शहरं
Join us  
Trending Stories
1
लाईफबॉय साबण ८, डव शाम्पू ५५, टूथपेस्ट १६ रुपयांनी स्वस्त झाली; हिंदुस्तान युनिलिव्हरची यादी आली...   
2
आता पश्चाताप करून काय उपयोग? रोखण्याचा प्रयत्न करूनही तरुणीनं खोल पाण्यात उडी घेतली; समोर आला थरकाप उडवणारा VIDEO
3
उल्हासनगरातील हॅन्ड्रेड बारमध्ये महिला वेटर्सचे अश्लील चाळे, महिला वेटर्ससह ९ जणांवर गुन्हा 
4
योगेश आळेकरी यांना मिळाली नवीकोरी दुचाकी; पुढच्या प्रवासाला सुरुवात करणार पण...
5
Sonu Sood : दिलदार सुपरहिरो! "रोटी का कर्ज चुकाना है"; पंजाबमधील पूरग्रस्तांसाठी सोनू सूदचा पुढाकार
6
मध्य प्रदेश मुख्यमंत्र्यांचा 'ऑन द स्पॉट' निर्णय; महिंद्राचा रतलामचा डीलर ४२० मध्ये तुरुंगात जाणार...
7
'तुम्ही जीआरमध्ये फेरफार करून बघा, मग तुम्हाला मराठे कळतील'; मनोज जरांगेंचा इशारा
8
VIRAL : चोरांनी कार चालकावर झाडली गोळी, पण पुढे जे झालं त्यानं स्वतःच घाबरले! Video बघून सगळेच झाले हैराण
9
या सुंदर प्रदेशावर हिंसाचाराची सावली पडलेली; पंतप्रधान नरेंद्र मोदी मणिपूरमध्ये, म्हणाले...
10
जगातला 'असा' एकमेव देश, जिथे घरात पाळल्या जातात मगरी; विकून होते कोटी रुपयांची कमाई!
11
Who Is Yash Rathod : विदर्भाची रन मशीन! पोट्याचं द्विशतक अवघ्या ६ धावांनी हुकलं
12
Aishanya Dwivedi : Video - "BCCI पहलगाम हल्ला, ऑपरेशन सिंदूर विसरलं; आपण पाकिस्तानला ही संधी का देतोय?"
13
यामाहाची FZ किती रुपयांनी स्वस्त झाली? जुना काळ आठवला..., फसिनो, आर१५ वर किती जीएसटी कमी झाला...
14
धैर्याला सॅल्यूट! देशातील पहिली ट्रान्सजेंडर फोटो जर्नलिस्ट; आता मागते भीक पण स्वप्न आहेत मोठी
15
Reels बनवण्यासाठी अस्वलाला पाजलं कोल्ड ड्रिंक, VIDEO व्हायरल झाल्यावर जे घडलं ते पाहून...
16
१० टक्के पगारवाढ, लॉयल्टी बोनस अन् समायोजन...! एनएचएम कर्मचाऱ्यांचा बेमुदत संप अखेर मागे
17
Sade Sati Upay: एकच रास, तरी साडेसातीचा काळ प्रत्येकाचा वेगळा; ३ महिन्यापूर्वी लागते चाहूल!
18
GST कपातीनंतर 4 लाखांपेक्षाही स्वस्तात मिळतेय ही मारुती SUV; देते 34 km पर्यंत मायलेज; बघा, व्हेरिअँट निहाय सूट...
19
अर्शद वारसी नव्हे, तर 'जॉली एलएलबी'साठी या मराठमोळ्या अभिनेत्याला होती पहिली पसंती, आता होतोय त्याला पश्चाताप
20
"आदित्य ठाकरे बुरख्यात लपून भारत-पाकिस्तान मॅच पाहतील"; मंत्री नितेश राणेंची बोचरी टीका

कोरोनामुळे हरवला फु लांचा सुगंध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2020 00:54 IST

विक्रे त्यांना आर्थिक तोटा : श्रावण महिना सुरू होऊनही मागणी नसल्याने वाढली चिंता

गणेश चोडणेकर ।लोकमत न्यूज नेटवर्कआगरदांडा : मार्च महिन्यापासून संचारबंदी लागू केल्याने व वाहतुकीची सर्व मार्ग बंद केल्यामुळे लोकांचे येणे- जाणे थांबले व वाहतूक व्यवस्था ठप्प झाल्याने सर्व आर्थिक व्यवहारांना मोठा फटका बसला, जीवनावश्यक वस्तूंच्या वाहतुकीशिवाय अन्य कोणत्याही वाहतुकीला परवानगी नसल्याने इतर घटकाची मोठी कोंडी झाली. विवाह व पूजा समारंभासाठी आवश्यक म्हणजे फुलांना खूप मोठे महत्त्व असते. त्यात श्रावण महिना सुरू झाला, तरी फु लांना मागणी नसल्याने विक्रेते काळजीत आहेत.कोरोनाच्या संचारबंदीमुळे मंदिरे, विवाह सोहळ्यांवरही बंधने आली असल्याने बाजारपेठेतील फुलांचा सुगंध हरवला आहे. श्रावण महिना व्रतवैकल्यांचा महिना असल्याने सुगंधी फुलांना मोठ्या प्रमाणावर मागणी असते. त्यानुसार, येथील फुलविक्रेते वाशी, पेण, दादर या मंडई बाजारातून फुले आणून ती मुरुड बाजारात विकतात. सध्या मुरुड तालुक्यात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे, त्यामुळे श्रावण महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात फूल विक्रेत्यांना ग्राहकांची प्रतीक्षा करावी लागत आहे. फुलाचे उत्पादन करणाऱ्या शेतकऱ्यांनीही नेमकेच उत्पादन केल्यामुळे बाजारात फुले नेमकीच येत आहेत. मागणीही कमी झाल्याने याचा परिणाम फुलांच्या किमती वाढण्यावर झाला आहे. ग्राहकांची संख्या रोडावली, सत्कार समारंभ बंद यामुळे एके काळी दहा हजारांचा गल्ला करणारे फुल विक्रेत्यांना आता फार तुटपुंज्या धंद्यावर समाधान मानावे लागत आहे. कोरोनाच्या संकटामुळे स्थानिक फूल उत्पादकांनी यावेळी फुलांचे उत्पादन घेणेही टाळल्याने तेही आर्थिक संकटात सापडले आहेत. यंदा फुलांची मागणी घटल्यामुळे मिळेल त्या दरात फुलांची विक्री उत्पादकांसह विक्रेत्यांना करावी लागत आहे.वाहतूक सुरळीत नसल्याने उत्पन्न कमीसहज वाहतूक होत नसल्याने उत्पादित केलेली फुले मंडईपर्यंत पोहोचवता येत नाही, त्यामुळे फुलांचे भरमसाट उत्पादन न करणेच योग्य आहे. सर्व वाहतूक सुरू झाल्यास फुलांचे मोठ्या प्रमाणवर उत्पादन करू, अशी प्रतिक्रिया दिली आहे. ऐन श्रावण मासात फुलांना वाढती मागणी असताना, ती प्रचंड प्रमाणात घटल्याने फुलांचे उत्पादन करणारे शेतकरी व फूल विक्रेते हे नाराज दिसून येत आहेत.अनेक वर्ष फुलांचा व्यवसाय करून या व्यवसायातूनच उपजिविका चालवत आलो आहे. परंतु यावर्षी कोरोनाच्या संकटामुळे हा व्यवसाय धुळीस मिळाला. कोरोना संकट कमी व्हावा त्याकरिता सरकारने लॉकडाऊन जाहिर केल्याने लग्नसराई , मंदिरे , धामार्कि उत्सव बंद झाले. आता सरकारने लॉकडाऊन शिथिल केल्याने पुन्हा आम्ही व्यवसाय सुरू केला. मात्र, फुलमंडईत फुलांची अवक कमी झाल्याने दरात वाढ झाल्याने ग्राहक कमी झाला आहे. परिणामी खरेदी केलेली फुले खराब होत असल्याने आर्थिक नुकसान होत आहे.- राजेश मुळेकर, फु ल विक्रे ते