शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
3
यावेळी तीन तुकडेच करा! पीएम मोदींनी काल पाच उच्चस्तरीय बैठका घेतल्या
4
आजचे राशीभविष्य, १ मे २०२५: व्यापारात फायदा अन् नोकरीत बढतीची शक्यता
5
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
6
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
7
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
8
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
9
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
10
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
11
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
12
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
13
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
14
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
15
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
16
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
17
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
18
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
19
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
20
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!

सावित्री-गांधारी नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली, महाड शहराला पुराचा धोका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 30, 2017 01:32 IST

गणेशाचे आगमन झाल्यापासून गेल्या पाच दिवसांपासून सुरू झालेली पावसाची रिपरिप अद्यापही कायम असून, गेल्या २४ तासांत कोसळणाºया मुसळधार पावसामुळे शहरानजीकहून वाहणाºया सावित्री आणि गांधारी नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे.

महाड : गणेशाचे आगमन झाल्यापासून गेल्या पाच दिवसांपासून सुरू झालेली पावसाची रिपरिप अद्यापही कायम असून, गेल्या २४ तासांत कोसळणाºया मुसळधार पावसामुळे शहरानजीकहून वाहणाºया सावित्री आणि गांधारी नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे. त्यामुळे महाड शहराला पुराचा धोका निर्माण झाला असून, महामार्गावरून शहराकडे येणारा दस्तुरी मार्ग मंगळवारी दुपारी ४ वा. पाण्याखाली गेल्याने हा मार्ग वाहतुकीसाठी बंद झाला आहे. तर शहराच्या सखल भागातही नद्यांचे पाणी शिरण्याची भीती व्यक्त केली जात आहे. ऐन गणेशोत्सवात पडणाºया या मुसळधार पावसामुळे तसेच पुराच्या शक्यतेने शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. तर सततच्या पावसामुळे गणेशभक्तांच्या उत्साहावर अक्षरश: पाणी पडल्याचे दिसून येत आहे.गेल्या २४ तासांत महाड तालुक्यात ११३.५० मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. पूरपरिस्थितीच्या पार्श्वभूमीवर शहरातील जनजीवन विस्कळीत झाले असून, ग्रामीण भागातील नागरिक शहरात न फिरकल्याने बाजारपेठेत वर्दळ कमी होती. तर ऐन गणेशोत्सवात गिºहाईक नसल्याने व्यापाºयांमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे. दस्तुरी मार्ग पाण्याखाली गेल्याने हा मार्ग दुपारनंतर वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आला आहे. पावसाचा जोर असाच कायम राहिला तर पुराचा धोका वाढण्याची भीती शहरवासीयांमध्ये व्यक्त के ली.म्हसळा शहरात रस्त्यांवर साचले पाणीम्हसळा : शहरात मागील दोन दिवस पडत असलेल्या पावसाने ठिकठिकाणी पाणी साचण्याच्या घटना घडत आहेत. विकासकांनी सर्व नियम धाब्यावर बसवून केलेली कामे, तसेच नगरपंचायतीने केलेल्या नालेसफाईचा दावा पूर्णपणे फोल ठरत असल्याने माणगाव-दिघी राज्यमार्ग, म्हसळे शहरात एस.टी. स्टॅण्ड परिसर व दिघी मार्ग पाण्याखाली गेला आहे. अरुंद गटारांमुळे पावसाच्या पाण्याचा तसेच सांडपाण्याचा निचरा रस्त्यावरून झाल्याने, या रस्त्याला नदीचे स्वरूप आले आहे. या रस्त्यालगत म्हसळा महावितरणचे कार्यालय असून, येथे एक फुटाच्या वर पाणी साचले आहे. म्हसळ्याकडून दिवेआगर, दिघीकडे जाणारा हा प्रमुख व एकमेव राज्यमार्ग आहे. हा रस्ता पाण्याखाली असल्यामुळे वाहनचालक व प्रवाशांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागतोय.गौरीचे आगमन होणार असल्याने बाजार करण्यासाठी आसपासच्या गावांतील नागरिक मोठ्या संख्येने येत आहेत, त्यातच शहरातील रस्ता पाण्याखाली गेल्याने ठिकठिकाणी मोठे अपघाती खड्डे पडले असून, दुचाकीस्वार येथे पडण्याच्या घटना रोज होत आहेत. या रस्त्याच्या दुरवस्थेकडे कोणीही पाहत नसल्याने नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.म्हसळे शहरातून जाणारा हा राज्यमार्ग दिवेआगर पर्यटनस्थळ, तसेच दिघी पोर्टला जाणारा एकमेव मार्ग असल्याने या मार्गावरून प्रवासी वाहनांसोबत पर्यटकांची वाहने व दिघी पोर्टकडून होणारी ओव्हरलोड वाहतूक प्रामुख्याने ३५ टन वजनाची लोखंडी कॉइल व कोळसावाहतूक कारणीभूत असल्याने रस्त्यावरील खड्ड्यांच्या प्रमाणात वाढ होऊन रस्त्यावर खडी पसरली आहे व त्यातच रस्त्यावर पाणी साचल्याने नागरिक, प्रवाशांची तारांबळ उडाली झाली आहे.अतिवृष्टीमुळे जनजीवन विस्कळीतपनवेल : गेल्या चार दिवसांपासून सुरू असलेली पावसाची संततधार मंगळवारी वाढल्याने पनवेलमधील जनजीवन विस्कळीत झाले आहे. मंगळवारी पावसाचा जोर वाढल्याने रेल्वेसेवाही ठप्प होती. पनवेल शहरातून जाणाºया सायन-पनवेल, मुंबई-गोवा महामार्गावर काही ठिकाणी पाणी साचले होते. दोन दिवसांत पनवेलमध्ये शंभर मिलीमीटरपेक्षा जास्त पावसाची नोंद करण्यात आली. रायगड जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वतीने पुढील २४ तासांत अतिवृष्टीचा इशारा दिला आहे.पनवेल आयटीआयसमोर सोमवारी झाड पडल्याने काही काळ रस्ता बंद झाला होता. पनवेलमधील गाढी नदी दुथडी भरून वाहत होती. विशेष म्हणजे, मंगळवारी गौरीचे आगमन असल्याने अनेक जण खरेदीसाठी बाहेर पडले होते. मात्र, मुसळधार पावसाने अनेकांच्या खरेदीवर याचा परिणाम झाला. मुंबईला जाणाºया लोकल सेवा ठप्प झाल्याने अनेकांना महामंडळाच्या बसेसवर व खासगी गाड्यांवर अवलंबून राहावे लागले होते. मात्र, रस्त्यावर साचलेल्या पाण्यामुळे वाहतुकीचा वेगही मंदावला होता. सायंकाळी उशिरापर्यंत पावसाचा जोर कायम होता.मुंबई-गोवा महामार्गावर गणेशोत्सवाच्या काळात वाहनांची वर्दळ मोठी असते. मात्र, ठिकठिकाणी पाणी साचल्याने ही वाहतूक संथ झाली आहे. सायन-पनवेल महामार्गावर खारघर टोलनाका परिसर व कळंबोली बस स्थानकाजवळ पाणी साचले होते.