शहरं
Join us  
Trending Stories
1
अनेक तर्कवितर्कांनंतर अखेर पंतप्रधान मोदी आणि कॅनडाच्या पंतप्रधानांची भेट, चर्चेत झाला मोठा निर्णय   
2
Air India: एअर इंडिया ड्रीमलाइनरची जगभरातील सहा उड्डाणे रद्द
3
राज्यात हिंदीची सक्ती नाही, पण सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी अनिवार्य!
4
Supreme Court: मुंबईविषयी तुम्हाला काही तरी वाटू द्या, अन्यथा तिथे सर्वत्र अतिक्रमण होईल- सर्वोच्च न्यायालय
5
आजचे राशीभविष्य - १८ जून २०२५, खूप मोठा आर्थिक लाभ होईल, सामाजिक स्तरावर यश आणि कीर्ती वाढेल
6
ठाणे, रायगडमधील अनेक पूल बनले धोकादायक!
7
आजचा अग्रलेख: तेलाचा भडका निश्चित!
8
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
9
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
10
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
11
Ahmedabad Plane Crash: कॅप्टन सुमित सभरवाल यांच्यावर अंत्यसंस्कार!
12
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
13
Ahmedabad Plane Crash: एअर होस्टेस मैथिली पाटील हिला साश्रुनयनांनी अखेरचा निरोप
14
विशेष लेख: नायजेरियात पाण्यावरून वाद: १०,००० ठार!
15
लेख: शहरे 'एक्स्प्रेस' धावत सुटली, गावखेड्यांनी काय करायचे?
16
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
17
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
18
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
19
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
20
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!

काशिद समुद्रात बुडून सांबराचा मृत्यू

By admin | Updated: July 6, 2016 01:52 IST

काशिदचा समुद्रकिनाऱ्यावर मंगळवारी सकाळी समुद्रकिनारी एक सांबर पळत होते व काही कुत्री त्याच्यामागे धावत होती. यामुळे जिवाच्या आकांताने हे हरीण समुद्राच्या पाण्यात शिरले

मुरुड/ जंजिरा : काशिदचा समुद्रकिनाऱ्यावर मंगळवारी सकाळी समुद्रकिनारी एक सांबर पळत होते व काही कुत्री त्याच्यामागे धावत होती. यामुळे जिवाच्या आकांताने हे हरीण समुद्राच्या पाण्यात शिरले यामुळे त्याचा बुडून मृत्यू झाला. गावाला लागून असलेल्या फणसाड अभयारण्यातून हे सांबर समुद्राच्या दिशेला आले असल्याचे येथील ग्रामस्थांना समजले. सर्वप्रथम फणसाड वनपरिक्षेत्राचे वनाधिकारी तडवी यांना घटनेची माहिती देण्यात आली. त्यानंतर सर्वांनी कुत्र्यांना हुसकावले मात्र ते सांबर आणखीनच पाण्यात शिरू लागले. पावसाळी वातावरणात खवळलेल्या समुद्रात शिरणे अशक्य असते. लगेचच वनपाल एम. एम. पाटील, एम. डी. टेमकर, एस. एच. पेडवी यांनी ग्रामस्थांसह प्रयत्नांची पराकाष्ठा केली. मात्र तोपर्यंत हरीण समुद्रात आत शिरले आणि त्याचा बुडून मृत्यू झाला.मादा जातीचे हे सांबर किमान १५० किलो वजनाचे होते. हिंस्त्र श्वापदाच्या अथवा चोरट्या शिकारींच्या पाठलागात हे सांबर फणसाड अभयारण्य क्षेत्र सोडून भरकटलेल्या अवस्थेत समुद्रकिनारी आल्याची शक्यता वर्तवली जात आहे. दुसरीकडे पावसाळ्यात चोरटी शिकार मोठा प्रमाणात होते असे अनेकदा निदर्शनास येते. आदिवासी आता अशा शिकार करत नाहीत, मात्र अवैध शिकारीचे प्रकार घडतात. त्यामुळे हा प्रकार अवैध शिकारींच्यामुळे झाल्याचा आरोप निसर्गसाथी संस्थेचे कार्यकर्ते बाबू सुर्वे यांनी केला. या हरणाचा पंचनामा करून त्याबाबत पूर्ण चौकशी करणार असल्याचे फणसाड अभयारण्याच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. (वार्ताहर)