध्वनी क्रमांक देण्यात आले आहेत.

टॅग्स :Raigadरायगड