शहरं
Join us  
Trending Stories
1
लंडनमध्ये १ लाखाहून अधिक स्थलांतर विरोधी निदर्शक रस्त्यावर उतरले, अनेक पोलिसांवर हल्ला
2
आशिया चषकात दुबईच्या मैदानावर आज भारत-पाकिस्तान हायव्होल्टेज द्वंद्व
3
एसईबीसी आरक्षणावर काय परिणाम होईल? मराठा आरक्षणावरील नव्या जीआरबाबत हायकोर्टाची राज्य सरकारला विचारणा
4
हिंसाचार सोडा, शांतीचा मार्ग स्वीकारा; मणिपूरला शांततेचे प्रतीक बनवू ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आवाहन
5
अमेरिकेनं ओसामा संपवला, पण त्याच्या बायकांचं काय झालं? पाकिस्तानच्या माजी राष्ट्रपतीच्या सहकाऱ्यानं सागितलं
6
IND vs PAK: गंभीरनं टीम इंडियातील खेळाडूंना स्पष्ट सांगितलंय की...; सहाय्यक कोच नेमकं काय म्हणाले?
7
याला म्हणतात 'दृढनिश्चय'...! मणिपूरमध्ये पाऊस बनला अडथळा, मग पंतप्रधान मोदींनी 'हा' मार्ग अवलंबला! 
8
Asia Cup 2025 Points Table : भारत-पाक लढतीआधी लंकेची विजयी सलामी! तरीही अफगाणिस्तान ठरले भारी!
9
नेपाळ हिंसाचारासंदर्भात CM योगी आदित्यनाथ यांचं मोठं विधान; म्हणाले - "छोट्या-छोट्या गोष्टींकडे..."
10
BAN vs SL : श्रीलंकेचा डंका! एका पराभवासह बांगलादेश संघ स्पर्धेतून OUT होण्याच्या उंबरठ्यावर
11
चार दिवसांत थंड व्हाल, हिंम्मत असेल तर कारागृहात पाठवून दाखवा; प्रशांत किशोर यांचं संजय जायसवाल यांना आव्हान
12
२०७ खुनाचा आरोप, तिला पकडण्यासाठी होते २ कोटींचे इनाम ! पण तिच्या 'या' निर्णयाने तिलाच मिळतील २५ लाख
13
कमाल झाली! हसरंगाचा बॉल स्टंपला लागला, पण नशिबाच्या जोरावर बॅटर Not Out राहून चमकला (VIDEO)
14
शेअर असावा तर असा...! 5 वर्षांत लखपतींना केलं करोडपती; TV-AC अन् वॉशिंग मशीन तयार करते कंपनी
15
"होय, मतचोरी झाली !" मत चोरीतूनच भाजप सत्तेत; काँग्रेसच्या आरोपाला नक्षल्यांचे समर्थन
16
Women's Asia Cup 2025 Final : भारताची फायनलमध्ये धडक! चीनचा हिशोब चुकता करुन इतिहास रचण्याची संधी
17
IND vs PAK Head To Head Record : पाकचा नवा डाव; पण टीम इंडियाविरुद्ध फिकी ठरेल त्यांची ही चाल, कारण...
18
लाईफबॉय साबण ८, डव शाम्पू ५५, टूथपेस्ट १६ रुपयांनी स्वस्त झाली; हिंदुस्तान युनिलिव्हरची यादी आली...   
19
आता पश्चाताप करून काय उपयोग? रोखण्याचा प्रयत्न करूनही तरुणीनं खोल पाण्यात उडी घेतली; थरकाप उडवणारा VIDEO
20
सासऱ्यावर गोळी झाडली, स्वतःला वाचवण्यासाठी पळत सुटला अन् पुराच्या पाण्यात पडला जावई! पुढे जे झालं...

समुद्रकिनारी ४० कोटींचे बंधारे

By admin | Updated: November 18, 2015 00:50 IST

श्रीवर्धन तालुक्यातील दिवेआगर समुद्र किनारी सुमारे ४० कोटी रुपये खर्चून दगडी बंधारा बांधण्याचे काम पतन विभागामार्फत लवकरच हाती घेण्यात येणार आहे. समुद्राचे पाणी अडविण्यासाठी

- आविष्कार देसाई,  अलिबागश्रीवर्धन तालुक्यातील दिवेआगर समुद्र किनारी सुमारे ४० कोटी रुपये खर्चून दगडी बंधारा बांधण्याचे काम पतन विभागामार्फत लवकरच हाती घेण्यात येणार आहे. समुद्राचे पाणी अडविण्यासाठी तसेच पर्यटकांच्या सुविधेसाठीही त्याचा वापर करता येणार आहे. दिवेआगर हे सांसद आदर्श ग्राम म्हणून गणले जात असतानाच पर्यटन वृध्दीने तालुक्याचा आर्थिक कायापालट करण्यास हे बंधारे मैलाचे दगड ठरण्याची शक्यता आहे. रायगड जिल्ह्याला लाभलेले विस्तृत समुद्र किनारे आणि तेथील नारळी-पोफळीच्या बागांनी निसर्गाचे सौंदर्य आणखीन खुलून दिसते. अलिबाग, मुरुड आणि श्रीवर्धन तालुक्याला विस्तृत समुद्र किनारे लाभले असल्याने पर्यटकांना नेहमीच ते आकर्षित करीत आले आहेत.तत्कालीन पालकमंत्री सुनील तटकरे यांनी दिवेआगरच्या रूपनारायण मंदिराला नवे रूप दिले होते. त्याचप्रमाणे श्रीवर्धन समुद्र किनारी कोट्यवधी रुपये खर्च करून सुशोभीकरण केले आहे. या सोयी-सुविधांमुळे येथील पर्यटन व्यवसायाला चांगलीच झळाळी प्राप्त झाली. अवजड उद्योगमंत्री अनंत गीते यांनी लोकसभेच्या निवडणुकीत तटकरेंचा पराभव केला होता. दिवेआगर हे गाव आदर्श सांसद ग्राम योजनेअंतर्गत दत्तक घेतले आहे. त्यामुळे तटकरेंनी विकास केला त्याहीपेक्षा जास्त विकास करण्यावर गीतेंचा भर राहिल्यास तो स्थानिकांच्या पथ्यावर पडणाराच आहे. ग्रामस्थांच्या तक्रारीनंतर गीतेंनी दिवेआगरच्या समुद्र किनारी भेट दिली होती. त्यावेळी तेथील काही दगडी बंधारे तुटलेले, सरकलेले दिसून आले. या बंधाऱ्यांची तातडीने चांगली निर्मिती करावी यासाठी प्रयत्न सुरु केले. पतन विभागाने येथील समुद्र किनाऱ्यांची पाहणी केली. सुमारे चार किलोमीटरचे बंधारे निर्माण करण्याची गरज असल्याचा अहवाल पतन विभागाने दिला. यासाठी ४० कोटी रुपये खर्च येणार आहे.समुद्र किनाऱ्यांच्या बंधाऱ्याचे काम पूर्वी पतन विभाग करीत होते. दरम्यानच्या कालावधीत १ एप्रिल २०११ ला हे काम मेरीटाईम बोर्डाकडे देण्यात आले होते. सरकारने २५ मे २०१५ ला हे काम पुन्हा पतन विभागाकडे वर्ग करण्याचे जाहीर केल्याचे पतन उपअभियंता विजय जावीर यांनी सांगितले.१० कोटी रुपये खर्च पहिल्या टप्प्यामध्ये दिवेआगर येथील एक हजार २५० मीटरचा बंधारा बांधण्यासाठी १० कोटी रुपये खर्च येणार आहे. उर्वरित कामासाठी आणखीन ३० कोटी रुपयांची गरज लागणार असल्याचे पतन उपअभियंता विजय जावीर यांनी सांगितले.निधीची तरतूद लवकर गरजेचीयेथील बंधारे लवकरच निर्माण झाल्याने समुद्राच्या पाण्यापासून संरक्षण होऊन ते बंधारे पर्यटकांच्या सुविधेसाठीही वापरता येणार आहेत. यासाठी सरकारने निधीची तरतूद लवकर करणे गरजेचे असल्याचे येथील स्थानिक सिध्देश शिलकर यांनी सांगितले.सरकारकडे निधीची कमतरता असल्याने बंधाऱ्याचे काम टप्प्याटप्प्याने करण्यात येणार आहे. बंधाऱ्यांमुळे समुद्राचे पाणी अडविले जाणार आहेच तसेच त्या बंधाऱ्यांचा पर्यटकांनाही वापर करता येणार आहे. त्यामुळे पर्यटन वृध्दीसाठी ते पोषक आहे.- अनंत गीते, केंद्रीय अवजड उद्योगमंत्री