शहरं
Join us  
Trending Stories
1
जागांवर तडजोड नाही, शिंदेसेना ठाम, भाजपाही मागे हटेना; अहिल्यानगरमध्ये महायुतीत फूट पडणार?
2
"आता टॅरिफ माझा 5वा आवडता शब्द...!"; असं का म्हणाले डोनाल्ड ट्रम्प? अमेरिकेसाठी केली मोठी घोषणा
3
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
4
Google नं पहिल्यांदाच आणलं क्रेडिट कार्ड, लगेच मिळणार कॅशबॅक आणि रिवॉर्ड; काय आहे खास?
5
Mumbai Crime: शीतपेयातून गुंगीचा पदार्थ, मुंबईत अल्पवयीन मुलींवर ४५ वर्षाच्या व्यक्तीने...; व्हिडीओही बनवला
6
Post Office ची धमाल स्कीम, व्हाल मालामाल; मॅच्युरिटीवर मिळतील ४० लाख रुपये, किती गुंतवणूक करावी लागणार?
7
Tarot Card: 'ऐकावे जनाचे, करावे मनाचे' याची प्रचिती देणारा आठवडा; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य 
8
Dollar vs Rupee: RBI च्या मोठ्या निर्णयानं परिस्थिती बदलली, ९१ पार गेलेला रुपया ८९ पर्यंत आला, नक्की काय केलं?
9
मतदारांना पैसे वाटप, EVM मध्ये छेडछाड अन् बोगस मतदार; सत्ताधाऱ्यांनी काढले एकमेकांचे वाभाडे
10
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
11
तुफान राडा! असं काय झालं की सुरक्षा रक्षकांनी ५० लाखांची मर्सिडीज फोडली; व्हायरल व्हिडीओतील घटना काय?
12
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
13
"वडिलांप्रमाणेच मलाही पुरस्कार आवडतात...", सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा अवॉर्ड मिळाल्यानंतर आर्यन खानची प्रतिक्रिया
14
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
15
"पहिल्यांदाच लेकाला सोडून शहराबाहेर आलोय..." विकी कौशलची भावुक प्रतिक्रिया
16
संजूची डोळ्यांचं पारणं फेडणारी फटकेबाजी! थेट कॉमेंट्री बॉक्समधून शास्त्रींचा आगरकर-गंभीर जोडीला सवाल (VIDEO)
17
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
18
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
19
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
20
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

समुद्रकिनारी ४० कोटींचे बंधारे

By admin | Updated: November 18, 2015 00:50 IST

श्रीवर्धन तालुक्यातील दिवेआगर समुद्र किनारी सुमारे ४० कोटी रुपये खर्चून दगडी बंधारा बांधण्याचे काम पतन विभागामार्फत लवकरच हाती घेण्यात येणार आहे. समुद्राचे पाणी अडविण्यासाठी

- आविष्कार देसाई,  अलिबागश्रीवर्धन तालुक्यातील दिवेआगर समुद्र किनारी सुमारे ४० कोटी रुपये खर्चून दगडी बंधारा बांधण्याचे काम पतन विभागामार्फत लवकरच हाती घेण्यात येणार आहे. समुद्राचे पाणी अडविण्यासाठी तसेच पर्यटकांच्या सुविधेसाठीही त्याचा वापर करता येणार आहे. दिवेआगर हे सांसद आदर्श ग्राम म्हणून गणले जात असतानाच पर्यटन वृध्दीने तालुक्याचा आर्थिक कायापालट करण्यास हे बंधारे मैलाचे दगड ठरण्याची शक्यता आहे. रायगड जिल्ह्याला लाभलेले विस्तृत समुद्र किनारे आणि तेथील नारळी-पोफळीच्या बागांनी निसर्गाचे सौंदर्य आणखीन खुलून दिसते. अलिबाग, मुरुड आणि श्रीवर्धन तालुक्याला विस्तृत समुद्र किनारे लाभले असल्याने पर्यटकांना नेहमीच ते आकर्षित करीत आले आहेत.तत्कालीन पालकमंत्री सुनील तटकरे यांनी दिवेआगरच्या रूपनारायण मंदिराला नवे रूप दिले होते. त्याचप्रमाणे श्रीवर्धन समुद्र किनारी कोट्यवधी रुपये खर्च करून सुशोभीकरण केले आहे. या सोयी-सुविधांमुळे येथील पर्यटन व्यवसायाला चांगलीच झळाळी प्राप्त झाली. अवजड उद्योगमंत्री अनंत गीते यांनी लोकसभेच्या निवडणुकीत तटकरेंचा पराभव केला होता. दिवेआगर हे गाव आदर्श सांसद ग्राम योजनेअंतर्गत दत्तक घेतले आहे. त्यामुळे तटकरेंनी विकास केला त्याहीपेक्षा जास्त विकास करण्यावर गीतेंचा भर राहिल्यास तो स्थानिकांच्या पथ्यावर पडणाराच आहे. ग्रामस्थांच्या तक्रारीनंतर गीतेंनी दिवेआगरच्या समुद्र किनारी भेट दिली होती. त्यावेळी तेथील काही दगडी बंधारे तुटलेले, सरकलेले दिसून आले. या बंधाऱ्यांची तातडीने चांगली निर्मिती करावी यासाठी प्रयत्न सुरु केले. पतन विभागाने येथील समुद्र किनाऱ्यांची पाहणी केली. सुमारे चार किलोमीटरचे बंधारे निर्माण करण्याची गरज असल्याचा अहवाल पतन विभागाने दिला. यासाठी ४० कोटी रुपये खर्च येणार आहे.समुद्र किनाऱ्यांच्या बंधाऱ्याचे काम पूर्वी पतन विभाग करीत होते. दरम्यानच्या कालावधीत १ एप्रिल २०११ ला हे काम मेरीटाईम बोर्डाकडे देण्यात आले होते. सरकारने २५ मे २०१५ ला हे काम पुन्हा पतन विभागाकडे वर्ग करण्याचे जाहीर केल्याचे पतन उपअभियंता विजय जावीर यांनी सांगितले.१० कोटी रुपये खर्च पहिल्या टप्प्यामध्ये दिवेआगर येथील एक हजार २५० मीटरचा बंधारा बांधण्यासाठी १० कोटी रुपये खर्च येणार आहे. उर्वरित कामासाठी आणखीन ३० कोटी रुपयांची गरज लागणार असल्याचे पतन उपअभियंता विजय जावीर यांनी सांगितले.निधीची तरतूद लवकर गरजेचीयेथील बंधारे लवकरच निर्माण झाल्याने समुद्राच्या पाण्यापासून संरक्षण होऊन ते बंधारे पर्यटकांच्या सुविधेसाठीही वापरता येणार आहेत. यासाठी सरकारने निधीची तरतूद लवकर करणे गरजेचे असल्याचे येथील स्थानिक सिध्देश शिलकर यांनी सांगितले.सरकारकडे निधीची कमतरता असल्याने बंधाऱ्याचे काम टप्प्याटप्प्याने करण्यात येणार आहे. बंधाऱ्यांमुळे समुद्राचे पाणी अडविले जाणार आहेच तसेच त्या बंधाऱ्यांचा पर्यटकांनाही वापर करता येणार आहे. त्यामुळे पर्यटन वृध्दीसाठी ते पोषक आहे.- अनंत गीते, केंद्रीय अवजड उद्योगमंत्री