शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

समुद्रकिनारी ४० कोटींचे बंधारे

By admin | Updated: November 18, 2015 00:50 IST

श्रीवर्धन तालुक्यातील दिवेआगर समुद्र किनारी सुमारे ४० कोटी रुपये खर्चून दगडी बंधारा बांधण्याचे काम पतन विभागामार्फत लवकरच हाती घेण्यात येणार आहे. समुद्राचे पाणी अडविण्यासाठी

- आविष्कार देसाई,  अलिबागश्रीवर्धन तालुक्यातील दिवेआगर समुद्र किनारी सुमारे ४० कोटी रुपये खर्चून दगडी बंधारा बांधण्याचे काम पतन विभागामार्फत लवकरच हाती घेण्यात येणार आहे. समुद्राचे पाणी अडविण्यासाठी तसेच पर्यटकांच्या सुविधेसाठीही त्याचा वापर करता येणार आहे. दिवेआगर हे सांसद आदर्श ग्राम म्हणून गणले जात असतानाच पर्यटन वृध्दीने तालुक्याचा आर्थिक कायापालट करण्यास हे बंधारे मैलाचे दगड ठरण्याची शक्यता आहे. रायगड जिल्ह्याला लाभलेले विस्तृत समुद्र किनारे आणि तेथील नारळी-पोफळीच्या बागांनी निसर्गाचे सौंदर्य आणखीन खुलून दिसते. अलिबाग, मुरुड आणि श्रीवर्धन तालुक्याला विस्तृत समुद्र किनारे लाभले असल्याने पर्यटकांना नेहमीच ते आकर्षित करीत आले आहेत.तत्कालीन पालकमंत्री सुनील तटकरे यांनी दिवेआगरच्या रूपनारायण मंदिराला नवे रूप दिले होते. त्याचप्रमाणे श्रीवर्धन समुद्र किनारी कोट्यवधी रुपये खर्च करून सुशोभीकरण केले आहे. या सोयी-सुविधांमुळे येथील पर्यटन व्यवसायाला चांगलीच झळाळी प्राप्त झाली. अवजड उद्योगमंत्री अनंत गीते यांनी लोकसभेच्या निवडणुकीत तटकरेंचा पराभव केला होता. दिवेआगर हे गाव आदर्श सांसद ग्राम योजनेअंतर्गत दत्तक घेतले आहे. त्यामुळे तटकरेंनी विकास केला त्याहीपेक्षा जास्त विकास करण्यावर गीतेंचा भर राहिल्यास तो स्थानिकांच्या पथ्यावर पडणाराच आहे. ग्रामस्थांच्या तक्रारीनंतर गीतेंनी दिवेआगरच्या समुद्र किनारी भेट दिली होती. त्यावेळी तेथील काही दगडी बंधारे तुटलेले, सरकलेले दिसून आले. या बंधाऱ्यांची तातडीने चांगली निर्मिती करावी यासाठी प्रयत्न सुरु केले. पतन विभागाने येथील समुद्र किनाऱ्यांची पाहणी केली. सुमारे चार किलोमीटरचे बंधारे निर्माण करण्याची गरज असल्याचा अहवाल पतन विभागाने दिला. यासाठी ४० कोटी रुपये खर्च येणार आहे.समुद्र किनाऱ्यांच्या बंधाऱ्याचे काम पूर्वी पतन विभाग करीत होते. दरम्यानच्या कालावधीत १ एप्रिल २०११ ला हे काम मेरीटाईम बोर्डाकडे देण्यात आले होते. सरकारने २५ मे २०१५ ला हे काम पुन्हा पतन विभागाकडे वर्ग करण्याचे जाहीर केल्याचे पतन उपअभियंता विजय जावीर यांनी सांगितले.१० कोटी रुपये खर्च पहिल्या टप्प्यामध्ये दिवेआगर येथील एक हजार २५० मीटरचा बंधारा बांधण्यासाठी १० कोटी रुपये खर्च येणार आहे. उर्वरित कामासाठी आणखीन ३० कोटी रुपयांची गरज लागणार असल्याचे पतन उपअभियंता विजय जावीर यांनी सांगितले.निधीची तरतूद लवकर गरजेचीयेथील बंधारे लवकरच निर्माण झाल्याने समुद्राच्या पाण्यापासून संरक्षण होऊन ते बंधारे पर्यटकांच्या सुविधेसाठीही वापरता येणार आहेत. यासाठी सरकारने निधीची तरतूद लवकर करणे गरजेचे असल्याचे येथील स्थानिक सिध्देश शिलकर यांनी सांगितले.सरकारकडे निधीची कमतरता असल्याने बंधाऱ्याचे काम टप्प्याटप्प्याने करण्यात येणार आहे. बंधाऱ्यांमुळे समुद्राचे पाणी अडविले जाणार आहेच तसेच त्या बंधाऱ्यांचा पर्यटकांनाही वापर करता येणार आहे. त्यामुळे पर्यटन वृध्दीसाठी ते पोषक आहे.- अनंत गीते, केंद्रीय अवजड उद्योगमंत्री