शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
2
भारत-पाकिस्तान तणाव शिगेला पोहोचला असतानाच अमेरिकेतून आली 'गुड न्यूज'! ट्रम्प म्हणाले, भारतासोबत होऊ शकतो करार
3
अक्षय्य तृतीयेला 'इतक्या' रुपयांनी स्वस्त झालं सोनं, काय आहे १४ ते २४ कॅरेट सोन्याचे नवे दर
4
PM मोदींच्या कॅबिनेट सुरक्षा समितीच्या बैठकीत मोठा निर्णय; माजी रॉ प्रमुखांकडे सोपवली महत्त्वाची जबाबदारी
5
पाकिस्तानचा खोटारडेपणा, हुतात्मा जवानाच्या आईला भारताने हाकलल्याची पसरवली बातमी, आता समोर आलं सत्य
6
'मुस्लीम रुग्णांवर उपचार करणार नाही' पहलगाम हल्ल्यानंतर इंदूरच्या डॉक्टरची पोस्ट व्हायरल
7
१ मेपासून देशातील १५ बँका होणार बंद; महाराष्ट्रातील बँकांचाही समावेश? खातेदारांच्या पैशाचं काय होणार?
8
"लहानपणापासून मी कित्येक पूजा केल्यात, काही लोकांना आज उत्तर मिळाले असेल"; शरद पवारांचा टोला
9
क्रिकेटसोबत कमाईतही नंबर वन आहे Rohit Sharma, वर्षाला कोट्यवधींची कमाई; कशी आहे लक्झरी लाईफस्टाईल?
10
निर्लज्ज पाकिस्तान! संसदेत, परराष्ट्रमंत्र्यांनी टीआरएफला वाचवल्याची कबुली दिली, म्हणाले, आम्ही त्यांचे नाव यूएनएससीच्या निवेदनातून...
11
ऐश्वर्या-अविनाश नारकर यांचे भन्नाट रील्स; लेकाची काय असते प्रतिक्रिया? म्हणाले, "तो कधीच..."
12
जगातील टॉप १० सर्वात महागडी शहरे; इथे एक दिवसांचा खर्च म्हणजे महिन्याचा पगार
13
वॉरेन बफेंनी १९८८ मध्ये खरेदी केलेले Coca-Cola चे शेअर्स, माहितीये त्यांच्या १ हजार डॉलर्सचं आज मूल्य काय आहे?
14
'माझा मुलगा फक्त १० वर्षांचा आहे आणि...' वैभव सूर्यवंशीबाबत एबी डिव्हिलियर्सचं मोठं वक्तव्य
15
पती सौदीला कमवायला गेला, इथं पत्नीचे जुळले शेजाऱ्याशी अनैतिक संबंध; पती परतला अन् शेवट झाला
16
नवऱ्याची दाढी आवडली नाही, कापण्यास नकार देताच बायको क्लीन शेव असलेल्या दिरासोबत पसार
17
Akshaya Tritiya 2025: यंदाची अक्षय्य तृतीया 'या' पाच राशींसाठी ठरणार खास; धनसंपत्तीची पूर्ण होणार आस!
18
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
19
रणबीर कपूरसोबत रिलेशनशिपमध्ये होती अमिषा पटेल? खुलासा करत म्हणाली, "आम्ही रोमँटिक..."
20
"पहलगामच्या हल्ल्यात धर्म आणायची गरज नाही, तो देशावरचा हल्ला"; 'त्या' विधानावर शरद पवारांचे स्पष्टीकरण

आरोग्यसेविकांचा तुटवडा

By admin | Updated: October 31, 2015 23:49 IST

महाड तालुक्यातील दासगांव प्राथमिक आरोग्य केंद्र मुंबई-गोवा महामार्गालगत आहे. महामार्गावर होणाऱ्या अपघातातील जखमींना उपचारासाठी सोयीचे असे हे एकमेव प्राथमिक

दासगांव : महाड तालुक्यातील दासगांव प्राथमिक आरोग्य केंद्र मुंबई-गोवा महामार्गालगत आहे. महामार्गावर होणाऱ्या अपघातातील जखमींना उपचारासाठी सोयीचे असे हे एकमेव प्राथमिक आरोग्य केंद्र आहे. या आरोग्य केंद्रांतर्गत २२ गावे व १८ वाड्यांचे उपकेंद्र आहे. या प्राथमिक आरोग्यकेंद्रावर दोन डॉक्टर काम करीत असून, या केंद्रात एक ा आरोग्यसेविकेची गरज आहे. मात्र हे पद रिक्त असल्याने या ठिकाणी उपचारासाठी रात्री-अपरात्री येणाऱ्या रुग्णांचे हाल होत आहेत.महाड तालुक्यातील दासगांवमधील प्राथमिक आरोग्य केंद्र मुंबई-गोवा महामार्गावरचे महत्त्वाचे आरोग्य केंद्र आहे. या आरोग्य केंद्रातंर्गत २२ गावे व १८ वाड्यांचा समावेश आहे. या केंद्रांतर्गत दासगांव, टोळ, देशमुख कांबळे, इसाने कांबळे, राजेवाडी अशी पाच उपकेंद्रे आहेत. या सर्व केंद्रांची देखरेख सबसेंटर असलेल्या दासगांव प्राथमिक आरोग्य केंद्रावरूनच केली जाते. मुंबई-गोवा महामार्गावर होणाऱ्या अपघातातील जखमींवर उपचारसाठी जवळचे एकमेव दासगांव प्राथमिक आरोग्य केंद्र आहे. मात्र या आरोग्य केंद्रावर गेले नऊ महिने आरोग्यसेविकेचे पद रिक्त असल्याने रात्री-अपरात्रीच्या वेळी उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांचे हाल होत आहेत.दासगांव प्राथमिक आरोग्य केंद्रावर वहूर, दासगांव, केंबुर्ली, दाभोळ, टोल, वीर या गावातून गोरगरीब जनता उपचारासाठी येत असते. तसेच या विभागात अपघातग्रस्तांच्या मदतीचे एकमेव ठिकाण आहे. या केंद्रावर महिन्यात सरासरी ६०० ते ७०० रुग्ण उपचार घेत असून, गेल्या जून या एका महिन्यात १,१५० रुग्णांवर या प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार करण्यात आले. मात्र अशा परिस्थितीत जिल्हा आरोग्य विभागाकडून याकडे दुर्लक्ष केले जात असल्याने या ठिकाणी एकच आरोग्यसेविकेचे पद असून, तेही नऊ महिने रिक्त ठेवण्यात आल्याने रुग्णांकडून आरोग्य विभागाविरुद्ध संताप व्यक्त होत आहे. सध्या प्राथमिक आरोग्य केंद्रावर टोळ गावच्या उपकेंद्रावर आरोग्यसेविका म्हणून असलेल्या जाधव या ठिकाणी रात्रीच्या वेळी रुग्णांना सेवा देतात. या उपकेंद्रांतर्गत सहा गावे आणि १३ वाड्या आहेत. मात्र १३ वाड्यांमध्ये सात वाड्या डोंगराळ भागातील आदिवासी वाड्या आहेत. या परिस्थितीत दोन्ही ठिकाणची जबाबदारी सांभाळणे एकाच आरोग्यसेविकेला अवघड आहे. तरी तातडीने आरोग्यसेविकेची नेमणूक करण्याची मागणी या विभागातील जनतेकडून केली जात आहे. (वार्ताहर)दासगांव, चिंभावे, बीरवाडी अशा तीन आरोग्य केंद्रांवर, आरोग्यसेविकांची पद गेली नऊ महिने रिक्त आहेत. सध्या या ठिकाणी अंतर्गत असणाऱ्या उपकेंद्रावर अदलाबदल करीत आरोग्यसेविकांची ड्युटी लावण्यात येत असून, रुग्णांची गैरसोय दूर करण्यात येत आहे. रिक्त पदांची माहिती जिल्हा आरोग्य कार्यालयाकडे पाठवून आरोग्यसेविकांची मागणीही करण्यात आलेली आहे. काही दिवसांत आरोग्यसेविकांची भरती होणार आहे. प्राधान्याने रिक्त पदे पहिली भरली जातील. - राजेंद्र शिंदे, तालुका आरोग्य अधिकारी.