शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदींना मिळाला त्रिनिदाद आणि टोबॅगोचा सर्वोच्च नागरी सन्मान; म्हणाले, "आपल्या नात्यात क्रिकेटचा रोमांच अन्..."
2
ENG vs IND 2nd Test Day 3 : 'त्या' दोघांनी दमवलं; तिसऱ्या दिवसाअखेर टीम इंडियानं १ विकेटही गमावली, पण...
3
"मी शेवटी 'जय गुजरात' म्हणालो कारण..."; एकनाथ शिंदे यांनी दिलं स्पष्टीकरण; ठाकरेंनाही डिवचलं...
4
मोठा दावा...! इराणवरील हल्ल्यानंतर कुठे गायब झाले अमेरिकेचे B-2 बॉम्बर विमान? एकाचे इमर्जन्सी लंडिंग अन्...
5
"मसूद अझहर कुठे? माहित नाही, भारतानं माहिती दिली तर..."; बिलावल भुट्टोंच्या विधानावर कुणाचाच विश्वास बसणार नाही
6
बेशुद्ध करणाऱ्या कोणत्याही स्प्रे चा वापर झाला नाही; कोंढवा अत्याचार प्रकरणात धक्कादायक खुलासा
7
"तीन दिवस एकच 'अंडरवेअर' अन्..."; पत्नीनं विचित्र कारणं सांगत पतीला पाठवलं 'डायव्हर्स लेटर', होतंय तुफान व्हायरल 
8
छोट्याखानी खेळीसह यशस्वी जैस्वालचा मोठा धमाका! द्रविड,सेहवाग अन् गंभीरच्या विक्रमाशी बरोबरी
9
कोंढवा बलात्कार प्रकरणात मोठा ट्विस्ट; ‘तो’ कुरिअर बॉय नसून तरुणीचा मित्र, अनेक धक्कादायक बाबी समोर
10
DSP सिराजचा 'सिक्सर' अन् आकाश दीपचा 'चौकार'! इंग्लंडचा संघ ४०७ धावांवर All Out
11
"कोण दुटप्पी? हे मराठी माणसाला लक्षात येतं...!"; ठाकरेंच्या विजयी मेळाव्यावर फडणवीसांची खरमरीत टीका, स्पष्टच बोलले
12
‘जय गुजरात’ म्हटलं म्हणजे शिंदेंचे महाराष्ट्रावरील प्रेम कमी झालं का? मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना सवाल
13
"देशाला दिशा देणाऱ्या महाराष्ट्रात वाढत्या शेतकरी आत्महत्या भूषणावह नाहीत"; काँग्रेसचे टीकास्त्र
14
देशाच्या आरोग्याचे बजेट ३७ हजार कोटींवरून १ लाख कोटींवर नेण्याचे काम पंतप्रधान मोदींनी केले - अमित शाह
15
“नोंदणीचा ‘एक टक्का’ निधी थेट स्थानिक स्वराज्य संस्थांना देण्याचा विचार”: चंद्रशेखर बावनकुळे
16
'पंत तूने क्या किया!' कॅच नव्हे त्यानं टीम इंडियाला टेन्शन फ्री करण्याची संधी सोडली
17
"ते नेमकं काय म्हणाले माहित नाही, मी..."; एकनाथ शिंदेंच्या 'जय गुजरात'वर अजित दादांची पहिली प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
18
नीचभंग दशांक योग: ८ राशींना पद-पैसा-लाभ, ४ ग्रहांची साथ; विठ्ठलाचे वरदान, शुभ-कल्याणच होईल!
19
‘जय गुजरात’वरून टीका; शिंदे गटाच्या नेत्यांनी उद्धव ठाकरेंचा ‘तो’ व्हिडिओच दाखवला, दिले उत्तर
20
महाराष्ट्रात मराठी शिकण्याचा आग्रह करू शकतो, पण दुराग्रह करू शकत नाही- CM देवेंद्र फडणवीस

मुंबई-गोवा महामार्गाची सुरक्षा धोक्यात

By admin | Updated: August 29, 2015 22:13 IST

मुंबई - गोवा महामार्ग सुरळीत ठेवण्यासाठी पळस्पे ते रत्नागिरी, सिंधुदुर्गपर्यंत महामार्गावर २५ वर्षांपूर्वी ७ वाहतूक शाखेची निर्मिती करण्यात आली. मात्र सध्या महामार्ग महाड वाहतूक

दासगाव : मुंबई - गोवा महामार्ग सुरळीत ठेवण्यासाठी पळस्पे ते रत्नागिरी, सिंधुदुर्गपर्यंत महामार्गावर २५ वर्षांपूर्वी ७ वाहतूक शाखेची निर्मिती करण्यात आली. मात्र सध्या महामार्ग महाड वाहतूक शाखेची अवस्था बिकट झाली असून या ठिकाणी तीन अधिकारी व ३३ कर्मचारी अशी नेमणूक असताना फक्त चार कर्मचारी काम करत असल्याने ते सध्या पुरेशी सेवा देऊ शकत नाही. यामुळे सध्या महामार्ग महाड वाहतूक शाखेअंतर्गत असणाऱ्या विभागाची सुरक्षा धोक्यात आली आहे.मुुंबई - गोवा महामार्गावर पळस्पे, वाकण, महाड, कशेडी, चिपळूण, हात खांबा, कसाल या ५०० किलोमीटर अंतरावर महामार्ग पोलीस वाहतूक शाखेची निर्मिती करत या ठिकाणी महामार्गालगत चौक्या उभारण्यात आल्या. महामार्गावर वाढती वाहतूक, होणारे अपघात व येणाऱ्या इतर अडचणी दूर करण्यासाठी या शाखांची निर्मिती करण्यात आली. मात्र गेले वर्षभर या ठिकाणी फक्त १ अधिकारी व १४ कर्मचारी काम करीत आहेत. पोलीस महामार्ग महाड शाखेतून १ अधिकारी व ८ कर्मचारी नाशिक कुंभमेळ्याच्या बंदोबस्तासाठी गेले आहेत तर १ कर्मचारी पनवेल कार्यालयात काम करत असून १ कर्मचारी रजेवर आहे. अशा या बिकट परिस्थितीत महाड वाहतूक शाखेत फक्त ४ कर्मचारी २४ तास सेवा देत आहेत. याबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता मात्र ते रजेवर असल्याने संपर्क होऊ शकला नाही. महामार्गाच्या सुरक्षेसाठी पुरेसा कर्मचारीवर्ग आवश्यक असल्याचे वाहनचालकांचे म्हणणे आहे.१० सप्टेंबरपासून लाखो गाड्यांची वर्दळयेत्या १७ सप्टेंबरपासून गणपती हा सण कोकणात सुरु होणार आहे. १० सप्टेंबरपासूनच लाखो गाड्यांची वर्दळ या महामार्गावर सुरु राहणार आहे, असे असताना महामार्ग मध्य वाहतूक शाखेत ४ कर्मचारी काम करत असल्याची खंत व्यक्त करण्यात येत आहे. अशा परिस्थितीत हे चार कर्मचारी शाखा सांभाळतील की महामार्गावर लोकांना सेवा देतील हा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.